मुंबई : वृत्तसंस्था सरकारी जाहिराती या अत्यंत दिशाभूल करणाऱ्या, लोकांची फसवणूक करणाऱ्या आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. ते मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. शेकडो कोटी रुपये खर्च करून खोट्या जाहिराती दाखवल्या जात आहेत, पण शेतकऱ्यांना काही मदत मिळत नाही, असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला. शिंदे गटाने विरोधी पक्षनेते अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. अर्थमंत्री असताना अजित पवार यांनी किती खोके जमवले ते सांगावे असे खासदार कृपाल तुमाने यांनी म्हटले आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, एकाकडून जरी मी पैसे घेतले असतील तर राजकारण सोडून घरी बसेल, माझ्यावर आरोप करत असाल ते…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहरातील श्री संत मुक्ताई मंदिरामागील रस्त्याच्या कडेला तरुणाचा खून करून मृतदेह फेकून देण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर शहरातील श्री संत मुक्ताई मंदिरामागील रस्त्याच्या कडेला तरुणाचा खून करून मृतदेह फेकून देण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. मयत तरुण रावेर तालुक्यातील असल्याची माहिती आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नसल्याने पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मुक्ताईनगर शहराजवळील श्री संत मुक्ताई मंदिराच्या मागील बाजूस बोदवड रोडला लागूनच मंगळवारी सकाळी एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडून असल्याची माहिती…
जळगाव : प्रतिनिधी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबरावजी पाटील यांचा वाढदिवस ५ जून रोजी आरोग्यस्नेही उपक्रमातून साजरा करण्यात आला, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनने जळगाव ग्रामिण मतदारसंघात आरोग्यसप्ताहाचे आयोजन केले असून त्याचे उद्घाटन हे पाळधी येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा.ना गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन करून ग्रामिण भागात आरोग्यसप्ताहाला सुरूवात करण्यात आली. आरोग्य शिबीराचे आयोजन हे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले होते. आरोग्यसप्ताहाची सुरूवात ही पाळधी येथून झालेली असून यामध्ये भव्यआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर व मोफत आयुष्यमान भारत (हेल्तकार्ड) नोंदणी शिबीर, तालूक्यातील…
धरणगाव : प्रतिनिधी शहरात भारतीय जनता पार्टीने 350 वा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शहरातील महिला व तरुण मुलींकरीता “द केरला स्टोरी” या चित्रपटाचा शो मोफत आयोजित केलेला आहे. सदरील चित्रपटास भरपूर प्रमाणात प्रतिसाद महिला व मुलींकडून मिळत आहेत प्रत्येक शो-हाऊस फुल राहत असुन आता पर्यंत 1800 ते 2000 महिला व मुलींनी चित्रपट बघण्याचा लाभ घेतलेला आहे.अजून भारतीय जनता पार्टीचा शहरातील घराघरातील महिला व मुलींना चित्रपट दाखविण्याचा मानस भारतीय जनता पार्टीचे ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड संजयभाऊ महाजन यांनी व्यक्त केला आहे. सदर चित्रपट कुमार टॉकीज येथे प्रदर्शित केला जात आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते,पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील महावितरणचे कार्यकारी अभियंता पवार यांना खंडित वीजपुरठा व भारनियमाबाबत व तहसीलदार सातपुते यांना पिक विमा नुकसान भरपाई, अतिवृष्टी अनुदान, विविध प्रलंबित अनुदान बाबत निवेदन देण्यात आले. हे निवेदन माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे. यावेळी उपस्थित ज्ञानेश्वर महाजन मा.नगरध्याक्ष, पुष्पाताई महाजन, मा. रविंद्र पाटील जि.प.सदस्य, तालुकाध्यक्ष धनराज माळि, दिपक वाघमारे मा.