जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकात मध्ये असलेल्या फातिमान नगरात काय जुन्या वादातून एका तरुणाने गोळीबार केल्याची घटना दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली या गोळीबारच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी परिसरातील 20 सेक्टर मधील प्रभाग कंपनी समोर गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जुन्या वादातून सोपान याने गावठी कट्टा घेऊन आकाश तोवर यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीचा राग येऊन कमरेला लावलेला असलेला गावठी कट्टा काढून आकाशवर दोन वेळा हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कुणाला काही दुखापत झालेली…
Author: editor desk
पाचोरा : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात नुकतीच एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत खून केल्याची घटना घडली होती. त्यानंतर या घटनेवरून जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी आक्रोश मोर्चा निघाला होता. हा मोर्चा भडगाव शहरात देखील निघाला होता यावेळी मुख्यमंत्र्यांनी थेट फोन करीत मुलीच्या पालकांना धीर देत प्रशासनाला आदेश देखील दिले होते. याचे वृत्तांकन स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांनी केले होते. याप्रकरणी दुसऱ्या दिवशी आमदार किशोर पाटील यांची रेकॉर्डिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यानंतर त्या पत्रकाराला पाचोर्यातील भरचौकात मारहाण झाल्याची घटना घडली आहे. काय आहे प्रकरण भडगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलींवर अत्याचार करीत नराधमाने खून केल्याची…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारमधील आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याची दंबगगिरी सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्याविरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अपहरण करून मारहाण केल्याची तक्रार व्यावसायिकाने केली आहे. खोट्या मनिलाँड्रिंग केसमध्ये गोवण्याची धमकी दिल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. राज सुर्वे याच्यासह १० ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईतील एका व्यावसायिकाचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केल्याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुला सह इतर काही लोकांविरुद्धात गुन्हा दाखल केला आहे. वनराई पोलीसांनी या प्रकरणात मनोज मिश्रा, पद्माकर, राज सुर्वे, विकी शेट्टी व इतर 10ते 12 अनोळखी इसम विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याला हादरवून टाकणारी घटना गेल्या काही दिवसापूर्वी घडली होती. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अकस्मात मृत्यूमुळे मनोरंजन सृष्टी अनेकांना याच मोठा शॉक लागला होता. त्यांच्या कुटुंबियांसाठी तर हा मोठा धक्का होता, ते तर अक्षरश: कोसळले. गेली अनेक दशके मराठी, हिंदींतील विविध चित्रपटांचे भव्यदिव्य सेट उभारणाऱ्या नितीन देसाई यांना अनेक महत्वपूर्ण पुरस्कार मिळाले होते. मुंबईत राहून एन.डी.स्टुडिओचे कामकाज सांभाळायचे तर त्यांची मुलं परदेशात होती. आयुष्यात हेच कर आणि तेच कर असं नितीन देसाई यांनी कधीच त्यांच्या मुलांना सांगितलं नाही किंवा कोणत्याही गोष्टीसाठी त्यांच्यावर दबाव टाकला नाही. त्यांची छोटी मुलगी तन्वी ही फॅशन डिजायनिंगचे शिक्षण घेत असून…
पुणे : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून महामार्गावर होणाऱ्या अपघातांची समस्या नेहमीच होऊन गेले आहे अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर तब्बल 11 वाहनांचा विचित्र अपघात होत या अपघातात एकाचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे या अपघातामध्ये दुचाकी ट्रक व स्कूल बस असा असल्याचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोंढवा बुद्रुक स्मशानभूमी जवळ तब्बल 11 वाहनांचा अपघात होत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला ट्रकने जोरदार धडक दिली पण सुदैवाने या अपघातात शाळेत तरी मुले बचावले असून यातील दोन विद्यार्थ्यांना किरकोळ जखमी झाले आहे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातानंतर