जळगाव : प्रतिनिधी एका कंपनीद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल, असे आमिष दाखवून रावेर येथील भूषण हाटे यांना ९ लाख ३० हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घालणाऱ्या सायबर ठगाला सायबर पोलिसांनी गुजरात राज्यातील भावनगर येथून बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याजवळून ५ लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. रावेर तालुक्यातील भूषण हाटे यांना एप्रिल महिन्यात सायबर ठगाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल ९ लाख ३० हजारांची ऑनलाइन फसवणूक केली होती. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी भूषण यांचे व्हॉट्सअॅप आणि बँकेतील झालेल्या व्यवहाराच्या मदतीने संशयित आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, तो गुजरात…
Author: editor desk
जामनेर : प्रतिनिधी लग्नासाठी आलेल्या नवरदेवासह वऱ्हाडींची चांगली व्यवस्था व मानसन्मान न झाल्याने जामनेरात मंगळवारी होऊ घातलेला विवाह सोहळा अर्ध्यावर सोडून वन्हाडी घराकडे परतली. परत निघालेल्या नवरदेव व त्यांच्या नातेवाइकांना मुलीकडच्या लोकांनी बोदवडजवळ अडविल्याचा प्रकार तालुक्यात सोमवारी घडला. जामनेर येथे सोमवारी साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम असल्याने खासगी बसमधून सकाळीच वर पक्षाकडील मंडळी गावात पोहोचली. पाहुण्यांची मनासारखी व्यवस्था व मानसन्मान मिळत नसल्याने नवरदेव व त्याचे नातेवाईक मंडळी दुपारीच माघारी फिरले, त्यामुळे वधूकडील नातेवाइकांमध्ये चलबिचल सुरू झाली नवरदेवाचे वाहन मध्य प्रदेशाच्या हद्दीत पोहोचले होते, तर वऱ्हाडींची बस बोदवडजवळच होती. तिथे ती अडविण्यात आली. मुलीकडच्यांनी त्यांना जामनेर पोलिस ठाण्यात आणले. रात्रीपर्यंत दोन्ही पक्षांकडून…
यावल ; प्रतिनिधी शहरातील एका भागात राहणाऱ्या विवाहिता घराच्या ओट्यावर झोपलेली असतांना एकाने साडी ओढून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी एकाला अटक केली आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल शहरातील एका परीसरात राहणारी २५ वर्षीय विवाहिता दि २८ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या घराच्या ओट्यावरील खाटेवर झोपली असताना रात्री १०.३० वाजेच्या सुमारास गावात अंकुश कोळी याने विवाहिता झोपेत असताना साडी ओढून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महीलेच्या लक्षात आल्याने तिने आरडाओरड केल्याने छेडखानी करणाऱ्याने पळ काढला. याबाबत महीलेने यावल पोलीस ठाण्यात अंकुश कोळी…
चोपडा : प्रतिनिधी शहरातील मुस्लिम कब्रस्थानजवळ एकास काहीही कारण नसताना त्याच्या खिशातील ८०० रुपये हिसकावून डोक्यात लोखंडी रॉड टाकून मारहाण केल्याची घटना २८ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील साकेगावातील रहिवासी असलेल्या नूर मोहम्मद पिंजारी वय २३ हा विद्यार्थी शिक्षण घेत असून २८ रोजी मुस्लिम कब्रस्थान रोडवर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चालत असताना संशयित आरोपी सत्यम चैत्राम पाटील, बंटी उर्फ जयेश शांताराम कोळी, रा. चोपडा यांनी नूर मोहम्मद याला काहीही कारण नसताना लोखंडी रॉड डोक्यात टाकून दुखापत केली. तसेच त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.…
पुणे : वृत्तसंस्था पुणे येथील कल्याणीनगर परिसरातील मारीगोल्ड आयटी पार्क येथे एका इमारतीला अचानक भीषण आग लागल्याने इमारतीमधील अनेकांची तारांबळ उडाली आहे. या आगिचे धुराचे लोट हवेत दुरवर पसरले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील कल्याणीनगर परिसरातील मारीगोल्ड आयटी पार्क येथे ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाकडून उंच शिडीची ब्रॉन्टो व इतर चार अग्निशमन वाहने दाखल झाली आहेत. आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि जीव वाचवण्यासाठी अनेकांनी गच्चीवर धाव घेतली. इमारतीत गच्चीवर अडकलेल्या 4 नागरिकांची सुटका झाली आहे. तर अजून काही नागरिक इमारतीत अडकल्याची शक्यता…
