मुंबई : वृत्तसंस्था राज्यात शिंदेंच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात मोठा भूकंप झाला असून शरद पवार विरूद्ध अजित पवार असा सामना राज्यातील राजकारणात पाहायला मिळत आहे. यादरम्यान राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत असे अजित पवार म्हणाले आहेत. तर शरद पवारांनी मात्र या निर्णयाला माझं समर्थन नसल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रवादी पक्षात उभी फूट फडल्यानंतर शरद पवारांनी लगेचच पक्ष बांधणीला सुरूवात केली आहे. तर अजित पवार यांनी त्यांच्या गटाला सरकारमध्ये कोणते मंत्रिपदे मिळतील यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी पक्षात कोणाचा शब्द चालणार आणि कोणाच्या पाठीशी किती किती संख्याबळ आहे याकडे…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आपल्याच पुतण्याने जबरदस्त धक्का देत विरोधकांशी हात मिळवणी केल्यानंतर आता या बंडाविरोधात पुन्हा रान उठवण्यासाठी शरद पवार हे बाहेर पडले आहेत. शरद पवार साताऱ्यात पोहोचले असून त्यांनी कराड मधील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन आशीर्वाद घेतले. या माध्यमातून पुढील लढाईचे रणशिंग शरद पवार फुंकले. शरद पवार यांच्यासोबत कोल्हापूरचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. या ठिकाणी शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानुसार शरद पवार सकाळीच कराडच्या दिशेने रवाना झाले. ते कराडमध्ये दाखल झाले असून ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. तसेच शरद पवार…
मुंबई : वृत्तसंस्था रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घटना घडली असून आता राष्ट्रवादीचे अनेक नेते शरद पवार यांच्या सोबत आहे तर पवारांचे राजकीय वारसदार म्हणून आ.रोहित पवार देखील शरद पवार यांच्या सोबत असून त्यांनी या विषयी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रोहित पवार म्हणाले कि, भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने शिवसेना फोडली तसा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत देखील होईल, असा आम्हाला अंदाज होता. अजित पवार यांच्या बंडानंतर मी भावनिक झालो असल्याचे देखील ते म्हणाले. अजित पवार आणि माझं नाते व्यक्तिगत आणि भावनिक आहे. राजकारण बाजूला ठेवले तर नक्कीच मी भावनिक झालो आहे. ते माझे काका आहेत आणि त्यांनी अनेक वेळा मला…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात जून महिना संपलेला असून जुलै महिन्याला सुरुवात देखील झालेली असतांना काही भागात पाणी आहे तर काही भागात अजूनही पाऊस पडलेला नसल्याने मोठी चिंता व्यक्त होत असतांना एक मोठी बातमी समोर आली आहे व हवामान विभागाकडून आनंदाची वार्ता देण्यात आली असून राज्यात तीन दिवस दमदार पाऊस असणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. नाशिकसह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर तसेच विदर्भात तीन दिवस जोरदार तर मराठवाड्यात ठराविक ठिकाणी हलक्या स्वरुपात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, शनिवारी नाशिक, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता इतर भाग तसेच विदर्भात ढगाळ वातावरण होते. नाशिक जिल्ह्यात दिवसभरात २२…
जळगाव : प्रतीनीधी राज्याच्या राजकारणात २ जुलै रोजी मोठी घडामोड होत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यातील अजित पवार समर्थकांनी जोरदार जल्लोष केला तर अनेक कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. त्यात जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार देखील अजित पवारांच्या भेटीसाठी मुंबईत पोहचले होते. आज दि.३ रोजी सकाळी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची देवगिरी या शासकीय बंगल्यावर भेट घेऊन फुलमाळा घालून दादांचा सत्कार केला. यावेळी अजितदादा यांचे जळगाव जिल्ह्यातले कट्टर समर्थक व जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी दादांचे स्वागत केले. त्यांचे सोबत शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख प्राध्यापक संजय पाटील सर, दोनगावचे किशोर पाटील व चोपड्याचे माजी युवक…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका कार्यालयात आमच्या देवाची प्रार्थना केल्यास आजार बरे होत असल्याचे सांगत, त्यांना प्रार्थनेसह सत्संगाच्या नावाखाली एकत्रित करून त्यांचे धर्मपरिवर्तन करीत असल्याचा संशयावरून शहरातील कालिंका माता चौक परिसरात गोंधळ झाला. रविवारी या प्रकाराचा विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यानी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन पुरुष व एक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कालिंका माता चौक परिसरातील एका लॉन्सच्या हॉलमध्ये ग्रामीण भागातील काही समुदायांतील कुटुंबांना प्रार्थनेच्या नावाखाली एकत्र आणले होते. आमच्या देवाची प्रार्थना केल्यास तुम्हाला असलेले आजार बरे होत असून तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच देवाची प्रार्थना करण्याची गरज राहणार नसल्याचे त्यांना सांगितले. त्यानुसार हे कुटुंब सकाळपासून…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नुकतेच शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, अजित पवार यांनी रविवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकारबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. हे सरकार आहे, त्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुसंख्य आमदारांनी जाण्याचा निर्णय घेतला. राज्यपाल महोदयांनी आम्हाला शपथ दिली. अजूनही मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. त्यातही इतरांना मंत्रिपदे मिळणार. अनेक दिवस चर्चा सुरू होती. देशपातळीवरील राजकीय परिस्थिती, राज्याची परिस्थिती बघता विकासाला महत्व दिलं पाहिजे असं माझं आणि सहकाऱ्यांचं स्पष्ट मत आलं. अतिशय मजबुतीने देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न मोदीसाहेब करत आहे. त्यामुळे आपणही…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित राष्ट्रवादीचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी सर्वच वृत्तपत्रात एक जाहिरात दिली होती. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा फोटो एकत्रित आल्यावर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने संजय पवार यांना बडतर्फ देखील केले होते पण आजच्या राजकीय परिस्थिती बघता अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर संजय पवार यांनी दिलेली ती जाहिरात अगदी खरी ठरली आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना चक्क शरद पवार व अजित पवार यांचा फोटोंचा वापर केला. त्याच्या या जाहिरातीमुळे राज्यभर चर्चा सुरु होती.…
अमळनेर : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात 2 जुलै रोजी मोठी खळबळ उडाली आहे भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादीने हात मिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतली आहे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे चार ते पाच आमदार शपथ घेण्याची तयारी सुरू आहे यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मतदार संघाचे आमदार अनिल भाईदास पाटील सुद्धा शपथ घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्याला आता तीन मंत्रीपद मिळाली आहे. अमळनेर मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील हे नेहमीच अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जात असतात. त्यामुळेच त्यांना या सरकारमध्ये मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. यावेळी अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील,धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ,आदिती…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करत मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती तर त्याला एक वर्ष उलटत नाही तोच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप व एकनाथ शिंदे यांच्या सोबत सत्तेत एकत्र आले आहे. त्यांनी नुकतेच राष्ट्रवादीच्या 40 आमदारांसोबत राजभवनात दाखल होत उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली आहे. राज्याच्या राजकारणातील १ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राज्यातील राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांना अजित पवारांनी संपर्क साधून त्यांना पहाटेच्या सुमारास मुंबईत बैठक घेण्यात आली होती या बैठकीनंतर थेट 40 आमदारांसह अजित पवार राजभाऊंना दाखल झाले होते यावेळी कुठल्याही ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिसून आले नाही तर…

