देशासह राज्यात नेहमीच महिला सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आला असून राज्यातील महिला आणि मुली संरक्षित आहेत का? असा प्रश्न नेहमी उपस्थित होतो. त्यामागील कारणंही अगदी तसंच आहे. राज्यात महिला आणि मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण प्रचंड वाढत आहे. दर महिन्याला हजारो मुली प्रत्येक जिल्ह्यातून बेपत्ता होत आहेत. असं असताना देखील मुलींवर लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटना सातत्याने समोर येताना दिसत आहेत. कल्याणमध्ये नुकतंच एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये अशाप्रकारच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेवर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आता पोलीसही सतर्क झाले आहेत. महिला अत्याचाराच्या घटना टाळायच्या असतील तर…
Author: editor desk
नवी मुंबई : वृत्तसंस्था भरधाव रेल्वेतून फेरीवाला बनून प्रवाशांचे महागडे मोबाईल पर्स आणि दागिने चोरणाऱ्या टोळीला मुंबई रेल्वे एसटीएफ पथकाने अटक केली आहे. रामेश्वर साहनी, खूबलाल महतो, विनोद महतो अशी या तीन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून 17 मोबाईल, महागडी घड्याळं यासह जवळपास 9 लाखाचा चोरीचा माल हस्तगत केला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. एका महिला प्रवाशाची लूट केल्यानंतर आरोपींचा पर्दाफाश झाला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने तपास करत टोळीचा शोध सुरु केला. अखेर या टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे. मेल एक्सप्रेसमध्ये एसीच्या डब्यात प्रवाशांचे किंमती वस्तू चोरीला जाण्याच्या घटनेत वाढ होत आहे.…
जळगाव : प्रतिनिधी फुफनगरी फाट्याजवळून विनापरवाना वाळू वाहतूक करणारे मालवाहू वाहन सोमवार, २१ ऑगस्ट रोजी तालुका पोलिसांनी पकडले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अनोळखी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वाळू उपशाला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन, महसूल व आरटीओ विभागाने बांभोरी गावातून सर्व ट्रॅक्टर, ट्रक, डंपर जप्त करण्यात आले. त्यानंतर आता वाळू वाहतूकदारांनी शक्कल लढवत मालवाहू वाहनातून वाळू वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. अशाच प्रकारे २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी मालवाह वाहनातून (क्र एमएच १९, सीवाय ८२५७) वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. या पथकाने तालुक्यातील फुफनगरी…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा पोलिस दलातील १५ सहायक पोलिस निरीक्षक आणि १५ पोलिस उपनिरीक्षक असे एकूण ३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी २१ ऑगस्ट रोजी रात्री काढले. बदली झालेल्या पोलिस उपनिरीक्षकांना नवीन पदाचा पदभार तत्काळ घेण्याचे निर्देशदेखील पोलिस अधीक्षकांनी दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्हा पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश . पोलिस उपनिरीक्षक असे एकूण ३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी २१ ऑगस्ट रोजी रात्री काढले. बदली झालेल्या पोलिस उपनिरीक्षकांना नवीन पदाचा पदभार तत्काळ घेण्याचे निर्देशदेखील पोलिस अधीक्षकांनी दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्हा…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा उपनिबंधक कार्यालयात बैठकीसाठी येत असलेल्या दुचाकीस्वाराचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात घडला. भरधाव गॅस सिलेंडर घेवून जाणार्या ट्रकने धडक दिल्याने पंजाबराव नामदेव बोरसे (52, कोल्हाडी) यांचा मृत्यू झाला आहे. कोेल्हाडीतील विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव असल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहकार विभागाची मंगळवारी बैठक असल्याने याा बैठकीसाठी कोल्हाडी विकासोचे सचिव पंजाबराव बोरसे हे सकाळी बोदवड येथून दुचाकीने (एम.एच.19 ए.सी.224) ने जळगावला यायला निघाले. ते शहरातील आकाशवाणी चौकात आल्यानंतर मागून गॅस सिलिंडर घेऊन जाणार्या ट्रकने (एम.एच.04 जे.यु.9596) त्यांना धडक दिली. यात बोरसे चाकाखाली…
मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील चोरी ची एक घटना सध्या चांगलीच चर्चेची ठरली आहे. काय तर या चोरट्यांनी चोरी केली. चोरीही मोठी होती. परंतु चोरी करण्यापूर्वी त्यांनी ज्योतिषीचा सल्ला घेतला होता. मग तो सल्ला कितपत यशस्वी झाला? परंतु हे चोरटे मात्र चोरी केल्यानंतर पोलिसांच्या सापळ्यात आले. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये एक कोटी रुपयांची चोरी झाली होती. सागर गोफेन यांच्या घरी ही चोरी झाली होती. ते घरी नसताना त्यांच्या पत्नीस चोरट्यांनी बंधक बनवले होते. त्यानंतर त्यांच्या घरातून 95 लाख रुपये रोकड आणि 11 लाख रुपये किंमतीचे सोने, चांदीचे दागिने घेऊन फरार झाले होते. पोलिसांनी या…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील जळके तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याठिकाणी आज माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले या शाळेत पटसंख्येनुसार १२० विद्यार्थी आहेत परंतु या शाळेत मागील पटसंख्येनुसार ६० गणवेश प्राप्त झाले होते त्यामुळे उर्वरित विद्यार्थी गणवेशापासुन वंचित राहतील अशी खंत येथील शिक्षक कर्मचारी यांना वाटत होती ही बाब जळके वि.वि.का.सोसायटी सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या लक्षात आली व त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य पवन भाऊ सोनवणे यांना विनंती केली व नियमित सामाजिक कार्यासाठी पुढे असणारे पवन भाऊ सोनवणे यांनी उर्वरित विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून दिले या…
धरणगाव :प्रतिनिधी येथील क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्थेचा पर्यटन क्षेत्र ‘क’वर्ग यादीत समावेश करण्यात आला असल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी नुकतीच केली आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी जिल्ह्यातील प्रलंबित विषयांवर चर्चा झाल्यानंतर धरणगाव तालुक्यातील डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत मधील क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती स्थळास ‘क’ वर्ग तिर्थक्षेत्र /पर्यटन क्षेत्र दर्जा देण्याची पालकमंत्री गुलाबरावजी पाटील बैठकीत घोषित केले. क्रांतिकारी खाज्याजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील भिल्ल समाज बांधव येथे भेट देण्यासाठी येतात. त्यामुळे स्मृती स्थळास पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात यावी, अशी सतत मागणी समाज बांधवांकडून होत होती. त्याची दखल…
जळगाव : प्रतिनिधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जिल्हा नियोजन बैठकीत केळी विकास महामंडळाला हरिभाऊ जावळे यांचे नाव देण्याची घोषणाचे ठराव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा बसविण्यासाठी 1 कोटी रूपये व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जन्मस्थानी असोदा येथे स्मारकासाठी ग्रामविकास व पर्यटन विभागाकडून १२ कोंटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. महाऊर्जा (MEDA) मार्फत जिल्ह्यातील ज्या – ज्या शाळांना आजही विजेची सोय नाही किंवा वीज बिल भरु शकत नाही अशा शाळांना सौर उर्जा प्रकल्प बसविणे जाणार असून खेडी शिवारात अद्यावत ७ कोटीच्या वारकरी भवन उभारणीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील…
कल्याण : वृत्तसंस्था शाळेतील शिक्षक व विद्यार्थीमध्ये नेहमीच प्रेमाचे नाते असते. याच गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना राज्यातील कल्याण शहरात घडली आहे. पूर्व परिसरातील एका नामांकित शाळेत पाच वर्षाच्या अल्पवयीन मुलावर शाळेत डान्स शिकवण्यासाठी आलेल्या डान्स टीचरने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणी डान्स टीचर समीर कदमला कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून कल्याणपूर्वमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. पोलिसांकडून देखील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यानंतरही गुन्हेगारी वाढत असल्याने ही गुन्हेगारी थांबवण्याचे आव्हान कल्याण कोळसेवाडी पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. कल्याण पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या एका पाच वर्षीय मुलाला…

