जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात दिवाळी सणाचा सर्वत्र उत्साह सुरू असताना दुसरीकडे मात्र जळगाव एसीबीने कारवाईचे फटाके फोडत जळगावातील सहाय्यक गटविकास अधिकार्यासह विस्तार अधिकार्याला पाच लाखांची लाच घेताना अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. मंगळवारी पाडव्याची शासकीय सुटी असताना लाचखोर महाभाग पंचायत समिती कार्यालयात आले व लाच स्वीकारताच एसीबीने काम फत्ते केले. विस्तार अधिकारी तथा सध्या पदभार सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र शालिग्राम सपकाळे (54) व विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे (53) अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील 38 वर्षीय तक्रारदार हे लोकसेवक आहेत. त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशी समितीमध्ये आरोपी तथा प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र शालिग्राम सपकाळे…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था नेहमीच अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतांना नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला प्रवासी लोकलने उतरून आपल्या घरी जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. टिटवाळा रेल्वे स्थानकालगत असलेल्या अरुणा शेजारील झुडपात हा प्रकार घडला. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी नराधम निशांत चव्हाण याला अटक केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे सोमवारी संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पीडित महिला शहाड रेल्वे स्थानकावरून लोकलने टिटवाळा रेल्वे स्थानकात आली. पीडित महिला शहाड येथे एका खाजगी कंपनीत काम करते. टिटवाळा रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर ही पीडित महिला शेजारीच असलेल्या…
पुणे : वृत्तसंस्था राज्यभरातील अनेक ठिकाणी छोट्या मोठय कारणावरून नेहमीच वाद निर्माण होत असतो पण तो वाद टोकाला कधी जाईल हे मात्र सांगता येत नसते. अशीच एक घटना धक्कादायक घटना पुण्यातील वडगाव शेरी परिसरात घडली आहे. दुकानदाराला मला उधारीवर सामान देऊ नको असे का सांगितले, याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून बिल्डिंगच्या टेरेसवरुन ढकलून देत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून हा प्रकार सोमवारी दि.१३ रात्री बाराच्या सुमारास वडगाव शेरी येथील संजय गांधी सोसायटीमध्ये घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथील बैजु लक्ष्मी मंडल (वय-३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील पद्मालय रेस्ट हाऊसजवळ एका व्यक्तीला काहीही कारण नसताना एकाने लोखंडी आसारीने मारहाण करीत जखमी केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरापासून जवळ असलेल्या कुसुंबा येथील नंदकिशोर उत्तम पाटील (वय ५०) हे आपल्या परिवारासह वास्तव्य असून बिगारीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. दि. सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता नंदकिशोर पाटील हे बिगारी काम करण्यासाठी ठेकेदारासह पद्मालय रेस्ट हाऊस येथे जमा झाले होते. दरम्यान पद्मालय रेस्ट हाऊसच्या गेट समोर बसलेले असताना पंकज नथू पवार यांच्या चहाच्या टपरीजवळ पप्पू नावाच्या व्यक्तीने शिवीगाळ केली. त्यामुळे नंदकिशोर पाटील यांनी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना उत्तरप्रदेशात एक भयानक घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या कारने ट्रकला जोरदार धडक दिल्याने या अपघातात ६ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुझफ्फरनगर परिसरात घडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात इतका भीषण होता, की सहाही तरुणांचे मृतदेह कारमध्ये अडकून पडले होते. अथक प्रयत्नानंतर कटरच्या सहाय्याने कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ऐन दिवाळीत ६ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. शिवम त्यागी, परश शर्मा,…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील पवन नगरातील २४ वर्षीय तरुण रेल्वे रुळ ओलांडतांना रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी रात्री २ वाजेपुर्वी घडली. या अपघातात दीपक सुकलाल सोनवणे (वय २४) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पवन नगरात दीपक सोनवणे हा कुटुंबियांसोबत वास्तव्याला होता. कटलरी व मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. रविवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता दिपक सोनवणे हा कामाच्या निमित्ताने घरातून बाहेर गेला होता. त्यानंतर रात्रीच्या सुमारास खांबा क्रमांक ४२० च्या २६ ते २८ च्या सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या…
अमळनेर : प्रतिनिधी राज्यभर दिवाळी सण मोठय उत्साहात साजरा होत असतांना अमळनेर तालुक्यातील एक गावात मात्र याच दिवशी एक दुर्देवी घटना घडली आहे. शौचालयाच्या टाकीत पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुदैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पडली आहे. अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथे सोमवार दि. १२ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घटना घडली आहे. यात भूषण दिलीप सोनवणे (वय-२) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथील अशोक सोनवणे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने त्याठिकाणी शौचालयासाठी लागणारी टाकीचे बांधकाम करण्यात आले असून ही टाकी पुर्णपणे पाण्याने भरलेली होती. या टाकीजवळ…
जळगाव : प्रतिनिधी एरंडोल शहरातील रहिवासी असलेल्या ९ वर्षीय बालकाचा छातीत आसारी घुसून धक्कादायक मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि.१३ रोजी संध्याकाळी उघडकीस आली आहे. शहरातील हिमालय पेट्रोलपंपमागील परिसरात नगरपालिकेच्या एका बांधकामाच्या ठिकाणी खेळत हि घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल शहरातील हिमालय पेट्रोल पंपामागील रहिवासी विशाल रविंद्र गायकवाड (वय ९) असे मयत बालकाचे नाव असून तो आई, वडील, लहान भाऊ- बहीण यांच्यासह राहतो. हातमजुरी करून त्याचा परिवार उदरनिर्वाह करतात. एरंडोल नगरपालिकेचे हिमालय पेट्रोलपंपामागे गटारीचे ढापे टाकायचे काम सुरु आहे. तेथे काही आसाऱ्या उघड्यावर धोकादायक स्थितीत ठेवलेल्या होत्या. सोमवारी विशाल त्याच्या मित्रांसह तेथे खेळत असताना अचानक तो पडला आणि एक आसारी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, AIIMS ने वैद्यकीय अधिकारी पदाची भरती जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही नोकरी मिळविण्यासाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही, तर पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. AIIMS भोपाळमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांवर कंत्राटी पद्धतीने भरती केली जात आहे. हा करार आणखी 6 महिने किंवा एक वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो. या भरतीअंतर्गत एकूण 4 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 1 पद अनारक्षित आहे. प्रत्येकी एक पद SC, ST, OBC आणि EWS साठी राखीव आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे MBBS पदवी असणे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभर दिवाळीची धामधूम सुरु असतांना गुन्हेगारी घटना घडत उघडकीस येत आहे. अशाच एका घटनेने कर्नाटकमध्ये खळबळ माजली आहे. कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यात आई आणि ३ मुलांसह एकाच घरातील चौघांची हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात एका महिलेची आणि तिच्या तीन मुलांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडालीय. रविवारी १३ नोव्हेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली. मारेकऱ्याने आधी महिला आणि तिच्या दोन मोठ्या मुलांची हत्या केली. तेवढ्यात महिलेचा 12 वर्षांचा धाकटा मुलगा आत आला. मारेकऱ्याने त्याला पाहताच त्याच्यावर हल्ला करून निष्पाप बालकाचाही चाकूने वार करून खून केला. मृताच्या…

