Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात जोरदार पाऊस गेल्या आठ दिवसापासून अनेक भागात सुरु आहे. याच वेळेत जालन्यामधून एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. शेळ्या चारायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथील तलावामध्ये घडली आहे. अभिजीत भारत येडे (वय 17) अर्चना संजय भालेराव (वय 15) दोघे रा.तळेगाव अशी पाण्यात बुडून मृत पावलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. अभिजीत येडे आणि अर्चना भालेराव हे दोघे गुरूवारी सकाळी शेळ्या चारण्यासाठी शेळ्या घेऊन घरून गेलेले होते. नेहमीप्रमाणे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या शेळ्याच घरी आल्या परंतु दोघेही घरी परतले नाही. घरच्यांनी थोडावेळ वाट…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्रीपदी अजित पवार यांना कंटाळून शिवसेनेच्या ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड करून भाजप सोबत घरोबा करून राज्यात सत्ता स्थापन केली होती. पण वर्षभरात राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार आपल्या आमदारासोबत येवून शिंदे व फडणवीस सरकारमध्ये अर्थमंत्री झाल्यामुळे अनेकांची गोची झाली आहे. व त्याचा परिणाम देखील जाणवू लागला आहे. अजित पवार यांनी आपल्यासोबत आलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांवर निधीची खैरात केली आहे. मात्र, या तुलनेत शिंदे गटाच्या आमदारांना मात्र कमी निधी देण्यात आला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीदेखील आज पत्रकार परिषदेत या निधीवाटपावर भाष्य केले आहे. संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  देशातील अनेक बेरोजगार तरुण नेहमीच नोकरीच्या शोधात असतात, अशाच तरुणासाठी हि बातमी महत्वाची असणार आहे. अनेक तरुणाचे किमान शिक्षण १० वी झालेले असते. त्यामुळे खूप जास्त शिक्षण लागेल असे काही वाटत नाही. भारत तिबेट सीमा पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. आयटीबीपीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती दिली आहे. आयटीबीपीमध्ये 458 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदासाठी भरती निघाली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदावर भरती होणाऱ्या उमेदवाराला 21,700 ते 69,100 रुपये पगार मिळू शकतो. यासाठी उमेदवाराचं वय कमीत कमी 21 वर्षं आणि जास्तीत जास्त 27 वर्षं असणं गरजेचं आहे. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  देशातील अनेक राज्यात पावसाचा कहर सुरु असतांना राज्यात देखील पावसामुळे शेतकऱ्यांचे संकट कायम आहे तर काही ठिकाणी मोठमोठ्या दरड कोसळल्याने अनेक संसार देखील पाण्यात बुडाले आहे. तर काही नद्यांनी पाण्याची धोकादायक पातळी ओलांडली आहे. रायगड,रत्नागीरी, सिंधुदुर्गमध्ये पुढचे पाचही दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर पालघर ठाण्यासाठी आजही ऑरेंज अलर्ट कामय आहे. विदर्भासाठी पुढचे पाच दिवस पावसाचे मुसळधार पावसाचे आहेत. अमरावती, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील आज धुव्वाधार पावसाचा अंदाज आहे. जळगाव साठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात देखील अनेक ठिकाणी विजांच्या कडकटांसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशभर पावसाचे थैमान सुरु असतांना बांगलादेशात बसला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात प्रवाशांनी भरलेली बस तलावात पडल्याने तीन मुलांसह 17 जणांचा मृत्यू झाला असून 35 जण जखमी झाले आहेत. वृत्तसंस्था एएनआयने बांगलादेशी वृत्तपत्र डेली स्टारच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला. या अपघातात बचावलेल्यांनी बस चालकाला दोषी ठरवत बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी भरल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले. डेली स्टारच्या मते, 52 लोकांची क्षमता असलेल्या बसमध्ये 60 हून अधिक लोक होते. पिरोजपूर येथील भंडारिया येथून सकाळी 9 वाजता निघालेली बस बारिशाल-खुलना महामार्गावरील छत्रकांडा येथे सकाळी 10 वाजताच्या सुमारास रस्त्याच्या…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील दोन जणांचा शुक्रवारी बुडून मृत्यू झाला. रढावन येथे एकाचा विहिरीत तर दुसऱ्याचा खदानीत मृतदेह आढळून आला. यात नितीन अंबादास मराठे (४२, रा. मुसळी ता. धरणगाव, ह.