पुणे :वृत्तसंस्था अनेक तरुण-तरुणी कुठल्या ना कुठल्या कारणाने आत्महत्या करीत असल्याचे अनेक घटना राज्यात घडत असतान एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. २५ वर्षीय तरुणी पोलीस भरतीची तयारी करीत असतांना तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोनाली धनाजी धुमाळ (वय-25 रा. टिळेकर मळा, उरुळी कांचन, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली धुमाळ ही विवाहित असून तिचा घटस्फोट झाला आहे. ती उरुळी कांचन परिसरात माहेरी राहत होती. मागील एक वर्षापासून ती पोलीस भरतीची तयारी करीत होती.…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीला मारहाण केल्यानंतर कार चालकाने 200 मीटरपर्यंत फरफटत नेले. या वेदनादायक आणि हृदयद्रावक घटनेत त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. पाठीमागून येणाऱ्या कारस्वाराने या घटनेचा व्हिडिओ शूट करुन सोशल मीडियावर शेअर केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, यानंतर पोलिसांनी तपास केला असता, हा व्हिडीओ NH8 च्या सर्व्हिस रोडचा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. ज्या व्यक्तीचा या घटनेत मृत्यू झाला, त्या व्यक्तीची ओळख पटली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या…
मुंबई : वृत्तसंस्था मुंबई शहरातील विरार पश्चिम परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 19 मजली इमारतीवरून चार वर्षांची चिमुकली खाली पडल्यामुळे तिचा मृत्यु झाला आहे. ही घटना विरार पश्चिम येथे असलेल्या बचराज नावाच्या 19 मजली इमारतीत घडली आहे. चिमुकलीची आई पतीला सोडवण्यासाठी स्टेशनवर केली असतानाच याचं वेळेत खिडकीतून डोकावून पाहताना तिचा तोल गेल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या 19 मजली इमारतीत चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये जयालयन कुटुंब राहते. त्यांना चार वर्षीय दर्शनी नावाची मुलगी एकुलती एक होती. काल सकाळी दर्शनीची आई तिच्या वडिलांना सोडवण्यासाठी स्टेशनवर गेली होती. यावेळी दर्शनी झोपली असल्यामुळे आईने तिला उठवले…
मुंबई : वृत्तसंस्था प्रत्येक घरातील सासू-सुनेचे नाते खूप महत्वाचे मानले जात असते. पण काही काही परिवारात हेच नाते भयावहक झाले असते. अशाच एका परिवारातील व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. कोपरीमध्ये ७७ वर्षीय ज्योती दयारामानी या सासूलाच ५३ वर्षीय कोमल दयारामानी या सुनेने जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कोपरी पोलिसांनी मंगळवारी दिली. या प्रकाराची व्हिडिओ क्लिपही सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. https://twitter.com/sirajnoorani/status/1711427150770036767?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1711427150770036767%7Ctwgr%5Ed0058fb4fe00c6f1d26c9fa1c87a64d4f2915863%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fm.dailyhunt.in%2Fnews%2Findia%2Fmarathi%2Fforyou%3Fmode%3Dpwaaction%3Dclicklaunch%3Dtrue कोपरीतील नाखवा हायस्कूलजवळील सिद्धार्थ नगरातील साई तिर्थ या उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. आपल्या तक्रारीमध्ये सासू ज्योती दयारामानी यांनी…
सांगली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यातील तलावाच्या पाण्यात बुडून निधन झाल्याच्या अनेक घटना दिवसेंदिवस वाढत असतांना एक धक्कादायक बातमी सांगलीच्या कवठेमहांकाळ येथून समोर येत आहे. कपडे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाय घसरून बंडगरवाडी तलावात पडल्यामुळे राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण (वय ४८) आणि कार्तिक राजेंद्र चव्हाण (वय १८) यांचा बुडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी संधाकाळच्या सुमारास ही घटना घडली. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली आहे. करोली टी येथील राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण आणि कार्तिक राजेंद्र चव्हाण हे घरातील धुणे धुण्यासाठी बंडगरवाडी तलाव परिसरात गेले होते. यावेळी ते पाय घसरुन पडले असावेत, असा…
नागपूर : वृत्तसंस्था विमान प्रवासात शेजारी बसलेल्या महिलेच्या दिशेने मोबाईलचे तोंड करून त्यावर अश्लिल व्हिडीओ बघणाऱ्या आणि विमान धावपट्टीवर उतरताना तिचा विनयभंग करणाऱ्या पुण्याच्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा प्रकार समोर आला. विमानातील एका प्रवाशाने लैंडिंगदरम्यान सहप्रवासी असलेल्या महिला डॉक्टरचा विनयभंग केला. महिलेनेदेखील हिंमत दाखवत त्याची कॉलर धरून त्याला चोप दिला. पोलिसांनी या प्रकरणात फिरोज शेख नूर मोहम्मद शेख (३२, दुर्रानी कॉम्प्लेक्स, कोंढवा, पुणे) याला अटक केली आहे.
