जळगाव : प्रतिनिधी शहरातील नवीन बस स्थानकावर आलेल्या एका महिलेचे तब्बल लाखो रुपयाचे दागिने अनोळखी इसमाने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिडको शहरातील सत्यम पार्क परिसरातील रहिवासी स्नेहन अजित तायडे (वय ३१) हि महिला दि १० रोजी दुपारच्या सुमारास जळगाव ते यावल येथे जाण्यासाठी शहरातील नवीन बसस्थानक परिसरात येत बस मध्ये बसत असतांना अनोळखी इसमाने त्यांच्या ताब्यातील ५० हजार किमतीचे सोन्याची पोत ४० हजार रुपये किमतीची सोन्याची लहान पोत, १० हजार किमतीचे सोन्याचे टोगल, १२ हजार किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण १ लाख १२…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात एकीकडे सत्तासंघर्षाच्या निकालाची उत्सुकता वाढली असतांना एक मोठी बातमी समोर आ ली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचलनालयाने नोटीस पाठवली आहे. सोमवारी १५ मे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. IL&FS प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस पाठवल्याचे समोर येत आहे. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. ईडीने नोटीस पाठवल्याच्या वृत्तावर जयंत पाटील यांनी मात्र अद्याप अशी कोणती नोटी मिळाली नसल्याचं…
चाळीसगाव : प्रतिनिधी लोखंडवाला कॉम्प्लेक्ससमोर भडगाव रोड येथे हळदीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या टेम्पोवरील स्पीकर बंद करण्याकरिता गेलेल्या दोघा पोलिसांना मारहाण करण्यात आली असून याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ मे रोजी रात्री उशिरा घडली. चाळीसगाव पोलिस स्टेशनचे पो. कॉ. विजय अभिमन महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते ९ मे रोजी रात्री गस्त घालत असताना मध्यरात्री १२:१५ वा. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी फोन करून भडगाव रोड चाळीसगाव या परिसरात स्पीकर बंद करण्याचे आदेश दिले. टाकळी प्र. चा. हद्दीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स समोर लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम सुरू होता. त्याठिकाणी टेम्पोवर (एमएच ०४ / डीके ६६९७) मोठ्या…
पारोळा : प्रतिनिधी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा पारोळा शहराबाहेरील बायपासवर इंडिका व्हिस्टाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार तर तीन जखमी झाल्याची घटना दिनांक ९ रोजीच्या दुपारच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे कडून एम एच १९ बी यू १७१७ हि इंडिका व्हिस्टा गाडी ही जळगाव कडे जात असताना पारोळा बायपास वर तिला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.त्यात बबलू अनुसे (३५) दुर्गाबाई अनुसे (६४) गोपीबाई कोकरे (६०) हे जखमी झाले तर पुष्पाबाई रमेश काले (४५) यांचा जागीच मृत्यू झाला.जखमींना रुग्णवाहिकेने पारोळा कुटीर रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. येथील बायपास वर तिन दिवसात किरकोळ पाच तर मोठें…
जळगाव : प्रतिनिधी रावेर शहरासह परिसरामध्ये दहशत माजविणाऱ्या तीन गुन्हेगारांना जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. टोळी प्रमुख इरफान हबीब तडवी (२१), जमील उर्फ गोलू बिस्मिल्ला तडवी (२०) व शब्बीर रमजान तडवी (२२, तिन्ही रा. पिंप्री, ता. रावेर) असे हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. तिन्ही गुन्हेगार हे टोळीने राहून रावेर शहरासह परिसरामध्ये दहशत पसरवीत होते. टोळीची नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊन नागरिकांचे जीवितास व जंगम मालमत्तेस धोका निर्माण झाला होता. त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली नव्हती. त्यामुळे तिघांचा हद्दपार प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाची उपविभागीय पोलिस अधिकारी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या आठ महिन्यापासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या निकाल उद्या ११ मे रोजी सुप्रीम कोर्टानं राखून ठेवलेला असल्याने तो जाहीर होणार आहे, सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडून निर्णय जाहीर केला जाणार आहे. यामुळं आता राज्यात पुन्हा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, “उद्या घटनापीठाकडून दोन प्रकरणांवर निकाल दिला जाणार आहे” यामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल तसेच दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील खटल्यावरही अंतिम निकाल दिला जाणार आहे. दिल्लीच्या राज्यपालांकडून वारंवार प्रशासकीय कामात हस्तक्षेप केला जात असल्याचं हे प्रकरण आहे, असं…
मुंबई : वृत्तसंस्था भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत हि टीका केली आहे. यावेळी नितेश राणे यांनी टीका करताना संजय राऊत यांना धमकी दिली.’तू आमच्या नेत्यांवर टीका कर मी तुझ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडणार’ असा इशारा नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडावेत अशी संजय राऊत यांची इच्छा दिसते असा उपरोधिक टोलादेखील नितेश राणे यांनी लगावला आहे. नितेश राणे नेमके काय म्हणाले? ‘तू…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील सुनावणी 20 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप असलेले खासदार संजय राऊत हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्या जमीनला ईडीने विरोध केला होता. त्यानंतर आज (10 मे) खासदार संजय राऊत मुंबई सत्र न्यायालयात हजर झाले होते. मात्र आरोपी सारंग आणि राकेश वाधवान आजही कोर्टात गैरहजर राहिले. गुरूआशिष कंपनी ही दिवाळखोर घोषित झाल्यानं प्रकरण एनसीएलटी प्रलंबित असल्याचं आज कोर्टात स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे गुरूआशिषला आरोपी बनवण्यात आल्यानं त्यांची कोण जबाबदारी घेणार?, हे अद्याप स्पष्ट नाही. सारंग आणि…
राज्यातील प्रसिद्ध धामिक स्थळ असलेल्या शेगाववरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या बसचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. हा अपघात बुलडाण्याजवळ झाल्याचे कळते. पुण्याच्या दिशेनं निघालेली बस पैनगंगा नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यामध्ये १ महिलेचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेगाववरून पुण्याच्या दिशेला बस निघालेली होती. या अपघातामध्ये बसमधील १७ जन गभीर जखमी असून त्यातील एक महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अपघाताचा तपास बुलडाणा पोलिस करत आहेत. बुलडाण्याच्या शेगाववरुन पुण्याला जाण्यासाठी निघालेल्या प्रवासी बसला मंगळवारी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास अपघात झाला. स्वरा ट्रॅव्हल्सच्या खासगी लक्झरी बसला हा अपघात झाला आहे. चिखली रोडवरील पेठजवळ ही घटना घडली. पेठ या…
जळगाव : प्रतिनिधी आव्हाने गावातून चोरटी वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर कोतवाल यांनी पकडले असता त्यांच्या हातावर तुरी देत चालकाने वाहन पळवून नेल्या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात दोन जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरापासून जवळ असलेल्या आव्हाने परिसरातील गिरणा नदीपात्रातून चोरटी वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर दि ९ रोजी १२.३० वाजेच्या सुमारास आव्हाने शिवारातील स्मशानभूमी जवळ आले असता कोतवाल किशोर चौधरी यांनी वाहतूक करणाऱ्यास थांबविले असता. त्याने ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाल किशोर चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर मालकासह एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

