जळगाव : प्रतिनिधी महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १४ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस दि. ६ डिसेंबर रोजी आहे. यानिमित्त नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या दरम्यान तीन विशेष गाड्या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दादर ते सेवाग्राम, अजनी, नागपूर या दरम्यान सहा विशेष गाड्या. तर अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या दरम्यान एक विशेष गाडी असेल. क्र. ०१२६२ ही गाडी नागपूर येथून ४ डिसेंबर रोजी ११:५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ३:३० वाजता पोहोचेल. क्र. ०१२६४ ही…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था एका तरुणीच्या प्रियकराने तिची क्रूरपणे हत्या केलीये. हत्या केल्यावर नराधमाने तिच्या शरीराचे तब्बल ३१ तुकडे केले आहेत. हि घटना ओडिसा येथे घडली आहे. या घटनेमुळे आता पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरून गेलाय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, २२ वर्षांची तरुणी बुधवारी आपल्या आईबाबांना सांगून घरातून बाहेर पडली. रात्र झाली तरी मुलगी घरी परतली नाही म्हणून तिच्या कुटुंबियांनी तिची शोधाशोध सुरू केली. मुलीचा काहीच तपास लागत नसल्याने शेवटी त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरंगपूर जिल्ह्यातील जंगलात शोधकार्यात तरुणीचा मृतदेह सापडला आहे. तिच्या मृतदेहाचे ३१ तुकडे करून जमिनीत पुरण्यात आले…
वाशीम : वृत्तसंस्था मुलगी आणि वडिलांचं नातं हे अत्यंत घट्ट आणि जिव्हाळ्याचं नातं असतं. एखादा बाप आपल्या मुलीच्या डोळ्यात कधीच अश्रू बघू शकत नाही. पण लाडेगाव येथील एका बापाने पोटच्या लेकीला संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील लाडेगाव एक धक्कादायक घटना घडलीय. मुलीवर चाकू हल्ला करून तिला गंभीर जखमी केलं आहे. ही घटना लाडेगाव ऑटो पॉईंट चौकात घडलीय. बापाने मुलीला संपवण्याचा प्रयत्न का केला, त्या मागे काय कारण आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, मानोरा तालुक्यात असलेल्या हिवरा येथील १६ वर्षीय मुलगी लाडेगाव ऑटो पॉईंट चौकात उभी होती. ही मुलगी पिप्री मोडक…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील गवळीवाडा परिसरात राहणारा राहुल रामदास गवळी (वय २८) हा तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी नांदगाव ते मनमाड दरम्यान घडली. याप्रकरणी रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शनिपेठ परिसरातील गवळीवाड्यात राहुल गवळी हा तरुण वास्तव्यास होता. हातमजूरी करुन तो कुटुंबाला हातभार लावित होता. शुक्रवारी राहुल हा रेल्वेतून प्रवास करीत असतांना त्याचा तोल जावून तो रेल्वेतून खाली पडला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती स्टेशनप्रबंधक यांनी रेल्वे पोलिसांन दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाची ओळख पटवून मृतदेह जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला.…
बीड : वृत्तसंस्था रस्त्यावर थांबलेल्या एका ओळखीच्या महिलेला दुचाकीवर लिफ्ट दिली. त्यानंतर तिला घरी नेऊन अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या घरच्यांना खोट्या केसमध्ये अडकवून जेलमध्ये टाकेल, अशी धमकी दिली. हा प्रकार बीड शहरात २० नोव्हेंबरला घडला. याप्रकरणी २३ नोव्हेंबरला शिवाजीनगर ठाण्यात आरोपी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस मुख्यालयावर हनुमान श्रीराम कयवाडे हे कर्तव्यावर असून बीड शहरातील पिडीता हि आपल्या मुलीला दिवाळीच्या सुट्टया असल्याने माहेरी गेली होती. २० नोव्हेंबरला सायंकाळी तिच्या भावाने तिला मंजिरी फाटा येथे सोडले. संसारोपयोगी साहित्य खरेदी करायचे असल्याने पीडिता बीडला येत होती. फाट्यावरून रिक्षाने ती बीडला आली. परंतु,…
