जळगाव : प्रतिनिधी दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करुन ४० हजारांच्या रोकडसह २० हजारांचा सुकामेवा व मसाले चोरुन नेले. ही घटना गुरवारी मध्यरात्रीच्या सुमारास दाणाबाजारात घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश नगरात हरिचंद्र कन्हैयालाल ललवाणी (वय ५४) हे वास्तव्यास असून त्यांचे शहरातील दाणाबाजारात सतगुरु ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. दिवाळी सणामुळे दुकानात सुकामेव्यासह इतर माल भरलेला आहे. दि. ९ रोजी रात्री ललवाणी हे नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेच्या सुमारास ते दुकानावर आले असता, त्यांना दुकानाच्या भिंतीला भगदाड पडलेले दिसून आले. त्यांनी दुकानातील सामानाची पाहणी केली…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील फुले मार्केट परिसरात खरेदीसाठी आलेल्यांच्या पिशवीतून साडेचार हजारांची रोकड लांबवल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. सणानिमित्त खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असल्याने चोरटे देखील सक्रीय झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश कॉलनी परिसरात सुवर्णसिंग भरतसिंग राजपूत (वय ५१) हे वास्तव्यास आहे. दिवाळीची खरेदी करण्यासाठी राजपूत हे शुक्रवारी दुपारच्या सुमारास शहरातील फुले मार्केट परिसरात गेले होते. त्यांनी सोबतच्या कापडी पिशवीत रोख रक्कम ठेवली होती. मार्केटमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी राजपूत यांनी कापडी पिशवीत ठेवलेली साडेचार हजारांची रोकड काढून घेतली. काही वेळानंतर हा प्रकार राजपूत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी…
अमळनेर : प्रतिनिधी भरधाव वेगात चारचाकी पुलाच्या कठड्याला धडकल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास जानवे गावाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गिरणा पंपिंगजवळील रहिवासी भगवान दलपत सपकाळे ( वय ६३) हे विजया भगवान कोळी (५५) आणि कुंतला भगवान कोळी (२४) यांना चारचाकी (एमएच १९ एएक्स ६४५३) वर अमळनेरहून धुळ्याकडे जात होते. वेगाने वाहन चालवल्याने जानवे गावाजवळ हॉटेल फाल्गुनीच्याजवळ पुलाच्या कठड्याला चारचाकी धडकली. त्यानंतर उलटून त्यात भगवान सपकाळे जागीच ठार झाले. विजया आणि कुंतला कोळी दोन्ही गंभीर जखमी झाल्या. परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिकेने त्यांना उपचारासाठी धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात रवाना करण्यात आले. घटनेचे वृत्त…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यापासून अनेक महत्वपूर्ण घडामोडी घडत असतांना कल्याण-डोंबिवली महापालिका २०१० च्या निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते राज ठाकरे यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने राज ठाकरे यांच्याविरोधात १३ वर्षांपूर्वी दाखल केलेला गुन्हा आणि आरोपपत्र शुक्रवारी रद्द केले. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत पोलीस उपायुक्तांनी बजावलेल्या तडिपारीच्या नोटिशीचे पालन न केल्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी राज ठाकरे यांना २९ सप्टेंबर २०१० रोजी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत रात्री १० नंतर न राहण्याची नोटीस बजावली होती. मात्र, राज ठाकरे यांनी ती…
नाशिक : वृत्तसंस्था शहरात वेगवेगळ्या भागात झालेल्या कार अपघातांत तीन दुचाकीस्वार ठार झाले. या अपघातात एक जण जखमी झाला असून, याप्रकरणी म्हसरूळ, अंबड आणि सातपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील परशराम सीताराम शेखरे (वय ३४, रा. कोकणगाव बु., ता. दिंडोरी) हे सोमवारी (दि. ६) रात्री आपल्या दुचाकीवर दिंडोरी रोडने प्रवास करत असताना हा अपघात झाला. करी लिव्हज हॉटेल समोरून ते प्रवास करीत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या विंगर कारने दुचाकीस धडक दिली. या अपघातात शेखरे यांचा मृत्यू झाला. याबाबत हवालदार हिरामण दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक राकेश पाटील (रा. विजयनगर, सिडको) याच्याविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसोली गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एमआयडीसीतील महावीर कंपनीजवळून अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता घडली आहे. याबाबत गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरसोली येथे १७ वर्षीय मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान, २९ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी परिसरातील महावीर कंपनीजवळ सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र तिच्या बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर…
