जळगाव : प्रतिनिधी मालकाच्या घरी साफसफाई करण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलाच्या पायाला वीज तारेला स्पर्श झाल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना दि.१ नोव्हेबर रोजी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बोहरा गल्लीत बांधकामाच्या ठिकाणी आई-वडील व बहीण यांच्यासोबत सुनील संजय चव्हाण (१६) हा वास्तव्यास असून तेथील फटाके दुकान मालकाने त्यांच्या गणेश कॉलनीतील घरी साफसफाई करण्यासाठी सुनील चव्हाण आणि त्याचा मित्र सागर शिंदे यांना बुधवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी पाठविले होते. घराची साफसाफाई करत असताना विजेच्या तारेवर पाय पडल्याने याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी गणेश कॉलनीत घडली. दोघे जण घराची सफाई करता असताना सुनीलच्या पायाचा वीज…
Author: editor desk
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील भाटखेडा शिवारातील मेंढपाळ वाड्यातील चिमाबाई देवा कोरडकर असे नाव असून या प्रकरणी अकस्मात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या चिमाबाई देवा कोरडकर (वय २५, रा. मुंजलवाडी ) हिचा पाय घसरून विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. धुरखेडा येथील पट्टीचे पोहणाऱ्यांनी तिचा मृतदेह सुमारे पावणे दोनशे फूट खोल विहिरीतील ७५ फूट पाण्यातून बाहेर काढल्यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. दरम्यान, मयत चिमाबाईच्या जेठाच्या खबरीवरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत चिमाबाईचे आई-वडील दाखल झाल्यानंतर गुरुवारी सकाळी…
धुळे : प्रतिनिधी जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथील वनजमिनीवर लावण्यात आलेल्या १०८ किलो वजनाचा ओला गांजासह ४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकाविरोधात सांगवी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे यांना मंगळवारी याबाबत खबर मिळाली होती. रायसिंग पावरा (रा. लाकड्या हनुमान) याने वनजमिनीवर गांजा सदृश अमली पदार्थाची लागवड केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक खलाणेसह नायब तहसीलदार महेश बोरसे व पोलिस पथकासह घटनास्थळी छापा टाकण्यासाठी गेले, मात्र त्याची चाहूल संबंधित शेतमालक रायसिंग पावरा यास लागल्याने तो तेथून फरार झाला. सदर क्षेत्रामध्ये ५ ते ६ फुट उंचीचे…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील आरोग्य विभागात महाराष्ट्र शासनाने यशस्वी ग्रुप या कंपनीला ठेकेदार पद्धतीने डाटा एंट्री ऑपरेटर भरले असुन यशस्वी ग्रुपच्या मनमानी कारभारा विरोधात या डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी संप पुकारला आहे तसे निवेदन प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले असुन आज डॉ. अभिषेक ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आरोग्य विभागात मनुष्यबळ कमी असल्याने डाटा एन्ट्री ऑपरेटर चे कामे करण्यासाठी पुणे येथील यशस्वी ग्रुप या कंपनीला करार दिलेला असुन यशस्वी ग्रुप या कंपनी मार्फत आरोग्य विभागात डाटा एंट्री ऑपरेटर प्रशिक्षणार्थी म्हणुन भरती केले आहे. त्यांना महिन्याला फक्त ९ हजार प्रमाणे मानधन अदा करण्यात येत…
जळगाव : प्रतिनिधी येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये पुस्तक जमा करण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय विद्यार्थिनीचा ग्रंथालय परिचर याने विनयभंग केल्याची घटना २६ ऑक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी मंगळवार, ३१ ऑक्टोबर रोजी विद्यार्थिनीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या जिल्ह्यातून जळगावात आजीकडे शिक्षणासाठी आलेली एक २० वर्षीय विद्यार्थिनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. २६ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा झाल्यानंतर ही विद्यार्थिनी ग्रंथालयात पुस्तक जमा करण्यासाठी गेली. तेथे ग्रंथालय परिचर कैलास कडभाने याने दुसऱ्या दिवशी परीक्षा असलेल्या विषयाचे पुस्तक घेऊन जाण्याविषयी आग्रह करीत विनयभंग केला. घाबरलेल्या अवस्थेत तिने घर गाठले व आजीला हकीकत सांगितली. नंतर…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील तरुणांना नोकरी करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरशन’ मध्ये इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, लिफ्ट & एस्केलेटर मेकॅनिक, मेकॅनिक (फ्रीज & AC) च्या 134 रिक्त अप्रेंटीसशिप जागांची भरती केली जाणार आहे. 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण आयटीआय उमेदवारांना नोकरी मिळविण्याची मोठी संधी त्यानिमित्त चालून आली आहे. नोकरीचे ठिकाण नागपूर, पुणे & नवी मुंबई असेल. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरशनच्या माध्यमातून नागपूर युनिटसाठी 71, पुणे युनिटसाठी 53 आणि नवी मुंबई युनिटसाठी 10 अप्रेंटिस उमेदवार भरले जाणार आहेत. 27 ऑक्टोबर 2023 रोजी किमान 17 आणि कमाल 24 वर्षे वय असलेले उमेदवार महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरशनच्या अप्रेंटीसशिप…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात आत्महत्या केल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना एक धक्कादायक घटना मुंबईतील मानखुर्द परिसरातून समोर आली आहे. एका 32 वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची समजत आहे. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथील राहत्या घरीत महिला पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेतला. वर्षा शिंदे असं मृत पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. त्या ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. यामध्ये त्यांनी पती आणि सासरच्यांवर गंभीर आरोपी लावले आहेत. ट्रॉम्बे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे. गेल्या दीड वर्षांपासून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या वर्षा शिंदे मंगळवारी सकाळी त्यांनी अचानक टोकाचा…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील सिद्धिविनायक कॉलनी परिसरात पती नोकरीवर तर मुले क्लासला गेलेली असताना सीमा शशिकांत कासोट (वय ३३) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मुले क्लासमधून घरी आली, त्यावेळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी शशिकांत कासोट हे कामावर गेले होते. तर त्यांची मुले क्लासला गेलेली होती. त्यामुळे सीमा घरी एकट्याच होत्या. त्यावेळी त्यांनी घरात ओढणीने गळफास घेतला. सायंकाळी मुले क्लासमधून घरी आली तर घराचा दरवाजा आतून बंद होता. मुलांनी बराच वेळ आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजारील मंडळींना सांगितले. त्यावेळी…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील सिंधी कॉलनीमधील रहिवासी अशोक बखटमल बजाज (५२) हे मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना ट्रकने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ३१) सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान रेल्वेच्या उड्डाणपुलाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक बजाज हे नेहमीप्रमाणे सकाळी पायी फिरायला निघाले असताना ट्रकने (एमएच १८ बीजी धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. पघात प्रकरणी बाजारपेठ पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. ट्रक चालक युनूस शहा, सजन शहा फकीर (रा. धुळे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश बेनकोळी करत आहे. दरम्यान, भुसावळ येथील या पुलवार…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मराठा आंदोलकांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली होती तरी देखील अनेक नेत्यांचा गावात प्रवेश होत असल्याने आंदोलकांनी त्यांच्या चारचाकी गाड्या पेटविण्यास सुरुवात केली असल्याने आता राज्यातील आमदार देखील आरक्षणासाठी राजीनामा देवू लागले आहे. यात पहिला धक्का शिंदे गटाला देखील बसला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा थेट विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला आहे. राज्यात सध्या मराठा समाजाचे आंदोलन पेटलेले असताना रमेश बोरणारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मतदार संघातूनच बोरणारे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर बोरणारे यांनी…

