जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय महिलेचा एका इसमाने घरात घुसून अत्याचार केल्याची घटना दि २१ रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पहूर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय महिला आपल्या परिवारासह राहायला आहे. दि २० रोजी रात्रीच्या सुमारास गावातील एक इसम महिलेच्या घरात प्रवेश करीत घराचे दार आतून बंद करीत महिलेशी जबरदस्ती करू लागला यावेळी महिलेने आरडा ओरड करण्यास सुरुवात केल्याने महिलेचे तोंड दाबून महिलेच्या मनाविरुद्ध तिच्यासोबत चुकीचे कृत्य केले व सदर प्रकार जर कुणाला सांगितला तर तुला व तुझ्या मुलाला मारून टाकेल अशी…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था मराठी चित्रपटसृष्टीतील अफलातून अभिनेता म्हणून भरत जाधव यांची ओळख आहे. विनोदी भूमिकांपासून ते अनेक गंभीर धाटणीच्या भूमिका साकारत भरतने प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच राज्य केलं आहे. मालिका असो, चित्रपट असो किंवा नाटक तिन्ही क्षेत्रात भरत नेहमीच सर्रस ठरला आहे. भरत जाधव सध्या चित्रपटांमध्ये झळकत नसला तरी तो नियमितपणे आपल्या नाटकांचे प्रयोग करतच असतो. अशातच काल भरत जाधव आपल्या ‘तू तू मी मी’ या नाटकाच्या प्रयोगासाठी रत्नागिरीला पोहोचला होता. यादरम्यान नाट्यगृहात असं काही घडलं की, अभिनेत्याने नाराजी व्यक्त करत आपण परत इथे कधीही येणार नसल्याचं प्रेक्षकांना सांगून टाकलं. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून येऊन सिनेसृष्टीत आपलं स्वतःच एक वेगळं अस्तित्व निर्माण…
प्रेमात आजवर सर्वच वेडे झाले आहे. त्यांनी प्रेमात काय केले याचा विचार हि कुणी करू शकत नाही. अशीच एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. एका प्रेमी युगुलाच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. खरगोनमधून ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विष पिऊन हे प्रेमी जोडपे स्थानिक पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र पोलिसांना हकीकत समजताच त्यांनाही धक्का बसला. पोलिसांनी तात्काळ दोघांनाही रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान दोघांचीही प्राणज्योत मालवली आहे. या घटनेमुळे दोघांच्याही कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करत तपास सुरु केला आहे. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील या प्रेमी युगुलाने एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती.…
मुंबई : वृत्तसंस्था दोन दिवसापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजाराची नोट कालबाह्य केल्यानंतर देशातील अनेक नागरिकांना मोठा धक्का बसला होता. पण यात चार महिन्याची मुदत दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे तर आज पुन्हा एकदा स्टेट बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. स्टेट बँकेने रविवारी 2000 च्या नोटा बदलण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. भारतातील सर्वात मोठ्या बँकेने म्हटले आहे की, 2000 च्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता नाही. कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. एका वेळी 10 नोटा बदलता येतील. नोटा बदलण्यासंबंधी सोशल मीडियावर वेगवेगळे दावे करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेने ही अधिसूचना जारी केली आहे. नोटा बदलून घेण्यासाठी आधारसारखा आयडी…
चोपडा : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस राहत्या घरातून पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील एका परिसरात १५ वर्षीय मुलगी आपल्या परिवारासोबत राहायला आहे. दि १६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरी असतांना अनोळखी इसमाने मुलीस काही तरी फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील सदस्यांनी अनेक ठिकाणी या मुलीचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने त्यांनी चोपडा शहर पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि.संतोष चव्हाण हे करीत आहेत.
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ३५ वर्षीय विवाहितेचा एकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह राहायला आहे. दि २० रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास विवाहिता मजुरी करण्यासाठी जात असतांना एका डेअरी जवळील मुख्य रस्त्यावर संशयित आरोपीने महिलेचा वेळोवेळी पाठलाग करीत असे तसेच शिट्या मारून गाणे म्हणायचा मुख्य रस्त्यावरून जात असतांना अचानक संशयित आरोपी महिलेला म्हणाला कि, या महिलेने माझ्यावर केस केलेली आहे म्हणत घाणेरड्या शिवीगाळ करू लागला व अश्लील टोमणे देखील मारू लागला यामुळे विवाहितेला लज्जा उत्पन्न झाली…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील एका गावात परराज्यातून आलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाणी मागण्याच्या बहाण्याने एकाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात परराज्यातून मजुरी करण्यासाठी आलेल्या परिवारातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असतांना दि १९ रोजी एकाने घरात असलेल्या मुलीला पाणी मागण्याच्या बहाणा करीत घरात घुसत अल्पवयीन मुलीसोबत चुकीचे कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला असता. त्यांनी लागलीच नशिराबाद पोलिसात धाव घेत एका संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा एकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह रहायला आहे. गेल्या ६ महिन्यापूर्वी यावल तालुक्यातील एका तरुणाने या मुलीशी मैत्री करीत तिला प्रेमाच्या जाळ्यात टाकून वारवार लग्नाचे आश्वासन देत तीन ते चार वेळा सहा महिन्यात जबरदस्ती अत्याचार केले त्यानंतर लग्नास नकार देत समाजात तुझी बदनामी करेल अशी धमकी दिल्याप्रकरणी अल्पवयीन मुलीने रावेर पोलिसात धाव घेत एका तरूणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले हे करीत…
बीड : वृत्तसंस्था मविआ सरकार सत्तेत आल्यापासून ते मविआ सरकार पडेपर्यंत संजय राऊत सातत्याने भाजपावर टीका करताना दिसले. त्यानंतर शिंदे गट वेगळ्या झाल्यावर त्यांच्यावरही राऊतांनी वेळोवेळी तोफ डागली. आम्ही बाळासाहेबांची खरी शिवसेना आहोत, असे संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजही म्हणताना दिसतात. तशातच आज, बीडच्या जाहीर सभेत संजय राऊतांनी तुफान आक्रमक पवित्रा घेत शिंदे गटाला एक ‘ओपन चॅलेंज’ दिलं. “आमचे विरोधक आम्हाला म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून तु्म्ही मते मागितलीत. असं अजिबात नाही. आमचे बाळासाहेब ठाकरे हे १ लाख मोदींवर भारी होते आणि आहेत. कर्नाटकात मोदींनी ३६ जाहीर सभा घेतल्या, २७ रोड शो केले, पण…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसोली गावातील १७ वर्षीय तरुणीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्देवी घटना घडली आहे. घरात एकटी असताना शिरसोलीतील पूजा सुधाकर वंडोळे (बारी) या १७ वर्षीय युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. आई बाहेर गेली असताना पूजा घरात एकटीच होती. तिने घराचा कडीकोयंडा लावला आणि गळफास घेतला. आई घरी आल्यावर दरवाजा उघडत नाही, म्हणून आरडाओरड सुरू केली. तेव्हा शेजारच्या मंडळींनी धाव घेतली आणि दरवाजा उघडला. तेव्हा पूजा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. पूजाला दुपारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी मृत घोषित केले.…