मु. रढावण- राजोरे) आणि देवा धाकू पारधी (४०, रा. ताडेपुरा, अमळनेर) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन हा भाऊ शरद, आईसोबत बुधवारी शेतात काम करत होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भाऊ घरी जायला निघाला असता, नितीन याने आपण नंतर येत असल्याचे सांगितले. मात्र, तो घरी पोहोचलाच नाही. शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याचे मामा राजेंद्र चिंतामण काळे यांच्या शेतातील विहिरीत नितीनचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत अमळनेर पोलिसात…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी  तालुक्यातील एका छोट्याशा गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस दारुड्या बापाने अश्लील शिवीगाळ करीत विनयभंग केल्याची नोंद पोलीस पाचोरा पोलीस स्थानकात झाल्यानंतर बापाला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका खेड्यात १६ वर्षीय पिडीत मुलगी ही आपल्या आई मयत असल्याने दोन भावांसह आजीसोबत बापाकडे राहत असून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अकरावीत पाचोरा कॉलेजला शिक्षण घेत असून एप्रिल महिन्यात बापाने मुलीला व त्याच्या आईला अश्लील शिवीगाळ करीत मुलीशी गैरवर्तन केले असून तसेच जून महिन्यात देखील बापाने पिडीतेस एकांतात गाठून अश्लील शिवीगाळ करीत विनयभंग केला आहे. वडील दारूच्या नशेत पिडीतेचा छळ करीत असल्याने शनिवारी पाचोरा पोलीस स्थानकात पीडित…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात २७ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यावल पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील डांभुर्णी या गावातील एका २७ वर्षीय तरुणी गावातील एका तरुणासोबत शेतीकामासाठी जवळच्या शेतात नियमित जात होती त्यामुळे तिची ओळख तरुणासोबत चांगलीच वाढली तरुणाने तरुणीस पैशाचे खोटे आमिष दाखवून संशयित आरोपीने तरुणीस डांबुर्णी येथून सावदा येथे बोलवून त्यानंतर त्याच्या दुचाकी वर दिनांक १५ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास तिला दुचाकीने ओंकारेश्वर येथून बडवाह येथील एका लॉज मध्ये नेऊन त्या ठिकाणी तरुणीवर बळजबरी करीत तीच्या मनाविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी यावल पोलीस…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाचा कहर सुरु असताना जळगाव शहराचे माजी महापौर विष्णू भंगाळे यांचे बंधू जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या चारचाकी गाडीचे टायर फुटून पलटी झाली. यावेळी चारचाकीमध्ये ४ व्यक्ती जण होते. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील माजी महापौर विष्णू भंगाळे यांचे बंधू जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे हे दि. २२ रोजी भुसावळकडून जळगावच्या दिशेने येत असतांना दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांच्या चारचाकी क्र.नंबर एमएच 19 सीओ 8240 या गाडीचे टायर फुटल्याने वाहन चालकाचा नियंत्रण सुटल्याने चारचाकी गाडी पलटी झाली. हा अपघात नशिराबाद पुलावर झाला असून गाडीने पलटी घेतल्यावर रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी लागलीच धाव घेत…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशातील अनेक नागरिकांना ‘गदर’ चित्रपटाची आठवण करून देणारी स्टोरी सध्या देशात घडू लागली असल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. पण पोलीस यंत्रणा ज्या प्रकारे तपास करीत आहे. त्याप्रमाणे हि स्टोरी कुठलीही लव्ह स्टोरी असल्याचे कुठलेही संकेत देत नाही. हि स्टोरी सीमा हैदर भारत आली कशी व का आली यासाठी एटीएसने तिची चौकशी केली असून सीमासोबत तिचा पती सचिन आणि सासरे नेत्रपाल यांचीही चौकशी करण्यात आली आहे. तीन दिवसांच्या चौकशीमध्ये सीमाबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या. कारण काही तशी कारणे त्यातील सर्वात मुख्य म्हणजे सीमाच्या ओळखपत्रावर तिचं वय हे 21 दाखवण्यात आलं होतं मात्र तिने वय 27 सांगितलं…

Read More