मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापौरपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, ‘डॉन’ अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळी यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचे उमेदवार रोहिदास लोखंडे यांच्याकडून योगिता गवळी पराभूत झाल्या. मात्र, निकालानंतर त्यांचे पती व प्रसिद्ध अभिनेता अक्षय वाघमारे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत योगिता यांच्या जिद्दीचा, संघर्षाचा आणि जनसेवेचा मनापासून गौरव केला आहे. अक्षय वाघमारे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “प्रिय बायको, सर्वप्रथम तुझे मनापासून आभार आणि मला तुझा प्रचंड अभिमान आहे. प्रेग्नन्सी आणि त्यानंतर अवघ्या एका महिन्याच्या मुलीची आई असताना, एवढी मोठी जबाबदारी खांद्यावर घेऊन तू ज्या धैर्याने निवडणूक लढवलीस, ते खरंच…
Author: editor desk
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर शहरातील ढेकू रोडवर वास्तव्यास असलेले खाजगी शाळेचे शिक्षक सुरेश सिताराम सोये यांचा काल दि.१८ रोजी सकाळी १० वाजता रेल्वे अपघातातात मृत्यू झाल्याची घटना चांदणी कुहे गावाजवळ सती माता मंदिराजवळ घडली. ते न्यु इंग्लिश स्कूल नांदेड येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर त्यांच्या पत्नी श्रीम. प्रमिला मोरे या जि. प.शाळा निपाणे ता. एरंडोल येथे प्राथमिक शिक्षिका आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीी घरातून ते अचानक बेपत्ता झाले होते, कोकणात ते सापडल्याने तेथून त्यांना परत आणले होते. दोन ते तीन दिवस घरीच थांबल्यावर दि.१८ रोजी सकाळी घरातून ते बाहेर पडले आणि सती माता मंदिराजवळ घटनास्थळी पोहोचले तेथे हावडा…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नशिराबाद येथे रविवारी (दि.१८) दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत एकूण १६ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये अल्पवयीन मुले व महिलांचाही समावेश आहे. या घटनेदरम्यान दगडफेक करण्यात आल्याने काही घरांच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या असल्याची माहिती जखमींनी रुग्णालयात दिली. सविस्तर वृत्त असे की, नशिराबाद येथील इस्लामपुरा भागात राहणारे आरीफ अली यांच्या घरी रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या सुमारास जुन्या वादाच्या कारणावरून दुसऱ्या गटाने अचानक दगडफेक करत लोखंडी पाइप, लाठ्याकाठ्या व कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात शेख अमीन शेख बाबू (४५), अब्दुल महेमूद अब्दुल गनी (५६), मोईल…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील १२ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाली असली, तरी जळगाव जिल्हा परिषदेची निवडणूक मात्र अद्याप रखडलेलीच आहे. राखीव जागांच्या आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने निर्माण झालेल्या वादावर २१ जानेवारी रोजी न्यायालयात सुनावणी होणार असून, त्याकडे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळासह इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. जळगाव जिल्हा परिषदेची शेवटची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली होती. त्यानंतर मार्च २०२२ मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर गेली चार वर्षांहून अधिक काळ जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती आहे. सन २०२२ मध्ये निवडणुकीसाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली होती. मात्र, ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून ही प्रक्रिया ऐनवेळी स्थगित करण्यात आली. या…
आजचे राशिभविष्य दि.१९ जानेवारी २०२६ मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा असेल. ज्यामुळे तुम्हाला मोठा आनंद मिळू शकतो. मात्र, स्वभाव काहीसा चिडचिडा होईल. त्यामुळे अनावश्यक राग टाळणे हिताचे ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलताना संयम ठेवा. घराचे नूतनीकरण किंवा वैयक्तिक गरजांवर खर्च होऊ शकतो. कुटुंबात एकजुटीचे वातावरण राहील. वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस छंद जोपासण्यासाठी आणि आनंदासाठी खरेदी करण्याचा आहे. बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मित्राकडून एखादी चांगली बातमी मिळेल. तुमची हरवलेली प्रिय वस्तू आज सापडण्याची शक्यता आहे. प्रेमात असलेले व्यक्ती जोडीदारासोबत प्रवासाचा बेत आखू शकतात. कामाच्या ठिकाणी…
