जामनेर : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील रस्त्यावर होत असलेल्या अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असून आज देखील जिल्ह्यात चारचाकी व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने पाच जण जखमी तर एका तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील भवानी घाटात दि.२६ ऑगस्ट रोजी पाचोरा तालुक्यातील काही तरूण शिरसाळा मारूती दर्शनासाठी जात असतांना बोदवड कडून भरधाव चारचाकी येत असतांना या घाटात दुचाकी व चारचाकीची समोर समोर धडक झाली हा अपघात रामवन मंदिरा समोर झाला. या अपघातात अर्जुन सुकलाल जाधव या तरुणाचा मृत्यू झाला. तर अर्जुन जाधव सुरवाडे व तुषार संतोष जामदार रा. पुंगाव हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था देशातील अनेक विमानतळावर धमकीचे फोन येत असतात. त्यामुळे पोलिसांची मोठी भंबेरी देखील उडत असते. मुंबई विमानतळावरील एका विमानात बॉम्ब ठेवला आहे, ते प्लेन दहा तासानंतर उड्डाण करणार आहे, या कॉलने गुरुवारी खळबळ उडाली. चौकशीत हा कॉल साताऱ्यातील १० वर्षांच्या दिव्यांग मुलाने वडिलांच्या मोबाइलवरून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सहार पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. या कॉलच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तत्काळ बैठक घेण्यात आली. सहार पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि एटीसी पथक, एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते. चौकशीत, तो कॉल खोटा असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. नवी मुंबईच्या नियंत्रण कक्षात हा कॉल…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात अपघाताची संख्या नियमित वाढत असून केरळमधील वायनाडमध्ये प्रवाशांनी भरलेली जीप उलटून झालेल्या अपघातात नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला तर मंतांमध्ये सर्वाधिक महिला आहेत. माहितीनुसार, दुपारी साडेतीनच्या सुमारास वल्लाड-मानंथवाडी रस्त्यावर हा अपघात झाला. गाडीत 12 जण होते. वायनाड हा काँग्रेस नेते राहुल गांधींचा लोकसभा मतदारसंघ आहे. त्यांनी देखील या अपघातावर शोक व्यक्त केला. या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना, खासदार राहुल गांधी म्हणाले की, वायनाडमधील मानंथवाडी येथे झालेल्या जीप दुर्घटनेने मला खूप दुःख झाले आहे. जिल्हाधिकार्यांशी बोलून तातडीने पाऊले उचलण्यास सांगितले आहे. माझे विचार शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो. एका…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक तरुण तरुणी लिव्ह-इनमध्ये राहत असतात अनेकांचे नाते टिकून राहत असते तर काहींचे काही कालानंतर दूर होत असते. अशीच एक धक्कादायक घटना बिहार राजाय्तील बांका या शहरातून समोर आली आहे. लिव्ह-इनमध्ये एका महिलेसोबत राहिल्यानंतर असं काही झालं की त्या नराधमाने त्याची पार्टनर आणि तिच्या निरागस मुलीचं आयुष्यचं संपवलं. बिहारमधील बांका येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. रुबैदा अस मृत महिलेचे नाव असून पती निधनानंतर ती जोडीदाराच्या शोधात होती. त्यानंतर तिची इर्शाद सोबत भेट झाली अन् ते दोघे लिव्हइनमध्ये राहू लागले. 4 वर्षे सगळं काही ठीक होतं. इर्शाद, रुबैदा आणि तिची लेक आनंदाने एकत्र राहत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रत्येकाच्या आयुष्यात भविष्यात काय होणार आहे. हे कोणीच सांगू शकत नाही असं नेहमी आपल्याला घरातले किंवा मित्रमंडळ सांगतात. कधी कधी एखादं सुख मिळवण्यासाठी आपल्याला एखादा गुन्हा करावा लागतो. असाच काहीसा प्रकार दिल्लीत घडला आहे. देशाच्या राजधानीत आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी बापाने टोकाचा निर्णय घेतला आहे. संजय गुप्ता (41) आणि अनीता गुप्ता (36) असं पती पत्नीचं नाव आहे. त्यांनी घरातील खरी गोष्ट ज्यावेळी पोलिसांना सांगितली. त्यावेळी पोलिस सुध्दा एकदम हतबल झाले होते. आरोपीच्या मुलाचा एक वर्षापुर्वी मृत्यू झाला आहे. त्यांच्या मुलीने अशी मागणी केली की, बापाने टोकाचा निर्णय घेतला. त्यांच्या मुलीने यावर्षी रक्षाबंधनाला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था तामिळनाडूमध्ये मदुराई ट्रेनला आग लागल्याची घटना समोर आली आहे. येथे मदुराई स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्याला आग लागली. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, दक्षिण रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, लखनौहून रामेश्वरमकडे जाणाऱ्या ट्रेनच्या पॅसेंजर डब्याला आग लागल्याने 10 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुनालूर-मदुराई एक्स्प्रेसच्या एका खासगी डब्यात आज पहाटे ५.१५ वाजता मदुराई यार्डमध्ये आग लागली. अग्निशमन दलाने पोहोचून आग आटोक्यात आणली असून इतर डब्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. यामुळेच आग लागली आहे. ट्रेनला आग लागल्याचा खुलासा दक्षिण रेल्वेने केला आहे. प्रवाशाने गुपचूप वाहून नेत असलेल्या गॅस सिलेंडरमुळे ही आग…
जळगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे बांधकामाच्या ठिकाणी कामासाठी जात असलेल्या दोन जणांच्या दुचाकीला ट्रेलरने (ट्रॉला) कट मारल्याने दुचाकीस्वार खाली पडून गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील बिबानगरजवळ घडली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एका जणाच्या हाताचा पंजा निकामी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील हनिफ शहा अमन शहा (२४) हे इमारत बांधकामाच्या ठिकाणी मजुरीचे काम करतात. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ते दुचाकीने (क्र. एमएच १९, डीक्यू ५३८६) पाळधी येथे कामावर जाण्यासाठी रहेमान गुलाब शहा यांच्यासह निघाले होते. त्या वेळी मागून येणाऱ्या ट्रालाने त्यांना…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील बदायूंमधील बिलसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या तेजेंद्र नावाच्या 42 वर्षीय व्यक्तीची रात्री घराबाहेर गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीला खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. हि घटना 14 ऑगस्ट रोजी घडली आहे. तेजेंद्र सागर याची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाडही पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी या गुन्ह्याबाबत माहिती देताना सांगितले की तेजेंद्र याची त्याच्या सुनेवर वाईट नजर होती. ही बाब तेजेंद्रच्या पत्नीला कळाली होती आणि दोघांमध्ये यावरून बरेचदा वाद होत होता. अनेक वेळा समजावूनही तेजेंद्र सुधारत नव्हता. तेजेंद्रच्या मुलाचे 2 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. माल ओलांडून…
एरंडोल : प्रतिनिधी येथील शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्यावर धरणगाव रस्ता कोठे आहे? असे विचारून मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 69 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची 17 ग्रॅम वजनाची मंगळपोल लांबवली. ही घटना गुरुवारी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील परदेशी गल्लीमधील रहिवासी विमलबाई लक्ष्मण चौधरी ह्या नेहमीप्रमाणे सकाळी शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्यावर फिरायला गेल्या असता विमलबाई चौधरी ह्या विश्रामगृहाच्या पुढे चालत असतांना मोटार सायकलवरून तीन युवक आले आणि त्यांच्याजवळ थांबून धरणगाव रस्ता कोठे आहे?. तसेच दुसरा रस्ता कोणता आहे?, असे विचारले. त्यानंतर विमलबाई चौधरी माहिती देवून पुढे चालत असतांना मोटार सायकलवरील…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील आव्हाने शिवारातील एका परिसरात महिलेसोबत दोन जणांमध्ये वाद झाला असून याकारणावरून महिला ही घरी बसलेली असतांना परिसरातील काहींनी चुकीचे वर्तन करून मारहाण करत विनयभंग करत धमकी दिल्याची घटना बुधवारी २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका भागात असलेल्या महिलेचे व त्याच भागातील दोन जणांमध्ये बुधवारी २३ ऑगस्ट रोजी सकाळी वाद झाला होता. त्यानंतर ही महिला तिच्या बहिणीसह संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घराबाहेर बसलेली होती. त्यावेळी सकाळी झालेल्या वादातून त्यांच्या घरासमोर राहणारा एक जण त्याच्या…

