मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक विध्यार्थिनी १० वीची परीक्षा दिली आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच बारावीचा निकाल जाहीर झाला असून आता दहावीच्या निकालासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. उद्या म्हणजेच 2 जून रोजी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र बोर्ड पुणे कार्यालयातून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे. १० वी चा निकाल कसा पाहाल? अधिकृत वेबसाइट — mahresult.nic.in वर लॉग इन करा. महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 लिंकवर जा. सीट नंबर आणि तुमच्या आईचे…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी धामणगाव जवळील तापी नदीपात्रामध्ये अंघोळ करत असताना अचानक फिट आल्याने रवींद्र आत्माराम कोळी (३०, रा. जैनाबाद) या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जैनाबाद येथील रवींद्र कोळी हा तरुण सेंट्रींग काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. सोमवारी रात्री धामणगाव येथे तो मित्रांसोबत हळदीच्या कार्यक्रमाला गेला होता. रात्रभर तेथेच मुक्काम केल्यानंतर मंगळवारी सकाळी तो मित्रांसोबत गावाजवळ असलेल्या तापी नदीच्या पात्रात अंघोळ करण्यासाठी गेला. रवींद्र हा एकटाच नदीपात्रामध्ये अंघोळ करीत होता. तर त्याचे दोन मित्र काही अंतरावर बसलेले होते. अचानक रवींद्र याला फिट आल्याने तो पाण्यात बुडू लागला.…
छत्रपती संभाजी नगर ; वृत्तसंस्था कोण जास्त मटण खाणार? या वादावरून भयंकर प्रकार घडला आहे. या वादात मित्राने मित्राची हत्या केली आहे. हि घटना छत्रपती संभाजीनगरात घडली आहे. घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सिल्लोड तालुक्यातील धारला या गावात ही घटना घडली आहे. जितेंद्र धृवे आणि ओमजय सूर्यवंशी या दोघांमध्ये मटणाचा वाद सुरू होता. या वादात ओमजयने जितेंद्रच्या डोक्यात रॉड मारली. मारहाण झाल्यानंतर जितेंद्रचा मृत्यू झाला. सिल्लोड तालुक्यातील धारला येथे शेतात मटणाची पार्टी सुरू होती. या पार्टीत मटन कोण जास्त खाणार? यावरून दोन मित्रांमध्ये वाद निर्माण झाला. यानंतर ओमजयने केलेल्या हल्ल्यात जितेंद्रचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे हे दोघे मित्र असून मध्य…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासकामाचा धडाका सुरु केला आहे. त्यांनी नुकताच निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ झाला याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे कौतुक करीत एक मोठे विधान केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निब्रळ येथे जलपूजन करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. निळवंडेसाठी ५३ वर्षे वाटं पाहावी लागली. प्रकल्पाबाबत अनेक चढ-उतार आले. झालं गेलं गंगेला वाहिलं आता स्वच्छ पाणी येणार. मी शेतकऱ्यांचा मुलगा हे काही लोकांना सहन…
जळगाव : प्रतिनिधी शहरापासून जवळ असलेल्या एका वाटर पार्कमध्ये शुटींग करीत असल्याच्या शुल्लक कारणाने पार्कमधील काही कर्मचारीनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणाने एमआयडीसी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या जळगाव जिल्ह्यात कडाक्याचे उन पडत आहे. त्यामुळे अनेक तरुण शहरानजीक असलेल्या झुलेलाल वाटर पार्क परिसरात जात आहेत. याठिकाणी आर्यन प्रितेश भावसार (वय-१९, रा. भवानी पेठ, आठवडे बाजार, जळगाव) हा तरूण आपल्या परिवारासह सोमवारी २९ मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास झुलेलाल वाटर पार्क फिरण्यासाठी आले होते. फिरत असताना कपडे बदलत असतांना शुटींग करत आहे या संशयावरून आर्यन भावसार याला…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ५५ वर्षीय महिलेचा एका डॉक्टराने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धरणगाव तालुक्यातील पाळधी या गावी ५५ वर्षीय महिला रहिवासास आहे. दिनांक २५ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास महिलेने संशयित आरोपी डॉक्टर पाटील याला सांगितले की या ठिकाणी गाडी पार्किंग करू नका याचा राग आल्याने संशयित आरोपी डॉ.