जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून वारंवार गुन्हे घडवून आणत असल्याप्रकरणी आज १ महिलेसह पाच गुन्हेगारांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक जळगाव यांचे कडेस आल्यानंतर सदर प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कडून चौकशी करुन हि टोळी अनेक भागात घरफोडी करीत असल्याच्या संशयावरून व वारंवार गुन्हे करण्याचे सवयी आहे असे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांना जळगांव जिल्हयातुन हददपार करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दपार प्रस्ताव क्र. ०१ / २०२३ प्रमाणे टोळी प्रमुख १) भावना जवाहरलाल लोढा वय ३८ रा. अयोध्यानगर, जळगाव, २) अनिल रमेश चौधरी (वय ४०), रा. अयोध्यानगर, जळगाव, ३) सैय्यद सजील सैय्यद हारुन…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था चित्रपट क्षेत्रात गेल्या काही दिवसापूर्वी मोठी खळबळ उडवून देणारी बातमी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे उडाली होती. सध्या नितीन देसाई मृत्यू प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून आर्थिक विवंचनेमुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात आलं. यादरम्यान आता नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजपचे नेते नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. चंद्रकांत देसाई यांनी त्यांचा स्टुडिओ विकत द्यावा म्हणून त्यांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. इतकेच नाही तर यामागे मातोश्रीच्या निगडीत व्यक्ती असल्याचे देखील राणे म्हणाले आहेत. नितीन देसाई हा एक चांगला…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील गंगापूर येथे . विद्युत वजन काट्याचा शॉक लागून विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. भारती घनश्याम पाटील (रा. गंगापुरी ता. धरणगाव), असे मयत विवाहितेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खानदेशचे ग्रामदैवत असलेल्या कानुमातेच्या उत्सवासाठी आपल्या गावी गंगापूर येथे आलेल्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घनश्याम रायभान पाटील हे आपली पत्नी ४ वर्षाची मुलगी आणि १० वर्षाच्या मुलासह सुरत येथे वास्तव्यास आहेत. कानबाईच्या उत्सवासाठी ते आपल्या परिवारासह गावी आले होते. रविवारी सकाळी ते आई-वडिलांसोबत शेतात भेंडी तोडायला गेले होते. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घरात भारतीबाई यांच्या लहान मुलांनी रडत-रडत आरडा ओरडा करायला सुरुवात केली. मावशी,…
धरणगाव : प्रतिनिधी राज्यातील शिवसेनेचा वाढता प्रभाव बघता अनेक पक्षातील नेत्यासह कार्यकर्ते मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होत आहे. नुकतेच जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. धरणगाव शहरातील काँग्रेससह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनेक कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निलेश इंगळे, भगवान महाजन, चंद्रकांत जाधव, राजेंद्र बोरसे, सुभाष चौधरी, मुकेश चौधरी, शांताराम चौधरी, घनश्याम सातव, शब्बीर सय्यद, अखिल कुरेशी, सचिन कासार यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सत्कार केला. याप्रसंगी शिवसेनेचे प्रवक्ते माजी…
पुणे : वृत्तसंस्था पार्टीत जबरदस्तीने आग्रह करुन तरुणीला दारु पाजली. दारुमुळे त्रास होऊ लागल्याने तिला हॉटेलमध्ये नेऊन तेथे तिच्यावर अत्याचार केला. तिचे न्युड फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपरी सौदागर येथील एका २८ वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ५८५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिषेक सत्तुजी टिक्कल (रा. चंदननगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक टिक्कल याने जुलै २०२२ मध्ये फिर्यादीस पार्टीसाठी विमाननगर येथील ईफिनगट क्लबमध्ये बोलावून घेतले. पार्टीत ड्रिक घेण्याचा आग्रह केला. तिने नकार दिल्यानंतरही जबरदस्तीने आग्रह करुन दारु…
