नवी दिल्ली : वृत्तसंस्था गावांमधील प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने ‘पंचम’ (Panchayat Assistance & Messaging Chatbot) हा विशेष व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुरू केला आहे. या नव्या डिजिटल उपक्रमामुळे आता नागरिकांना घरबसल्या मोबाईलवरून ग्रामपंचायतीशी संबंधित विविध कामे, दाखले तसेच शासकीय योजनांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने ग्रामपंचायतींना सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘पंचम’ या चॅटबॉटची रचना केली असून तो ग्रामपंचायतींसाठी एक ‘डिजिटल सोबती’ म्हणून कार्य करणार आहे. दैनंदिन प्रशासकीय कामात मदत करण्यासोबतच मार्गदर्शन व महत्त्वाची माहिती सोप्या स्वरूपात पोहोचवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘पंचम’च्या माध्यमातून केंद्र सरकार आणि देशभरातील ३०…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने २०२६ सालासाठीच्या प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यंदा देशभरातील ४५ मान्यवरांना विविध पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या यादीत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा समावेश आहे. राज्याच्या मातीतील लोककला जिवंत ठेवणारे लोकनाट्य तमाशा महर्षी रघुवीर खेडकर, वैद्यकीय क्षेत्रात निःस्वार्थ सेवा बजावणाऱ्या डॉ. अर्मिडा फर्नांडिस, कापूस संशोधनात क्रांती घडवणारे परभणीचे शेतकरी संशोधक श्रीरंग लाड तसेच पारंपरिक वाद्यसंस्कृती जपणारे तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना यंदाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांमध्ये गणल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांत पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन श्रेणींचा समावेश आहे. कला,…
जळगाव : प्रतिनिधी जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघा जणांनी दोन तरुणांवर सिमेंटचा ब्लॉक फेकून हल्ला केल्याची धक्कादायक घटना दि. २३ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर उड्डाणपुलाखालील चहाच्या टपरीसमोर घडली. या हल्ल्यात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दूध फेडरेशनजवळील राजमालती नगरात राहणारा दिनेश माने हा ट्रान्सपोर्ट व्यवसाय करतो. दि. २३ जानेवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास तो शिवाजीनगर उड्डाणपुलाखाली जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा असताना मागील भांडणाच्या कारणावरून अयान शरिफ पटेल, अनिस रेहमान पटेल व त्यांच्या आणखी एका साथीदाराशी त्याचा वाद झाला. वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि तिघांनी…
जळगाव : प्रतिनिधी सहा महिन्यापुर्वी भाडेतत्वावर घेतलेल्या घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर एएचटीयू आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणाहून देहविक्रीसाठी डांबून ठेवलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. तर कुंटणखाना चालविणाऱ्या विजय सखाराम तायडे (वय ३२, रा. हनुमान नगर, खेडी शिवार) याला अटक केली. ही कारवाई दि. २३ रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास केली. या कारवाईचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खेडी शिवारातील हनुमान नगरात विजय याने भाडेतत्वावर घर घेतल होते. त्याठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून तो अल्पवयीन मुलीला डांबून ठेवत तेथे कुंटणखाना चालवित असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाली. त्यांनी दि. २३…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांचा संयुक्त कारवाईत प्रतिबंधित असलेला गुटख्याचा कंटेनर पाठलाग करून पकडल्याने पाळधी परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांना आज दुपारी महामार्गावरून एक कंटेनर प्रतिबंधित असलेला गुटख्याची वाहतूक करत आहे, अशी माहिती मिळाली. यानुसार त्यांनी पाळत ठेवली. तर कंटेनर येताच तो थांबवण्यास सांगितले. मात्र तो कंटेनर न थांबताच पुढे गेला. त्यामुळे पाठलाग करून एरंडोल तालुक्यातील सावदे शिवारात या कंटेनरला पकडण्यात यश आले. त्यानंतर हा कंटेनर ताब्यात घेऊन पाळधी पोलीस चौकीत आणला. या वेळी त्या कंटेनरमध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याचे आढळले. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार…
