अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक कारागृहातून कैदी फरार होत असल्याच्या घटना आता काही नवीन राहिलेल्या नाही. अशीच एक घटना संगमनेर येथील शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहातून चार कैद्यांनी पलायन केल्याचे उघड झाले आहे. गंभीर गुन्ह्यांप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या या आरोपींनी जेलचे गज तोडले आणि ते फरार झाले. बुधवारी पहाटे पाच वाजता घडलेल्या या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील जेलमध्ये या चार कैद्यांना इतरांसोबत ठेवण्यात आले होते. त्या कारागृहामध्ये मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तास होते. राहुल देविदास काळे, रमेश थापा अनिल छबू ढोले आणि मच्छिंद्र…
Author: editor desk
मालेगाव : वृत्तसंस्था मालेगाव जवळील वाशीम येथे तुरीच्या शेतात काम करताना शेतकऱ्याचा रोटावेटरमध्ये अडकून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज ८ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. राजेश भिमराव सौभागे (३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सौभागे कुटुंबीय ज्ञानेश्वर वाढणकर यांच्या मालेगाव शेतशिवारातील शेत मक्त्याने करतात. दरम्यान, या शेतातील तुरीमध्ये रोटावेटर फिरविण्यासाठी त्यांनी एम. एच. ३७ एडी – ४९९८ या क्रमांकाचे ट्रॅक्टर बोलाविले. यावेळी चालक अंकुश चवरे हा ट्रॅक्टर चालवित असताना राजेश हा ट्रॅक्टरवर बसलेला होता. अचानक त्याचा तोल जाऊन राजेश ट्रॅक्टरवरून कोसळून रोटावेटरमध्ये अडकला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रॅक्टर चालक अंकुश हा घटनास्थळावरून पळून गेला. अशा…
जळगाव : प्रतिनिधी पार्ट टाइम जॉब देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी टास्क पूर्ण करा, असे सांगत प्रियंका प्रवीण जैन (३२, रा. भुसावळ) यांची पाच लाख ८९ हजार ७९४ रुपयांची फसवणूक करण्यात आली. यात नोकरी तर मिळाली नाही, शिवाय हातची रक्कमही गेली. याप्रकरणी निधी व अमित असे नाव सांगणाऱ्या दोघांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील गृहिणी असलेल्या प्रियंका जैन यांच्याशी १९ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान वेळोवेळी निधी व अमित, अशी नावे सांगणाऱ्या दोघांनी संपर्क साधत त्यांना पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखविले. त्यासाठी एक टास्क दिला व तो पूर्ण होण्यासाठी खाते रिचार्जच्या नावाने वेळोवेळी रक्कम…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून लाचखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. यात महसूलसह पोलीस विभागात मोठय संख्येने कारवाई होत आहे. अशीच एक कारवाई जळगाव शहरात देखील झाली आहे. जळगाव जिल्हा कारागृहातील कैदी मुलाला भेटण्यासाठी आलेल्या आईकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना सुभेदार भीमा उखई भिल, पोलिस कर्मचारी पूजा सोपान सोनवणे व हेमलता गयबू पाटील हे धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात दि. ८ नोव्हेबर रोजी अडकले. यातील हेमलता पाटील यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर रोजी तक्रारदार महिला मुलाला भेटण्यासाठी जिल्हा कारागृहाजवळ आल्या होत्या. त्यावेळी ड्युटीवर असलेले सुभेदार भीमा भिल, पूजा सोनवणे, हेमलता पाटील…
जळगाव : प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने जिल्ह्यात संयुक्तपणे हातभट्टी दारू निर्मूलन मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत ७ नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात १०६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात १०० आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातून २७ लाख ५५ हजार ५५५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम राजकुमार, विभागीय उपायुक्त बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हातभट्टी निर्मिती व वाहतूक करणाऱ्या विरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक व्ही.टी.भुकन नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पथके, नाशिक विभागीय भरारी पथक (कळवण), तसेच जळगाव पोलीस विभागांच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई…
