जळगाव : प्रतिनिधी शहरात गेल्या आठवड्यापासून सर्वपक्षीय नगरसेवकांनी मनपाबाहेर साखळी उपोषण सुरु केले होते. त्यात मनपा आयुक्तांच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरु झाले होते. पण पाचव्या दिवशी शहराचे आ.राजूमामा भोळे यांनी हे आंदोलन सोडविण्यात आले होते तर दुसरीकडे प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम सुरु केली असून मनपात तुकाराम मुंडे यांना प्रशासक म्हणून बसविण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, जळगांव शहरांत गेल्या ५ ते ६ वर्षापासुन समस्यांचा महापुर असतांना प्रशासनाच्या नाकरते पणामुळे जळगांव करांना खडयांच्या मोठया प्रमाणात समस्यांचा मोठा सामना करावा लागत आहे. निधी येवुन देखील पारदर्शक पणे रस्त्यांची कामे झालेली नाहीत. त्यामुळे नागरीकांना आहे…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची बदली झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागेवर आयुष प्रसाद यांची नेमणूक झाली आहे. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांची देखील बदली झाली आहे. जळगाव जिह्यात गेल्या आठवड्यात जिल्ह्यात महत्वाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची नवनियुक्ती झाली असून जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे स्वागत तर जिल्हा परिषदेचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निरोप देण्यात आला.
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेंच्या पथकाने जिल्ह्यातील बोदवडसह मुक्ताईनगर, मलकापूर व सूरत येथील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून याप्रकरणी मुक्ताईनगरातील चोरीच्या पाच दुचाकींसह दुचाकी चोरटा संशयित आरोपी सागर रामदास कोळी याला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून एक लाख दहा हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सागर कोळी हा चोरीच्या दुचाकी बाळगून असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. पथकाने आरोपीला ताब्यात घेताच त्याने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली देत पाच दुचाकी काढून दिल्या. आरोपीला बोदवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था मुंबई-पालघर दरम्यान एका धावत्या रेल्वेत एकाने गोळीबार केल्याची घटना आज पहाटे घडली आहे. या घटनेने राज्य हादरले असून जयपूरहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने 4 जणांची गोळ्या झाडून हत्या केली. जवानाने आपल्या स्वयंचलित रायफलमधून गोळीबार केला आणि यामध्ये 3 प्रवासी आणि एक RPF जवानाचा मृत्यू झाला. आरोपी कॉन्स्टेबल चेतन कुमार चौधरी याने प्रथम एस्कॉर्ट ड्युटी इन्चार्ज टिका राम मीणा यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर दुसऱ्या डब्यात जाऊन तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केली. पालघर आणि मुंबईदरम्यान दहिसरमध्ये गोळीबार झाला. गोळी झाडणाऱ्या पोलीस हवालदाराला मीरा रोडजवळ पकडले आहे. हवालदार मानसिक तणावाने त्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. ही…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील नेरी गावानजीक भुसावळ-तुळजापूर एसटीला ओव्हरटेक करणाऱ्या कंटेनरने कट मारून धडक दिली. यात एसटीतील २४ प्रवासी किरकोळ जखमी झाले. हा अपघात रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींवर नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. नरेश पाटील यांनी उपचार केले. तीन जखमींना उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ-तुळजापूर एसटी ( क्र. एमएच २० बीएल ३४७२) नेरी येथील विश्रामगृहासमोरून पुढे जात असताना सिल्लोटकरे भगवान नेमाने जान असलेल्या कंटेनरने एसटीला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात धडक दिली. त्यात २४ प्रवासी जखमी झाले. मननेगी मानिनी मिलनान पोलिस निरीक्षक किरण शिंदे, भाजप कार्यकर्ते…
