नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणत घडत आहे. अशीच एक घटना छत्तीसगडच्या विलासपूरमध्ये घडली आहे. तेथे एका भाजी व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जबलपूर येथील व्यापारी आणि राजस्थानमधील व्यापारी यांच्यात भाजीचा सौदा झाला होता. पण जबलपूरच्या व्यावसायिकाला तो भाजीपाला आवडला नाही. त्यामुळे त्यांच्यातील सौदा फिस्कटला. दोघांवरून त्याच कारणामुळे वाद झाला. त्यानंतर जबलपूरच्या व्यापाऱ्याने राजस्थानच्या व्यापाऱ्याची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, विलासपूरच्या तख्तपूर भागातील जबलपूर येथील भाजी व्यापारी सनम अन्सारी यांना राजस्थानचे भाजी व्यापारी भगवानराम बिश्नोई यांनी आणलेल्या काही भाज्या आवडल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यातील खरेदीचा सौदा फिस्कटला. यामुळे भगवानराम…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था जुन्या मुंबई पुणे नागपूर महामार्गावर खासगी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली असून यामध्ये सात- ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या मुंबई पुणे नागपूर महामार्गावर सुलतानपूर नजिक खाजगी बसला भीषण अपघात झाला. बस चालकाला झोप आल्याने भरधाव बस वरील नियंत्रण सुटून बस पलटी झाली. या अपघातात बसमधील सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच पोलिसांनी तात्काळ धाव घेत जखमींना मदत केली. अपघातातील जखमी प्रवाशांवर सध्या मेहकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामधील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात चोरीसह घरफोड्या करणाऱ्या अनेक टोळी सक्रीय झाल्या आहे. अशा अनेक फरार टोळ्यांच्या मागावर पोलीस असतांना एका टोळीतील सदस्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने दहा, वीस नव्हे तर तब्बल दीडशे घरफोड्या केल्या होत्या. परंतु तो पोलिसांना सापडत नव्हता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांकडून अनेक प्रयत्न केले गेले. नेहमीचकवा देऊन तो फरार होत होता. गुन्हेगारांचे अपराध कधीतरी पूर्ण होतात, त्या पद्धतीने त्याच्या अपराधांचा कोटा पूर्ण झाला अन् अखेर पुणे पोलिसांच्या सापळ्यात तो आला. यामुळे पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल दीडशे घरफोडीचे गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगारास पुणे येथील कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर हडपसर, बिबवेवाडी,…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या महिनाभरपसून दडी मारून बसलेले पाऊस गेल्या दोन दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पडत आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात शेतातील पिकांसह धरणातील पाणीसाठ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. हेजेरी लावली आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठयात एका टक्क्याने वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दडी मारली त्यामुळे तब्बल एक महिना पाऊस नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण झालेले आहे. जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील तीन प्रकल्पांमधे साठा शून्यावर आहे. मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पातील जलसाठा अत्यंत कमी आहे. त्यामुळे यंदा भीषण पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जाण्याची श्यकता आहे. बुधवारी रात्री पावसाचे आगमन झाल्याने जळगाव जिल्ह्यात…
सोलापूर : वृत्तसंस्था अनेक परिवारात सासू – सुनेचे भांडण होत असतात पण काही भांडण काही काळासाठी असतात तर काही भांडण इतक्या टोकाला पोहचते कि काही होवू शकते अशीच एक घटना सोलापुरात घडली आहे. न सांगता कार्यक्रमाला गेली म्हणून पतीने हात पकडला आणि सासूने ब्लेडने तिच्या हातावर वार करून जखमी केल्याची घटना विडी घरकुल येथे घडली. स्नेहा गिरीधर टंकसाळ या विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार सासू सरस्वती रामचंद्र टंकसाळ व पती गिरीधर रामचंद्र टंकसाळ या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी स्नेहा ही सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कार्यक्रमाला गेली होती. यावरून सासूने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर स्नेहाला…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात पती-पत्नीचे वाद मोठ्या टोकाला जात असतांना एक घटना भिवंडी येथून समोर आली आहे. मोबाइलवरून पत्नीला तलाक देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबई येथे राहणाऱ्या पतीने मोबाइलवरून तीन वेळा ‘तलाक, तलाक, तलाक’ असे बोलून भिवंडीत माहेरी असलेल्या पत्नीला घटस्फोट दिला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पतीसह नणंद आणि नंदेचा पती अशा तिघांविरोधात मंगळवारी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दर्गारोड या परिसरातील कशीश मेहताब अन्सारी (२३) हिचा मुंबई साकीनाका परिसरातील मेहताब आजमगीर अन्सारीसोबत निकाह झाला होता. १७ जून ते १४ ऑगस्ट २०२३ या काळात पती मेहताब अन्सारी, नंदोई मोहम्मद रफी अन्सारी, नणंद आलिया…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत रात्रीच्या गस्त गुन्हे शोध पथकाने चंदन चोरी करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यासोबतच कुन्हाड आणि करवतही जप्त करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री सहायक पोलिस निरीक्षक दीपक बिरारी आणि पथक गस्त घालत होते. पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास भडगाव रस्त्यावर दोन संशयित इसम आढळून आले. त्यांना थांबण्याचा इशारा केला. त्या दोघांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना शिवाजी चौकात पकडले. त्यांच्याकडे तीन किलो चंदन आढळून आले. य आरोपींवर चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल आहे. यात शेख अमीन शेख हजी (वय ५२) आणि…
भुसावळ : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील तिहेरी हत्याकांडप्रकरणी सहा संशयितांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश एस. व्ही. जंगमस्वामी यांनी दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींपैकी देवीदास मधुकर पवार (भील) (३०), अमोल रवींद्र कोळी (२४), मयूर लिलाधर तायडे (कोळी) यांना अटक करून ७ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली होती. गुरुवारी कोठडी पूर्ण झाल्याने त्यांना पुन्हा न्यालयालयात आणले होते. तसेच याप्रकरणात अजून दीपक मधुकर पवार (भील) (२९), मनोज श्रावण मोरे (२५), किरण भागवत सपकाळे (३३) या तिघांना अटक केली आहे. या सहा जणांना गुरुवारी न्यायाधीश एस. व्ही. जंगमस्वामी यांच्या न्यायालयात हजर केले…
जळगाव : प्रतिनिधी पाचोरा शहरातील एका भागात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून आक्षेपार्ह फोटो तयार करत तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात बुधवारी बनावट खाते वापरणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय तरुणी ही पाचोरा शहरातील एका भागात वास्तव्याला आहे. दरम्यान, अज्ञात व्यक्त्तीने ३ ते ६ सप्टेंबर दरम्यान तरुणीच्या नावाने इन्स्टाग्रामची दोन बनावट खाती तयार करून पीडित तरुणीचा फोटो ठेवून त्यावर वेगळ्याच प्रकारचे स्टिकर लावले. त्यानंतर तिची बदनामी होईल, या उद्देशाने सोशल मीडियात व्हायरल केले. हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने हा…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक तरुणीना मॉडेल होण्याचे स्वप्न असते पण काही लोक यांचे हेच स्वप्न लक्षात घेवून त्यांना काम मिळवून देण्याचे आश्वासन देत गोड बोलून मॉडेलचा विश्वास संपादन केला. मात्र नंतर तिला लॉजवर नेऊन तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका फोटोग्राफरला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मॉडेलच्या तक्रारीवरून डी.एन. नगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हिमल मेहता असे त्या फोटोग्राफरचे नाव आहे. वेब सीरिजमध्ये काम मिळवून देतो असे सांगत त्याने पीडितेला लॉजवर नेले आणि तेथे तिच्या शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन तिचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे. पीडित तरूणी 30 वर्षांची असून हिंदी चित्रपटांमध्ये काम मिळवण्यापूर्वी ती मॉडेलिंग…

