चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव शहरात दूध सागर मार्गासह अन्य भागातील दूध डेअरींवर बुधवारी जिल्हा दूध व दुग्धजन्य भेसळ प्रतिबंधक समितीने छापे टाकले. यात आठ डेअरींमध्ये दुधात भेसळ आढळून आल्याने १३८२ लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट करण्यात आले. या धडक कारवाईमुळे दूध संकलन, विक्री करणाऱ्या व दूग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही छापेमारी सकाळपासून दुपारपर्यंत सुरू होती. एकेकाळी मुंबईच्या गल्लीबोळात चाळीसगाव आणि दूध असे समीकरण तयार झाले. १९९० ते २००५ पर्यंत हा व्यवसाय येथे भरभराटीला आला होता. एका आठवड्यात २०० कोटी रुपयांची उलाढाल व्हायची. दरदिवशी चाळीसगावातून लाखो लिटर दूध मुंबईला जायचे. मात्र पुढील काळात दुधाचा दर्जा खालावल्याने येथील व्यवसायाला उतरती…
Author: editor desk
नंदुरबार : वृत्तसंस्था आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकाची पगारवाढ, आयोगाच्या हप्त्याच्या रकमेचे बिल काढून देण्यासाठी ७ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या नंदुरबार पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सायंकाळी अटक केली. शिवाय याच शिक्षकाकडून मोघम स्वरूपात दोन हजारांची लाच मागणाऱ्या आणखी एका कनिष्ठ सहायकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. दादाभाई फुला पानपाटील (५४) कनिष्ठ सहायक व सुखदेव भुरसिंग वाघ (४३) नोकरी, कनिष्ठ सहायक, पंचायत समिती, नंदुरबार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथून बदली करून आलेल्या शिक्षकाची सेवा येथे सुरू झाली होती. त्यांचा पगारवाढ, वेतन आयोगाच्या हप्त्याच्या रकमेचे बिल काढण्यासाठी त्यांनी पंचायत समितीचे कनिष्ठ सहायक दादाभाई पानपाटील यांच्याकडे…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात अनेक तरुण सोशल मीडियाला बळी पडून हातात कोयता घेत दहशत निर्माण करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुन्हा एकदा रामानंद पोलिसांनी कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. हा संशयित आरोपी हद्दपार असतांना देखील दहशत माजवीत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ८ऑगस्ट रोजी मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास शहरातील समता नगर परिसरात असलेल्या धामणवाडा येथे संशयित आरोपी राहुल काकडे हा हातात कोयता घेऊन दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना समजतात घटनास्थळी रामानंदनगर पोलीस स्थानकाचे पथक गेले. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक विजय खरे…
सोलापूर : वृत्तसंस्था प्रेमविवाहाला विरोध केला म्हणून पोटच्या मुलीनेच बापाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच संताप व्यक्त होत आहे. सोलापूरातील माढा तालुक्यात ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलीसह तिच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रेम विवाहाला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलीनेच मित्रांच्या साथीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यात घडली आहे. प्रियकराच्या मदतीने साक्षी शहा हिने वडील महेंद्र शाह यांना बेदम मारहाण केली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली असून यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. साक्षीहिचे एका तरुणावर प्रेम होते तिने त्याच्यासोबतच लग्न करण्याचा हट्ट धरला. मात्र, तिच्या आंतरजातीय प्रेमविवाहाला वडिलांचा विरोध होता.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था शिल्पकला आता प्रचंड पुढारली आहे. घरांना या कलेने अनोखा आकार देता येतो. आपल्याला जसं हवं तसं घर सजवता येतं. काहीजणसंपूर्ण घराला बागीचा बनवतात, काहीजण दरवाजापासून शेवटच्या कोपऱ्यापर्यंत अगदी गुहेसारख्या घरात राहणं पसंत करतात. गावात किंवा परिसरात एखादं पडकं घर असेल, तर आपण गंमतीत त्या वास्तूला भूत बंगला म्हणतो. उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात मात्र खराखुरा भूत बंगला वाटावा, असं घर आढळलं. या घरातल्या विजेच्या तारांना चिकटून एका 4 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस घरात शिरले असता अत्यंत विचित्रपणा समोर आला.मुलीच्या मृत्यूविरोधात तिच्या कुटुंबीयांनी घर मालकावर कलम 304 अंतर्गत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी शमशेर उर्फ बबलू याला…
धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात नवीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कार्यभार घेतल्यापासून त्यांनी पहिल्याच दिवशी वाळूमाफियांना तंबी दिल्याने अनेक तालुक्यातील वाळूमाफियांना पकडण्यासाठी आदेश देण्यात आले होते. त्यावरच धरणगाव तालुक्यात वाळू चोरी सुरु असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाने घटनास्थळी धाव घेत २ वाहने पकडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील मौजे चांदसर बु येथे अवैध वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर क्र MH32AH4776 योगेश पुरुषोत्तम कोळी व MH34L8254 योगेश ईश्वर कोळी यांचे मालकीचे असून सदर वाहन पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. सदरची कारवाई श्री मनिषकुमार गायकवाड उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, पाळधी मंडळ अधिकारी अमोल पाटील, लक्ष्मीकांत…
धुळे : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापूर्वी अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांनी शिवसेना-भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीत फूट पडली आहे. आमदारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. पक्ष सावरण्यासाठी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. एकीकडे शरद पवार गटाचा पक्ष सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. खान्देशातील एका बड्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. धुळे येथील माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपप्रदेश अध्यक्ष अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीला पुनश्च हरिओम म्हणत राम राम ठोकला आहे. पक्षाच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सोपविला असून सध्यातरी कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे अनिल गोटे…
चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे येथील ज्वेलर्सचे शटर तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मेहूणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहुनबारे येथील रहिवासी कुंदन प्रभाकर बाविस्कर (वय ४५) हे सराफा व्यावसायिक असून त्यांचे स्वामी समर्थ केंद्रा जवळ कुलस्वामिनी ज्वेलर्स नावाचे दुकान असून ७ ऑगस्ट रोजी रात्री नऊ ते ८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने 55 हजार रुपये किमतीचे सातशे ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जोडवे बनविण्याची चांदीची तार, १२ हजार रुपये किमतीचे तीन ग्राम वजनाचे सोन्याच्या नाकातील फुल्या असा एकूण 67 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी मेहूणबारे पोलीस…
मुंबई : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत युती त्यांनीच तोडली असा आरोप केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. इतकेच नाही तर शरद पवार यांच्याबाबत मोदींनी केलेल्या दाव्यावरही त्यांनी टीका केली आहे. शरद पवार यांना काँग्रेसने पंतप्रधान होण्यापासून रोखले असल्याचे मोदी म्हणाले होते. यावर खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. युती तोडल्याचा फोन खडसेंनी उद्धव ठाकरेंना केला होता. 2014 मध्ये युती कोणी तोडली, हे मोदींनी तपासावे असा सल्लाही खासदार संजय राऊत यांनी दिला. युती तोडण्याच्या निर्णयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा राऊत यांनी समाचार घेतला. शरद…
मुंबई : वृत्तसंस्था इंडस्ट्रीतील बॉडीगार्ड चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्दीकी इस्माईल यांचे मंगळवारी, 8 ऑगस्ट रोजी वयाच्या 63 व्या वर्षी निधन झाले. यकृताच्या आजारामुळे त्यांना गेल्या महिन्यात कोची येथील अमृता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवार, 7 ऑगस्ट रोजी दुपारी, सिद्दीकी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना एक्स्ट्राकॉर्पोरल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन सपोर्टवर ठेवण्यात आले. मात्र अनेक प्रयत्न करूनही त्यांचा जीव वाचवण्यात यश आले नाही. सिद्दीकी इस्माईल यांचे पार्थिव कडवंथरा येथील राजीव गांधी इनडोअर स्टेडियममध्ये 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 11.30 या वेळेत ठेवण्यात येणार आहे. नंतर ते त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल, जेणेकरून लोकांना श्रद्धांजली वाहता येईल. त्यानंतर बुधवारी सायंकाळी 6…

