मुंबई : वृत्तसंस्था गेल्या तीन दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगड जिल्ह्यात झालेल्या नैसर्गिक आपत्ती झालेल्या ठिकाणी तळ ठोकून असतांना थेट शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाल्याने राज्यतील विरोधकांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत देखील कुजबुज सुरु झाली आहे. दिल्ली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत. दुपारी 4 वाजता एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचीही भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. परंतु या भेटीगाठीमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, राज्यात रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या तिढ्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील काही भागात पावसाचा मोठा हाहाकार असतांना रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटननेनंतर येथील दुर्घटनाग्रस्त मुलांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे सरसावले आहेत. या मुलांचं पालकत्व शिंदे स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या वतीने डॉ. नीलम गोऱ्हे या आज इर्शाळवाडी येथे जाऊन या मुलांचं पालकत्व स्वीकारण्याची माहिती दिली. नीलम गोऱ्हे या इर्शाळवाडीत जाऊन दुर्घटनास्थळाची पाहणी केली. या दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण निर्वासित झाले आहेत. तसेच दुर्घटनास्थळी बचावकार्य अजूनही सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अजून ८६ जण अडकल्याची माहिती मिळत आहेत. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन इर्शाळवाडीतील मुलांची…
मुंबई : वृत्तसंस्था देशात बदलत्या हवामानामुळे राज्यातील पावसाला जोरदार सुरुवात झाल्याने कोकणात पावसाचाह कहर सुरु असून यात रायगड जिल्ह्यातील इशाळवाडीतील अनके परिवार जमिनीखाली अडकले असून गेल्या तीन दिवसापासून येथे शोधकार्य सुरु आहे. या ठिकाणी आज ठाकरे गटाचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भेट देणार असल्याची बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील इशाळवाडीतील नुकसानग्रस्त परिसराची ते पाहणी करतील. तसेच स्थानिकांशी चर्चा करणार आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते यावेळी त्यांच्यासोबत असतील. या आधी आमदार आदित्य ठाकरे यांनी या भागाचा दौरा केला होता. इरशाळवाडीतील दुर्घटनेनंतर बचाव कार्य अजूनही सुरू आहे. येथील मृतांची संख्या आता 22 झाली असून अजूनही 102 नागरिकांचा शोध लागलेला नाही. शिवसेना…
मुंबई : वृत्तसंस्था देशात पावसाचा कहर सुरु असतांना राज्यातील रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीत मोठ्या दुर्घटनेचा आज तिसरा दिवस असून आज तिसऱ्या दिवशी सुद्धा या ठिकाणी शोधकार्य व मदतकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मातीचे ढिगारे उपसले जात आहेत. आजही एनडीआरएफच्या चार टीम घटनास्थळी दाखल झाल्या असून या जवानांनी तात्काळ ढिगारे उपसण्या सुरुवात केली आहे. मात्र, इर्शाळगड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मदतकार्यात प्रचंड अडथळे येत आहेत. या दुर्घटनेतील मृत आणि जखमींचे कुटुंबीय आणि शेजारच्या गावातील नातेवाईक गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात तळ ठोकून आहेत. हे कुटुंबीय आणि नातेवाईकही आपल्या आप्तेष्टांचा शोध घेत आहेत. कोण भावाचा शोध घेतंय, तर कोण वडिलांचा…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर शहरातील एका हॉटेल मालकाने वेटरच्या डोक्यात लोखंडी वस्तूने मारहाण करून खून केला. ही घटना तब्बल तीन महिन्यांनी उघडकीस आली आहे. सुरत रुग्णालयातील पंचनामा आणि आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीत तफावत आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यावर हा गुन्ह्याची उकल झाली. पोलिसांनी आरोपी हॉटेल मालक नरेंद्र उर्फ भटू यशवंत चौधरी (वय ३५) रा. माळीवाडा याला ताब्यात घेतले. दगडू उर्फ बाबूभाई नारायण पाटील असे मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र चौधरी याची अमळनेर परिसरातच साई व रूपाली हॉटेल आहे. दगडू पाटील हा तेथे वेटर होता. दगडू गेल्या पंधरा वर्षांपासून आपल्या सुरत येथे राहणाऱ्या कुटुंबापासून वेगळा राहून येथे काम…
