जळगाव : प्रतिनिधी तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला परिसरातील नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना शुक्रवार, १४ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या तरुणाला तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संतप्त जमावाने तरुणाची दुचाकी पेटवून दिल्याने परिसरात खळबळ उडाली. काही संतप्त नागरिक त्याला पेटत्या दुचाकीवर फेकणार होते, मात्र काही पोलिस कर्मचारी व इतर नागरिकांनी त्यांना रोखले. अनेक वर्षांपासून रहिवास याबाबत अधिक माहिती अशी की, तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या १३ वर्षांपासून हे कुटुंब वास्तव्याला आहे. या ठिकाणी पती पत्नी, दोन मुले आणि दोन मुली राहतात. शुक्रवार, १४ जुलै रोजी…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी शरद पवारांना धक्का देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यावर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घ्यायला १० दिवस उलटल्यावर आज खाते वाटप झाले असून यात शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. यात अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खाते, छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालय, तर दिलीप वळसे पाटील यांना सहकार खाते देण्यात आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल, पशू संवर्धन खाते देण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी मंत्रालय देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या अनेक वर्षापासून भारताची महत्वाकांक्षी मोहिम असलेलं चांद्रयान यशस्वीरित्या ३ लॉन्च करण्यात आली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन हे २.३५ मिनिटांनी लॉन्च झालं. अवघ्या देशाचं याकडं लागलं होतं. यावेळी केंद्रातील अनेक मंत्री अंतराळ केंद्रात उपस्थित होते. अवघ्या देशानं हा सोहळा टीव्हीवर लाईव्ह पाहिला. चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणानंतर 3 वर्षे, 11 महिने आणि 23 दिवसांनी शुक्रवारी भारताने चांद्रयान-3 मिशन लॉंच केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2.35 वाजता बाहुबली रॉकेट LVM3-M4 द्वारे ते अवकाशात पाठवले. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ इतर शास्त्रज्ञांसह मिशन कंट्रोल रूममध्ये आहेत. या मोहिमेद्वारे भारताला आपली अंतराळ शक्ती जगाला दाखवायची…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्तेत अजित पवार आल्याने आता सत्तेत तीन वाटे झाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असतांना शिंदेंनी त्यांची बैठक घेत मोठे बळ दिले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत 152 हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केला होता. त्यांच्या दाव्यामुळे भाजपच्या शिवसेना व राष्ट्रवादी या मित्रपक्षांना किती जागा मिळणार? याविषयी साशंकता निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेतील बंडावेळी आपल्यासोबत आलेल्या 50 पैकी एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नसल्याचा दावा केला. सत्ताधारी पक्ष विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून लढवणार आहेत.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी झाल्यानंतर अजित पवारांनी थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे पण त्यांना अजून ही कुठलेही खाते मिळाले नसताना त्यांनी आज मंत्रालयातून कामकाजाला सुरुवात केली आहे. अजित पवार आज सकाळी ९.४५ वाजता मंत्रालयात दाखल झाले. यामुळे मंत्रालयातील अधिकाऱ्यांची धांदल उडाली. सध्या अधिकाऱ्यांसोबत अजित पवार यांची बैठक सुरू आहे. राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या प्रशासकीय कामाला सुरवात केली आहे. अजित पवार यांनी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी एक बैठक बोलावली आहे. अर्थ विभागाचे सचिव डॉ. नितीन करीर यांच्यासोबत ते बैठक घेत आहेत. अद्याप आधिकृत खातेवाटप झाले नाही, मात्र अजित पवार यांनी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यास…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना दि.१२ रोजी घडली असून या प्रकरणी मारवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह रहिवासास असून दि.१२ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आई जवळून ५ रुपये घेवून दुकानात गेली असता कुणी तरी अनोळखी इसमाने तिला फूस लावून पळवून नेल्याची घटना यावेळी घडली. परिवारातील सदस्याने अल्पवयीन मुलीला गावासह परिसरात शोधाशोध केली असता पण ती मिळून न आल्याने अल्पवयीन मुलीच्या आईने मारवाड पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका.संजय पाटील हे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही वर्षाआधी चांद्रयान लाँच करण्यात आले होते पण ते अयशस्वी झाल्यानंतर आज पुन्हा एकदा चांद्रयान-2 लाँच झाल्यानंतर 3 वर्षे, 11 महिने आणि 23 दिवसांनी भारत चांद्रयान-3 मिशन लॉन्च करणार आहे. दुपारी 2.35 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून LVM3-M4 रॉकेटद्वारे ते अवकाशात पाठवले जाईल. या मोहिमेद्वारे भारताला आपली अंतराळ शक्ती जगाला दाखवायची आहे. मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर असे करणारा भारत हा चौथा देश ठरेल. चांद्रयान-३ अंतराळयानामध्ये तीन लँडर/रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहेत. सुमारे 40 दिवसांनंतर म्हणजेच 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील.…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काल १३ जुलै रोजी कोकण दौऱ्यावर होते. दापोली, चिपळून आणि खेड येथील मनसे कार्यकर्त्यांशी राज ठाकरेंनी पक्षबांधणी संदर्भात संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी खेडमध्ये भाषण करताना स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच खेडमधील जनता मनसेच्या उमेदवारांना नक्की साथ देतील, असा विश्वासही राज ठाकरे यांनी बोलून दाखवला. राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, “माझ्यासमोर तुम्ही सर्वजण बसला आहात. मला तुमची साथ हवी आहे, अशी माझी अपेक्षा आहे. ऐन मोक्याच्या वेळी मला तुमची साथ हवी आहे. मला फक्त एवढंच सांगायचंय की मागच्या वेळी ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. पण आता नगरपरिषदेच्या निवडणुका आपल्याला स्वबळावर…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरूण तलावाच्या ट्रॅकजवळ अज्ञात चार जणांनी दुचाकीवर येऊन, बाकावर बसलेल्या दोन युवकांवर चाकूने वार करून त्यांना जखमी करत त्यांच्याजवळील महागडे मोबाइल जबरीने हिसकावून पसार झाल्याची घटना घडली. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तीन संशयितांना अटक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमांशू शशिकांत कुटे (वय २५) हा युवक मूळ वाशिम येथे राहणारा असून, जळगाव शहरात शिक्षणासाठी महाबळ परिसरात राहतो. मंगळवारी रात्री ११ वाजता हिमांशू आपला मित्र देवेश चव्हाण (वय २४) याच्यासोबत मेहरूण तलाव वॉकिंग ट्रॅकवरील बाकावर बसला होता. त्यावेळी चार अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आले. एकाने चाकूने…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील आत्महत्या कॉलनीच्या मागील बाजूस असलेल्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला शौचासाठी गेलेल्या एका युवकाला रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ९:३० वाजता घडली. भावेश मुरलीधर सोनार (वय २८) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हरिविठ्ठलनगर भागात भावेश सोनार हा युवक आपल्या आई, वडील व मोठ्या भावासह वास्तव्याला होता. बुधवारी रात्री घरी आल्यानंतर ९:०० वाजेच्या सुमारास घरातून शौचासाठी निघाला. रात्री ९:३० वाजेच्या सुमारास आत्महत्या कॉलनीच्या मागील बाजूस असलेल्या रेल्वे ट्रॅकलगत रेल्वेचा धक्का लागल्याने भावेशचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती रेल्वे ट्रॅकलगत असलेल्या काही युवकांनी रात्री पोलिसांना दिली. हरिविठ्ठल नगरातील काही…