उपनगराध्यक्ष, , मोहन नाना जेष्ठ नेते, देवरे आबा कार्योध्याक्ष, रघुनाथ पाटील मार्केट कमिटी संचालक, दिलीप अण्णा धनगर मार्केट कमिटी संचालक, नाटेश्वर पवार माजी युवक अध्यक्ष, मनोज पाटील युवक अध्यक्ष, सुरेखा ताई पाटील महिला अध्यक्ष, ओंकार माळी, संजय पाटील पिंपळे, शरद आबा,, दिनानाथ चव्हाण…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील बहराइच शहरात धक्कादायक घटना घडली आहे. येथे दोन कुटुंबातील लग्नाचा आनंद शोकसागरात विरून गेला. २२ वर्षांच्या मुलाची लग्नाची मिरवणूकीत नाचून कुटुंबातील सदस्याने २० वर्षांच्या मुलीला त्यांची सून म्हणून घरी आणले. घरात आनंदाचे वातावरण होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वधू-वर एकत्र खोलीत जातात, पण सकाळी दोघांची खोली उघडत नाही. कुंडी वाजवूनही दोघांची खोली उघडत नाही, तेव्हा वराच्या लहान भावाने खिडकीतून खोलीत उडी मारली. नवरा-नवरीच्या खोलीतील दृश्य पाहून त्याला धक्का बसला. वधू-वर मृत अवस्थेत खोलीत आढळले. जेव्हा त्याने पटकन कुंडी उघडली तेव्हा कुटुंबातील इतर लोक येऊन नवऱ्याला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे शरीर थंड होते. नवरीही मृत…
पुणे : वृत्तसंस्था ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे दुर्गराज रायगडावर आयोजन करण्यात आले आहे पण यंदा भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या उत्साहाने रायगडावर येत आहेत. काही ठिकाणी तर विशेष गाड्या देखील सोडण्यात आल्या आहेत. मात्र या सगळ्या गोष्टी असल्या तरी काही भाविकांना मात्र गडावर जाता आलं नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. भाविकांच्या गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी गडाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने ती नियंत्रणात आणणं हे देखील पोलीस प्रशासनासमोरचं आव्हान आहे. दुर्गराज रायगडावर सध्या जवळपास अडीच लाख भाविक जमले आहेत. गडाच्या खाली जवळपास ५०- ७५ हजार…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर नराधम बापाने अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या प्रकरणी आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावात मजुरी करणाऱ्या पीडित मुलीच्या आईला बरे वाटत नसल्याने सलाइन लावण्यासाठी घरात जागा नव्हती, म्हणून दिराच्या घरी आईला सलाईन लावण्यात आली. त्यावेळी बापाने पीडित मुलीचे तोंड दाबून तिच्याशी जबरदस्तीने अतिप्रसंग केला. रविवारी रात्री ११ वाजता आई घरी आल्यावर घाबरलेल्या मुलीने हा प्रकार सांगितला. याबाबत पोलिसात ५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस करीत…
जळगाव : प्रतिनिधी शहरापासून जवळ असलेल्या बांभोरी येथील कंपनीतील कंत्राटी कर्मचार्यांनी गेल्या काही दिवसापासून आदोलन पुकारले आहे. या आंदोलनातील कर्मचारी शेखर गोकुळ पाटील (वय-50) रा.खेडी कढोली ता.एरंडोल यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाच्या दबावामुळे व मानसिक त्रासामुळेच कर्मचार्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करत कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी कामगार सहकारी व नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात एकच गर्दी केली होती. एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथील शेखर गोकुळ पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून गेल्या 20 ते 25 वर्षांपासून बांभोरी येथील हिताची कंपनीत कंत्राटी पध्दतीने नोकरीला होते. गेल्या दि. 23 मे पासून त्यांच्यासह इतर कामगारांनी हिताची…
यावल : प्रतिनिधी भरधाव दुचाकी वाहनासमोर अचानक मोकाट गुरे आल्याने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. ही घटना साकळी ता. यावलनजीक सोमवारी दुपारी घडली. डिगंबर संजय चौधरी (२५, रा. पंढरीनाथ नगर, जामनेर रोड, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संजय चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत. मोकाट गुरांचा प्रश्न जीवघेणा ठरत असून गत अनेक वर्षांपासून पालिकांकडून हा प्रश्न गांभीर्याने घेतला जात नाही. लोकांमधून ओरड झाल्यांनतर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करण्यात येते. त्यानंतर संबंधित मालकही पुन्हा आपली जनावरे मोकळी सोडत असतात.…