पाटील यांनी महिलेला अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली जर तु पोलिसात माझ्याविरोधात तक्रार दिली तर तुला व परिवाराला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील यावेळी दिली. या महिलेने पाळधी दूरक्षेत्र पोलिसात धाव घेत संशयित आरोपी डॉ.उत्पल्ल…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावामध्ये महसूल पथकातील अधिकारी यांनी वाळूचे ट्रॅक्टर दिसले असताना त्याला पकडण्यासाठी जात होते. यावेळी भरधाव वाळूच्या ट्रॅक्टरने पथकाला हुलकावणी देत ट्रॅक्टर पळवून नेल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धरणगाव तालुक्यातील नांदेड फाटा या ठिकाणी मंडळ अधिकारी प्रवीण मधुकर बेंडाळे वय 55 हे दिनांक 29 मे रोजी संध्याकाळी च्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या वाळू ट्रॅक्टर्स थांबविले असता ट्रॅक्टरवरील चालकाने मंडळ अधिकारी यांना हुलकावणी देत एक ब्रास वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेले आहे या प्रकरणी मंडळ अधिकारी प्रवीण बेंडाळे यांनी धरणगाव पोलिसात संशयित आरोपी भटू रमेश सैंदाणे राहणार नांदेड यांच्या विरोधात तक्रार दिली…
जळगाव : प्रतिनिधी यावल तालुक्यातील एक धरण प्रसिद्ध असून याठिकाणी अनेक जिल्ह्यातील तरुण पर्यटनासाठी येत असतात. याच धरणात मंगळवारी दोन बालक बुडाले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील सावखेडासीम गावाजवळील निंबादेवी धरणावर गुरांना पाणी पाजण्यासाठी आलेले निमछावी वस्तीवरील दोघे बालक अचानक बुडाल्याने एकच खळबळ उडाली असून मंगळवारी सायंकाळी ही घटना घडल्यानंतर एकाचा मृतदेह शोधण्यात यश आले तर दुसर्या बालकाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. दोन्ही बालके निमछाव आदिवासी वस्तीवरील रहिवासी आहेत. आसाराम शांतीलाल बारेला (14) व नेनू किसन बारेला (10, रा.निमछाव वस्ती) अशी बुडालेल्या बालकांची नावे आहेत. आसारामचा मृतदेह शोधण्यात यश आले मात्र नेनूचा रात्री उशिरापर्यंत…
जळगाव : प्रतिनिधी प्रत्येक महिलेला सोने खरेदी करण्याची खूप आवड असते, त्याच महिलासाठी हि बातमी आहे ज्यांना सध्या सोने खरेदी करायचे आहे. जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच योग्य वेळ आहे. सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने घट होत आहे. हा क्रम गेल्या चार दिवसांपासून सातत्याने सुरू आहे. सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव हा ६० हजार रुपयांपेक्षा खाली आला आहे. सोन्यासोबत चांदीची किंमतसुद्धा कमी झाली आहे. मंगळवारी चांदीचा दर ३५ रुपयांनी कमी होऊन ७२ हजार २५० रुपये प्रति किलो ग्रॅम एवढा झाला आहे. कमकुवत जागतिक सौद्यांमुळे दिल्लीच्या सराफा बाजारामध्ये मंगळवारी सोनं ९० रुपयांनी स्वस्त होऊन ५९ हजार ९४५…
पुणे : वृत्तसंस्था राज्यात येत्या ६ जून रोजी रायगड येथे राज्याभिषेक सोहळ्याची तयारी सुरु आहे तर राज्यातील अनेक शिवभक्त गडावर येणार आहे. त्यासाठी मोठी सजावट करण्यात येत आहे. त्याआधीच एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. राजदरबार येथे सजावटीचे काम करताना एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर ६ जूनला राज्याभिषेक सोहळा आहे. यासाठी गडावर सजावट करण्यात येत आहे, यातच ही धक्कादायक घटना समोर आली आहे. गड किल्ल्यांची दुरावस्था होत चालली आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी किल्ल्यांच्या डागडुजीची कामे सुरु झाली आहेत. काही गडांवर सजावटीच्या कामालाही सुरुवात झाली आहे. ६ जूनला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक…

