Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी शहरातील विनोद ठोळे यांनी आयुर्विमा क्षेत्रात जळगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेले आहे. आयुर्विमा क्षेत्रात अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले आणि नव व्यावसायिकांना, एलआयसी एजंटांना प्रोत्साहन देण्याचे काम विनोद ठोळे करीत आहेत. सध्या त्यांनी सर्वोच्च असलेली अमेरिकन संस्था “एमडीआरटी” चे सदस्यत्व मिळविलेले आहे. भारतात सर्वात जास्त “एमडीआरटी” एजंट घडविण्याचा त्यांनी पराक्रम केला आहे. एलआयसीतर्फे आता शनिवारी १३ व १४ रोजी दिवसभर विमा प्रतिनिधी नेमणूक अभियान राबविण्यात येत आहे. सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत इयत्ता १० वी पास व १८ वर्षे पूर्ण असणारे तरुण मुलाखतीसाठी येऊ शकतात. मुलाखत कोर्टाच्या मागे रोझ गार्डन जवळ टिमवन कन्सल्टन्टच्या कार्यालयात होणार आहेत. तरुणांनी सुवर्णसंधीचा…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी  पाचोरा शहरातील महाराणा प्रताप चौकात भरधाव पिकअप वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहनाने रस्त्यालगत असलेल्या दत्त मंदिरासमोर बसलेल्या चौघांना उडवल्याची घटना शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात चार जणांपैकी दोन जणांचे पायाचे जागेवरच तुकडे पडून दोन्ही पाय निकामी झाले आहेत. तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. भडगावकडून बुलढाण्याकडे एम.एच. ४८ बीएम. ७९४३ या क्रमाकांचे पिकअप वाहन जात होते. यादरम्यान वाहन पाचोरा शहरातून जात असताना वाहनावरील चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव वाहनाने रस्त्यालगत असलेल्या दत्त मंदिरासमोर बसलेल्या वसंत भाईदास पाटील, विनोद पाटील, अमोल वाघ आणि कुंदन परदेशी या चार जणांना जोरदार धडक दिली. या जखमींवर खासगी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील तांबापुरा परीसरातील गौतमनगरात जुन्या वादातून आरोपींनी एका दाम्पत्यास मारहाण करीत त्यांच्याकडील रोकड तसेच दागिणे असलेली 33 हजारांचा ऐवज असलेली पर्स लांबवल्याने एमआयडीसी पोलिसात यात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या दोघा आरोपी पती-पत्नीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. संजना फरहान शेख व फरहान शब्बीर शेख असे अटकेतील दाम्पत्याची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापुर परिसरातील गौतम नगराताील तबस्सुम आरा इक्बाल खान (21) यांच्या तक्रारीनुसार, त्या एका रुग्णालयात अकाउंटंट असून 9 रोजी रात्री साडेआठ वाजता घराकडे येत असताना संशयित संजना फरहान शेख व तिचा पती फरहान शब्बीर शेख (दोन्ही रा.तांबापुरा) यांनी अडवत तुझी आईला समजावून सांग,…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  राज्यातील ठाकरे गटाला न्यायालयाने धक्का दिला आहे. तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार वाचलेले असल्याने राज्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावात देखील जल्लोष करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांनी फटाके फोडून केले स्वागत करीत पाळधी येथे जल्लोष साजरा केला फटाके फोडून जय भवानी ,जय शिवाजी चा नारा देत जल्लोष साजरा केला या वेळी उपस्थित मध्ये ग्रामपंचायत सदस्य डिंगबर माळी , युवासेना विधानसभा क्षेत्र प्रमुख आबा माळी, गुलाब माळी, योगेश पाटील, लखन पाटील,चंदू पवार, अक्षय पाटील , जितेंद्र माळी, बंटी पाटील , समाधान वाघ,अनिल कोळी, अजय…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  भुसावळ येथील छबीलदास मार्केटसमोरील गणेश ट्रेडिंग दुकानाचे संचालक मोहन चावराई यांना आधी बंदूक दाखवून पैशांची मागणी केली. पैसे न मिळाल्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरून नेली आहे. मात्र चावराई यांनी साखळी पकडून ठेवल्याने चोरट्यांना फक्त अर्धीच साखळी मिळाली. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलिस निरीक्षक गजानन पडघम घटनास्थळी दाखल झाले होते, तर माजी नगरसेवक निक्की बत्रा अजय नगराणी हेसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. चावराई हे दुकान बंद करत असताना दोन चोरट्यांनी येऊन चाकू व बंदूक दाखवून पैशांची बॅग मागितली. बॅग नसल्याने गळ्यातील सोन्याची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शिष्यवृत्ती परीक्षेत नापास करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तुषार शांताराम माळी (३३, रा. नशिराबाद परिसर) या खासगी क्लासच्या शिक्षकास जिल्हा न्यायालयाने गुरुवारी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणामध्ये पीडित मुलीला बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण नियम २०१२ मधील कायदा ७ नुसार महाराष्ट्र शासनाकडून १० लाख रुपये रक्कम पुनर्वसनासाठी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच आरोपीला २ लाख २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यातील ५० टक्के रक्कम पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने केले आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील एका ३५ वर्षीय महिलेस लग्नाचे आमिष देत एका ने फार्म हाऊसवर नेत तिच्यावर अत्यचार केल्या प्रकरणी एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्ण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरातील रहिवासी असलेल्या एका ३५ वर्षीय महिलेले मार्च २०२० पासून ते ८ फेब्रुवारी २०२३ पर्यत संशयीत आरोपी अंकुश मारुती महाजन (माळी) याने लग्नाचे आमिष दिले होते. या काळात फिर्यादी महिलेस संशयित आरोपीने ८ फेब्रुवारी रोजी एरंडोल ते जळगाव हायवे क्र.६ च्या बाजूला असलेल्या एका फार्म हाऊसवर फिर्यादीस दुचाकीने नेत महिलेवर शारीरिक संबध केल्याने पिडीत महिलेने एरंडोल पोलिसात धाव घेत संशयित आरोपी अंकुश महाजन(माळी) याच्या विरोधात गुन्हा दाखल…

