Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मान्सून आल्यानं आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरीही समाधानी झाला आहे. आज मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. एका आठवड्याच्या विलंबानंतर आज केरळात मान्सूनचं आगमन झालेलं आहे. देशात मान्सूनचं आगमन झालेलं आहे. आज केरळमध्ये मान्सूननं धडक दिलीय. हवामान खात्यानं तशी माहिती दिलीय. लवकरच मान्सूनचं राज्यात आगमन होईल, असा अंदाज आहे. जवळपास एक आठवडा उशिरानं मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळं देशातील अनेक भागांमध्ये नागरिक उकाड्यानं हैराण झाले आहेत. नैऋत्य मान्सून केरळात दाखल झाला आहे, अशी औपचारिक घोषणा हवामान खात्यानं दिली आहे.…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था  राज्यातील अनेक भागात महिलासह तरुणीवर अत्याचार होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असताना नागपुरात बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. चुलत भावाच्या वाढदिवसाला घरी गेलेल्या बहिणीवर तरुणाची नजर पडली. नात्याचा विचार न करता त्याने आपल्याच चुलत बहिणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. गर्भधारणेच्या ३ महिन्यांनंतर ही स्थिती उघड झाली. भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला कलंक लावणाऱ्या तरुणाविरुद्ध उमरेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी उमरेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावात राहते. ती इयत्ता ११ वीची विद्यार्थिनी आहे. तिचा चुलत काका तिच्या घराशेजारी राहतो. ती सतत त्यांचा घरी ये-जा करत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील खूबचंद साहित्या नगरातील सराईत गुन्हेगार किरण शंकर खर्चे (वय ३०) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला पुणे येथील येरवडा कारागृहात एका वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरण खर्चे याच्याविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये १६ गुन्हे तर ५ अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. शिवाय जिल्हापेठ पोलिस ठाण्यात सुध्दा गुन्हा दाखल असून तो शहरासह परिसरामध्ये दहशत पसरवित होता. त्यामुळे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी त्याचा एमपीडीएचा प्रस्ताव तयार करून स्थानिक गुन्हे शाखेकडे पाठविला होता. नंतर तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आल्यानंतर प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. त्यानुसार पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, अतुल…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील गंगापुरी येथे बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी तीन घरांचा मागील दरवाजाच्या कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला व लॅपटॉपसह किरकोळ रक्कम चोरून नेली. मात्र, चोरलेले लॅपटॉप आणि सोन्याची अंगठी तापी नदीच्या काठावर फेकून दिल्याचे समोर आले. त्यामुळे चोरटे नेमके कशाची चोरी करण्यास आले होते, हे समजू शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी भीमराव रामोशे, गोरख कुमावत आणि अरुण पवार हे घराच्या बाहेर झोपलेले असताना घराचा मागील दरवाजाचा तोडून प्रवेश केला. भीमराव रामोशे यांच्या घरातून किरकोळ रक्कम वगळता, चोरट्यांचा हाती काहीलागले नाही. कुमावत यांच्या घरातून १ हजार ७०० रुपये चोरीस गेले, अरुण पवार यांच्या घरातून लॅपटाप सोन्याची…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील खडका ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त सरपंचांच्या मुलावर औद्योगिक वसाहती परिसरामध्ये रात्री चाकू हल्ला झाला. याप्रकरणात मुलगा जखमी असून त्यावर भुसावळ येथे हिदम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुक्यातील खडका गावातील सरपंच यशोदाबाई देविदास तायडे यांचा मुलगा गिरीश याच्यावर चाकूहल्ला झाला आहे. या हल्ल्यात सरपंच यशोदाबाई तायडे यांचा मुलगा गिरीश तायडे हा जखमी झाला आहे. रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या दरम्यान एमआयडीसी परिसरामध्ये हल्ला झाला आहे. जखमी गिरीश तायडे याच्यावर भुसावळ येथील हिदमा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गिरीश तायडे यांच्यावर पाच ते सहा ठिकाणी वार झाले आहेत.

