जळगाव : प्रतिनिधी जागतिक मानसीक आरोग्य दिनानिमित्त चेतना व्यसनमुक्ती ,युवाशक्ती फाउंडेशन आणि शहरात गाऊ आनंदाची गाणी या कार्यक्रमाचे आयोजन 10 ऑक्टोबर संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत काव्यरत्नावली चौक येथे करण्यात आलेले आहे .मानसशास्त्र सांगते की गाणी गायल्यामुळे डान्स केल्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे आपल्या मेंदूमधील हॅपी हार्मोनची वाढ होत असते .व्यक्ती आनंदी होत असतो .आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला तान तणावांना सामोरे जावे लागते .अधिकच्या ताणतणावामुळे माणूस आनंदापासून पारखा होतो . असे म्हणतात आनंदी मन यश खेचून आणते . मनाला आनंदी करण्या करताच जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून काव्यरत्नावली चौकामध्ये मनसोक्त आनंदी गाण्यांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे .…
Author: editor desk
लातूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता यात लातूर जिल्ह्यात देखील खुनाच्या घटनेने हादरून गेला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात एका रिक्षा चालकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. दरम्यान या घटनेचा तपास औसा पोलीस करत आहेत. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार लातूर औसा महामार्गावरील कारंजे खडी केंद्राच्या परिसरात इस्माईल मुबारक मणियार (वय 41, राहणार हरंगुळे, ता. जि. लातूर) हे आले हाेते. तेथे त्यांचा अज्ञातांनी दगडाने ठेचून खून केला. मणियार यांच्या डाेक्यात ठेचून मारण्यासह शरीरावर इतरही ठिकाणी गंभीर मारहाण केल्याचे निदर्शानस आल्याचे पाेलीसांनी सांगितले. या खूनाचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक शहरात छोट्या मोठ्या घटनेतून आगीच्या घटना घडत असतांना पंजाबच्या जालंधरमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जालंधरच्या अवतारनगरमध्ये घरातील फ्रीजचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत २ चिमुकल्यांसह एकाच घरातील पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जालंधरच्या अवतार नगर येथील गल्ली क्रमांक १२ मध्ये ही घटना घडली. घरातील सर्व सदस्य क्रिकेट मॅच पाहण्यात व्यक्त होते. याचवेळी त्यांच्या घरातील फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट झाला. अचानक स्फोट झाल्याने कॉम्प्रेसरमधील गॅस संपूर्ण घरात पसरला. या आगीच्या आणि गॅसच्या झपाट्यात कोणालाही घराबाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे 65 वर्षीय…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यापासून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गस्त सुरु केली असतांना एका कारचा संशय आल्यानंतर पाठलाग करीत 18 लाखांची अफूची बोंडे जप्त केली तर पोलिसांना पाहताच संशयित चालक पसार झाला. पोलिसांनी रेल्वे स्टेशन माल धक्क्याजवळ ही कारवाई केल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरचे पोलिस उपनिरीक्षक सुहास आवाड हे रविवारी पहाटे गस्त करीत असतांना त्यांना शहरातील धुळे रोड महाविद्यालयाजवळ कार (क्रमांक एम.पी. 09 डब्यू.सी.1485) दिसल्यानंतर त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी चालकास थांबण्याचा इशारा केला मात्र चालकाने सुसाट वेगाने कार पळवल्यानंतर पथकाने पाठलाग सुरू केल्यानंतर चाळीसगाव रेल्वे स्टेशन माल धक्क्याजवळ वाहन सोडून चालक…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा भारतीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी मिझोराम, छत्तीसगड , मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याबाबतचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं. मिझोराममधून १३ ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सर्व पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी केली जाणार आहे. मिझोराम विधानसभा निवडणुकीचं मतदान ७ नोव्हेंबर घेतलं जाणार आहे. तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान तर १७ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेतलं जाणार आहे. दरम्यान, मध्य प्रदेश- १७ नोव्हेंबर, राज्यस्थान…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एकाच भागात राहणाऱ्या महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर मेहरून तलाव परिसरात बलात्कार करून तिचा वेळोवेळी पाठलाग करून तिच्याशी अंगलटपणा करून तिला त्रास देणाऱ्या तरुणांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात दानिश तडवी तरुणीला गेल्या तीन चार वर्षांपासून ओळखत असून ती इयत्ता अकरावीत असताना त्याने 2021 मध्ये कांताई धरण परिसरात विनयभंग केला होता तसेच तरुणी बारावीत गेली असता तिच्यावर 2022 साली मेहरुन तलाव परिसरात असणाऱ्या झाडाझुडपांच्या मध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर विद्यार्थिनीने दुसऱ्या एका महाविद्यालयात प्रवेश घेऊन तिथे…
भडगाव : प्रतिनिधी केळी लागवडीसाठी जमीन तयार करीत असताना विजेचा शॉक लागून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हि घटना रविवारी पाचोरा तालुक्यातील घुसर्डी येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घुसर्डी येथील विकास धर्मा निकुंभ (वय २३) असे या मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी सकाळी तो काका राजेंद्र निकुंभ, चुलतभाऊ साई व यश निकुंभ यांच्यासोबत केळी लागवडीसाठी जमीन तयार करीत होता. त्याचवेळी त्याला वीज तारेचा शॉक बसला. त्यात तो बेशुद्ध पडला. काका व चुलतभावांनी त्यास कजगाव येथील खासगी दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, काका, चुलत भाऊ असा परिवार…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक खून प्रेमप्रकरणातून होत असतात, उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या पतीची बेदम मारहाण करुन हत्या केली आहे. ज्या व्यक्तीची हत्या करायची होती. त्या व्यक्तीला मारण्यापूर्वी प्रचंड दारु पाजली होती. त्यानंतर त्याच्या बायकोला बॉयफ्रेंडने विचारलं की, त्याची हत्या करु का ? ज्यावेळी प्रेयसीने हत्या करण्याची परवानगी दिली, त्यानंतर आरोपीने चाकूने वार केले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर त्याची कसून चौकशी सुरु आहे. ज्या व्यक्तीचा खून झाला आहे, त्याचं नाव संजय आहे. तो मुलगा फर्रुखाबाद येथील रहिवासी आहे. त्याच्या पत्नीचं नाव सुमन आहे. पोलिसांनी…
सातारा : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून अनेक खुनाच्या घटना उघडकीस येत असतांना आज रविवारी देखील सातारा जिल्हा खुनाने हादरलं आहे. जिल्ह्यातील माण तालुक्यात दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. माण तालुक्यातील आंधळी गावात पती पत्नीचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केला असल्याची घटना आज रविवारी उघडकीस आली असून घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. संजय रामचंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी मनीषा संजय पवार रा. आंधळी, ता. माण अशी मृत्यू झालेल्या पती – पत्नीची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, माण तालुक्यातील आंधळी गावात पती पत्नीचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची घटना शनिवारी रात्री…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका परिसरात ३५ वर्षीय तरुणाने भाड्याच्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जळगाव – धरणगाव महामार्गावर असलेल्या खोटे नगर परिसरात भाड्याच्या घरात राहणारे बाळासाहेब लोटन पवार (वय ३५) यांनी आज सकाळी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पवार हे औद्योगिक वसाहतमधील एका कंपनीत कामाला असून त्यांच्या आई-वडिलांचे चार ते पाच वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तर तीन बहिणींचे लग्न झाले असून तरुण खोटेनगरात भाड्याच्या घरात एकटाच राहत होता. रविवार, ८ ऑक्टोबर रोजी दुपार झाली तरी तो घराबाहेर आला नाही, त्यामुळे घरमालक त्याला…

