Author: editor desk

अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर शहरातील तिरंगा चौकात दुकानाला अचानक आग लागून साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ३१ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. आग विझवताना अग्निशमन दलाच्या तिघांना विजेचा धक्का बसला. मात्र सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. मिळालेल्या माहितीनुसार, तिरंगा चौकात येथील भाऊसाहेब गुलाबराव महाजन यांचे कांचन कॉस्मेटिक व जनरल स्टोअर्सचे दुकान असून ३१ रोजी रात्री त्यांना शेजारील हेमनदास पंजाबी यांचा फोन आला की, दुकानातून धूर निघत आहे. भाऊसाहेब महाजन दुकानावर पोहचले. त्यांनी शटर उघडले असता आगीच्या मोठ्या ज्वाळा निघत होत्या. आगीचे रौद्र रूप पाहून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे नितीन खैरनार, दिनेश बिन्हाडे, जफर खान, फारुख शेख,…

Read More

भडगाव : प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील कजगाव येथील बालिका दि. ३० रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार भडगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. तिचा मृतदेह गोंडगाव येथील गोठ्यात कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात मिळून आला. रात्री उशिरा घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोंडगाव येथील कल्याणी संजय पाटील ही आठ वर्षाची बालिका बेपत्ता झाल्याची तक्रार दि. ३० रोजी सायंकाळी भडगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली. या बालिकेचा तपास सुरू असतानाच मंगळवारी गोठ्यात कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात तिचा मृतदेह सापडला. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपविभागीय अधिकारी अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, कजगाव पोलीस मदत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी यावल अवैध फर्निचर दुकानांवर आज यावल वन विभागाने कारवाई केली. यात सुमारे १ लाख रूपये किंमतीची वन लाकुड व मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल गावातील शेख असलम शेख असगर (मुन्शी फर्निचर) येथे वन कर्मचार्‍यांना सह सापळा रचून धाड सत्र राबवले. त्यात विना परवाना अवैध साग नग – 5 (घन मीटर 0.062) तसेच रंधा मशीन – 1 असा एकूण 21984 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. किनगाव येथील रामचंद्र पाटील यांचे अवैध फर्निचर दुकानवर सापळा रचून धाड टाकली असता त्यात दरवाजा फालके 08, पलंग 02, सोफा सेट 01, साग नग 72, चौरंग…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यात अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्या माफियांवर लगाम लावण्यासाठी शासनाने वाळू ही प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. जळगाव जिल्ह्यात अद्याप ही यंत्रणा सुरू झाली नाही. नियम हे सर्वांना सारखे असल्यामुळे याची प्रचिती आज नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले. नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पदभार सांभाळल्यावर पहिल्याच बैठकीत सर्व वाळू माफियांना तंबी दिल्याने जिल्ह्यात वाळूमाफिया मध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली. त्यामुळे चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील स्वच्छतागृहाचे वाळू मिळत नसल्यामुळे काम थांबले असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानामधील स्वच्छतागृहाचे नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामाला वाळू लागत असल्यामुळे काम करणाऱ्या ठेकेदाराला…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक महिलासह तरुणीवर अत्याचाराचे प्रमाण वाढत असतांना एकच भयानक प्रकरण समोर आले आहे. चक्क तरुणाने आपल्या काकू घरात एकटी असल्याची संधी साधत शरीर संबध करायची मागणी केली पण काकूने नकार दिल्याने संतापलेल्या पुतण्याने चक्क काकूचे डोके भीतीवर आदळून ठार केल्याची घटना तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई शहरातील कोडुंगैयूरमध्ये ४८ वर्षीय काकूसोबत तरुणाला शरीर संबंध ठेवायचे असल्याने काकूने त्याच्या या मागणीला नकार दिल्याने पुतण्याने रागाच्या भरात काकूचे डोके भिंतीवर