Read More

ठाणे : वृत्तसंस्था  जिल्ह्यातील मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय प्रियकराने ३२ वर्षीय प्रेयसीची हत्या करून तिचे कटरने लहान लहान तुकडे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने तिच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्याला खायला घातल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. भाईंदर पूर्वेला गीतानगर फेज ७ आहे. येथील गीता आकाश दीप इमारतीत ७०४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये मनोज साहनी (५६) व सरस्वती वैद्य (३२) हे दोघे तीन वर्षांपासून भाड्याने राहत होते. या सदनिकेतून दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांनी बुधवारी रात्री नयानगर पोलिसांना कळवले. पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी लिफ्टमधून पळून चाललेल्या सहानी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्हा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपवाटप करण्यात आले. शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ.भारती रंधे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले. माननीय माजी महापौर तथा नगरसेवक डॉ. अश्विनभाऊ सोनवणे, सौ सरिता ललित कोल्हे नगरसेवक ऍड.दिलीप पोकळे ऍड.अभिजीत जितेंद्र रंधे नगरसेविका रेश्मा काळे कुंदन काळे शोभा चौधरी केशवराव म्हस्के माजी नगर सेविका सौ.कमलताई म्हस्के निशा पवार शांतनु नारखेडे हर्षल मावळे शुभांगी बिराडे संकेत कापसे नारखेडे साहेब उपस्थित होते त्यावेळी शक्ती फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष मृणालिनी रंधे प्रकाश सोनवणे निरंजना तायडे लोकेश चौधरी पृथ्वीराज देशमुख संतोष भंगाळे मयूर देशमुख यांनी कार्यक्रमाचे सर्व परिश्रम घेतले. शक्ती फाउंडेशनच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या काही दिवसाआधी प्रत्येकच्या घरातील टीव्हीवर येणाऱ्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री शनायाची भूमिका साकारणारी रसिका सुनील सर्वांचीच लाडकी बनली. तिला रसिका नाही तर शनाया नावानेच लोक ओळखू लागले. काहीशी खलनायिका भूमिका असली तरी प्रेक्षकांना तिचा वेडेपणा, साधेपणा भावला. अल्पावधीतच रसिका मराठी मनोरंजनसृष्टीत आघाडीची अभिनेत्री म्हणून पुढे आली. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच रसिकाने 2021 मध्ये लग्न करत सर्वांना धक्का दिला. डान्सर आदित्य बिलागीसह तिने लग्नगाठ बांधली. मग आता रसिका पुन्हा लग्न करतीए अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. नक्की प्रकरण काय आहे जाणून घेऊया. रसिका आणि आदित्य बिलागी २०२१ मध्ये लग्नबंधनात अडकले. २०१८ मध्ये त्यांची भेट लॉस…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापूर शहरात तीव्र आंदोलन झाले. आज कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आंदोलन केलं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूर आंदोलन प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला आश्चर्य आणि गंमत वाटते की भाजप सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण सारखाच दूषित होत आहे. राज्यामध्ये सारख्या दंगली होत राहिल्या तर राज्याचं नुकसान होणार आहे. राज्यामध्ये घडणाऱ्या घटनांमुळे जनता घाबरली आणि बिथरली आहे.” पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “राज्यामध्ये होणाऱ्या दंगलींमुळे जनता घाबरली आहे आणि हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. देशातून भारतीय जनता पक्षाला विरोध होत आहे. हे आता भाजपच्या लक्षात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील खोटे नगर परिसरात दुचाकीची चावी हरवल्यानंतर मित्रांमध्येच वाद उफाळल्याने मित्रानेच धारदार शस्त्र मारून मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली होती. सुरूवातीला हल्ल्यात तरुण अत्यवस्थ असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र बुधवारी पहाटे तरुणाची प्राणज्योत मालवल्याने पोलिसांनी या प्रकरणी खुनाचे कलम वाढवत तिघांना अटक केली. अविनाश निंबा अहिरे (35, कुसूंबा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खोटे नगराजवळील अंडाभूर्जीच्या गाडीवर अविनाश हा चारचाकी (एम.एच.19 ई.ए.0451) वरून मित्रासोबत आल्यानंतर संशयितदेखील आले. अविनाशची दुचाकी संशयित दीपककडे होती मात्र दुचाकीची चावी हरवल्याने अविनाशने त्याबाबत दीपकला विचारणा केल्यानंतर चावी शोधत आहे, असे संशयिताने सांगितल्यानंतर…

Read More