भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कजगाव- कनाशी रस्त्यावर पायी जात असताना लोन पिराचे गावाजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी एकाला जबर मारहाण करीत त्याला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला तीन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील कनाशी येथील रहिवासी सागर राजेंद्र भदाणे (वय २६) हे दि. २४ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कजगाव येथून कनाशी गावाकडे रस्त्याने पायी जात असताना लोन पिराचे गावाजवळ अज्ञात तीन व्यक्तींनी दुचाकीवरून येऊन त्यांना मारहाण करून शिवीगाळ करीत त्यांच्या जवळील मोबाईल आणि बाराशे रुपये रोख लुटून नेले .याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक गुन्हेगारी तोंडवर काढत असतांना गेल्या काही महिन्यापासून प्रेमात जुडलेले विवाह पुढे जावून शेवटच्या टोकावर पोहचत असल्याच्या अनेक घटना समोर येवू लागल्या आहे. आसाम राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणानं पत्नी आणि सासू-सासऱ्यांची हत्या आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात घडली. तिघांच्या हत्या करुन त्यानं ९ महिन्यांच्या मुलासह पोलीस ठाणं गाठलं. आपण तिघांची हत्या केल्याची माहिती त्यानं पोलिसांना दिली आणि आत्मसमर्पण केलं. त्यानं दिलेली माहिती ऐकून पोलिसांनी त्यानं सांगितलेलं ठिकाण गाठलं. तिथे तिघांचे मृतदेह होते. नाजीबूर रहमान बोरा असं आरोपीचं नाव आहे. त्यानं चाकूनं भोसकून तिघांना संपवलं. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी पीडित…
अमळनेर : प्रतिनिधी ५० वर्षीय इसमाने घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला होता आज येथील न्यायालयाने आरोपीला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पारोळा पोलीस स्थानकात दाखल असलेल्या गुन्ह्यात एका आरोपीला आज अमळनेरच्या न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. दिनांक २ ऑगस्ट २०१८ साली देवगाव तालुका पारोळा येथील रहिवासी संतोष मुरलीधर पाटील ( वय ५०) या आरोपीने त्याच्या शेजारी राहत असलेल्या बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला होता. या मुलीस त्याने १० रूपये देऊन कुरकुरे आणण्यासाठी पाठविले. यानंतर त्याने अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. याप्रसंगी ती बालीका त्याच्या हाताला चावा घेऊन पळून गेली. यानंतर तिच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पारोळा पोलीस स्थानकात त्याच्या विरोधात भादंवि कलम ३५४,…
जळगाव : प्रतिनिधी कचरा, अमृतचे पाणी आदी समस्यांबाबत महासभेत आवाज उठवूनही त्याची दखल घेतली जात नाही. नगररचना विभागातील भ्रष्टाचार बंद व्हावा व आयुक्तांची बदली करावी यासाठी भाजपचे नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे गुरुवार, दि. २७ जुलैपासून महापालिकेसमोर साखळी उपोषण करणार आहेत. सर्व पक्षीय नगरसेवकांसह जळगावकरांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन सोनवणे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे. जळगाव शहराला आज समस्यांनी घेरले आहे. चालायला रस्ते नाहीत. पावसाळ्यात सर्वत्र चिखल साचला आहे. रोज २५० टन कचरा संकलनाचा मक्ता दिलेला असताना ३०० टन कचरा संकलित केल्याचे दाखवून महापालिकेची लूट केली जात आहे. इतका कचरा दाखविल्यावरही शहरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. आता त्यातून दुर्गंधी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी आणि तांबापूर परिसरात गांजाचे सेवन करून नशा करणाऱ्या दोघांवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. मिळालेल्या माहिती नुसार, सुप्रीम कॉलनी आणि तांबापूर या परिसरात काही तरुण गांजाचे सेवन करून नशा करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी कारवाई केली. तांबापुरा परिसरात शेख मशरूख अब्दुल खाटील (४२ रा. गवळी वाडा, तांबापुरा) आणि सुप्रीम कॉलनी परिसरात भरत राठोड (२५, रा. सेवालाल चौक, सुप्रीम कॉलनी) या दोघांवर कारवाई केली. पोलिस कॉन्स्टेबल विशाल कोळी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी आणि…