जळगाव : प्रतिनिधी शहरात गेली चार दिवसापूर्वी के.सी.पार्क परिसरात रात्री ८ वाजेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणी आता जळगाव महापालिकेच्या हद्दीतील जळगाव सर्वे नंबर ३२६/२, प्लॉट नंबर ३८ या ठिकाणी तळमजल्यावर शौचालय, बाथरूम व दोन दुकाने तसेच पहिला मजला असे विनापरवाना व अनधिकृत वाढीव बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकेच्या नगर रचना विभागाने अशोक नारायण माने यांना नोटीस बजावली आहे. हे बांधकाम का पाडण्यात येऊ नये, अशी विचारणा करून ३० दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे नोटिसीमध्ये म्हटले आहे. तीन दिवसांपूर्वी गुरुवार, २७ जुलै रोजी याच ठिकाणी गोळीबाराची घटना झाली होती. आव्हाणे रस्त्यावरील के. सी. पार्क, त्रिभुवन कॉलनी या ठिकाणी प्लॉट नंबर…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात कामे संपवून घरी जाणाऱ्या महिलेला एका तरुण व तरुणीने ५०० रुपयांची नोट दाखवून ती खरी की खोटी अशी विचारले अन् महिलेला गुंगी आली. त्या वेळी त्या महिलेचे ६७ हजार रुपयांचे दागिने ‘बंटी, बबली’ने हातचलाखी करीत लांबविल्याची घटना २८ जुलै रोजी शिरसोली नाक्यानजीक घडली. या प्रकरणी २९ रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनीमधील रहिवासी असलेल्या सुशीला आनंदा कापडे या वेगवेगळ्या ठिकाणी घरकामं करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात शुक्रवारी दुपारी कामे संपवून त्या घरी जात होत्या. त्या वेळी त्यांच्या मागे एक तरुणी आली व एक तरुण त्यांच्या बरोबर चालत होता.…
पाचोरा : प्रतिनिधी भरधाव रेल्वेतून पडल्याने परराज्यातील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि.२९ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली असुन, प्रथमदर्शनी मयताची ओळख पटविणे अवघड असल्याने अखेर ३० जुलै रोजी मयताची ओळख पटली. मयत इसम हा उत्तर प्रदेश येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा ते गाळण दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३६५ / २१ नजीक एका इसमाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती रेल्वे क्रं. १८०२९ चे लोकोपायलट आर. एस. कोष्टी यांनी वाॅकी टाॅकी द्वारे पाचोरा स्टेशन प्रबंधक यांना दिली. घटनास्थळ हे…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरापासून जवळ असलेल्या व एमआयडीसी मधील एका कंपनीत काम करून आपल्या मामासह रायपूर कंडारी गावात भाड्याने राहत असलेल्या खोलीत परप्रांतीय तरूणाने मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी ३० जुलै रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,बिहार राज्यातील दरबंगा गावातील व सध्या रायपूर कंडारीत रहिवासी असलेल्या गोविंदकुमार बलराम पासवान (वय-३२) हा तरूण आपला मामा अर्जून कुमार यांच्यासोबत गेल्या सहा महिन्यांपासून जळगाव तालुक्यातील रायपुर कंडारी येथे मोहन परदेशी यांच्या घरात भाड्याच्या खोलीत वास्तव्याला होता. गोविंदकुमार पासवान हा एमआयडीसीतील इंडो ऑईल प्रोटीन फूड या खासगी कंपनीत…
मुंबई : वृत्तसंस्था श्री शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे विदर्भ दौऱ्यावर असताना दोन शहरांमध्ये केलेल्या बेताल वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी व काँग्रेसने राज्यभर आंदोलन केले होते तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली होती यानंतर काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे ठार मारण्याची धमकी मिळाली असल्याने त्यांच्या घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भ दौऱ्यावर असलेले श्री शिव प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी दोन शहरात केलेल्या वेगवेगळ्या बेताल वक्तव्याबाबत दोन दिवसापासून राष्ट्रवादी व काँग्रेसने राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठे आंदोलन केले आहे त्यानंतर माजी मुख्यमंत्री यांनी विधिमंडळात याबाबत आक्रमक पवित्रा घेतल्याने त्यांच्या कराड…

