Author: editor desk

जालना : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर दुचाकीसह चारचाकी व बसचा अपघात नियमित होत असल्याचे चित्र असतांना दि.८ रोजी रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा बसचालकाने ओव्हरटेक करीत असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट बस ३० फुट खोल गेली असून या प्रवासी जखमी झाले आहे. हि घटना जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या केंदळी फाट्याजवळ घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंदळी फाट्याजवळ पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी समोर असलेल्या आयशरला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला. पुसदवरून मुंबईकडे जाणारी एसटी बस रस्त्याच्या बाजूला 30 फूट खाली कोसळली. या अपघातात 22 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. तर तीन प्रवाशांना अधिक उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईतील मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. येत्या एक ते दोन दिवसांत दहशतवादी हल्ल्याची धमकी या फोनद्वारे देण्यात आली आहे. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात सोमवारी रात्री 10 वाजता हा फोन आला असल्याचे समजते. या फोनमुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे आता मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. याप्रकरणी पोलीस तपास करत असून हा फोन कोणी केला? कोणत्या उद्देशाने केला? खरेच काही अतिरेकी कारवाईचा कट आहे, की केवळ दहशत माजवण्याच्या उद्देशाने हा फोन करण्यात आला आहे, याबाबत मुंबई पोलीस तपास करत आहेत. तपासानंतर सर्व सत्य समोर येईल. परंतु, सातत्याने येणाऱ्या अशा धमकीच्या फोनमुळे मुंबई पुन्हा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी शिर्डी येथील ओझरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनात एक वक्तव्य केले होते. सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते, असं इंदुरीकर म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्या याच वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला होता. यावर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला होता. त्यामुळे खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत इंदुरीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, खंडपीठाचे निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने इंदुरीकर यांना दणका…

Read More

सावदा : प्रतिनिधी रावेर तालुक्यातील शहरातील एका उर्दू शाळेमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीला कार्यालयात बोलावून तिला नवीन नकाब देतो असे आम्हीच दाखवून ऑफिस बंद करून तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा घृणास्पद प्रकार येथे तीन ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा सावदा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एक तेरा वर्षीय विद्यार्थिनी ही अँग्लो उर्दू हायस्कूल गोसिया नगर येथे शिकत असून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संशयित अक्रम खान अमानुल्ला खान राहणार रजा नगर सावदा तालुका रावेर याने तिला ऑफिसमध्ये बोलावून तुला नवीन नकाब देतो…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मरणाच्या दारावर असणार त्या व्यक्तीच्या अनेक नातेवाई शेवटची इच्छा विचारीत असतात. अनेक गोष्टी करणं राहून गेल्या असतात. पण अशा इच्छा पूर्ण करण्यासाठी नातेवाईक काही हि करू शतकात. अनेक वेळा त्यांचा काही इच्छा अशा असतात की जा त्यांचा आजारपणामुळे पूर्ण करणं शक्य नसतं. अशाच एका पती पत्नीची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. ज्यामध्ये आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असताना पतीने तिला इच्छा विचारली. तिने जे काही मागितलं त्यानंतर त्याला सर्वात मोठा धक्का बसला. Reddit वर एक पोस्ट लिहिताना पतीने त्याची दुःखद कहाणी जगासमोर मांडली आहे. तो म्हणाला की, ”माझ्या पत्नीला असाध्य आजार आहे. तिच्याकडे जगण्यासाठी जास्तीत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ठाकरे गट व शिंदे गटात सुरु असलेल्या वादात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते टार्गेट होत आहे. त्यात नुकतेच अजून एक भर पडली आहे. शिवसेना (शिंदे गटा)चे अंधेरी विभागाचे प्रमुख अल्ताफ पेवकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. काल सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. अल्ताफ पेवकर वर्सोवा येथून आपल्या कारने घरी निघाले असताना, हल्लेखोर तोंडाला रूमाल बांधून आले आणि त्यांनी अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी बॅटच्या सहाय्याने अल्ताफ पेवकर यांच्या कारची काच फोडली. तसेच त्यांना मारहाण देखील केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा हल्ला ठाकरे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था विनानंबर प्लेट सुसाट निघालेल्या तरुणाला हटकल्याच्या रागात त्याने वाहतूक पोलिसाच्या अंगावर कार चढविण्याचा प्रयत्न केला. पोलिस थोडक्यात बचावताच तो वाटेत येणाऱ्या अन्य वाहनांनाही धडक देत सुसाट पुढे निघाला. नागरिकांनी त्याला अडविण्यासाठी गाडीच्या काचाही फोडल्या. अखेर जवळपास पाऊण तासाच्या थरारक पाठलागानंतर भायखळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याला अटक करण्यात आले. आदित जितेश धवन (२२) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, त्याचे वडील नागपूरमध्ये व्यावसायिक आहेत. धवन हा शिक्षण घेत असून, तो अंधेरी परिसरात राहतो. रविवारी सायंकाळी धवन अंधेरीतून मरिन ड्राइव्हकडे येत असताना एका दुचाकीला धडक देत पुढे निघाला. यादरम्यान, सुंदर महल जंक्शन, एन. एस. रोड येथे सिग्नल लागला,…