जळगाव : प्रतिनिधी पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्याविषयीची माहिती घेतांना मोबाईलवर आलेली लिंक चुकून क्लिक झाल्याने माधवदास खिल्लुमल शुगानी (वय ७९, रा. अमळनेर) यांची ७लाख ८९ हजारात तर खासगी वाहन चालक शेख शरीफ शेख खलील (वय ३१, रा. मेहरुण) यांना फ्रेन्चाईसी मिळवून देतो असे म्हणत त्यांची ५ लाख ३७ हजारात ऑनलाईन गंडविले. या दोघ घटनांध्ये एकूण १३ लाख २७ हजारात फसवणूक झाल्याने याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ येथून निवृत्त झालेले शिक्षक माधवदास शुगानी हे अमळनेर येथे वास्तव्यास आहे. दि. ५ सप्टेंबर रोजी त्यांनी पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्याविषयीची माहिती ऑनलाईन शोधली. जास्त रात्र झाल्याने झोप येत असताना मोबाईलवर…
आजचे राशिभविष्य दि.२५ जानेवारी २०२६ मेष राशी आज, तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांकडून कौटुंबिक कामे पूर्ण करण्यात मदत मिळेल. एखादा वर्गमित्र तुमच्याशी काही वैयक्तिक गोष्टी शेअर करू शकतो. तुम्ही तुमच्या मित्राला मदत करण्यास नेहमीच तयार असाल. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. वृषभ राशी आज दिवस बरा जाणार नाही. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की तुमचे महत्वाचे काम पूर्ण होत आहे, परंतु संध्याकाळपर्यंत ते रखडू शकते. आज कोणतेही महत्त्वाचे काम हाती घेण्यापूर्वी, वडीलधाऱ्यांचा किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमच्या पालकांच्या आशीर्वादाने, आज तुम्ही सर्व अडथळ्यांवर मात करू शकाल. मिथुन राशी परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आजमहत्वाची अपडेट मिळू शकते. आज आर्थिक…
चंद्रपूर : वृत्तसंस्था महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचा पेच आणि काँग्रेसमधील अंतर्गत कलहावरून भाजप नेते व आमदार परिणय फुके यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “चंद्रपुरात सर्वात मोठा पक्ष ठरूनही सत्ता स्थापन करता न येणे, हे काँग्रेससाठी अत्यंत लाजिरवाणे आहे. सध्या वडेट्टीवारांची अवस्था ‘नाचता येईना अंगण वाकडं’ अशी झाली आहे,” असा खोचक टोला फुकेंनी लगावला. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तास्थापना करण्यात अपयशी ठरल्याने फुकेंनी काँग्रेसच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “वडेट्टीवार ना स्वतःच्या पक्षश्रेष्ठींचे ऐकतात, ना त्यांचे नगरसेवक त्यांचे ऐकतात. मोठा पक्ष असूनही सत्ता उभी करता न येणे, हे काँग्रेसच्या अपयशाचे प्रतीक आहे,” असे ते म्हणाले. काँग्रेसवर टीका…
मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्या बहुप्रतीक्षित ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटातील पहिले गाणे ‘मातृभूमी’ नुकतेच प्रदर्शित झाले असून, या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची तीव्र भावना जागृत केली आहे. प्रदर्शित होताच हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले असून एक्स (ट्विटर)वर ट्रेंडमध्ये आहे. ‘मातृभूमी’ या गाण्यात सलमान खान भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दमदार आर्मी लूकमध्ये दिसत आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंह प्रमुख भूमिकेत असून, गाण्यात एक साधं पण आनंदी कौटुंबिक जीवन दाखवण्यात आलं आहे. शांत, प्रेमळ क्षणांना गलवान खोऱ्यातील तणावपूर्ण युद्धप्रसंगांशी प्रभावीपणे जोडण्यात आले असून कर्तव्य, प्रेम, त्याग आणि देशभक्तीचा भावनिक संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर आता…
नाशिक : वृत्तसंस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर राजकीय वातावरण तापले असतानाच, कर्नाटकातील चोरली घाट परिसरात सुमारे ४०० कोटी रुपयांच्या रोख रकमेचा कंटेनर चोरीला गेल्याचा संशय व्यक्त होत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या संशयातून नाशिक जिल्ह्यातील एका तरुणाचे अपहरण, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेला आहे. इगतपुरी तालुक्यातील रहिवासी संदीप पाटील यांनी नाशिक ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, कर्नाटकातील चोरली घाट परिसरात ४०० कोटी रुपयांच्या रोख रकमेचा कंटेनर चोरीला गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. या आरोपाच्या आधारे काही व्यक्तींनी त्यांचे अपहरण करून अज्ञात ठिकाणी नेले. तेथे त्यांना…

