भंडारा : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून राज्यातील वाळू माफियांनी महसूल अधिकाऱ्यांच्या डोक्याला चांगलाच ताप दिलेला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील महसूल अधिकारीवर होणाऱ्या हल्याच्या घटना कुठेही कमी होत असतांना दिसून येत नाही तर वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने कारवाई करण्यास गेलेल्या महसूल विभागातील पथकातील अधिकाऱ्यांच्या अंगावर थेट ट्रॅक्टर चालविला. यात तलाठी किरण मोरे यांच्या पायावरून चाक गेल्याने हाड मोडल्याची घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी तालुक्यातील खातखेडा रेती घाटावर हा प्रकार घडला. याप्रकरणी आशिष काटेखाये (३५), पंकज काटेखाये (३३) या दोघांना अटक करण्यात आली असून, तिसरा अनोळखी व्यक्ती फरार आहे नदी घाटातून…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक लोकांना चहा पिण्याचे वेड असल्याने अनेक व्यापारी अनेक देशातून मसाले आणून राज्यात चहा बनवून विकत असतात. पण एका व्यापारीने थेट चहा पावडरच्या पाऊचमध्ये कोट्यवधी रुपयांच्या हिऱ्यांची तस्करी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कस्टम विभागाने आरोपीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. मुकीम रजा अश्रफ मन्सुरी असे आरोपीचे नाव असून तो मुंबईहून दुबईला जात होता. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या चहा पावडरच्या बॉक्समध्ये तब्बल दीड कोटींचे हिरे असल्याची माहिती मिळाली असून हा ऐवज जप्त केल्याचे सांगितले जात आहे. मुंबईतील नळ बाजार परिसरात राहणारा मुकीम रझा अश्रफ मन्सूरी (३०) हा मुंबईहून…
शेगाव : वृत्तसंस्था महाराष्ट्राला संत परंपरेची भूमी मानली जाते. त्यातील एक संत नागरी म्हणून शेगावची ओळख देखील आहे. याच नगरीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये कुंटणखाणा सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच कुंटणखाण्यावर छापेमारी करत दोन महिलांची सुटका केली. याप्रकरणी हॉटेल मालक आणि व्यवस्थापकासह दोन महिलांवर शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश देशमुख पप्पू उर्फ आनंद गुजर असे मुख्य आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. धार्मिक स्थळ अशी ओळख असलेल्या शेगावमध्ये अशा घटना उघडकीस येत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. आरोपींवर कडक कारवाईची मागणी…
मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे या मूळगावी गेले आहेत. ते पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यालाही उपस्थित राहिले नाही. प्रारंभी ते या कार्यक्रमाला ऑनलाइन हजर राहतील असे सांगण्यात आले. पण ते ऑनलाइनही हजर राहिले नसल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. आ.शिरसाठ म्हणाले कि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 तास काम करतात. हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती ाहे. आम्ही सर्व आमदारांनी त्यांना डॉक्टरांकडे जाण्याची विनंती केली आहे. 15 ऑगस्ट नंतर आम्ही त्यांना ‘बळजबरी’ने… हा शब्द मुद्दाम लक्षात ठेवा. आम्ही त्यांना बळजबरीने हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहोत. त्यांची तब्येत एवढी खराब आहे की, त्याची कल्पना तुम्हाला नसेल. आम्ही…
धरणगाव : प्रतिनधी धरणगाव तालुक्यातील निशाणे या लहानशा खेड्यात वर्ल्ड व्हिजन इंडिया या संस्थेच्या माध्यमातून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सायकली व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, प्रकल्प अधिकारी वर्ल्ड व्हिजन इंडिया जितेंद्र गोरे, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी सभापती दिपक सोनवणे, मुकूंद नन्नवरे, शिवसेना तालुका प्रमुख जयदीप पाटील,साळवा हायस्कूल चे मुख्याध्यापक ए एस पाटील, सरपंच योगेश पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विका.