मुंबई : वृत्तसंस्था मुंबईवरील हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेट वे ऑफ इंडियाजवळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करत असतानाच अचानक पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरु असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी भाषण सुरूच ठेवलं. भर पावसात त्यांनी भाषण करत 26/11 च्या शहिदांना आदरांजली वाहिली आहे. अमृता फडणवीस यांच्या पुढाकाराने ग्लोबल पीस ऑनर्सने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. गेटवे ऑफ इंडिया येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते. यावेळी 26/11तील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचा राज्यात दौरे सुरू असून खानदेश दौऱ्यामध्ये जळगाव शहरात ४ डिसेंबर रोजी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या नियोजनासाठी व तारीख निश्चित करण्यासाठी आज जळगाव जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचा पदाधिकारी यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सभेचे नियोजन करण्यात आले. जळगाव जिल्हा सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या आयोजनाबाबत जळगाव येथे रविवारी सकाळी साडेदहा वाजता पद्मालय रेस्ट हाऊस येथे समाजाची बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीत आयोजन व स्थळाबाबत चर्चा करण्यात आली. सभेची तारीख निश्चित नसल्याने तारीख निश्चित करण्याबाबत…
जळगाव : प्रतिनिधी राज्यभरात अनेक ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असतानाच काही ठिकाणी गारपिटीनेही तडाखा दिला आहे. रविवारच्या तडाख्यानंतर सोमवारी देखील राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या पावसामुळे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक सुधारला असून मुंबईतील प्रदूषण कमी झाले आहे. शिवाय सोमवारी संध्याकाळी मुंबई शहर उपनगरात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. यवतमाळ जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाची रिपरिप सुरूच आहे. हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आहे. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरूच आहे. वाशिम जिल्ह्यात विजांच्या…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तरसोद येथे राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या निधीतून राजपूत समाजाच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते झाले. तरसोद येथे राजपूत समाजाचे सभागृह व्हावे याकरिता समाजबांधवांनी अनेक दिवसांपासून मागणी केली होती. या सभागृहामुळे समाजबांधवांना कार्यक्रम घेणे सोईचे ठरणार आहे. गावात हक्काचे सभागृह होणार असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील होते तर प्रमुख मान्यवर म्हणून तालुकाप्रमुख शिवराज पाटील, उपतालुका प्रमुख जितेंद्र राणे, पंकज पाटील, शांताराम राजपूत, सुदाम राजपूत, प्रविण राजपूत, हिरालाल राजपूत व राजपूत समाजाची सर्व मंडळी व मान्यवर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षभरापासून अभिनेत्री कॅटरिना कैफ वेगवेगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत येत असतात. सध्या ‘टायगर ३’च्या यशाचा आनंद घेत आहे. एक था टायगर आणि टायगर जिंदा है च्या यशानंतर हा तिसरा भागही प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. आतापर्यंत सिनेमाने ४०० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. कॅटरिना कैफच्या जोया या गाजलेल्या भूमिकेचं याही सिनेमातून कौतुक होतंय. सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने कॅटरिनाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये तिने एका भयानक अनुभवाबद्दल सांगितलं आहे. मृत्यूला आपल्या समोर बघणं म्हणजे काय याचा अनुभव अभिनेत्री कॅटरिना कैफला आला. एका मुलाखतीत ती म्हणाली, ‘एकदा मी चॉपरवर होते. अचानक हवेमुळे चॉपर अशांत झाले. तेव्हा मला जाणवलं…
नाशिक : वृत्तसंस्था इंदौर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मनमाडनजीक रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये ६ जण ठार, तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मनमाड-येवला मार्गावर कंटेनर आणि स्वीफ्ट कारची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये स्वीफ्ट गाडीतील मधील नाशिकच्या पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मनमाड-मालेगाव मार्गावर चोंडी घाटाजवळ कंटेनर कारवर उलटून झालेल्या अपघातात कारचालक जागीच ठार झाला असून चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदौर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दोन अपघात झाले. मनमाड-मालेगाव रस्त्यावर चोंडीजवळ कंटेनर (क्रमांक आर. जे. १४ जी.पी. ३४३५) आणि…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील आकाशवाणी चौकासह एमआयडीसी परिसरातून दुचाकी लांबवणाऱ्या राहुल गणेश महाजन (वय-२०) रा. तांबापुरा व सोमनाथ भागवत अहिरे (रा. कुसुंबा) या दोघ चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून दुचाकीच्या दुचाकींसह मोबाईल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रामानंद नगर व एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने केली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आकाशवाणी चौक परिसरात राहणारे भाऊसाहेब दादाजी बागुल हे दि. २३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता ते आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात जवळ दुचाकी (एमएच ४१ आर २३६३) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान चोरून नेलेली दुचाकी ही लाडवंजारी मंगल कार्यालयावरून संशयित राहुल महाजन हा घेऊन…
नंदुरबार : वृत्तसंस्था भरधाव पिकअप वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना नवापूर ते बोकरझर गावादरम्यान घडली. याबाबत पीक चालकाविरुद्ध नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवजान गावित हा त्याची दुचाकीने (क्रमांक एमएच ३९ आर २७१२) नवापूरकडून बोकड़झर गावाकडे जात असताना समोरून आलेल्या पिकअप वाहनाने (क्रमांक एमएच १८ एम ९८२१) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दुचाकीस्वार दिवज्ञान हा फेकला गेल्याने त्याला गंभीर मार लागला त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत सुरेश रुपजी गावित, रा. बोरझर यांनी फिर्याद दिल्याने पिकअप चालक देवीदास पंडित कोठावदे (६१) रा. पिंपळनेर, ता. साक्री याच्याविरुद्ध नवापूर पोलिसात अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची घटना सुरु असतांना एक भीषण अपघाताची घटना पुणे जिल्ह्यातील भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाटात वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाल्याची घटना घडली. हि गाडी घाटातून खाली गेली असती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. यामुळे सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. पुणे जिल्ह्यातील भोरमार्गे महाडच्या दिशेने जात असताना वरंधा घाटातून गाडी जाताना वारवंड गावाच्या हद्दीत रस्त्याचा अंदाज न आल्याने चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेच्या चारित जाऊन पलटी झाल्याने अपघात झाल्याची घटना घडली. या गाडीत काही प्रवाशी होते. या गाडीतले २ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. या दोघांना किरकोळ दुखापत झाली. मात्र यामध्ये चारचाकी गाडीचे मोठं…
जळगाव : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती करताना या देशातल्या प्रत्येक स्त्री, पुरुष आणि निसर्गनिर्मित गोष्टींचा, मुक्या जनावरांचा आणि त्यासोबतच भोगोलिक दृष्टीचा सुद्धा विचार करत देशाला आणि भारतीय जनमानसाला एक गौरवांकित संविधान दिलेले आहे. हे संविधान प्रत्येक भारतीयांचा जीवन जगण्याचा सन्मार्ग असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संविधान जागर समितीतर्फे आयोजित संविधान गौरव दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संविधान जागर समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पालकमंत्र्यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. पालकमंत्री बोलताना पुढे म्हणाले की , सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत भारतीय संविधान…