एरंडोल : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात अनेक अल्पवयीन मुली असोसह तरुणीवर अत्यचार होण्याचे प्रमाण सुरु असतांना एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एरंडोल तालुक्यातील एका मुलींच्या वस्तीगृहातील काळजी वाहकाने पाच बालिकांवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तिघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील खडके या ठिकाणी एक मुलींचे वस्तीगृह असून या ठिकाणी गणेश शिवाजी पंडीत हा काळजीवाहक म्हणून नेमणूकीला आहे. काळजीवाहक गणेश पंडीत याने वस्तीगृहातील बालिकांसोबत ऑगस्ट 2022 ते जून 2023 या कालावधीत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार बालिकांनी केली आहे. या पिडीत बालिकांनी या घटनेची माहिती संस्थेचे अधिक्षक आणि सचिव याच्याकडे देखील केली. मात्र त्यांनी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रेम आंधळं असतं असंही म्हटलं जातं. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला जात-धर्म, वर्ण-पंथ, श्रीमंती-गरीबी, वयातला फरक असं काहीही दिसत नसतं. एकदा प्रेम झालं की ती व्यक्ती त्यात आकंठ बुडते. मग ती व्यक्ती प्रेमासाठी काहीही करण्यास तयार होते. मात्र आजकाल प्रेमाच्या नावाखाली नात्यांचं पावित्र्यही डागाळलं जाऊ लागलं आहे. नात्यामधील पावित्र्य कलंकित करणारे एक प्रकरण उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये घडले आहे. इथे राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याची पुतणी आवडायला लागली. त्याने आपले प्रेम पुतणीसमोर व्यक्त केलं असता ती देखील याला तयार झाली. या दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केलं. दोघांच्या हट्टापायी दोघांची कुटुंबेही तयार झाली आणि सगळ्यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडले. जौनपूरमधल्या…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील अनेक भागातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असतांना शहरातील मेहरून परिसरातून चोरीस गेलेल्या दुचाकी प्रकरणी दाखल गुन्ह्यातील एका आरोपीच्या एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तीन मोटरसायकली हस्तगत करण्यात आले आहेत. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील मेहरून परिसरातील विठ्ठल मंदिराजवळ २० जुलै रोजी कल्पेश लहू कोल्हे यांची दुचाकी रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमी मिळाल्यानुसार संशयित संतोष शांताराम सपकाळे राहणार जोशी वाडा मेहरून हा चोरीच्या गुन्ह्यातील मोटर सायकल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेतले असता त्याने…
मुंबई : वृत्तसंस्था उष्माघाताने होणाऱ्या मृत्युंना नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरून मृतांचे कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्ना द्वारे विधानपरिषद सभागृहात केली यावेळी आ.एकनाथराव खडसे म्हणाले राज्यात उष्णतेच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात ११ नागरिकांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे शासनाने जाहीर केले आहे तसेच जळगाव जिल्ह्यात सुद्धा उष्माघातामुळे बऱ्याच नागरिकांचा मृत्यू झालेला आहे हे खरे आहे काय, असल्यास, उष्माघाताने होणाऱ्या मृत्युंना नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरून मृतांचे कुटुंबियांना शासनाकडून किमान ५ लाख रुपये आर्थिक मदत मिळणेबाबत मा.लोकप्रतिनिधी यांनी मा.मुख्यमंत्री महोदय यांचेकडे दिनांक १४ मे २०२३ रोजी पत्रव्यवहार करून मागणी केलेली आहे असे…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेला घर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासरे व इतरांवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूर येथील विवाहिता पूजा मुकेश जांगिड (वय ३४) हे सध्या माहेरी शहरातील गणेश वाडी येथे आले असून त्यांचे लग्न २०२१ ला मुकेश राधेश्याम जांगिड राहणार शुक्ला नगर ,गंदा गडा ,जबलपूर यांच्याशी झाला होता. विवाहानंतर सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर घर घेण्यासाठी पती मुकेश जांगिड याने पाच लाख रुपये बाहेरून आणावेत अशी मागणी केली. तसेच सासू सुमित्रा जांगिड सासरा राधेश्याम जांगिड नणंद निशा लोकेश…

