मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना एक भीषण अपघाताची घटना मुंबई शहरातील वरळी सी लिंकवरील टोल नाक्यावर एक भीषण अपघात गुरुवारी घडल्याचे समोर आले आहे. टोल नाक्यावर उभ्या असलेल्या सहा ते सात वाहनांना भरधाव कारने मागून येत जोरदार धडक दिली आहे. हि घटना रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या भीषण अपघाताचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, वरळीहून वांद्र्याच्या दिशेने भरधाव वेगात आलेली एक इनोव्हा…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी राज्यातील शिंदे, फडणवीस व पवार सरकारने गेल्या काही दिवसाआधी राज्यातील ४० तालुक्यांना दुष्काळ जाहीर केला आहे पण राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतकरी यावर आक्रमक होत आता आंदोलने सुरु झाली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात देखील राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या सुचनेनुसार धरणगाव तालुका दुष्काळ जाहीर करावा तसेच आणेवारी ५० पैशाच्यां आत लावावी व गिरणा धरण चे दोन आवर्तन रब्बी हंगामासाठी सोडावे या मागणीसाठी तहसीलदार धरणगाव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी धनराज माळी तालुकाध्यक्ष व दीपक वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच मोहन नाना जेष्ठ नेते, रविदादा पाटील मार्केट कमिटी संचालक धरणगाव, अरविंद देवरे कार्याध्यक्ष, दिलीप…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विनापरवाना अवैध लाकडांची वाहतूक सुरु असताना पोलिसांनी एका संशयित आरोपीवर कारवाई करीत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमी मिळाली होती. दि. ८ नोव्हेंबर रोजी टाटा कंपनीचा छोटा हत्ती वाहन (क्रमांक एमएच १५ डीके ३५६) या वाहनामध्ये अवैध लाकडाची वाहतुक होत आहे. बातमीनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता नेरी नाका, पांचाळ गल्ली समोर रोडवर जळगाव टाटा कंपनीचा छोटा हत्ती वाहन मिळुन आले होते. त्यामधे निंब जातीच्या झाडाचे ओले लाकुड मिळाले होते. वाहनावर असलेला चालक सैय्यद मुस्तकिन सैय्यद मुनाफ (वय २५ वर्ष रा.…
जळगाव : प्रतिनिधी मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध पकड वॉरंट मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी बकालेला गुरुवारी बजावले आहे. तपासधिकाऱ्यांनी न्यायायालकडे बकाले याला फरार घोषीत करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बकाले याला कोणत्याही क्षणी अटक होवू शकते. मुख्यन्याय दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या पकड़ ऑर्डरला स्थगिती मिळावी यासाठी बकाले याने मुख्यन्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दि. ७ नोव्हेंबर रोजी पत्र दाखल केले होते. त्याला स्थगिती मिळावी बकाले याने न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने तपासधिकाऱ्यांचा खुलासा मागविला होता. परंतु यावर हरकत घेतली जाईल म्हणून बकाले याने दुसऱ्या दिवशी न्यायायालयात सादर केलेला अर्ज वकीलांमार्फत मागे घेतला. या संपूर्ण बाबीची माहिती मिळाल्यानंतर…
पारोळा : प्रतिनिधी एका ४३ वर्षीय प्रौढाचा दि.७ रोजी पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हि घटना पारोळा तालुक्यातील वसंतनगर येथील इंदाशी धरणात घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील वसंतनगर येथील अशोक जाधव (वय ४५) रा वसंतनगर हे दि.७ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतात कामासाठी चाललो असे सांगून गेले होते. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत घरी न आल्याने गावातील मंडळी व परिवाराचे सदस्यांनी सर्वत्र शोधाशोध करूनही आढळून आले नाही. मात्र आज दि.९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पिंपळकोठा शिवारात असलेल्या इंदाशी धरणात त्यांचा मृत्यू देह पाण्यात तरंगताना आढळून आला,…
