मुंबई : वृत्तसंस्था सध्या देशभरात सोशल मिडीयाच्या माध्यमातून होणारी ओळख व त्यातून निर्माण होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत आहे. सोशल मीडियावर प्रेम करत अपहरण, हल्ले, हत्या अशा घटना उजेडात येत आहेत. अशीच धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. इंस्टाग्रामवर जुळलेल्या प्रेमातील प्रियकराने अल्पवयीन मुलीला फूस लावून तिचे अपहरण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली. मात्र मुंबई गुन्हे शाखा आणि लोहमार्ग पथकाने 48 तासांच्या आत मुलीची सुटका करत प्रियकरला ताब्यात घेतले आहे. कुणाल रविंद्र रातांबे असे अटक करण्यात आले आहे. सोलापूर ते मुंबई गदक एक्सप्रेसने प्रवास करत असताना ही घटना घडली. पीडित मुलगी आणि आरोपीची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. ओळखीचे प्रेमात रुपांतर…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मोठ्या शहरातील गुन्हेगारी वाढत चाललेली असतांना सध्या गोकुळाष्टमी सण जवळ आला आहे. त्यामुळे गोविंदा पथक दहीहंडीची जोरदार तयारी करत आहेत. मात्र दहीहंडीचा सराव करत असताना गोविंदा पथकावर काही तरुणांकडून हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. या हल्ल्यात एक गोविंदा गंभीर जखमी झाला आहे. किरकोळ वादातून हा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी जखमी गोविंदाच्या फिर्यादीवरुन रामनगर पोलिसांकडून तिघांवरिोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवलीतील आयरे भागात असलेल्या बालाडी गार्डन गृहसंकुलासमोर गोविंदा पथकाचा सराव सुरु होता. यावेळी चार तरुण तेथे आले आणि त्यांनी गोविंदा पथकाशी वाद घातला. बघता बघता हा वाद विकोपाला गेला. मग या वादातून गोविंदा…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील सरकारने तरुणांसह तरुणीसाठी तलाठी भरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी मात्र नाशिक जिल्ह्यात पेपर फुटी प्रकरण चर्चेत असतांना आता पुन्हा एकदा प्रशासकीय व्यवस्था विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत गंभीर नाही का? असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण तलाठीपदाच्या परीक्षेत सावळा गोंधळ पाहायला मिळतोय. परिक्षेच्या आधी सर्व्हर डाऊन झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. नागपुरात तलाठी भरती परिक्षेत सर्व्हर डाऊन झालं आहे. फक्त नागपुरातच नाही तर अकोला, अमरावती, लातूरमध्येही हीच परिस्थिती आहे. अमरावतीतही तलाठी पदाच्या परीक्षेत सावळा गोंधळ पाहायला मिळतोय. नऊ वाजता सुरू होणारी परीक्षा अद्यापही सुरू झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये…
फैजपूर : प्रतिनिधी यावल तालुक्यातील फैजपूर नजीक न्हावी शिवारात पाच वर्षाच्या बालिकेच्या हत्येप्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता ठुशा बारेला असे हत्या झालेल्या बालिकेचे नाव आहे. ठुशा भावला बारेला असे बालिकेची हत्या करणा-या बापाचे नाव आहे. 17 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी 20 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कु. अनिता बारेला या बालिकेस दवाखान्यात घेवून जातो असे सांगून तिचा बाप ठुशा बारेला तिला घेवून गेला. बालिकेला दवाखान्यात न नेता त्याने न्हावी शिवारातील धिरज चौधरी यांच्या शेतातील विहीरीत फेकून जिवे ठार केले. बालिकेचे आजोबा छंडा वेरला बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फैजपूर पोलिस…
बुलढाणा जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुण गेल्या काही दिवसापासून नोकरीच्या शोधात बहिणीकडे आलेला होता. जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अंकुश शिवाजी सुरळकर (वय-२२)असे मयत तरूणाचे नाव आहे. याबाबत नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील अंकुश सुरळकर हा राहत असलेल्या बहिण व मेव्हणे अनिल दामू इंगळे यांच्याकडे गेल्या आठ दिवसांपासून नोकरीच्या शोधासाठी आलेला होता. गेल्या आठ दिवसांपासून तो नोकरीच्या शोधात होता. गुरूवारी १७ ऑगस्ट रोजी सकाळी नेहमीप्रमाणे नोकरी शोधायला जात असल्याचे सांगून बहिणीच्या घरातून निघून गेला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला…