मुंबई : वृत्तसंस्था महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईच्या महापौरपदावरून सुरू झालेल्या चर्चेत आता भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सूचक विधानावर जोरदार टीका करताना राणे यांनी, “ज्यांच्याकडे संख्याबळ नाही, त्यांचा महापौर काय आकाशातून पडणार का?” असा खोचक सवाल उपस्थित केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंना केवळ ७२ जागांवर समाधान मानावे लागले. मात्र महापौरपदाबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी, “देवाच्या मनात असेल तर आमचाच महापौर होईल” असे सूचक विधान केले होते. यावरूनच राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या विधानावर प्रतिक्रिया…
पुणे : वृत्तसंस्था पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण तापलेले असतानाच थेरगाव परिसरात जाणीवपूर्वक कार जाळण्याची धक्कादायक घटना घडली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री उभ्या असलेल्या एका कारला ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावण्यात आल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यामुळे शहरातील राजकीय तणाव अधिकच वाढला आहे. ही कार आकाश बारणे यांच्या मालकीची असून, ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराचे चुलत भाऊ आहेत. प्रभाग क्रमांक २३ मधील थेरगाव परिसरात ही घटना घडली. निवडणूक निकालानंतर काही तासांतच ही घटना घडल्याने, हा प्रकार राजकीय आकसातून झाला का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अज्ञात व्यक्ती बाटलीतून…
भुसावळ : प्रतिनिधी भावजयीच्या अंत्यसंस्काराहून माघारी परतणाऱ्यास बसने धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने प्रल्हाद अमृत बाविस्कर (वय ६०, रा. मन्यारखेडा, ता. भुसावळ) हे समोरुन येणाऱ्या कंटेनरखाली येवून चिरडल्या गेल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी सुनीताबाई बाविस्कर या गंभीर जखमी झाल्या. ही घटना शनिवार दि. १७ रोजी दुपारच्या सुमारास कंडारी फाट्यावर घडली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने जप्त केली आहे. भुसावळ तालुक्यातील मन्यारखेडा येथे प्रल्हाद बाविस्कर हे वास्तव्यास होते. त्यांच्या भावजयीचे निधन झाल्याने प्रल्हाद बाविस्कर हे पत्नी सुनीताबाई बाविस्कर यांच्यासोबत विटनेर येथे जाण्यासाठी (एमएच १९, ईडी ९३३९) क्रमांकाच्या दुचाकीने निघाले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर हे दुचाकीने मन्यारखेडा येथे घरी परतत होते.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालांमध्ये भाजप-शिंदेसेना युतीने २४ महापालिकांवर वर्चस्व मिळवले असून, ९ महापालिकांत भाजपने स्वबळावर सत्ता स्थापनेचा आकडा गाठला आहे. या निकालांमुळे भाजप राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला आहे. या निकालांत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मोठा धक्का बसला असून, त्यांच्या बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांत पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. केवळ अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीला समाधानकारक यश मिळाले आहे. या पराभवानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक भूमिका घेत, यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. सरकार…
जनतेच्या प्रेमातून उमटतोय विश्वासाचा आवाज जळगाव | प्रतिनिधी प्रभाग क्रमांक ९ मध्ये सध्या निवडणूक प्रचाराला भावनिक वळण मिळत असून, महायुतीच्या उमेदवार जयश्री राहुल पाटील यांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रेम, विश्वास आणि भावनिक पाठिंबा मिळताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणाऱ्या राहुल पाटील यांच्या कार्याची पावती आज जनता स्वतः शब्दांत आणि कृतीतून देताना दिसत आहे. घराघरांत सुरू असलेल्या प्रचारादरम्यान नागरिक पुष्पगुच्छ देत, औक्षण करत आणि विजयासाठी शुभेच्छा व आशीर्वाद देत जयश्री राहुल पाटील यांचे स्वागत करत आहेत. “हे केवळ प्रचार नाही, तर नात्यांची जपणूक आहे,” अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत असून, मागील काळात केलेल्या कामांचीच ही पावती…