यावल : प्रतिनिधी यावल तालुक्यातील परसाडे परिसरात रविवारी मध्यरात्री अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने घर कोसळून घोड्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावल तालुक्यातील परसाडे गावातील पीरखा ललाखा तडवी यांचा मालकीचा घोडा गावातील बांधलेले पत्र्याचे घर होते. या ठिकाणी त्यांचा घोडा बांधण्यात आलेला होता. रविवारी २९ मे रोजी मध्यरात्री १ ते ३ वाजेच्या सुमारास चक्रीवादळ आल्याने घोडा बांधलेले घर कोसळले. यात घोड्याचा दाबला गेल्याचे त्याचा मृत्यू झाला. अत्यंत गरीब अशा कुटुंबातील पिरखा तडवी यांच्या कुंटुबाचा पोटापाण्याचे उदरनिर्वाहाचे साधन असलेला पांढरा शुभ्र असल्यामुळे घोडा याची परिसरात मोठ्या प्रमाणात नवरदेवांची लग्नसाठी मागणी असायची, या वादळी वाऱ्यात तो मरण पावल्याने आदिवासी कुटुंबाचे सुमारे…
मुंबई : वृत्तसंस्था दहावीच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. अनेक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. बोर्डाकडून अजून निकालाच्या तारखांची अधिकृत घोषणा झाली नाही पण निकालाच्या तारखांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल या आठवड्यातच जाहीर होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल जूनच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर होणार आहे. बोर्डाकडून अजूनही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र हा निकाल याच आठवड्यातच जारी केला जाईल अशी माहिती मिळत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या…
यावल : प्रतिनिधी शहरातील एका मॉलमध्ये काम करणाऱ्या तरूणीचा विनयभंग केल्या प्रकरणी एका तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, शहरातील भुसावळ रोडवर असलेल्या एका मॉल मध्ये रविवार २८ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कॅश काउंटर कामास असलेल्या एका १९ वर्षीय तरुणीची ईक्रामोद्दीन अल्लाउद्दीन शेख रा.आयशा नगर, यावल या तरुणाने तरूणी काम करीत असलेल्या मॉलमध्ये सामान घेण्याच्या बहाण्याने येवून तरुणीच्या जवळ आला असता “तु मला आवडते, तु माझ्याशी लग्न करणार का? तु माझ्या घरी ये आपण मजा करू” असे बोलुन तरूणीस लज्जा वाटेल असे कृत करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.संजय देवरे हे करीत…
अनैतिक संबंधांच्या अनेक घटना रोज उघडकीस येत असतात. याच अनैतिक संबंधातून अनेकदा गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना देखील घडल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक सुखी कुटुंबे देखील तुटली आहेत. मात्र प्रेमात बुडालेल्या जोडप्यांना इतर कोणाचाही विचार येत नाही आणि ते टोकाचं पाऊल उचलतात. उत्तर प्रदेशात असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडला आहे. तीन मुलांच्या आईचा स्वतःच्याच दीरावर जीव जडला होता. त्यानंतर दोघांनाही एकदा अंधाराचा फायदा घेत असा काही प्रकार केला की सगळ्या कुटुंबालाच धक्का बसलाय. उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. रामपूरमध्ये एका विवाहित महिलेने अंधाराचा फायदा घेत असे काही केले की, संपूर्ण गावात आता त्याची चर्चा सुरु…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील जुने जळगावातील विठ्ठल मंदिर परिसरात पवन दिनेश बारेला (रा. जुने जळगाव) या दोन वर्षाच्या बालकाच्या चेहऱ्यावर उकळता चहा पडल्याने संपूर्ण चेहरा भाजल्याची घटना शनिवारी घडली. जखमी चिमुकल्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात दिनेश बारेला (२६) हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला आहे. शनिवारी सायंकाळी बारेला यांच्या पत्नी चह करीत होत्या. त्यावेळी पवन ह खेळता-खेळता जवळ आला धक्का लागल्याने उकळता चह पवनच्या चेहऱ्यावर पडला. यात चिमुकल्याचा चेहरा भाजला गेला. शेजारी राहणारे सोनू माधव राठोड यांच्या मदतीने जखमी चिमुकल्याल रविवारी सकाळी १० वाजत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात…