जळगाव : प्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणूकीत पराभव झाल्याच्या रागातून विनोद रघूनाथ सुर्यवंशी यांनी महिलेला अश्लिल शिवीगाळ केली. ही घटना दि. ८ रोजी सकाळच्या सुमारास जळगाव तालुक्यातील अमोदा गावात घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील अमोदा गावात कल्पनाबाई सुभाष सुर्यवंशी या वात्तस्तव्यास आहेत. त्यांच्या गावात राहणारे विनोद सुर्यवंशी हे ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती. परंतु निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने दि. ८ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ते कल्पनाबाई यांच्या घराजवळ आले. त्यांनी त्यांना माझा ग्रामपंचायत निवडणूकीत तुझ्यामुळे पराभव झालेला आहे. त्यामुळे त्यांनी महिलेला अश्लिल शिवीगाळ केली. तसेच मी तुला जिवंत सोडणार नाही आणि तुझ्या नवऱ्याचा घात…
जामनेर :प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्ह्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले असून जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात पहूर पेठ येथील नवनिर्वाचित सरपंच अब्बू तडवी व अन्न महामंडळ सदस्य रामेश्वर पाटील आदी पदाधिकारी यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता पहूर ता.जामनेर येथे घडली. या थरार घटनेत १०ते १२ जण बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर महामार्गाच्या बाजूला असलेल्या पाटील यांच्या निवासस्थानासमोर अब्बू तडवी व रामेश्वर पाटील हे चर्चा करीत होते. त्याचवेळी एम.एच. १८ बी.जी. ४१४२ क्रमांकाचा मालवाहतूक ट्रक भरधाव वेगाने पदाधिकाऱ्यांच्या दिशेने आला. ट्रकचा वेग संशयास्पद वाटल्याने पाटील यांनी तडवी यांना ढकलत आरडाओरड केली. त्यामुळे उपसरपंच…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक जिल्ह्यात धक्कादायक घटना घडत आहे. यात अनेक महिलासह तरुणाचे मृतदेह आढळल्याच्या देखील घटना घडत असतांना अशीच एक बातमी दिल्लीतील एका हॉटेलमधून समोर आली आहे. एका हॉटेलच्या रुममध्ये विवाहित महिलेसह तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली होती. दोघांनी आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना होता. दरम्यान, पोलिसांनी तातडीने या प्रकरणात तपासाची चक्रे फिरवली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर समोर जी माहिती आली, ती ऐकून पोलिसही चक्रावून गेले. सोहराब (वय 28 वर्ष) आणि आयशा असं मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन मुलांची आई असलेल्या मृत आयशाचे मेरठ येथील रहिवासी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्याच्या तरूणाईला सोशल मीडियावरील वेगवेगळे प्लॅटफॉर्म असतील. तसंच रिल्स बनवण्याच मोठ्या प्रमाणात वेड लागले आहे. पण अशातच काहीनां आपल्या जीवाला मूकावे लागते. तरी या गोष्टीतून धडा न घेता स्टंट करण्याचे तरुण तसेच तरुणी थांबत नाही. अशी एक घटना आगऱ्यातील लखनऊमध्ये घडली आहे. आगऱ्यामधील लखनऊ एक्सप्रेस हायवेवर काही तरुण स्वत:चा जीव धोक्यात टाकून रील्स बनवत होते. याबद्दलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तरुणांविरोद्धात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि.८ बुधवारी रोजी ही घटना सोशल मीडियावरील इन्टांग्रामवरुन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. व्हायरल व्हिडीओत आपल्याला दिसत आहे की, लखनऊमधील एका मोठ्या हायवेवर काही…
बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यातील समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापडा बनला असून नेहमीच या महामार्गावर अपघात होत आहे. तर नुकतेच समृद्धी महामार्गावर मेहकरनजिक खाजगी लक्झरी बस आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला आहे. खाजगी लक्झरी बसचा रस्त्याच्या कडेला उभी असताना मागून येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून नागपूरच्या दिशेने गणराज ट्रॅव्हल्सची बस जात होती. सकाळी 5.45 वाजेच्या सुमारास मेहेकरनजिक बसच्या टायरची हवा चेक करण्यासाठी खाली उतरला होता. दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने बसला जोरदार धडक दिली. यात बस चालक जागीच ठार झाला. तर बस मधीलच एका प्रवाशाचा मृत्यू झाला. बसमध्ये एकूण 37 प्रवाशी…

