नवी दिल्ली : वृत्तसंस्था तामिळनाडूमध्ये मदुराई ट्रेनला आग लागल्याची घटना समोर आली आहे. येथे मदुराई स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्याला आग लागली. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, दक्षिण रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, लखनौहून रामेश्वरमकडे जाणाऱ्या ट्रेनच्या पॅसेंजर डब्याला आग लागल्याने 10 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुनालूर-मदुराई एक्स्प्रेसच्या एका खासगी डब्यात आज पहाटे ५.१५ वाजता मदुराई यार्डमध्ये आग लागली. अग्निशमन दलाने पोहोचून आग आटोक्यात आणली असून इतर डब्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. यामुळेच आग लागली आहे. ट्रेनला आग लागल्याचा खुलासा दक्षिण रेल्वेने केला आहे. प्रवाशाने गुपचूप वाहून नेत असलेल्या गॅस सिलेंडरमुळे ही आग…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे बांधकामाच्या ठिकाणी कामासाठी जात असलेल्या दोन जणांच्या दुचाकीला ट्रेलरने (ट्रॉला) कट मारल्याने दुचाकीस्वार खाली पडून गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील बिबानगरजवळ घडली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एका जणाच्या हाताचा पंजा निकामी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील हनिफ शहा अमन शहा (२४) हे इमारत बांधकामाच्या ठिकाणी मजुरीचे काम करतात. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ते दुचाकीने (क्र. एमएच १९, डीक्यू ५३८६) पाळधी येथे कामावर जाण्यासाठी रहेमान गुलाब शहा यांच्यासह निघाले होते. त्या वेळी मागून येणाऱ्या ट्रालाने त्यांना…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील बदायूंमधील बिलसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या तेजेंद्र नावाच्या 42 वर्षीय व्यक्तीची रात्री घराबाहेर गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीला खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. हि घटना 14 ऑगस्ट रोजी घडली आहे. तेजेंद्र सागर याची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाडही पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी या गुन्ह्याबाबत माहिती देताना सांगितले की तेजेंद्र याची त्याच्या सुनेवर वाईट नजर होती. ही बाब तेजेंद्रच्या पत्नीला कळाली होती आणि दोघांमध्ये यावरून बरेचदा वाद होत होता. अनेक वेळा समजावूनही तेजेंद्र सुधारत नव्हता. तेजेंद्रच्या मुलाचे 2 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. माल ओलांडून…
एरंडोल : प्रतिनिधी येथील शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्यावर धरणगाव रस्ता कोठे आहे? असे विचारून मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 69 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची 17 ग्रॅम वजनाची मंगळपोल लांबवली. ही घटना गुरुवारी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील परदेशी गल्लीमधील रहिवासी विमलबाई लक्ष्मण चौधरी ह्या नेहमीप्रमाणे सकाळी शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्यावर फिरायला गेल्या असता विमलबाई चौधरी ह्या विश्रामगृहाच्या पुढे चालत असतांना मोटार सायकलवरून तीन युवक आले आणि त्यांच्याजवळ थांबून धरणगाव रस्ता कोठे आहे?. तसेच दुसरा रस्ता कोणता आहे?, असे विचारले. त्यानंतर विमलबाई चौधरी माहिती देवून पुढे चालत असतांना मोटार सायकलवरील…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील आव्हाने शिवारातील एका परिसरात महिलेसोबत दोन जणांमध्ये वाद झाला असून याकारणावरून महिला ही घरी बसलेली असतांना परिसरातील काहींनी चुकीचे वर्तन करून मारहाण करत विनयभंग करत धमकी दिल्याची घटना बुधवारी २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका भागात असलेल्या महिलेचे व त्याच भागातील दोन जणांमध्ये बुधवारी २३ ऑगस्ट रोजी सकाळी वाद झाला होता. त्यानंतर ही महिला तिच्या बहिणीसह संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घराबाहेर बसलेली होती. त्यावेळी सकाळी झालेल्या वादातून त्यांच्या घरासमोर राहणारा एक जण