घटनास्थळी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक तरुण देशसेवेत नोकरीला लागण्याचे स्वप्न बाळगून असतात. तसाच एक तरूण असेच स्वप्न बाळगून होता. पण नियतीला हे कदाचित मान्य नसेल. हि घटना आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकानं स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. गळफास घेण्यापूर्वी युवकाने आईच्या व्हॉट्सअपला I am Sorry म्हणत आई वडिलांची माफी मागितली आहे. जर वेळीच घरमालकाने दरवाजा उघडला असता तर युवकाचा जीव वाचला असता असं त्याच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत युवक लखनौच्या बीबीडी परिसरात तिवारीगंज इथं भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याचे वडील हरीश साहनी आणि आई माया हरदोई संडिला खासगी कंपनीत नोकरी करतात. आईनं…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यात सुरु असलेल्या गुन्हेगारीच्या घटना दिवसेदिवस वाढत चाललेल्या असून पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमधील बायजीपुरा भागात एक थरारक घटना घडली आहे. या परिसरात एका तरुणावर गावठी पिस्तुलीने गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात देखील घेतले आहे. काय घडली घटना बायजीपुरा परिसर अतिशय रहदारीचा भागा म्हणुन ओळखला जात असतो. या परिसरात गोळीबारामध्ये एक तरूणाचा दुर्देवी मृत्यु तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हि घटना बुधवारी सायंकाळी साडे ७ च्या सुमारास गल्ली नंबर 18 मधील बौध्द विहारसमोर घडली आहे. 24 वर्षीय तरूणाचे दहा दिवसांनी लग्न असल्यामुळे टेलरकडे कपड्याचे माप देऊन घरी परत…
औरंगाबाद : वृत्तसंस्था जिल्ह्यातील पिशोर येथे मुलीसोबतच्या प्रेमप्रकरणातून २२ वर्षीय तरुणाला मारहाण करून विहिरीत फेकून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना कन्नड तालुक्यातील खातखेडा येथे सोमवारी रात्री घडली. नारायण रतन पवार असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीसह १८ नातेवाइकांविरुद्ध पिशोर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण पवार हा तरुण रविवारी सायंकाळी घरासमोर बाहेर बसला होता. यावेळी एका सात वर्षीय चिमुकल्याने एक चिठ्ठी आणून नारायणच्या दरवाजात टाकली. सदरील चिठ्ठी ही घरासमोर राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीने पाठविली असून, त्यात मला तुझी खूप आठवण येते. माझ्यावर प्रेम असेल तर मला दूर घेऊन चल, अशा प्रकारचा मजकूर लिहिलेला…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील एका गावामधील सात वर्षीय चिमुकलीचे अपहरण व खून केल्याप्रकरणी स्वप्निल उर्फ सोन्या विनोद पाटील (१९) याला पुन्हा ११ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनाववण्यात आली. ३० जुलै रोजी सात वर्षीय चिमुकली ही बेपत्ता झाली होती. दोन दिवसांनी तिचा मृतदेह कडब्याखाली आढळून आला होता. चौकशीअंती स्वप्निल यानेच तिचा खून केल्याची बाब समोर आल्यानंतर गुरुवारी त्याला अटक करण्यात आली. होती. शुक्रवार, ४ ऑगस्ट रोजी भडगाव पोलिसांनी त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला ९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. या दरम्यान त्याची विचारपूस केली असता. त्याने सहकार्य केले नसून वेळ काढून नेली. त्यामुळे त्याला पुन्हा पोलिस कोठडीची…
जळगाव : प्रतीनिधी भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून हत्या केल्या प्रकरणाचा खटला जलदगती चालवू तसेच आरोपीला कठोर शिक्षा होण्याबाबत कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. पीडित परिवाराला तत्काळ घरकूल मंजूर करून त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकारी हे मंगळवारी रावेर येथे आले होते. त्यावेळी क्षत्रिय सूर्यवंशी मराठा समाजाने त्यांना निवेदन दिले. त्यावर जिल्हाधिकारी यांनी वरील आश्वासन दिले. शहरातील राजे छत्रपती शिवाजी चौक परिसरात क्षत्रिय सूर्यवंशी मराठा समाजातर्फे शोकसभा घेऊन गोंडगाव येथील मयत पीडित बालिकेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान क्षत्रिय सूर्यवंशी मराठा समाजातर्फे तहसील कार्यालयावर धडक देत निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना…