पुणे : वृत्तसंस्था पुणे शहरातील पिंपरी येथील कासारवाडीत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावामध्ये मंगळवारी सकाळी क्लोरीन वायूच्या टाकीतून वायुगळती झाली. त्यामुळे पोहण्यासाठी उतरलेल्या १५ जणांना अचानक खोकला व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. अनेकजण पाण्यात बुडू लागले; मात्र जीवरक्षकांनी प्रसंगावधान राखून त्यांना बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले. एका दहावर्षीय मुलीची प्रकृती गंभीर असून, तिला खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. तलावातील पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन वायूचा वापर केला जातो. त्याची टाकी पूर्णत: गंजल्याने त्यामधून वायुगळती झाली. ही बाब प्रशिक्षक व जीवरक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नागरिकांना तत्काळ तलावाबाहेर येण्यास सांगितले; मात्र श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अनेकजण पाण्यात बुडू लागले.…
भुसावळ : प्रतिनिधी मोबाइलवर रिचार्ज करण्यासाठी तीनशे रुपये दिले. अनेक दिवस होऊनही रिचार्ज न झाल्याने पैसे परत मागितल्याचा राग आल्याने एकास बेदम मारहाण केली. तसेच मानेवर व हातावर ब्लेडने वार करून जखमी केले. ही घटना रविवारी घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील मुस्तकीम शेख मुख्तार (वय २४) आगाखान वाडा यांना कुमार किराणासमोर फरहान शेख नसीम व फरदीन शेख नसीम हे दोन्ही भाऊ भेटले. मुस्तकीम यांनी २ ऑक्टोबरला मोबाइलमध्ये ३०० रुपये रिचार्ज मारण्यासाठी रोख पैसे दिले होते. मोबाइलमध्ये रिचार्ज न आल्यामुळे मुस्तकीमने फरदीन यांना याबाबत विचारणा केली असता रिचार्ज केलेला आहे. परंतु…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात अल्पवयीन मुलीना पळवून नेल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा येथे एक 50 वर्षीय शिक्षक आपल्या विद्यार्थिनीला घेऊन पळून गेला आहे. विद्यार्थिनी पळून जाताना आपल्यासोबत 30 हजार रुपये कॅश, दागिने आणि कुटुंबातील सदस्यांचं आधारकार्ड घेऊन गेली आहे. शिक्षक त्यांच्या मुलीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करत असून त्यामुळे समाजात बदनामी होत असल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गोंडा ग्रामीण भागातील कोतवाली भागात असलेल्या गावातील हे प्रकरण आहे. जिथे जुलै महिन्यात शिक्षक अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवून घेऊन…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक गावात भुलाबाई विसर्जन करण्यात येत असतांना जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे देखील संध्याकाळी विसर्जन सुरु असतांना एक दुर्देवी घटना घडली होती. एक तरुण पाण्यात बुडाला होता. त्या तरुणाला काढण्यासाठी १४ तासांनी यश आले आहे पण दुर्देवाने हा तरुण मयत अवस्थेत मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे भुलाबाई विसर्जन कार्यक्रम सुरु असतांना रमेश चव्हाण हे पाण्यात बुडाल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांना शोधण्यासाठी राज्य आपत्ती परिषद दल जळगाव यांनी सुरुवात केली परंतु मयत रमेश चव्हाण याचा मृतदेह १४ तास अथक परिश्रम करुन सुदधा हाती लागत नसल्याने शेवटी म्हसावद मंडळ अधिकारी आंधळे यांनी…

