Author: editor desk

अमळनेर :  प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातून ३२ वर्षीय तरुणाची दुचाकी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणाच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरातील रहिवासी असलेले राहुल राजेंद्र पाटील(वय ३२) हे दि ७ मे २०२३ बाहेरगावाहून येत आपली दुचाकी क्र.एम.एच.१९.बी.डब्लू,.६०८९ हि अंगणात लावलेली असतांना अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्याची खात्री झाल्यावर अमळनेर पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ.चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.

Read More

रावेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला एकाने जून २०२२ मध्ये तिच्यासोबत चुकीचे कृत्य केल्यानंतर हि अल्पवयीन मुलीस गर्भवती केल्याबाबत एका विरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या  माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावातील ऊस तोडणीसाठी नेहमी प्रवासात असलेले कुटुंब हे आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी नेहमीच बाहेरगावी असते. याच काळात दि १४ जून २०२२ च्या दिवशी बारामती परिसरातील फलटण या गावी असतांना याठिकाणी रावेर तालुक्यातीलच एका इसमाने संबधित परिवारातील सदस्य ऊस तोडणीसाठी गेले असता. त्यांच्या झोपडीत जावून त्यांच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करीत तिच्यासोबत शरीरसंबध ठेवले असता तीस गर्भवती करून अशा अवस्थेत आणले. त्यामुळे अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातील दोन तरूण कामानिमित मुक्ताईनगर – मलकापूर दरम्यान घोडसगाव गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री सव्वाअकरा वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथील पृथ्वीराज चव्हाण आणि सागर गोपाळ अशी मयतांची नावे आहेत. अज्ञात वाहनाने मोटारसायकलला (एम.एच.१९ / सीएस ६९६८) जोरदार धडक दिली. दोन्ही तरुणांच्या मृतदेहाचे विच्छेदन करून त्यांच्यावर मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यासंदर्भात चरणसिंग सावजी चव्हाण (कापूसवाडी, ता. जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस स्थानकात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था बॉलीवूड क्षेत्रात नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असलेली अभिनेत्री राखी सावंत हिचा भाऊ राकेश अनंत सावंत याला ओशिवरा पोलीसांनी अटक केली आहे. चेक बाऊन्स प्रकरणी त्याला हि अटक करण्यात आली आहे. 3 वर्षांपूर्वी एका व्यावसायिकाच्या तक्रारीवरून कोर्ट केस क्रमांक 96/ss/2021 कलम 138 अ जामीन पात्र वॉरंट वरती राकेशला ही अटक करण्यात आलेली आहे. न्यायालयाने राकेश सावंत यास पैसे परत करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता. मात्र राकेश सावंत याने पैसे परत न केल्यामुळे न्यायालयाने त्याच्या विरुद्ध अटक वॉरंट काढले. यानंतर ओशिवरा पोलिसांनी राकेश सावंत याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 22 मे पर्यंत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील एका मुख्य रस्त्यावरील हॉटेलच्या मागील बाजूस असल्याचा चोरट्यांनी फायदा घेत खिडकीतून आत प्रवेश करून २५ हजारांची रोकड लंपास केल्या प्रकरणी हॉटेल चालकाने तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समर्थ कॉलनीतील रहिवासी असलेले विवेकानंद पाटील यांच्या मालकीचे जळगाव – यावल रस्त्यावर असलेले विदगाव येथे तापी गार्डन नावाने हॉटेल असून दि.५ मे च्या मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी हॉटेलच्या मागील बाजूने प्रवेश करून ड्रॉवरमधील २४ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ लक्ष्मण शिंदे करीत आहे.

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना राजधानी इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) चे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पीएम इमरान खान यांना इस्लामाबाद हाय कोर्टाच्या बाहेर अटक करण्यात आले आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांना अलकादिर ट्रस्ट केसमध्ये करण्यात आले आहे. पीटीआयचे नेते इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. पीटीआयने इम्रान खान यांच्या अटकेचा निषेध केला आहे. त्याचबरोबर इम्रान खान यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद पोलिसांनीही एक निवेदन जारी केले आहे. इस्लामाबादच्या आयजीनी माध्यमांना सांगितले की, इम्रान यांना कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सध्या परिस्थिती सामान्य आहे.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसात राजीनामा माघारी घेतल्याने ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून राष्ट्रवादीचे वाभाडे काढले होते. त्यावर आता शरद पवार यांनी राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. लोकांनी मला थांबू दिले नाही. कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे मी राजीनामा मागे घेतला. आम्ही पक्षात काय करतो हे राऊतांना माहिती नाही. आम्ही काय केलं ते त्यांना माहिती नाही. पक्षातील अनेकांना कॅबिनेट मंत्री पदाची संधी दिली. आम्ही कुणाला संधी दिली आणि काय केलं हे जाहिर करत नाही. त्यामुळे कुणी आमच्यावर टीका केली तर दुर्लक्ष करतो. आम्ही कधी प्रसिद्धी नाही करत. सामना अग्रलेखाला महत्त्व देत नाही. आम्ही…

Read More

इंदौर : वृत्तसंस्था  मध्यप्रदेश मधील खरगोन जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. बोराड नदीवरील पुलावरून एक प्रवासी बस 50 फूट खाली पडली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला. तर 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा 20 पर्यंत वाढू शकतो. या अपघातात चालक, कंडक्टर आणि क्लिनरचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी खरगोनमध्ये झालेल्या बस अपघातावर शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, ही अत्यंत दुःखद घटना आहे. या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. या घटनेत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावातून एक १७ वर्षीय तर एक १६ वर्षीय अशा दोन अल्पवयीन मुलीना अनोळखी इसमाने पळवून नेल्याप्रकरणी एमआयडीसी तर जळगाव तालुका पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी  दिलेल्या माहितीनुसार,  जळगाव शहरापासून जवळ असलेल्या धानवड परिसरातील एका १७ वर्षीय मुलीला दि ८ मे २०२३ रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास मुलगी परिवारासोबत गच्चीवर झोपलेली असतांना अनोळखी इसमाने तिला काही तरी फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी इसमाविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली असून पुढील तपास पोउनी.अनिस शेख हे करीत आहेत. तर दुसऱ्या घटनेत जळगाव तालुक्यातील नांद्र गावातील परिसरातून एका १६ वर्षीय मुलीस दि ८…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  कर्नाटकातील निवडणूकित भाजपने सर्वच शक्ती पणाला लावलेली असतांना  सोमवारी ८ मे संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे. मात्र, भाजप मध्यरात्रीसुद्धा सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले. मतदानाला एक दिवस बाकी असतानाच भाजपनं केलेलं मध्यरात्रीचे ट्विट सध्या चर्चेत आलं आहे. प्रचार थांबल्यानंतरही पंतप्रधान मोदींनी काल रात्री १२.२१ वाजता कर्नाटकच्या जनतेसाठी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. भाजपच्या ट्विटर हँडलवर पंतप्रधानांचा हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी यांनी भाजपला मत देण्याचे आवाहन केले आहे. ‘कर्नाटकला एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी दुहेरी इंजिन सरकारची गरज आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘तुमची स्वप्ने, ही माझी स्वप्ने आहे ती आपण…

Read More