जळगाव : प्रतिनिधी भुसावळ शहरातील बाजार पेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना षडयंत्र अॅन्टीकरप्शनच्या खोट्या गुन्हयामध्ये अडकवुन अटक करविले प्रकरणी निपक्षपणे चौकशी होवुन न्याय मिळणेबाबत आज काही समाजसेवकांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे कि, वरील विषयास अनुसरुन आम्ही खालील सही करणार भुसावळ शहरातील सामान्य नागरीक नम्रपणे निवेदन करतो की, पोलीस निरीक्षक श्री राहुल बाबासाहेब गायकवाड हे गेल्या दिड वर्षापासुन भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणुन कार्यरत होते. त्यांचे कार्यकाळामध्ये त्यांनी भुसावळ शहरातील अनेक गुन्हेगारांवर मोक्का, एम. पी.डी.ए सारख्या कायद्याखाली कठोर कारवाया करुन गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवलेले होते. त्यांच्या प्रभावी व आक्रमक कार्यशैलीमुळे…
जळगाव : प्रतिनिधी शहरानजीक असलेल्या गिरणा नदीपात्रातून नियमितपणे चोरटी वाळूची वाहतूक सुरु असल्याच्या घटना तालुका पोलिसांच्या कानावर आले असतांना त्यांनी वाहतूक सुरु असतांना एका ट्रॅक्टर पकडून चालकाविरोधात तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातून नजीक असलेल्या गिरणा नदी पात्रातून दिनांक २० जुलै रोजीच्या सुमारास गिरणा नदी पात्रातून एक ब्रास अवैध वाळूची वाहतूक करीत असताना एक ट्रॅक्टर निमखेडी शिवारातील कांताई नेत्रालय समोरून जात असताना पोलीस पथकाने कारवाई करीत सुमारे ३ हजार रुपये किमतीची अवैध वाळू तर २ लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी जनार्दन शांताराम सूर्यवंशी रा.भिकमचंद नगर, पिंप्राळा रोड जळगाव यांच्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे, फडणवीस व पवार सरकारचे विधानसभेत अधिवेशन सुरु असून यात सत्ताधारी व विरोधाकामध्ये जोरदार सामना पाहायला मिळत असून आज शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील व ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली आहे. खातेवाटपावरून यांच्यात खडाजंगी झाली. या दोघांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खुर्चीवरुन उठून शांत केले. आदित्य ठाकरे म्हणाले, सभागृह सुरू होण्यापूर्वी मंत्र्यांचा खातेवाटप होतो. यामुळे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवरील भार कमी होतो. प्रत्येक दिवशी खातेवाटप होतो. एखाद्या मंत्र्यांला उत्तर देता आले नाही तर टाईमपास होतो. आम्ही सगळे आमच्या मतदारसंघातून येतो. महाराष्ट्रात आम्ही आवाज देतो. यावर विधानसभा अध्यक्ष म्हणाले, अधिवेशनापूर्ती जबाबदारी ज्या मंत्र्यांकडे दिली…
चाळीसगाव : प्रतिनिधी कु. राजेश्वरी जाधव हिच्या ९ व्या स्मृतीदिना निमित्त शहरातील ० ते १४ वयोगटातील बालकांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी व निदान शिबिराचे आयोजन रामचंद्र य. जाधव व यश ग्रुप मित्र परिवाराने दि. २३ जुलै २०२३ रविवार रोजी बापजी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, हिरापूर रोड, चाळीसगाव येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पालकांनी मुलांना घेऊन येण्यासाठी व जुनी फाईल असल्या सोबत आणण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. शिबिरात नामवंत नेत्ररोग तज्ञ डॉ. सो. भावना भामरे – बागड, नाशिक, बालनेत्रविकार तज्ञ, डॉ. पराग अनिल बागड, नाशिक पडद्याचे विकार तज्ञ, व डॉ. अमित महाजन नेत्ररोग तज्ञ, डॉ.…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील माळी समाजाचे युवा कार्यकर्ते तथा समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन यांची अखिल भारतीय माळी महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सदर निवड संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचा आदेशाने युवक राष्ट्रीय अध्यक्ष नितीन शेलार यांनी केली आहे. भूषण महाजन हे सन 2014 पासून माळी समाजाच्या कार्यात सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांनी 2017 या वर्षी माळी समाजाचे मुखपत्र माळी साम्राज्य साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले. या साप्ताहिक वृत्तपत्रच्या माध्यमातून त्यांनी राज्यस्तरीय उद्योजक मेळाव्याचे आयोजन केले आहेत. सन 2019 पासून ते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष म्हणुन काम करीत आहेत. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी…