जोरदार आदळले. यात काकू गंभीर जखमी झाल्यवर देखील तरुणाने तिला किस करीत पुन्हा पुन्हा तिचे डोके भिंतीवर आदळून तिला ठार केले. हा तरूण इतक्यावर थांबला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज जिल्हा निबंधक यांना मधुकर सहकारी साखर कारखान्यास पुरविलेल्या उसाची रक्कम मिळण्याबाबत नशिराबाद सह केळी, निमगांव येथील उस उत्पादक शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हंटले आहे कि, उस उत्पादक शेतकरी असून सन 2018-19 या वर्षी आमच्या उसाची लागवड करून मधुकर सहकारी साखर कारखान्यात नोंदविलेला होता. आमचा लागवड केलेला संपूर्ण उस मधुकर सहकारी साखर कारखान्यास पुरविला होता. आज 5 वर्षे उलटूनही आम्हा शेतकऱ्यांना आमच्या उसाची रक्कम कारखान्याकडून मिळालेली नाही. निसर्गावर अवलंबून असलेला शेतकरी कष्ट करून उत्पादन घेतल्यावर येणाऱ्या रकमेवर पुढील हंगामाची तयारी करत असतो. परंतू अद्यापपावेतो उसाच्या रकमेची कारखान्याकडून परतफेड न…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील गणेश नगरातील रहिवासी असलेले डॉ.आदिनाथ संजय पाटील (वय २७) यांनी केईएम रुग्णालयात शिवडीतील टीबी रुग्णालयात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहेत. सोमवार, ३१ जुलै रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना समोर आल्यानंतर केईएमसह जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथे वैद्यकीय पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या डॉ. आदिनाथ पाटील हा केईएम रुग्णालयाच्या औषधविभागशास्त्र विभागांतर्गत पदव्युत्तर शिक्षण घेत होता. तो डॉ. संजय पाटील व डॉ. स्मिता पाटील यांचा चिरंजीव आहे. सोमवारी 31 जुलै रोजी सकाळी आठ वाजता मुलाने आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबीय मुंबईकडे रवाना झाले. काही दिवसांपूर्वी केईएम रुग्णालयातील महिला आणि…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  राज्यात पावसाचा हाहाकार सुरु असतांना अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतांना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात देखील एका शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या शेतकरीचा एक बैल विजेचा शौक लागल्याने मृत पावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील शेतकरी दीपक हेमराज पाटील यांचा १ बैल दि.३१ रोजी विजेचा शौक लागल्याने जागीच गतप्राण झाल्याने शेतकरीचे नुकसान झाले आहे. याबाबत सादर पंचनामा पशुवैदकीय अधिकारी यांनी केला असून सदर शेतकरीस शासनाकडून मदत व्हावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आलेली आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील समृद्धी एक्सप्रेस हायवेवर होणाऱ्या अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नुकतेच ठाण्यातील हायवेवर सोमवारी रात्री उशिरा एक दुर्घटना घडली. शहापूरजवळ सरलांबे येथे महामार्गावरील पुलाचे बांधकाम सुरू असताना गर्डर लॉन्चिंग मशिन पडल्याने 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. दोघे जखमी झाले आहेत. महामार्गावर रात्री बांधकाम सुरू होते. हे गर्डर मशीन 100 फूट उंचीवरून पडले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आताही अनेक मजूर दबलेले असण्याची भीती व्यक्त होत आहे. बचावकार्य सुरू आहे. वास्तविक, गर्डर मशीनचे वजन जास्त असल्याने ते लवकर हटवण्यात अडचणीत येत आहेत. क्रेन आल्यानंतरच बचाव कार्याला वेग येईल. शाहपूर उपजिल्हा रुग्णालयात सुमारे 15…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील आसोदा रोडवर असलेल्या एका मंदीराजवळून एकाची मालवाहू चारचाकी वाहन अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जुना ममुराबाद रोड परिसरातील चौघुले प्लॉट येथील रहिवासी मिलींद शशिकांत दलाल (वय-३६) हा तरूण टेंट हाऊसचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. त्यांच्याकडे सामान वाहतूक करण्यासाठी (एमएच ०४ जीएफ ९०१२) क्रमांकाचे चारचाकी वाहन आहे. २७ जुलै रात्री ११ वाजता ते २९ जुलै सकाळी ९ वाजेच्या दरम्यान जळगाव-आसोदा रोडवरील मुंजोबार मंदीराजवळ चारचाकी वाहन पार्कींग करून लावले होते. अज्ञात चोरट्यांनी चारचाकी वाहन चोरून नेल्याचे समोर आले. मिलींद…

Read More