भुसावळ : प्रतिनिधी शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे चारचाकी वाहनात आलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकासह दोघांना गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतुसांसह अटक केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. रेल्वे स्थानकाच्या केला सायडींगजवळ ही कारवाई गुरुवारी पावणेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. योगेश महेश वंजारे (बौद्ध विहार, खडका, ता. भुसावळ) व विशाल भीमराव साळुंखे (वीटभट्टी ताजी, धुळे, ह.मु. खड़का सबस्टेशनजवळ, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर झायलो मालक विलास सपकाळे (शांती नगर, भुसावळ) हे पसार आहेत.तिन्ही संशयितांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहराचे निरीक्षक गजानन पडघण यांना गावठी पिस्टलासह संशयित येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कारवाईचे निर्देश…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सोशल मिडीयावर गेल्या काही दिवसापासून अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मेट्रोत पुरुषांच्या जोरदार हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसते की, एक तरुण आणि एका वयोवृद्ध प्रवाशांमध्ये वाद होत आहे. यामध्ये नुसता वाद होत नसून चक्क लाथाबुक्क्यांनी हाणामारी होत आहे. सुरुवातीस क्षुल्लक वाटणारा हा वाद काही क्षणात हाणामारीत रुपांतरित होईल असे कुणालाही वाटले नव्हते. https://twitter.com/gharkekalesh/status/1722576626888954150?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1722576626888954150%7Ctwgr%5E334fb080bd36862b3355b2c7c5613d3b9bec32ad%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fviral-videos%2Ftwo-man-fighting-in-delhi-metro-viral-video-tsp2000 वयस्कर व्यक्तीने तरुणाला लाथेने मारलं, ज्यामुळे तरुण खाली पडतो.तरुण खाली पडतो तेव्हा मेट्रोत बाजूला असलेला एक व्यक्ती वृ्द्ध व्यक्तीचे केस खेचतो. मात्र वाद वाढत आहे हे लक्षात…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अजित पवार यांच्या गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वात पक्ष संघटनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संजय पवार म्हणले की, आगामी होणाऱ्या निवडणुका संदर्भात धरणगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, काही अडचणी असतील तर माझ्याशी संपर्क साधून त्या तातडीने सोडाव्यात असे देखील त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. शिवसेनाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील उभी फूट पडल्याने शरद पवार आणि अजित पवार यांचा गट तयार झाला आहे. आगामी काळात पक्ष संघटना नगरपालिका, जिल्हा परिषद गट , पंचायत समिती गण गावापातडीवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक महामार्गावर अनेक अपघात होत असतात काही दिवसानंतर याची चौकशी देखील थांबत असते पण गेल्या आठ वर्षांपूर्वी गुरुग्रामच्या सेक्टर 57 जवळील रेल्वे विहार जवळ दहावीचा विद्यार्थी अमित चौधरी याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. आपल्या काकांसोबत घरी चाललेल्या अमित याला एका अज्ञात वाहनचालकाने जोरदार ठक्कर मारली होती. रुग्णालयात त्याला नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 279 ( बेपर्वाईने गाडी चालविणे ), 304 अ ( सदोष मनुष्यवध ) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. परंतू चालकाची ओळख न पटल्याने पोलिसांनी फाईल बंद केली. अमितचे वडील जितेंद्र यांनी पोलिसांच्या पायऱ्या झिझवल्या परंतू त्यांना…