Read More

सुट्टीच्या काळात अनेकांना फिरायला जायला आवडते. लोक इन्जॉय करण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसोबत बाहेर जातात. पर्यटनस्थळी हॉटेल अथवा एखाद्या भक्तनिवासात मुक्काम करतात. पण आता एखादा बंगला किंवा रूमही भाड्याने घेण्याचा ट्रेंड आहे. हॉटेलच्या तुलनेने हे स्वस्त आणि मस्त असल्याने अनेक पर्यटक याचा वापर करतात. परंतु हे किती घातक ठरू शकते याचा प्रत्यय एका महिलेला आला आहे. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियात १४ मैत्रिणीसोबत फिरायला गेलेल्या २६ वर्षीय Kennedy CalWell सोबत जे घडले त्याने तिच्यासह तिचे फ्रेंडही घाबरले आहेत. एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त आलेल्या लेडीज ग्रुपमधील मुलीला घरात काहीतरी अजब घडत असल्याचा संशय आला. अशावेळी मुलींनी फ्लॅश लाईट ऑन करून घरातील कानाकोपरा शोधण्यास सुरूवात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठा निकाल आज हाती आलेला आहे. यात ठाकरे गटाला जरी धक्का असला तरी शिंदे गटातील ‘त्या’ १६ आमदारांवर आजही संकट कायम आहे. गेल्या ११ महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तीवाद केला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने यावरील निकाल राखून ठेवला होता. सुप्रीम कोर्टाने आज ११ मे यावरील निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आता यावर निकाल देतील. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं सरकार बचावलं आहे. राहुल नार्वेकर आता याप्रकरणी काय निकाल देतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. २००१ मध्ये अजनबी हा चित्रपट अब्बास-मस्तान यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, बॉबी देओल, करीना कपूर आणि नवोदित बिपाशा बसू मुख्य भूमिकेत होते. पत्नी स्वॅपिंगची संकल्पनाही या चित्रपटात दाखवण्यात आली होती. चित्रपटाला शोभेल अशी घटना इथं घडली आहे. त्यात आता बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली. देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. त्यात आता बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली. खुद्द पतीनेच स्वत:च्या पत्नीला दुसऱ्या पुरूषासोबत संबंध प्रस्थापित करण्यास सांगितल्याची बाब समोर आली आहे.…

Read More