Author: editor desk

मुक्ताईनगर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका ठिकाणी बसचे टायर फुटल्याने बस थेट शेतात जावून धडकली असून या अपघातात जिल्ह्यातील ९ प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. या अपघातात सुदैवाने या अपघातात प्राणहानी टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज जळगाव येथून मुक्ताईनगर आगाराची एमएच २० बीएल-१७७० या क्रमांकाची बस काटेलधामकडे येत असतांना मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा-काकोडा गावाजवळ असलेल्या पारंबी फाट्याजवळ बसचे टायर अचानक फुटले. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस ही बाजूलाच असलेल्या शेताच्या बांधावर जाऊन धडकली. आज सकाळी हा अपघात घडला. या अपघातामध्ये नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. यात प्रतीक्षा सुनील झांबरे ( २२, रा. आळंद ); समाधान उखर्डु तायडे…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातील ३२ वर्षीय महिलेचा एकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील पहुर पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या एका गावातील 32 वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे . दिनांक २६ रोजी ही महिला घरात काटेवर झोपलेली असताना त्यावेळेस त्याच गावातील एक समस्येत आरोग्य तिच्याजवळ येऊन चुकीचे वर्तन करीत त्यावेळी महिलेला लज्जा उत्पन्न झाल्याने त्या तरुणा विरोधात पहूर पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक सुभाष पाटील हे करीत आहे

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  महाराष्ट्र भूषण पुरस्काराप्रमाणे  देशातल्या उद्योग क्षेत्रात नावाजला जाणारा उद्योग रत्न हा पुरस्कार महाराष्ट्र शासन या वर्षीपासून सुरू करत असून यात पहिला पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना देण्यात येणार आहे, अशी घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केली. तरुण, महिला तसेच मराठी उद्योजक अशा तीन प्रवर्गासाठी आणखी तीन पुरस्कार देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रामधल्या अलौकिक कामगिरीसाठी प्रदान करण्यात येतो. त्याच धर्तीवर उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी या वर्षीपासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  शिंदे – फडणवीस सरकारमध्ये अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी झाली होती. आता शरद पवार राज्यात पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरले असून त्यांनी आता पक्षाचे बंडखोर नेते व भाजपला मैदानात चीतपट करण्यासाठी तयारी सुरु केली असून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी याबबत ३ प्लॅन तयार केले असून, त्याचा सर्वात मोठा फटका केंद्रातील सत्ताधारी भाजपला बसण्याची शक्यता आहे. यात  छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आदी बडे नेते कॅबिनेट मंत्री झाले. या घटनाक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली. त्यानंतर अजित पवारांच्या गटाने शरद पवारांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. पण पवारांनी त्यांच्यासोबत येण्यास ठाम नकार दिला. आता पवार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यातील चिखली येथे भारत निर्माण योजनेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकारणी उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद उपविभाग, मुक्ताईनगर यांनी केलेल्या चौकशीत रुपये १६,९२,०६८ एवढ्या रक्कमेची तफावत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. याबाबत विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करत आ.एकनाथराव खडसे यांनी चिखली येथे भारत निर्माणच्या कामांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी बोलता्ंना ते म्हणाले, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, जळगाव यांनी दिनांक २७ जुलै २०२२ रोजीच्या पत्रान्वये गट विकास अधिकारी, पंचायत समिती, मुक्ताईनगर यांना चौकशी अहवालाप्रमाणे रुपये १६,९२,०६८ एवढी रक्कम संबंधित तांत्रिक सेवा पुरवठेदार तत्कालीन अध्यक्ष व सचिव व सर्व तत्कालीन ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी  पाचोरा शहरातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस माझ्याशी लग्न कर माझ्यासोबत चल अन्यथा तुझ्या अंगावर ऍसिड टाकून देईल अशी धमकी देत एकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे यामुळे परिसरात खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील एका परिसरात असलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून गेल्या दोन महिन्यापासून पाचोरा तालुक्यातील एका गावातील एक तरुण अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना नियमितपणे अल्पवयीन मुलगी असल्याचे माहिती असून देखील तिच्या वेळोवेळी पाठलाग करून तिच्या शाळेजवळ तिला थांबवत माझ्याशी लग्न कर व तू माझ्यासोबत चल नाहीतर मी तुझ्या अंगावर एसिड टाकून देईन अशी वारंवार धमकी देत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  परप्रांतीय तरुण गोव्याला कामानिमित्त गेलेला असतांना त्याची प्रकृती बिघडल्याने, मित्रांसोबत परत घरी जाण्यासाठी निघाला असताना घरी पोहोचण्याआधीच रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे ४ वाजता घडली. कलीम बाबूराव कोमार (वय २८, रा. उडुरमा, ता. कुटुरा, ओडिशा) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मित्रांसोबत पुन्हा ओडिशामधील आपल्या गावाला जाण्यासाठी मंगळवारी निघाला. मात्र, बुधवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास म्हसावद गावाजवळ कलीम याला अस्वस्थ वाटत असल्याने तो बाथरूमला जाण्यासाठी गेला. मात्र, त्याची प्रकृती खाल्यावल्याने त्याला चक्कर येऊन तो धावत्या रेल्वेतून खाली पडला.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करीत या अकाऊंटवरून घरगुती साहित्य विक्री करावयाचे असल्याची पोस्टदेखील टाकण्यात आली आहे. या प्रकरणी अमन मित्तल यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची गेल्याच आठवड्यात बदली झाली आहे. सायबर चोरट्यांनी अमन मित्तल यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले आहे. तसेच त्या अकाऊंटवरून घरगुती साहित्य विक्रीला द्यावयाचे सांगत, फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अमन मित्तल आयएएस या नावाने हे अकाऊंट तयार केले आहे. तसेच याच नावाने मित्तल यांचे अधिकृत अकाऊंटदेखील आहे. त्यांच्याच अकाऊंटवरील फोटो वापरून…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी  तालुक्यातील लोहारखेडा येथे दारुड्या पतीस दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे न दिल्याने त्याचा राग आल्याने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांड्याने  जबर मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार दि. २३ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला याप्रकरणी मद्यपी पतीविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहार खेडा येथील रहिवासी असलेल्या रंजना गोपाळ पानपाटील वय 25 ह्या शेत मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. 23 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांचे पती गोपाळ गणेश पानपाटील हे नेहमी दारू पिण्यासाठी पैसे मागत असताना त्यांनी पैसे ची मागणी केली मात्र पैसे न दिल्यामुळे याचा राग आल्याने गोपाळ पान पाटील…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील वाघारी येथील एका घरात अनोळखी चोरट्यानी प्रवेश करून पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि 13 हजार रुपयेची रोकड चोरून नेल्याचा प्रकार २६ जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडला याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघारी येथील रहिवासी दीपक जीवन गुटके यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने पाच हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल व सिम कार्ड तसेच १३ हजार ८०० रुपयांची रोकड चोरून नेत्याचा प्रकार 26 जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने दीपक घुटके यांनी दिलेल्या पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल…

Read More