नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रत्येक लहान मुलांना टॉफी आवडत असते. अगदी गल्लीतील कुणीही टॉफी दिली तर लहान मुले आवडीने घेत असतात अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विषारी टॉफी खाल्ल्यामुळे आजारी पडलेल्या आणखी एका मुलीचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. विषारी टॉफी खाल्ल्याने आतापर्यंत तीन मुलींचा मृत्यू झाला आहे, तर आणखी एका मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. टेरेसवर झोपायला गेलेल्या मुलींना विषारी टॉफी देण्यात आली होती. चौघींनी त्या टॉफी खाताच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यामध्ये तिघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र हे कृत्य जाणूनबुजून करण्यात आले असून, पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. आपल्या दोन पत्नींच्या आत्महत्येनंतर बदला घेण्यासाठी लहान मुलींचा…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अनेक भावीक महादेव मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात आहेत. वसईतील तुंगारेश्वर येथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येतात. पण दर्शनाला आलेल्या एका महिलेसोबत हृदयद्रावक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. हि घटना वसईत घडली आहे. पतीसोबत बुलेटवर बसून तुंगारेश्वर दर्शनाला गेलेल्या पत्नीचा ओढणीने घात केला. बुलेटवरुन जात असताना महिलेची ओढणी बुलेटच्या मागच्या चाकात अडकल्याने गळफास बसून तिचा मृत्यू झाल्याची धक्क्दायक घटना घडली. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई बाफाणे हद्दीत ही घटना घडली. प्रतिमा यादव असे मयत महिलेचे नाव असून, ती कांदिवलीतील रहिवासी आहे. या घटनेमुळे कांदिवली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कांदिवलीतील रहिवासी असलेले यादव पती-पत्नी रविवारी सुट्टी…
पुणे : वृत्तसंस्था गेल्या महिन्यात पुणे शहरातून पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक केली असल्याची घटना ताजी असतांना त्यापूर्वी मुंबई अन् पुणे शहरात ३ जुलै रोजी काही जणांना अटक केली होती. यानंतर पुणे शहर दहशतवाद्यांचे केंद्र झाले की काय? अशी प्रकरणे उघड होऊ लागली. दहशतवादी प्रकरणाचा तपास एटीएस आणि एनआयएने केला. त्यानंतर आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रथमच या प्रकरणावर जाहीरपणे मत मांडले. पालकमंत्र्यांनी पुणे शहरात दहशतवाद्यांची साखळी कार्यरत असल्याची कबुली दिली. इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशवादी संघटनांशी पुण्यातील दहशतवाद्यांचे संबंध समोर आले आहे. तसेच हे दशतवादी स्टुडंट इस्लामिक मुव्हेमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सिमी आणि इंडियन मुजाहिदीन या बंद पडलेल्या संघटनांचे…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणावर एका पुरुष जातीचे प्रेत वाहून आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. घटनास्थळी अमळनेर पोलीस पथक दाखल होवून असून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाच्या काठावर एक प्रेत कुजलेल्या अवस्थेत दिनांक २१ रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास गुराख्याना दिसून आले. कुत्रे प्रेताचे लचके तोडत होते. गुराख्यानी पोलीस पाटील उमाकांत पाटील यांना कळवल्या नंतर त्यांनी मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सहा पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक व पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, सुनील तेली यांनी घटनास्थळी भेट दिली असता मयत पुरुषाच्या अंगावर कपडे नव्हते…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या सरकारच्या माध्यमातून अनेक तरुण व तरुणीसाठी तलाठी भरतीची परीक्षा घेण्यात आली होती. पण अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्यामुळे तलाठी भरतीची परीक्षा तब्बल दोन तास पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे बाहेर जिल्ह्यातून आलेला विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असून विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. जळगाव शहरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी सकाळी नऊ वाजता तलाठी भरतीचा पहिला पेपर होता. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्यामुळे हा पेपर साडेअकरा वाजता सुरू झाला. त्यामुळे परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले असून पुढील सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा दुपारी साडेबारा ऐवजी दुपारी अडीच वाजता होणार आहे.…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल तनारीकाजवळ अज्ञात तिघांनी एका कापड व्यापार्याला कट मारल्याचा बहाणा करून मारहाण करून व्यापार्याकडील ३४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना मंगळवार, १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शोध पथकाने तीन जणांना अटक केली आहे. संशयिताना न्यायालयात हजर केले असता २२ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हर्षल संजयकुमार सावकारे (वय-२७, रा.पांडुरंग टॉकीजवळ, भुसावळ), आनंद प्रकाश पवार (वय-२० रा.नागसेन कॉलनी, कंडारी, ता.भुसावळ) आणि अनिकेत सदानंद सोनवणे (वय-२३ रा. सराफ बाजार, भुसावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची आणावे आहे. किशोर रामेश्वर सदावर्ते (वय-३१ रा.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सहसा पती-पत्नीचे नाते हे खूप प्रेमळ आणि सुंदर मानले जाते. ते सतत एकमेकांच्या पाठीशी उभे असतात. त्यांचा विश्वास हा या नात्याचा पाया आहे आणि ज्या दिवशी ते तुटते त्याच दिवशी एकापेक्षा एक भयावह कथा समोर येतात. असाच एक किस्सा अमेरिकेतून समोर आला आहे. येथे पत्नीने प्रियकराला भेटायला जाण्यासाठी प्रायव्हेट जेट न दिल्याने पतीच्या नावावर सुपारी दिली. लिंडसे शिवर असे या महिलेचे नाव असून ती पती रॉबर्ट शिव्हरसोबत राहत होती. दोघांमधील खराब नात्यामुळे ते घटस्फोट घेणार होते, पण त्याच दरम्यान काहीतरी वेगळे घडले. पतीला या महिलेच्या अफेअरची आधीच माहिती होती, परंतु घटस्फोटाच्या लगेच आधी, तिला प्रियकरसोबत…
मुंबई : वृत्तसंस्था कोणतेही वय अवलंबून नसते, ज्याचे हृदय तरुण असते तो कधीही म्हातारा होत नाही. आजकाल अशा तगड्या आणि वयाने योग्य व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा 80 वर्षांचा ‘काका’ असा ब्रेक डान्स करताना दिसतोय, जे पाहून मोठमोठे डान्सर्सही प्रभावित होतील आणि ह्रदय पिळवटून टाकतील. उदयपुरविसिट नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये 75-80 वयोगटातील एक व्यक्ती मोकळ्या रस्त्यावर जोरदार नाचताना दिसत आहे. इतर काही कलाकारही तिथे परफॉर्म करताना दिसतात. ‘सजना है मुझे सजना के लिए’ गाण्यावर अंकल ब्रेक डान्स करतात, त्यांची स्टेप्स आणि एनर्जी दोन्ही अप्रतिम आहेत. कानात इअरफोन घालून हा काका कोणाचीही पर्वा न…
अमळनेर शहरात चोरीच्या घटनेत नियमित वाढ होत असतांना दिसत आहे. शहरातील एका परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अनोळखी चोरट्यानी घरात प्रवेश करून रोकड व दागिने चोरून घराच्या शेजारी अंगणात लावलेली १५ हजार किमतीची दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील शास्त्रीनगर रहिवासी नितीन भालचंद्र पवार यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्याने ७ हजार रोख आणि ३ हजार रुपयांचे दागिने चोरून नेत त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या माधवराव बडगुजर यांची १५ हजार किमतीची दुचाकी क्रमानं एम एच १९- ७९१८ चोरून नेली . याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात प्रेमातून लग्न होत असतेत पण काही प्रेम विवाह आहे जे अखेरच्या श्वासापर्यत टिकत असते तर काही विवाह अगदी शुल्लक कारणाने भांडण होत कुठल्याही टोकाला पोहचत असते. अशीच एक घटना पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगना जिल्ह्यात बागदा येथे एका डॉक्टरने पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यानंतर ही घटना त्याने आपल्या भावाला सांगितली. नंतर डॉक्टर थेट पोलीस ठाण्यात पोहचला. स्वतःला त्याने पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली. डॉक्टरने पत्नीच्या गळ्यातील नळीवर चाकू फिरवला. शनिवारी रात्री ही घटना उत्तर २४ परगना जिल्ह्याच्या बागदा येथे घडली. आरोपी अरिंदम बाला हा मांडवाघाटा गावातील राहणारा आहे. अरिंदम…

