जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजचा चौथा वर्धापन दिन जळगाव शहरातील देव हाईटस याठिकाणी मोठ्या उत्साहात दि.४ रोजी साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थिती वर्धापन दिन अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी जी.प.सदस्य प्रताप पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, रमेश माणिकराव पाटील, एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोनि.जयपाल हिरे,निरीक्षक पवन देसले, शिवराज पाटील, प्रा.प्रवीण पाटीलसर, वासुदेव पाटील सर, नितीन विसपुते, डी.ओ.पाटील, राम पवार, धवल पाटील, डॉ.अरुण पाटील, संजय चव्हाण, खुशाल पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता,…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातून अल्पवयीन मुलीला अनोळखी इसमाने काहीतरी आमिष दाखवत पळवून नेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी शुक्रवार ३ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा ते ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान घरात सर्वजण झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शुक्रवारी ३ नोव्हेंबर रोजी…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चोपडा रस्त्यावरील वढोदे गावाजवळील एका कृषी केंद्रासह शहरातील विरारनगर व मदिनानगर परिसर अशा तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कृषी केंद्रातील चोरीत सहभाग अज्ञात चोरटे सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात विरारनगर परिसरात मध्यप्रदेशातील संशयितास अटक केली आहे. शहरातील हरिओमनगर शेजारी मदिनानगर परिसरातील रहिवासी रफीक खान नामदार खान (वय ५५) हे खासगी शाळेत शिपाई म्हणून नोकरीस आहेत. त्यांनी शहरातील विस्तारित भागात आपल्या सून व मुलासाठी भाडे तत्वावर घर घेतले. १ ते २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घरातील मंडळी ही बाबूजीपुरा येथील घरात झोपण्यासाठी गेले असता चोरटयांनी…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यभरात अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरातून समोर आली आहे. भावाला व्याजाने एक लाख रुपये मुलीच्या लग्नासाठी दिले खरे; पण याच पैशांसाठी बहिणीने सख्ख्या भावाचा गुंडांच्या मदतीने खून केला. ही घटना १ नोव्हेंबररोजी बेगमपुरा भागात समोर आली होती. विशेष म्हणजे, आत्महत्या केल्याचा बनावही केला. मात्र, घाटीतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने मृत भावाला झालेल्या जखमा आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर बेगमपुरा पोलिसांना ही आत्महत्या नसून हा खून असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर या प्रकरणात बहिणीसह तिचा दूरचा नातेवाईक, त्याचे मित्र अशा पाचहून अधिक जणांविरोधात २ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे, ही घटना…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले होते तर अनेक जिल्ह्यात साखळी उपोषण देखील सुरु केले होते. मात्र सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिल्यावर जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान संभाजीनगर येथील रुग्णालयात मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे किंवा मुंबई इथं देखील हलवण्यात येऊ शकते. आज सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली. सरकार सोमवारपर्यंत मनोज जरांगे यांनी नवीन जीआर देणार आहे. मनोज जरांगे म्हणाले, सध्या साखळी उपोषण सुरु आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. मात्र आता समिती देखील कामाला लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २४ तारीख देली आहे. कुणीही…
नाशिक : वृत्तसंस्था कळवण शहरातील गणेश नगर भागातून चार घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टरवर फटाक्याची ठिणगी पडल्याने चाऱ्याने पेट घेतल्याची घटना गुरुवारी (दि. २) सायंकाळच्या सुमारास घडली. यात चारा पूर्णपणे जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. यंदा पावसाने देवळा तालुक्याकडे पाठ फिरवल्याने दुष्काळसदृश परिस्थितीत निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. खर्डासह देवळा तालुक्यातील असंख्य गावातील शेतकरी जनावरांना लागणारा चारा घेण्यासाठी कळवण तालुक्यात येत आहेत. शेतकरी भास्कर खंडेराव पवार (रा. खर्डा ता. देवळा) हे कळवण तालुक्यातील मानूर येथून गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास आपल्या ट्रॅक्टरने (क्रमांक एमएच ४१ बीई ८८७०) मका पिकाचा चारा घेऊन जात होते. त्याचवेळी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नेपाळमधील काही जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 11.32 वाजता 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे केंद्र नेपाळमधील काठमांडूच्या वायव्येस 331 किलोमीटर अंतरावर 10 किलोमीटर भूमिगत होते. नेपाळमधील दोन जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. जाजरकोटमधील स्थानिक अधिकाऱ्याने ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेला सांगितलं की, जिल्ह्यात किमान ३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेजारच्या रुकुम पश्चिम जिल्ह्यात किमान ३६ लोक मृत पावल्याची माहिती समजत आहे. या दुर्घटनेनंतर देशातील तिन्ही सुरक्षा यंत्रणा जखमींना तत्काळ मदत करण्यासाठी घटनास्थळी रवाना झाल्या आहेत, याबाबतची माहिती नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आली आहे. नेपाळच्या गृहमंत्रालयाने सांगितलं की, दैलेख, सल्याण आणि रोल्पा जिल्ह्यांसह इतरही काही जिल्ह्यांतून लोक जखमी झाल्याची आणि…
जळगाव : प्रतिनिधी राज्य शासनाने पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२२-२३ साठी राज्य हिस्स्याची रू. १९६ कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी मंजुरी देवून निधी वितरित केला होता यामुळे जिल्ह्यातील रखडलेला पिक विमा नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होवून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा आपल्या सर्वसामान्यांच्या सरकारचा निर्धार आहे. परंतु विमा कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नुकसान भरपाई जमा होण्यास थोडा विलंब होताच पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत तीव्र शब्दात ठणकावले तसेच राज्याच्या कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे जिल्ह्यासाठी सरसकट लाभ देण्यासाठी सतत पाठपुरावा केला आहे. त्यामुळे सदर नुकसान भरपाई रक्कम ही ४…
धुळे : प्रतिनिधी जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जवखेडा येथील एका मंडळ अधिकाऱ्याने २ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना शिरपूर तालुक्यातील जवखेडा येथील मंडळ अधिकारी मुकेश श्रीकांत भावसार याला रंगेहाथ पकडण्यात आले. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. शिरपूर तालुक्यातील वरुळ शिवारात असलेल्या शेतजमिनीची वाटणी करण्यावरून तक्रारदार आणि त्याची बहीण यांच्यात वाद होता. त्यांच्यात वाटणी करण्याबाबत शिरपूरच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने आदेश दिला होता. या आदेशाची प्रत जोडून तक्रारदाराने तहसीलदारांकडे मागणी अर्ज सादर केला. संबंधित तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी अर्जावर कार्यवाही करून सातबाऱ्यावर नावनोंदणी करून…
जळगाव : प्रतिनिधी आईने किराणा दुकानावरून साहित्य मागविले असता ते घेण्यासाठी १९ वर्षीय तरुणी गेली असता यावेळी एका दुकानाजवळ ३० वर्षीय इसमाने तरुणीसोबत चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, नशिराबाद या गावात १९ वर्षीय तरुणी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.२ नोव्हेबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तरुणीच्या आईने दुकानातून सामान घेण्यासाठी पाठविले असता. तरुणी दुकानात जात असतांना याच परिसरातील एका ३० वर्षीय व्यक्तीने दुकानाजवळ असतांना तरुणीसोबत चुकीचे वर्तन करीत तिला म्हणाला कि तु मला खूप आवडते यावर तुझे म्हणणे काय ? तर तरुणीने त्याला धक्का देत मी तुझे नाव माझ्या…