सोसायटी चैरमन सुभाष भाऊ पाटील मराठी शाळेचा मुख्याध्यापिका व शिक्षक वृंद व गावातील पालक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र गोऱ यांनी केले व आभार वळवी यांनी मानले कार्यक्रम…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील प्रत्येक व्यक्तीला भारतीय रेल्वेचा प्रवास अगदी सुरक्षित वाटत असतो. कधीकधी या प्रवासात कडू-गोड अनुभवही येतात. असाच एक अनुभव एका ट्रेनमध्ये प्रवास करीत असतांना अनेक प्रवाश्यांना आला आहे. शुक्रवारी जे प्रवासी आनंद विहार येथून गाझीपूरला जाणाऱ्या सुहेलदेव ट्रेनमध्ये बसले. दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल ते उत्तर प्रदेशातील गाझीपूर पर्यंत जाणारी सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस तिच्या नेहमीच्या वेळेनुसार आनंद विहार येथून रवाना झाली. मात्र ट्रेन पुढे गेली असता थोड्याच वेळात ट्रेनमधील दोन कोचमधील वीजच गेली. पॉवर फेल्युअर झाल्यामुळे AC सुद्धा बंद पडला आणि उकाड्यामुळे लोकांची चिडचिड, राग आणखीनच वाढला. वाढत्या उकाड्यामुळे कोचमधील लहान मुलं आणि महिलांचा त्रास वाढला.…
नागपूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातून भाजप नेत्या सना खान गेल्या काही दिवसापासून गायब झाल्या होत्या त्यानंतर जबलपूरमधील हिरण नदीत त्याचा मृतदेह आढळून आला असून या प्रकरणी जबलपूरच्या गोरा बाजार पोलिसांनी आरोपी अमित उर्फ पप्पू साहू याला अटक केली आहे. आरोपीने सनाची हत्या करून मृतदेह हिरण नदीत फेकल्याची कबुली दिली आहे. सनाने चार महिन्यांपूर्वीच अमितसोबत कोर्ट मॅरेज केले होते. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेले. मात्र, अद्याप मृतदेह सापडलेला नाही. त्यांची हत्या का आणि कशी झाली हेही समोर आलेले नाही. पोलिसांनी आणखी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी आरोपी अमित साहू, त्याचा नोकर जितेंद्र आणि अन्य एका आरोपीला २४ तासांच्या रिमांडवर नागपूरला नेले आहे.…
बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यात तरुण व तरुणी थोड्या थोड्या कारणाने टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपविल्याच्या घटना नियमित घडत असतात. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी बु येथील २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. गोठ्यातील लोखंडी अँगलला तरुणाने गळफास घेतला. अशोक कलाजी लिपने असे या तरुणाचे नाव आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे. अशोकचे वडील कलाजी लिपने हे साडेनऊच्या सुमारास बैलांना चारा टाकण्यासाठी ते गोठ्यावर गेले. यावेळी समोरील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांचा मुलगा अशोक गोठ्यातील अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला. यामुळे मोठा गोंधळ उडाला. त्याच्या रडण्याने…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील वावडे येथून चारचाकी चोरली आणि त्याच कारने मांडळ गावात येत अज्ञात चोरट्यांनी सात दुकाने फोडून सुमारे ३ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना दि. १० रोजी रात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वावडे येथून प्रकाश ज्ञानेश्वर धोबी यांची चारचाकी क्रमांक एमएच १९ एएक्स १७ चोरीला गेल्याचे दि. ११ रोजी सकाळी लक्षात आले. त्यांनी मारवड पोलिसात गुन्हा दाखल केला. त्याच वेळी मांडळ येथे सात दुकाने फोडल्याचे समोर आले. त्यात महेश जैन यांच्या किराणा दुकानातून २५ ते ३० हजार रुपयांचे साहित्य, नीलेश पाटील यांच्या कृषी केंद्रातून लॅपटॉप व रोख रक्कम ३० हजार, वाल्मीक पाटील यांच्या रेशन दुकानातून यांच्या…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर शहरातील एका परिसरात दारू दिली नाही म्हणून ‘सुलतान’ आणि ‘शाहरुख’ यांनी एका बिअरबारवर धिंगाणा घातला. तसेच दुकानाचे नुकसान केले. मालकाचे पैसेदेखील काढून घेतल्याची घटना दि. १० रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील बाजारपेठेत असलेल्या बिअर बारवर सुलतान रहिमखा पठाण ( वय ३७ ) याने दारूची बाटली मागितली. त्यावर मालकाने तू येथे दारू पिऊ नको, प्यायल्यावर तू पैसे देत नाही आणि काचेचे ग्लास फोडून नुकसान करतो. याचा राग येऊन सुलतान ने शिवीगाळ आणि दमदाटी केली. तसेच त्याचा भाऊ शाहरुख रहिम खान पठाण (वय ३६) याला बोलावून…

