जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेल्याचा प्रकार २४ जुलै रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल मोरे करीत आहे.
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील बस स्थानकावर आत्याला घेण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय विद्यार्थ्यांचा सार्वजनिक शौचालयातून तीन जणांनी जबरदस्तीने दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून फरार झाल्याची घटना २५ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बस स्थानकावर तालुक्यातील हिरापूर येथील १९ वर्षीय विद्यार्थी नचिकेत सुनील येवले हा आपल्या आत्याला घेण्यासाठी चाळीसगाव बस स्थानकावर आला असता तो लघुशंकेसाठी सार्वजनिक शौचालयात गेला असता तेथे असलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्याच्या हातातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला .याप्रकरणी नचिकेत येवले याच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात सुरु असलेले राजकीय गणिते पाहता शरद पवारांची राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते आता अजित पवारांच्या गटात सामील होण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरु असून त्याचा पहिला अनुभव सोलापूर जिल्ह्यात आलेला आहे. शरद पवारांचे कट्टर समर्थक मानले जाणारे नेते आता अजित पवारांच्या गटात आल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे खंदे समर्थक आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांचे घरदेखील फुटल्याचे मानले जात आहे. बळिराम साठे यांचे सुपुत्र जितेंद्र साठे आणि नातू जयदीप साठे हे अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. या संबंधितांनी मंगळवारी मुंबईत अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या अनेक महिन्यापासून मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिसांचार सुरु असून आता महिलावर देखील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात मणिपूरमधील एका दुकानात स्थानिक महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाला निलंबित करण्यात आलं आहे. एका अधिकाऱ्याने काल (मंगळवारी) याबाबतची माहिती दिली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडिओमध्ये, हेड कॉन्स्टेबल सतीश प्रसाद, त्याच्या गणवेशात असताना महिलेचा विनयभंग करत तिला शिवीगाळ करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे. बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने या घटनेची माहिती देताना सांगितले की, ही घटना २० जुलै रोजी…
अमळनेर : प्रतिनिधी बोगस खते आणि लाल्या व इतर रोगामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेली कपाशी पिके करपत असल्याने माजी जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांनी कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सविस्तर चर्चा करत तातडीने पंचनामे करून प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्याची विनंती अधिकाऱ्यांना केली. तालुका कृषी अधिकारी श्री ठाकरे आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री ठाकूर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. अमळनेर तालुक्यात मंगरूळ, जानवे, नीम, कळमसरे, पाडळसरे यासह अनेक गावातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड केली असता लाल्या सह इतर अज्ञात रोगामुळे पिके खराब झाली तर काहींनी सरदार नामक बोगस खते दिल्याने त्यांचीही पिके करपली.…
जळगाव : प्रतिनिधी एका संतापजनक घटनेने जिल्हा कारागृह चर्चेत आले आहे. या कारागृहात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ब्यारेकमधील खुनाच्या गुन्ह्यातील एका बंदीवर चार जणांनी अनैसर्गिक कृत्य करून या कृत्याचे वाचता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा कारागृहातील वर्ग २ मध्ये खूनाच्या गुन्ह्यात असलेला २६ वर्षीय संशयिताला ठेवण्यात आले असून त्याच्यासोबत बॅरेक १ व २ मध्ये भावेश कांतीलाल दंडगव्हाळ, विक्की शिंदे, कलीम शेख सलीम, विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण या कैद्यांना देखील ठेवले होते. दि.१२ रोजी त्या कैद्याला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील शासकीय विभागात अनेक अधिकारी लाच घेत असता त्याचे प्रमाण गेल्या दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहे पण लाच लुचपत विभाग देखील लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करीत अद्दल घडवीत आहे. पण एका अधिकाऱ्याने तर थेट लाच घेत असतांना पोलिसांनी पकडल्याने त्या नोटा तोंडात कोंबल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हि घटना मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात घडली आहे. लोकायुक्तांच्या पथकाने एका महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले. यानंतर लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याने लाच घेतलेली रक्कम तोंडात कोंबल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यादरम्यान या अधिकाऱ्याच्या तोंडातून नोटा काढण्याचा खूप प्रयत्न केला तरीही त्याने…
मुंबई : वृत्तसंस्था मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले नाव कायम ठेवणारी व आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री पूजा सावंत हे नाव आता कलाविश्वासाठी नवीन राहिलेलं नाही. त्यामुळे बऱ्याचवेळा ती चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. ती नेहमीच सोशल मिडीयावर देखील सक्रीय असते. जंगली चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या पूजाविषयी सध्या चाहत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून नवीन चर्चा जोर धरु लागली आहे. पूजाने गुपचूप साखरपुडा उरकल्याचे म्हंटले जात होते. अखेर यावर पूजाने मौन सोडले आहे. काही दिवसांपुर्वी पूजाने इंस्टाग्रामवर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले होते. या फोटोत ती खुपच सुंदर दिसत होती. मात्र या फोटोमध्ये पूजाच्या नेटकऱ्यांना एक अंगठी दिसली. यावरून तिचा साखरपुडा…
मुंबई : वृत्तसंस्था मुंबईत हिंदुजा रुग्णालयात त्यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचं वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विनोदी लेखन आणि क्रीडा पत्रकारीतेसाठी ते प्रसिद्ध होते. प्रकृती बिघडल्याने शिरीष कणेकर यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारावेळी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. शिरीष कणेकर यांची ओळख शैलीदार लेखक, फिल्मी गप्पांची मैफल रंगवणारे वक्ते अशी होती. वृत्तपत्रांमध्ये सिनेमा, क्रिकेट, राजकारण यावर त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध आहे. तसंच कणेकरी, फिल्लमबाजी, शिरीषासन यातून त्यांनी विनोदी लेखनही केलं.मुंबई विद्यापीठातून शिरीष कणेकर यांनी एलएलबी पूर्ण केली. त्यानंतर पत्रकार म्हणून त्यांनी इंडियन एक्सप्रेस, फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रांमधून काम केलं.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील नवीन कानळदा रोड या ठिकाणी रिक्षा पलटी झाली असून सुदेवाने या रिक्षा कुठलेही प्रवासी नसून केवळ रिक्षाचालक होता त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील सत्यम पार्क परिसरातील सचिन जयस्वाल हे रिक्षा चालवून आपल्या परिवाराचा उदरनिवार्ह करतात. दि. २५ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घरी जेवणासाठी जात असतांना नवीन कानळदा रोड परिसरातील लक्ष्मी नगराच्या पुढे जात असतांना अचानक दोन ते तीन कुत्रे मध्ये आल्याने त्या कुत्र्यांना वाचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असता. त्याचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा पलटी झाली. घटनास्थळी ५ ते १० मिनिटे कुणालाही लक्षात आले नाही पण काहीना समजताच रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यानी त्यांना…

