Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वार २९ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपास जवळील विठ्ठल मंदिरासमोरील राष्ट्रीय महामार्गावर 27 ऑगस्ट रोजी घडली होता. या प्रकरणी मंगळवारी अज्ञात वाहनधारकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, भूषण संभाजी माळी (29, रा.पिंपरखेड, ता.भडगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील भूषण माळी हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला असून दि. २७ ऑगस्ट रोजी भूषण हा शिरसोली येथे राहणार्‍या बहिणीकडे भेटण्यासाठी आला होता. रात्रीचे जेवण केल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास भूषण हा दुचाकीने घरी जाण्यासाठी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील एका बँकेत काम करणाऱ्या कर्मचारी तरुणीचा लपून व्हिडीओ काढणाऱ्या एका जणाला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका खासगी बँकेत महिला कर्मचारी नोकरीला आहे. बुधवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शौकत अली अब्दुल गफ्फार (वय-४२) रा. कासमवाडी, जळगाव हा तिथे आला. त्यावेळी महिला कर्मचाऱ्याशी बोलत असतांना संभाषणाचे व्हिडीओ शुट‍ करत होता. दरम्यान, आपला व्हिडीओ शुट करत असल्याचे महिला कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच आरडाओरड करून बँकेतील इतर कर्मचाऱ्यांना सांगितला. त्यानंतर घडलेल्या प्रकारनंतर संतप्त नागरीकांना त्याला चांगला चोप देवून शहर पोलीसांच्या स्वाधिन केले.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था सातारा शहरातील एका नामवंत हॉटेलमध्ये धुमधडाक्यात साखरपुडा झाला. या साखरपुड्यात ९ लाख ६३ हजार रुपये खर्च केला. मात्र, त्यानंतर लग्न न करताच मुलाकडील मंडळींनी फसवणूक केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी सातारा शहर याप्रकरणी एका डॉक्टरसह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. गिरीश बाळकृष्ण कदम, बाळकृष्ण बाजीराव कदम, शीला बाळकृष्ण कदम (रा. शाहूनगर, गोडोली सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील तक्रारदार हे ७० वर्षांचे असून, ते मूळचे मुंबईचे आहेत. त्यांच्या डॉक्टर असलेल्या मुलीसोबत वरील संशयितांनी साताऱ्यातील एका नामवंत हॉटेलमध्ये साखरपुडा केला होता. लग्न मोडल्यामुळे सामाजिक बदनामी व आर्थिक नुकसानही झाले असल्याचे मुलीच्या वडिलांनी तक्रारीत नमूद…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था उत्तर प्रदेश येथून कामानिमित्त कुटुंबासमवेत राहण्यासाठी आलेल्या एका कुटुंबातील पतीने कौटुंबिक वादातून त्याच्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. नूरजहाँ मोहम्मद शफिक चौधरी (२८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. यातील मुख्य बाब म्हणजे बाप जेव्हा आईला मारत होता त्यावेळी त्यांची तीन चिमुकली मुलेदेखील समोर होती. मात्र, बापाचा पारा एवढा चढला होता की, त्याला याचेही भान नव्हते. याप्रकरणी पोलिसांनी नूरजहाँ यांचा पती मोहम्मद शफिक सुकीरल्ला चौधरी (३४) याला अटक केली असून, याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद चौधरी हा चार वर्षांपूर्वी कामानिमित्त उत्तर…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  चाळीसगाव येथून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीस, तसेच त्यास मदत करणाऱ्या मित्रास चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला ३१ रोजी अज्ञाताने फूस लावून पळवून नेले होते. शुभम संजय मोरे (२२, चाळीसगाव) याने या मुलीस पळवून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार शुभमला या गुन्ह्यात मित्र राहुल जगन सुतार (सूरत) याने मदत केली आहे. राहुल सुतार यास ताब्यात घेण्यात आले. यांनी केली कारवाई  पोहेकॉ. राहुल सोनवणे, पोकों. आशुतोष सोनवणे, पोकॉ. रवींद्र वच्छे पोकॉ. उज्ज्वल म्हस्के यांनी राहुल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  लखनऊ येथे नुकतेच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील १९ व्या जागतिक शांतता आणि एकता उत्सव ‘कॉनफ्लूएंस २०२३’ मध्ये जळगावच्या किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलने डंका वाजवला आहे. उत्सवातील विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या २० विद्यार्थ्यांच्या संघाने तब्बल ७ स्पर्धेत ८ बक्षिसे पटकावली आहेत. विजयी संघ सर्वोत्कृष्ट विजेतेपदाची ट्रॉफी घेऊन जळगावात पोहचताच त्यांचे शाळा व्यवस्थापन व पालकांतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. जगातील सगळयात मोठी शाळा म्हणून नावाजलेली लखनऊ येथील सिटी माँटेसरी स्कूलतर्फे दि.३० ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२३ दरम्यान डब्ल्यूयूसीसी ऑडिटोरियम लखनऊ येथे १९ व्या जागतिक शांतता आणि एकता उत्सव ‘कॉनफ्लूएंस २०२३’ चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये एकता, शांततेचे…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतात यासोबत चोरीच्या देखील घटना घडत आहे. अशातच एक धक्कादायक घटना पिंपरीत घडली आहे. चोरी करत असताना पाहिले म्हणून तिघांनी एका सुरक्षारक्षकाला हाताने व लोखंडी तलवारीने मारहाण केली आहे ही घटना रविवारी रात्री पिंपरी येथे घडली. याप्रकरणी सुखदेव राजेंद्र मोरे (वय 45 रा पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिरत दिली आहे. यावरून पोलिसांनी उज्वल विनोद लव्हे (वय.21 रा पिंपरी) याला अटक केली असून, त्याचे साथीदार गौरव वाल्मिकी व राज वाल्मिकी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्वल व गौरव याला पिंपरी पुलाखालून स्टील चोरी करताना फिर्यादी यांनी पाहिले होते. यादरम्यान…