त्याच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्या सोशल मिडीयावर आपण अनेक व्हिडीओ बघत असतो, यात नवरा बायकोचे भांडण देखील असते तर नवऱ्यासोबत प्रेयसीला बघून बायको नवऱ्याची धुलाई केली असल्याचा देखील आजवर व्हिडीओ पाहिले आहे पण हि घटना वेगळीच आहे. चक्क दोन बायकांना एका नवऱ्यासोबत राहण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. एका व्यक्तीने दोन लग्न केली. दोन्ही बायकांना नवऱ्यासोबतच रहायच होतं. त्यांना नवऱ्याला आपल्यापासून दूर होऊ द्यायच नव्हतं. त्यावरुन त्यांच्यात भांडण सुरु होती. अखेर हे प्रकरण परामर्श न्यायालय गेलं. त्यात न्यायालयाने दोघींना समान न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. घटिया येथे राहणाऱ्या व्यक्तीने 15 वर्षांपूर्वी बामोरा येथे राहणाऱ्या महिलेबरोबर लग्न केलं. काही काळापर्यंत पती-पत्नीमध्ये सगळं…
अहमदनगर : वृत्तसंस्था भारतामध्ये गेल्या काही वर्षापासून अनेक लोक घुसखोरी करीत असल्याच्या घटना ताज्या असतांना पुन्हा एकदा महाराष्ट्रात चार बांगलादेशींनी घुसखोरी केल्याने नगरमधून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहेत. अन्य सहा जण फरार झाले आहेत. अहमदनगरच्या खंडाळा येथील शिवशक्ती क्रेशर प्लांटवर काही दिवसांपासून बंगलादेशी लोक ओळख लपवून राहत होते. एजंटला पैसे देऊन बांगलादेशहून भारतात आले होते. नाशिक एटीएसने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. नगर तालुका पोलीस ठाण्यात दहा जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य फरार सहा जणांचा पोलीस शोध घेत आहेत. नाशिक एटीएस आणि नगर तालुका पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. खंडाळ येथील शिवशक्ती क्रेशर प्लांटवर काही…
मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील अनेक तरुण सोशल मिडीयाच्या माध्यमातून चुकीच्या मार्गाला लागल्याच्या घटना नियमित घडत असतात. सध्या ऑनलाइन गेम खेळण्याकडे अनेक तरुण आकर्षिले जात आहेत. नुकतेच डोंबिवलीत एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याने सांगितलेली माहिती ऐकून पोलिसांना धक्का बसला आहे. एका ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातून भर रस्त्यात मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या चोराला एका तरुणाने धाडस दाखवत पाठलाग करून पकडलं. त्यानंतर काही लोकांच्या मदतीने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्या तरुणाचं नाव नितीन ठाकरे असं आहे. चोरट्याने ऑनलाइन रमी सर्कलवर गेम खेळून त्यात कर्जबाजारी झाला होता. कर्ज फेडण्यासाठी चोरीचा मार्ग निवडल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. सध्या विष्णू नगर पोलिसांनी पुढचा…
पुणे : वृत्तसंस्था राज्याला हादरा देणारी घटना पुणे शहरात २०१० मध्ये घडली होती. या घटनेत एका युवकावर तब्बल ३७ वार कोयत्याने करण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात या प्रकरणाची सुनवाणी झाली. अखेर या खटल्याचा निकाल आला आहे. पुणे न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला. पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. पुणे येथे 21 नोव्हेंबर 2010 मध्ये राकेश नामदेव घुले (वय २५, रा. बोपखेल) यांचा खून करण्यात आला होता. हा खून पूर्व वैमनस्यातून झाला होता. तर यापूर्वी मार्च 2010 मध्ये राकेश घुले यांनी यातील आरोपींवर हल्ला…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर शहरातील एका मेडिकल फाउंडेशनच्या दवाखान्यात एका महिलेसह पाच अनोळखी लोकांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंमळनेर पोलीस स्थानकात महिलेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर शहरातील नर्मदा मेडिकल फाउंडेशन या दवाखान्यात दिनांक २३ ऑगस्ट रोजी एका महिलेने दवाखान्यांमध्ये येत मोफत उपचार करावेत तसेच आम्ही दिलेले पैसे परत करावेत तसेच आम्हाला आत्ताच्या आत्ता दहा हजार रुपये द्यावेत जर पैसे दिले नाही तर तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करून व जीवे ठार मारू अशी धमकी देऊन ही मागणी केली असता साक्षीदाराने नकार दिल्याने डॉक्टरांच्या टेबल मधील ड्रॉवरमध्ये ठेवलेले…