यावल : प्रतिनिधी गर्भवती महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यातील मनवेल या गावात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील मनवेल येथे शितल उर्फ रूपाली विजय कोळी (वय-२२) हि महिला आपल्या परिवारासोबत वास्तव्याला होत्या. दि.७ रोजी मंगळवारी घरात कुणीही नसतांना तिने राहत्या घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. पती विजय कोळी हे घरी आले तेव्हा हा प्रकार लक्षात आला. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. या घटनेची खबर मयताचे सासरे भगवान दौलत कोळी वय५७ वर्ष यांनी यावल पोलीस ठाण्यात दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून व्यावसायिक व घरगुती सिलिंडरच्या भावात मोठी वाढ होत असतांना आता केंद्र सरकार पुन्हा एकदा घरगुती सिलिंडरच्या किमती कमी करणार आहे. पुढच्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये भारतात लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. यासाठी केंद्र सरकारने LPG ग्राहकांना मोठा दिलासा देऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मिंटमध्ये प्रसिद्ध प्रकाशित झालेल्या बातमीनुसार सरकार गॅस सिलिंडरवरील सबसिडी वाढवण्याचा विचार करत आहे. सरकारने पंतप्रधान उज्जवला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरच्या अनुदानात वाढ जाहीर करणे अपेक्षित आहे. या योजनेच्या रकमेत वाढ झाल्याने करोडो गॅस ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. उज्जवल योजनेचा लाभ जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी ग्राहक संख्या वाढवण्यावरही सरकार भर देत…
बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील कडा तलावातील झुडपात आठ महिन्यांपूर्वी (६ एप्रिल) मच्छिमारांना पुरुष जातीचा सांगाडा आढळून आला होता. पोलिसांनी वर्षभर तपास करत या प्रकरणाचा छडा लावला. तपासाअंती दोन मित्रांच्या मदतीने मुलाने बापाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तलावात फेकून दिल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणातील आरोपींवर अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथील तलावात मच्छिमारांना ६ एप्रिल रोजी सकाळी बेशरमाच्या डादपातसांगाडा आढळून आला होता… पोलिसांनी पंचनामा केला असता ५५ ते ६० वर्षीय पुरुष जातीचा मृतदेह असल्याचे आढळून आले. नोव्हेंबर– डिसेंबर २०२२ या काळात लक्ष्मण सदाशिव शेंडे यांचा खून झाल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात आगीची घटना घडत असतांना भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील पारसनाथ कंपाउंड येथील पहिल्या मजल्यावरील टेक्सराईज कापसापासून उशा बनवणाऱ्या शेजल एंटरप्रायझेस कारखान्यात मंगळवारी सायंकाळी उशिरा शॉर्टसर्किटने आग लागण्याची दुर्घटना घडली. आगीत कारखान्यात काम करणारी महिला व तिच्यासोबत आलेला तीनवर्षीय चिमुकला यांचा होरपळून मृत्यू झाला. शकुंतला रवी राजभर (वय ३५) व प्रिन्स राजभर (३) असे मृत्यू झालेल्या मायलेकांची नावे आहेत. कारखान्यात शॉर्टसर्किटने आग लागली. आगीची माहिती मिळताच कंपनीत काम करणारे महिला व पुरुष कामगार बाहेर पळाले त्यामध्ये शकुंतला हीसुद्धा होती; परंतु ती बाहेर पडल्यावर तिच्यासोबत आलेला तीन वर्षांचा प्रिन्स मुलगा आतमध्ये राहिल्याचे लक्षात आल्यावर शकुंतलादेवी पुन्हा आतमध्ये…
नाशिक : वृत्तसंस्था शेवगाव तालुक्यातील मळेगाव येथे एसटी न बसच्या चाकाखाली सापडून एका ९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि.७) सकाळी न पावणेदहाच्या सुमारास घडला. मळेगाव येथील शेवगाव-नगर रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या वनवे कुटुंबातील श्लोक गणेश वनवे (वय ९) हा घराकडून मळेगावकडे सायकलवर जात असताना म्हस्के यांच्या वीटभट्टीसमोर त्याच्यासमोरून रिक्षा जात होती, रिक्षाला ओव्हरटेक ” करून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक समोरून राहुरीच्या दिशेने जाणाऱ्या (क्र. एमएच ४० वाय ५४२८) या शेवगाव- राहुरी बसच्या चालकाला अंदाज न आल्याने श्लोकची सायकल बसच्या पुढील चाकाला धडकून तो फेकला जाऊन तो बसच्या उजव्या बाजूच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला. अपघतानंतर…