Read More

अहमदनगर : वृत्तसंस्था अनेकांचे बाप आपल्या मुलासाठी वाटेल ते करण्याची हिम्मत ठेवत असतात पण काही हैवान बाप मुलासोबत असे काही करतात कि, त्याचा कुठलाही नेम नाही. अशीच एक घटना अहमदनगर येथील कर्जत येथे घडली आहे. एका हैवान बापाने आपल्या दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकून दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. हि घटना अळसुंदे येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतजवळ असलेल्या अळसुंदे गावात दारूच्या आहारी गेलेल्या पित्याने थेट कौटुंबिक कलहातून पोटच्या दोन मुलांना विहिरीत फेकून दिल्याने बहीण- भावाचा मृत्यू झाला आहे. पत्नीच्या फिर्यादीवरून पती गोकूळ जयराम क्षीरसागर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक केली आहे. ऋतुजा गोकुळ…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मुख्य रस्त्यावर असलेल्या सोन्याच्या दुकानात पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांची चाहूल शेजारी राहणाऱ्या नागरिकांना लागल्याने चोरटे पसार झाले. नेरी येथील सचिन पाटील यांचे सिद्धी ज्वेलर्स नावाने दुकान आहे. सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास एका कारमधून चोरटे चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. यावेळी त्यांच्या हातात टॉमी व अन्य साहित्य होते. यावेळी काहीतरी पडल्याची चाहूल शेजारी राहणाऱ्या लोकांना लागली. ते पाहण्यासाठी ते बाहेर आले असता त्यांना चोरटे दिसले. त्यांनी ‘चोर चोर म्हणून आरडाओरड केली. यावेळी इतर नागरिकही जागे झाले. नागरिक जागे होताच चोरट्यांनी कारमधून पलायन केले. त्यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधलेला असल्याने त्यांचे चेहरे दिसू…

Read More

चोपडा : प्रतिनिधी वेळोदे येथून चोपड्याकडे महाविद्यालयात जात असताना दुचाकी व बस यांच्यात अपघात होवून विद्यार्थी जागीच ठार झाला. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या ही घटना सुमारास घडली. अमोल मूलचंद भोई ( २३, वेळोदे, ता. चोपडा) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. मयत अमोल भोई हा वेळोदे येथून चोपडा येथे महाविद्यालयात जात होता. तालुक्यातील गलंगी पोलिस चौकीजवळ बस आणि अमोलची दुचाकी यांच्यात अपघात झाल्याने अमोलचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई वडील, भाऊ असा परिवार आहे. त्याच्यावर सोमवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास वेळोदे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read More