Read More

पारोळा : प्रतिनिधी जळगाव ग्रामीण भागात होणाऱ्या अपघाताच्या संख्येत नियमित वाढ होत आहे. नेहमी दुचाकी, चारचाकीचा अपघात होत असतो मात्र नुकताच झालेल्या अपघातात एका चारचाकी कारने सायकलस्वाराला जबर धडक दिल्याने सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना पारोळा शहराजवळील हायवेच्या बायपास रस्त्यावरील धरणगाव चौफुलीवर मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा शहरातील बायपास हायवेवर धरणगाव चौफुलीवर मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहराकडे आपल्या सायकलीने येणारे शिवाजी शामराव मराठे (वय ३८, रा शिवाजी विभाग,पारोळा) हे घरी येत असताना जळगावकडून धुळेकडे जाणाऱ्या इनोव्हा कारने जोरदार धडक दिल्याने सायकल चालक पंधरा ते वीस फूट फेकले गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे आपल्या घरी सुट्टीसाठी आलेल्या मुंबईतील पोलिसाचा दुर्देवी अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली आहे. यात दीपक जयसिंग बाविस्कर (वय ३२) असे मयत पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे दीपक बाविस्कर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते व ते मुंबई येथे रेल्वे पोलिसात नियुक्तीस होते. दीपक बाविस्कर हे सुट्टीनिमित्त आपल्या गावी आल्यानंतर . सोमवारी रात्री दिपक बाविस्कर हे कामाच्या निमित्ताने दुचाकीने वावडदा येथे गेले होते. तेथील काम आटोपून परत घरी म्हसावदरोडवरील कुरकुरे नाल्याजवळ त्यांचया वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिली. याप्रकरणी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईतील गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून सध्या लोकल प्रवासही आता फारसा सुरक्षित राहिलेला नसल्याचे गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांवरून दिसून येत आहे. असाच एक प्रकार रेल्वे स्टेशनवर घडल्याचे समोर आले आहे. मुंबईतील मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्टेशनवर असाच काहीसा प्रकार घडला. तेथे एका महिलेचा विनयभंग झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करून विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ सप्टेंबर रोजी ही घटना घडली असून आरोपीविरोधात कलम 354 व कलम 509 अंतर्गत कुर्ला रेल्वे पोलिस स्थानकांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इरफान सिद्दीकी (वय 39) असे आरोपीचे नाव असून तो मुंब्रा येथील रहिवासी असल्याचे…

Read More