पुणे : वृत्तसंस्था गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक तरुण-तरुणी सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतात पण चाळीशी पार केलेले अनेक जण सोशल मीडियावर मैत्रीणी शोधत असल्याने पुणे शहरातील ४६ वर्षीय व्यावसायिकाने अशीच मैत्रीण शोधली. मग दोघांमध्ये चॅटींग सुरु झाले. त्यामध्ये तो व्यावसायिक तिच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला. दोघांमधील संवाद प्रेमाचे होत होते. मग तिने त्याला पुण्यातील वारजे भागातील हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवले. हॉटेलमध्ये गेल्यावर जे घडले, त्यामुळे त्याला मोठा धक्का बसला. काय घडली घटना ? पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड परिसरातील रहिवासी असणाऱ्या ४६ वर्षीय व्यावसायिकाबाबत हा प्रकार घडला आहे. त्याने फेसबुकवरुन मनिषा नावाच्या मुलीशी मैत्री केली. ‘मनिषा जी’ नावाने तिचे फेसबुक अकांउट होते. दोघांमध्ये…
जळगाव : प्रतिनिधी मंत्री महोदय ना. गुलाबराव पाटील यांना तीन दिवस मुंबईत मंत्री मंडळाच्या बैठकांना हजर रहावे लागते. त्यामुळे मंत्र्यांची भेट घेणे नागरीकांना शक्य होत नाही. परंतु, आता प्रत्येक गणात बैठक घेऊन नागरीकांच्या समस्या जागेवरच सोडवल्या जातील. त्यासाठी तलाठी, तहसिलदार, प्रांत यांनाही गावातच बोलावून घेऊ, अशी हमी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी आज दिली. वावडदा येथे झालेल्या पंचायत समिती गण संपर्क बैठक या अभियानाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. या अभियानांतर्गत मंत्री महाेदयांनी गेल्या चार वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती बॅनर, माहिती पुस्तीकेच्या स्वरुपातून नागरीकांपर्यंत पोहोचवण्याची विनंती प्रतापराव पाटील यांनी केली. वराड गावातील स्मशानभुमीचे वॉल कंपाऊंड व शिवरस्ता म्हसावद…
धरणगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे खासदार उन्मेष पाटील यांनी धरणगाव व अमळनेर स्टेशन अमृत भारत स्कीम अंतर्गत मंजूर केल्याबद्दल मंत्री यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे व्यक्त केले आभार व विविध मागण्यांविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली. भारतीय जनता पार्टी,धरणगाव/ अंमळनेर तालुका व रेल्वे सल्लागार समिती,यांनी रेल्वे विषयी सुचविलेल्या विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना DRUCC मेंबर श्री प्रतिक जैन यांचेकडून देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे कि, भारतीय जनता पार्टी,धरणगाव/ अंमळनेर तालुका रेल्वे सल्लागार समिती,यांनी रेल्वे विषयी सुचविलेल्या विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना शासकीय दौऱ्या दरम्यान जळगाव येथे निवेदन देण्यात आले. 1. भुसावळ ते पुणे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात हनीट्रॅपप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत पती-पत्नीला अटक केली आहे. पोलिसांनी या जोडप्याला एका व्यक्तीकडून 50 हजार रुपये घेताना पकडले. पोलिसांनी आरोपींकडून एक लाख 30 हजारांची रोकड आणि एक दुचाकी असा एकूण एक लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पकडलेल्या जोडप्याने एका व्यक्तीचा अश्लील व्हिडिओ बनवून त्याला आपल्या जाळ्यात अडकवले होते. नंतर ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्यात गुंतले. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करताना पोलीस अधीक्षक राजर्षी राज वर्मा यांनी सांगितले की, या संदर्भात मालपुरा येथील रहिवासी तक्रारदाराने जुने टोंक पोलिसांना तक्रार दिली होती. मालपुरा येथे दुकान असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीने त्याच्या दुकानदाराकडून…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था एका पत्नीने पतीवर बॅटने हल्ला करून त्याची हत्या केली. या हत्येमागचे कारण अवैध संबंधातून समोर आले आहे. पतीचे दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध असल्याने पत्नी संतापली होती. हि घटना राजस्थानच्या झुंझुनू शहरात घडली आहे. त्यामुळे घरात दोघांमध्ये भांडण व्हायचे. शनिवारीही यावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यादरम्यान रागाच्या भरात आलेल्या पत्नीने पतीच्या डोक्यात बॅटने वार करून त्याचा खून केला. या जोडप्याला तीन मुले आहेत. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. हत्येचा बळी ठरलेला तरुण झुंझुनू नगरपरिषदेत सफाई कामगार होता. स्टेशन ऑफिसर राममनोहर थोलिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामगडचा रहिवासी बंटी वाल्मिकी (४२) हा झुंझुनू नगरपरिषदेत सफाई…

