मुंबई : वृत्तसंस्था गेल्या चार दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान अवकाळी पाऊस सुरू असून शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. खरीप हंगामातील पिकांसह फळबागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होणार? असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता आहे. हवामान विभागाने पुण्यासह नाशिक, अहमदनदर, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. यासोबतच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती,…
Author: editor desk
अमरावती : वृत्तसंस्था भरदिवसा सुवर्ण व्यावसायिक असलेल्या इसमाच्या घरात घुसून त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे घडली आहे. घरातून तब्बल ७४ लाख रुपयांचे दागिने घेऊन चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले आहे. या घटनेचा पोलीस तपस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे भरदिवसा संजय मांडळे (वय ५४) हे आपल्या राहत्या घरी असतांना घरी कोणी नसतांना अज्ञात चोरट्याने घरात शिरून धारधार शस्त्राने मांडळे यांच्यावर वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घरातून ७४ लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन पंचनामा केला. सुवर्णकाराच्या घरात घुसून त्याची निर्घृणपणे हत्या करून अज्ञात आरोपिंनी सोने,…
सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना घडत असतांना सोलापूर जिल्ह्यातील एका तालुक्यात अंगाचा थरकाप उडवणारी घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. एका शिक्षकाने आपल्या पत्नीचा गळा चिरून खून त्यानंतर पोटच्या ५ वर्षीय मुलाची देखील हत्या केली असून शिक्षकाने स्वत:ला देखील संपविल्याची थरारक घटना बार्शी तालुक्यात उघडकीस आली आहे. यात अतुल मुंढे असं मृत शिक्षकाचं नाव असून तृप्ती मुंढे आणि ओम मुंढे अशी हत्या झालेल्या माय-लेकांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच बार्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत अतुल मुंढे हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. अतुल यांच्या पत्नी तृप्ती…
जळगाव : प्रतिनिधी राज्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून शेतातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना आज दिले. राज्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास यामुळे हिराविला आहे. या अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत व्हावी यासाठी राज्य शासनातर्फे शासकीय यंत्रणा तत्काळ रावळण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात ही…
मुंबई : वृत्तसंस्था प्रेम प्रकरणातील तणावातून तरुणीने बेडशीटच्या मदतीने गळफास घेत मुंबईत नौदलात अग्निवीरचे प्रशिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यात अपर्णा असं या मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी मालवणी पोलिस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंध सुरळीत होत नसल्याने तरुणी बऱ्याच दिवसांपासून तणावाखाली होती. या त्रासाला कंटाळून तरुणीने बेडशीटच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तरुणीचं नुकतच अग्रिवीर योजनेंतर्गत निवड झाली होती. तरुणी ‘आयएनएस हमला’वर प्रशिक्षणासाठी आली असताना ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच नौदलाच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. प्राथमिक…
इंदूर : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात गुन्हेगारी वाढत आहे, तर शाळकरी मुलांमध्ये देखील अशीच गुन्हेगारी चव्हाट्यावर येत असतांना मध्यप्रदेशातील इंदूर येथील एका खासगी शाळेत झालेल्या भांडणात चौथीच्या एका विद्यार्थ्याच्या पायावर त्याच्या तीन वर्गमित्रांनी अभ्यासात वापरल्या जाणाऱ्या कर्कटकने १०८ वेळा वार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची दखल घेत बाल कल्याण समितीने सोमवारी पोलिसांकडून तपास अहवाल मागवला. हे प्रकरण धक्कादायक आहे. इतक्या लहान वयातील मुलांच्या या हिंसक वर्तनाचे कारण काय आहे हे शोधण्यासाठी आम्ही तपास अहवाल मागितला आहे. मुले हिंसक दृश्यांसह व्हिडीओ गेम खेळतात की नाही याचा शोध घेतला जाईल, असे सीडब्ल्यूसीच्या अध्यक्षा पल्लवी पोरवाल यांनी सांगितले.
जळगाव : प्रतीनिधी भडगाव तालुक्यातील कजगाव येथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कजगाव परिसरात दि. २६ रोजी संध्याकाळी व मध्यरात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतातील अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसासोबतच वादळी वारा देखील असल्यामुळे केळीचे घड जमिनिवर कोसळले असून वेचणीला आलेल्या कापसाचे देखील आतोनात नुकसान झाले आहे. तसेच तूर, मका, ऊस, दादर आदी पिकांसह फळबागांचे ही मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने कजगाव परिसरातील अनेक शिवारात विविध पिकांचे नुकसान झाले आहे. बहुतांश शेतातील पिके आडवी पडली असून शेतातील पिके भूईसपाट झाले आहेत. वेगवेगळ्या संकटांमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता अवकाळी…
जळगाव : प्रतीनिधी शहरातील शिवाजीनगरातील अमनपार्कमध्ये शिवीगाळ करीत असल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार केले. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजी नगरातील अमन पार्कमध्ये रईस शेख रशिद शेख हा तरुण वास्तव्यास असून त्यांच्या शेजारी राहणारे अब्दुल लतीफ शेख व ईस्माईल शेख, खलील शेख, वशीम शेख, नदीम शेख हे राहत असून त्यांनी त्यांच्या घरासमोर मोबाईचे दुकान टाकले आहे. त्याठिकाणी गर्दी होत असल्याने सन २०२१ मध्ये त्यांच्यामध्ये वाद झाले होते. शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास रईस शेख हा घरी जात असतांना त्यांच्या शेजारी राहणारा नदीम…
पारोळा : प्रतिनिधी पारोळा कजगाव रस्त्यावरील डी. बी. पाटील कॉलेजजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास सासूरवाडीला जात असलेल्या तरुणाला भरधाव वाहनाने उडविल्याची घटना घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महेश राजेंद्र जावरे (वय २५, रा. भोंडण) या तरुणाचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. याप्रकरणी पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील भोंडण येथे महेश राजेंद्र जावरे हा तरुण रविवारी सायंकाळी महेश हा दुचाकीवर मेहूटेहू येथे आपल्या सासूरवाडीला जाण्यासाठी निघाला. दरम्यान, पारोळा कजगाव रस्त्यावरील डी. बी. पाटील कॉलेज जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने महेशच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये महेश हा गंभीर झाला होता. नागरिकांच्या मदतीने महेशला रुग्णवाहिका चालक…
धरणगाव : प्रतिनिधी युवतीच्या दुचाकीला बसचा कट लागल्याने बस गावात आल्यानंतर दोघांनी बसचालकास लाथाबुक्क्यांसह चापटांनी बेदम मारहाण केल्याची घटना २७ च्या सायंकाळी नांदेड येथे गावठाण चौकात घडली. दरम्यान, बसचालकाची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावहून नांदेडला सायंकाळी चार वाजता येणारी बस (एमएच-१४/बीटी-३०१९) ही चार वाजेच्या सुमारास नांदेडला आल्यानंतर नारणे गावाकडे जाते. ही बस नारण्याहून नांदेडकडे येत असताना नम्रता महेंद्र पाटील (२०) हिच्या दुचाकीला बसने कट मारला. त्यामुळे दुचाकी घसरली व नम्रता पाटील हिच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. बस गावात आल्यानंतर मुलीच्या नातेवाइकांनी बसचालक तुकाराम आनंदराव रायसिंग (४६, बांभोरी) यांना बेदम मारहाण केलीबसचालक गंभीर अवस्थेतच साडेचार वाजेपासून सायंकाळच्या साडेसहा वाजेपर्यंत बसच्या…