पुणे : वृत्तसंस्था अनेक लोकांना दारू पिण्याची मोठी सवय असते. पण हीच सवय एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. दारू पिण्यासाठी जात असताना झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात 2 जून रोजी चाकण येथे घडला. याप्रकरणी पोलीस अंमलदार हर्षल शिरवले यांनी शनिवारी (दि. २६) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चारचाकी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीकेश हे दारू पिण्यासाठी दुचाकी वरून जात असताना अज्ञात चारचाकी वाहनाने भोयर यांच्या गाडीला धडक दिली. यात भोयर गंभीर जखमी झाले. यातच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात दोन जून रोजी घडला. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात गुन्ह्याची…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात अनेक घटना नात्याला काळिमा फासणाऱ्या घडत आहे. एका दिराने त्याच्या वहिनीला भांडण सोडवून समेट घडवण्यासाठी घरी बोलावले. त्याच्यावर विश्वास ठेवून महिला तिकडे गेलीही. पण त्यानंतर दीर, मोठा दीर आणि आणखी एका नातेवाईकाने तिचा विश्वासघात करत तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर ती पोलिसांत जाऊ नये यासाठी त्यांनी तिला धमकीही दिली. पीडित महिला कशीबशी आपला जीव वाचवून तेथून पळाली. नंतर तिने पोलिस स्थानकात जाऊन तिची आपबीती कथन केली पण पोलिसांनी तक्रार दाखलच करून घेतली नाही. उत्तर प्रदेशातील बरेली येथे हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. अखेर पीडित महिलेने बरेली एडीजीजीकडे जाऊन न्यायाची…
सांगली : वृत्तसंस्था राज्याला हादरविणारी घटना सांगली जिल्ह्यातील एका तालुक्यात घडली आहे. आश्रमशाळेतील जवळपास 170 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्यामुळे अचानक प्रशासनाची मोठी धावपळ सुरु झाली. जत तालुक्यातील उमदी येथील समता आश्रम शाळेतील ही घटना असून. विद्यार्थ्यांवर तातडीने जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु केले असल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दोषींवर कडक कारवाई होणार आहे. सदर घटनेची संपूर्ण चौकशीकरून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. जत तालुक्यातील उमदी येथील एका आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. त्या शाळेचं नाव समता आश्रम…
जळगाव : प्रतिनिधी पूर्वी पाणीपुरवठा विभागाला केवळ ७०० कोटींचे बजेट होते. मात्र आता जलजीवन मिशन मुळे ५० हजार कोटी पेक्षाही जास्त बजेट आहे. त्यामुळे राज्याला पिण्याचे पाणी पाजण्याचे पुण्याची सेवा करण्याची संधी मिळाली असल्यामुळे मी भाग्यशाली मंत्री आहे. रावेर तालुक्यात 89 गावांच्या पाणीपुरवठा योजना मंजूर असून गरीब व वंचित पात्र लाभार्थ्यांचेच संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरण मंजूर करण्याचे समितीला निर्देश केले. काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांचा अभिमान असून शेतकरी हितासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. जनता हीच आपली श्रद्धा असून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे. एस. टी. च्या महिलांना निम्मे तिकीट व ज्येष्ठांना मोफत प्रवासामुळे रिक्षावाले नाराज झाले असले तरी त्यांच्यासाठी…
धरणगाव : प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील तरुणाचा धरणगाव तालुक्यातील पाळधी ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यादरम्यान शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. अज्ञात ट्रकने त्याला मागून धडक दिली. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पाळधी पोलिस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे. भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील भूषण संभाजी महाजन – माळी (वय २९) असे मयत तरुणाचे नाव आहे. शनिवारी तो त्याच्या नातेवाईकांकडे जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे आला होता. रात्री दहा वाजेनंतर तो शिरसोलीवरून पिंपरखेडला पाळधी मार्गे जायला निघाला होता. विद्यापीठाच्या दिशेने चालत असताना त्याला अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात…

