Author: editor desk

सांगली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरु असतांना सांगली जिल्ह्यातील हरिपुरात ग्रामपंचायत निवडणुकीत काळया जादूचा वापर झाल्याची चर्चा आहे. अज्ञाताकडून काळया बाहुल्यांची पूजा केली गेली तर मोहिते पॅनलच्या कार्यकर्त्यांनी त्या बाहुल्या जाळून टाकल्या. दरम्यान या घटनेबाबत पाेलीसांत नाेंद झालेली नाही. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयासाठी सध्या टोकाचे प्रयत्न केले जात आहेत. सांगली नजीकच्या हरिपुरात निवडणुकीत चक्क काळया जादूचा वापर केला जात आहे. अज्ञाताकडून हरिपूरमध्ये बाहुल्यांची पूजा मांडण्यात आली. यानंतर संतप्त मोहिते पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जादूटोणा केलेल्या बाहुल्या जाळून निषेध केला. हरिपूर ग्रामपंचायतीसाठी निवडणूक सुरू आहे. यासाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. सध्या ग्रामपंचायतीवर तांबवेकर प्रणित बोंद्रे पॅनेलची सत्ता…

Read More

नेहमीच आपल्या हटके फॅशनमुळे चर्चेत असलेली व वादाच्या भोवऱ्यात अडकणारी उर्फी जावेदला जीवे मारण्याच्या धमक्या देखील आल्या असून उर्फी जावेद न घाबरता पुन्हा नव्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये कॅमेऱ्यापुढे येत. आता सध्या उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामागचे कारण म्हणजे उर्फी जावेदला पोलिसांनी अटक केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. उर्फी जावेदला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. दोन महिला पोलिस तिला सोबत घेऊन जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल भियानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. उर्फी जावेदला खरंच अटक झाली आहे की नाही हे अद्याप समोर आले नाही. पण हा…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून अनेक अल्पवयीन मुलीना प्रेम प्रकरणात अडकवून त्यांच्या सोबत चुकीचे कृत्य केल्याच्या अनेक घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गेल्या वर्षभरापासून प्रेम संबध निर्माण करीत एका तरुणाने तिच्यासोबत शारिरीक संबध निर्माण करून तिला गर्भवती केल्याची घटना उघड झाली असून अल्पवयीन मुलीला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी अडावद पोलिसात एका विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.१ ते ३१ मार्च २०२३ या महिन्याभरात तरुणाने चोपडा व जळगाव येथील…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  रात्रीच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या दुचाकींची समोरासमोर जबर धडकून झालेल्या अपघातात वरणगाव व फुलगावातील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव येथील महामार्गावरील शिवाजी नगर येथे बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकल स्वारांनी एकमेकांना धडक दिली. यात दोन्ही जण गंभीर जखमी झाले. या जखमींना वरणगावच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या भीषण अपघातात फुलगाव येथील माजी सैनिक कॉलनीतील विजय रामकृष्ण महाजन (वय ४७) आणि वरणगाव येथील गणपती नगरमधील आदर्श शाळेजवळ राहणारे ललित धांडे (वय ३५)…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून ड्रग्ज प्रकरण मोठ्या चर्चेत आले असून आता ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्याचा सखोल तपास आवश्यक आहे. हा देशातील तरुणाई नासवण्याचा प्रकार आहे. या गुन्ह्यांच्या मुळाशी जायचे आहे, असे सांगून तपास अधिकारी व गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील तांबे यांनी ललितसह दोन्ही आरोपींना चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी चौदा दिवसांची कोठडी न देता ७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ड्रगतस्कर ललित पाटील याने साकीनाका पोलिसांच्या ताब्यात असताना अंधेरी न्यायालयात आपल्या जीविताला धोका असल्याचा दावा केला आहे. यावेळीही ललितचे वकील संदीप बाली यांनी आरोग्य आणि…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाची कारवाई सुरु असतांना जनावरांच्या खाद्यासोबत भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक कोटी 19 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.1) दुपारी चारच्या सुमारास बंगलोर-मुंबई महामार्गावर रावेत गावच्या हद्दीत केली आहे. बंगलोर-मुंबई महामार्गावरुन विदेशी मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपुत यांना मिळाली. त्यानुसार, रावेत गावच्या हद्दीतील हॉटेल हेमराज समोर सापळा रचण्यात आला. पथकाने दुपारी चारच्या सुमारास भारत बेझ कंपनीचे 14 चाकी वाहन (एमएच 15 एफव्ही 7940) आडवले. वाहनामध्ये 50 किलो…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात अपघाताची मालिका सुरु असतांना एक धक्कादायक अपघात दिल्लीत घडला आहे. फिल्ममेकर पीयूष पालसोबत घडला आहे. अपघातानंतर पीयूष पाल अर्धा तास रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यामध्ये तडफडत राहिला. पण त्याच्या मदतीसाठी कोणीच धावून आले नाही. सर्वजण आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करत राहिले. अशामध्ये तडफडूनच पियूषचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय पीयूष पालचा दिल्लीमध्ये अपघात झाला. पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. आपल्या बाइकवरून पीयूष दक्षिण दिल्लीतील पंचशील एन्क्लेव्हजवळील ट्रॅफिक सिग्नलवर लेन बदलत होता. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या दुसऱ्या बाइकने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर पीयूष आपल्या बाइकसह लांबपर्यंत खरचटत गेला. हा अपघात इतका भीषण होता की…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावात २९ वर्षीय विवाहितेवर एकाने मध्यरात्री तिच्या घरात घुसून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरूणाविरोधात जामनेर पोलिसात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात २९ वर्षीय विवाहिता भाड्याच्या घरात राहत असून दि.३० सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास २५ वर्षीय विवाहितेच्या घरी येवून तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबध ठेवले जर हि घटना कुणाला सांगितलीस तर तुझ्या दोन्ही मुलीना जीवे मारून टाकेल अशी धमकी देखील यावेळी संशयित आरोपीने विवाहित महिलेला दिली. त्यानंतर विवाहित महिलेने जामनेर पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Read More

बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतांना एक धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातून समोर आली आहे. येथील जुनी भाजी मार्केट गजबजलेला परिसरात भर दिवसा चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीच्या किराणा सामानाच्या पिशवीतून ५० हजार रुपयाची चोरी झाल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून पोलीस त्या चार चोरट्याचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव पाटण येथी राहणार फिर्यादी दिगंबर ज्ञानदेव वाघ यांनी जळगाव जामोद पोलिसात याविषयी तक्रार दाखल केली आहे. दिगंबर वाघ यांनी त्यांच्या आईच्या उपचारासाठी स्टेट बँक कृषी शाखा जळगाव जामोद येथुन ५० हजार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगावातील शैक्षणिक क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. मात्र तोच त्याच बातमीचे पडसाद असे काही उमटले कि, दुपारी त्या संबंधित गुन्ह्यातील आरोपीने आपली जीवन यात्राच संपवल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोप असलेल्या आरोपीने शिरसोली ते दापोरा रेल्वेरुळावर स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील ग्रंथालय परिचर कैलास दत्तात्रय कडधाने (५३) यांच्या विरुद्ध २० वर्षीय विद्यार्थिनीने दि. २६ ऑक्टोबर रोजी विनयभंग केल्याची फिर्याद रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार मंगळवारी ३१ रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा…

Read More