जळगाव : प्रतिनिधी ग्रामीण भागात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कीर्तनकार मंडळी वारसा जपत आहे. मात्र, ग्रामीण भागात वारकरी साहित्याची उणिव भासत असल्याने वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे आणि वाढला पाहिजे. सांस्कृतिक व धार्मिक परंपरा टिकून ठेवण्यासाठी भजनी साहित्य वाटप केले जात आहे. जीवन सुकर होण्यासाठी वारकरी संप्रदायाचे विचार महत्वाचे असून वारकरी संप्रदायाचा विचार समाजाला तारू शकतो. नुसते वारकरी साहित्य वाटपापुरते नव्हे तर वारकरी संप्रदाय व धर्म कार्यासाठी नेहमीच कटिब्ध्द राहील, अशी ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्र आयोजित पाळधी येथील सुगोकी लॉन्सवर आयोजित भजनी मंडळ साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी मंत्री…
नागपूर : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी शक्तीशाली नेते आहे. मात्र पनोती हा शब्द त्यांनी स्वतःला का लावून घेतला हे समजत नाही. त्यामुळे पनोती शब्द ट्रेडिंग झाला आहे. सर्वसामान्य लोक त्याचा वापर करीत आहे. काँग्रेसने मोदी यांच्याबद्धल हा शब्द वापरला नाही. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनीच तसा समज करून घेतला असेही पटोले म्हणाले. ओबीसी आणि मराठा समाजात राज्य सरकारने भांडण लावले आहे आहे. ते आता टोकाला गेले असून आरक्षणावरून सुरू असलेला धुमाकूळ थांबवण्यात यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. जरांगे आणि भुजबळ काय म्हणतात त्यावर आम्हाला बोलायचे नाही. दोन्ही समाजाला न्याय कसा देता येईल हे सरकारने ठरवावे. दोघांचे भांडण आता…
अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात खुनाच्या घटना घडत असतांना एक थरारक घटना अहमदनगरच्या पारनेर शहरात घडली आहे. घराच्या जागेवरुन झालेल्या वादात अडीच वर्षाच्या चिमुकल्यासह आईची हत्या केल्याची घटना गुरुवारी संध्यकाळी अहमदनगरच्या पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये घडली आहे. यातील आरोपींविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून आरोपी मात्र फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पारनेर परिसरात राहणाऱ्या श्रीमंदिलकर आणि येणारे कुटुंबियांमध्ये घराच्या जागेवरून वाद सुरु होते. यावरुन दोन्ही कुटुंबियांमध्ये नेहमीच खटके उडत असत. मात्र गुरुवारी या वादाने टोक गाठलं आणि दोन जणांचा जीव यामध्ये गेला आहे. किरण श्रीमंदिलकर आणि येणारे कुटुंबात पुन्हा वाद झाला. यावेळी किरण याने शितल येणारे आणि…
जळगाव : प्रतिनिधी भोपाळ विभागातील बुधनी-बरखेरा स्थानकादरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जात आहे. यासाठी भुसावळ विभागातून जाणाऱ्या २४ गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढील प्रमाणे : क्र. १२१५३ लोकमान्य टिळक टर्मिनस – राणी कमलापती एक्स्प्रेस ७ डिसेंबर रोजी रद्द. क्र. १२१५४ राणी कमलापती-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ८ डिसेंबर रोजी रद्द. क्र. १२७२० हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत तर क्र. १२७१९ जयपूर- हैदराबाद एक्स्प्रेस २९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्र. ११०७९ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस ७ डिसेंबर रोजी तर क्र. ११०८० गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ९ डिसेंबर…
जळगाव : प्रतिनिधी मराठा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले मोकाट फिरत आहे. त्यामुळे दहा दिवसाच्या आत बकालेला तात्काळ अटक करा अन्यथा दि. ४ डिसेंबर पासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमसोर आमरण उपोषण करण्याचा इशारा छत्रपती शिवाजी बिग्रेडने दिला आहे. मराठा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा व उच्च न्यायालयाने त्याला जामीन नाकारला असून पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तो मोकाट फिरत आहे. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असून समाजात असंतोष निर्माण होत आहे. गेल्या वर्षभरापासून बकालेला संरक्षण देणाऱ्या तपास अधिकाऱ्यांना तातडीने निलंबीत करावे. तसेच या गंभीर…

