भुसावळ : प्रतिनिधी शहरातील महामार्गावर कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव कार बल्करला धडकली होती. या अपघातात तिन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. यातील एका जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील पूजा कॉम्प्लेक्स समोरील मार्गावर कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव कार रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बल्करवर आदळल्याने तीन जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना १९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली होती. यातील शहरातील खडका चौफुली भागातील मेहरा मयंक चैनसिंग (वय २४) याचा उपचारादरम्यान २० डिसेंबर रोजी मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दरम्यान, भुसावळातील पूजा कॉम्प्लेक्स समोरील…
Author: editor desk
यावल : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात अपघाताच्या घटना सुरु असतांना नुकतेच यावल तालुक्यातील निमगाव येथे यावल ते भुसावल मार्गावरील पाटील यांच्या शेताजवळ रस्त्यावर उस वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने झालेल्या अपघातात १२ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील निमगाव येथील आनंद रघुनाथ सोनवणे (वय १२) हा २० डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उभा होता. या वेळी यावल येथून भुसावळ मार्गे मुक्ताईनगर येथे उस वाहतूक करणाऱ्या महेंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टर (एमएच- १९, डीएफ- २५३५) जात होते. दरम्यान, निमगाव जवळ नयनसिंग खुबसिंग पाटील यांच्या शेताजवळील रस्त्यावर या ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीच्या चाकाखाली…
मुंबई : वृत्तसंस्था बॉलीवूड क्षेत्रात नेहमीच विविध कारणाने चर्चेत येणारा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान हे मात्र आता जरा वेगळ्या चर्चेत आले आहे. ते नेहमीच सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. गौरी खान हि देखील रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपच्या स्कॅनरखाली येत आहे, ज्याने गुंतवणूकदार आणि बँकांकडून 30 कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घातला आहे. वास्तविक, तुलसियानी ग्रुपने गौरी खानला कंपनीची ब्रँड ऍम्बेसेडर बनवली होती. तुलसियानी ग्रुपवर फसवणूक केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात गौरी खानलाही आरोपी करण्यात आले होते. तुलसियानी ग्रुपने लखनौच्या सुशांत गोल्फ सिटीमध्ये अनेक प्रकल्प विकसित केले आहेत. या प्रकल्पातील फ्लॅट खरेदी करण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांनी पैसे दिले होते. मात्र,…
जळगाव : प्रतिनिधी नाशिक कारागृहात खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला बंदी गुड्डू उर्फ कानशा वहाब शेख (वय २६, रा. तांबापूरा) हा संचित रजेवर आला होता. रजा संपल्यानंतर तो सुरत येथे पळून जात असतांना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता तांबापूरा परिसरातून अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खूनाच्या गुन्ह्यात गुड्डु उर्फ कानशा वहाब शेख याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नाशिक कारागृहात तो शिक्षा भोगत होता. २१ नोव्हेंबर रोजी त्याला २१ दिवसांची संचित रजा मंजूर झाल्यानंतर तो बाहेर आला होता. १३ डिसेंबर रोजी त्याची रजा संपल्यानंतर देखील तो कारागृहात हजर झाला नाही.…
मुंबई : वृत्तसंस्था देशात येत्या काही दिवसावर थर्टी फर्स्टसाठी खास कुरियरने मागवलेल्या विदेशी मद्याचा १ कोटी किंमतीचा साठा राज्य उत्पादन शुल्क, मुंबई शहर भरारी पथक दोन यांनी केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. तसेच तीन आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आला असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले टेम्पो आणि कंटेनर सुद्धा जप्त करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहर भरारी पथक दोनचे निरीक्षक प्रकाश काळे यांच्या नेतृत्वाखाली दाणा आणि वाडीबंदर येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत हरियाणा राज्यात विक्री केल्या जाणाऱ्या विदेशी मद्याच्या ५८० ब्रँड व्हिस्की बॉटल कुरिअरच्या माध्यमातून अवैद्य वाहतूक करून मुंबईत आणण्यात आल्याची…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. चुराचांदपूर जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा दोन विद्यार्थी गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली. यानंतर मणिपूर सरकारने जिल्ह्यात पाच दिवस मोबाइल इंटरनेट बंद केले आहे. याशिवाय, दोन महिन्यांसाठी जिल्ह्यात सभांना बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे, हिंसक चकमकीत अनेक नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान, सीआरपीसीच्या च्या कलम १४४ अंतर्गत निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. मणिपूरमध्ये सोमवारी झालेल्या तुरळक हिंसाचारानंतर चुराचांदपुर जिल्ह्यात दोन महिन्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, लोकांच्या दोन गटांमधील संघर्षामुळे अजूनही शांतता भंग होण्याची शक्यता आहे. सध्या परिस्थिती तणावपूर्ण…
यवतमाळ : वृत्तसंस्था प्रत्येक पती व पत्नीच्या नात्यात विश्वास खूप महत्वाचा असतो. पती-पत्नीचं नातं तर संपूर्णपणे प्रेम आणि विश्वासावर चालतं. मात्र एकाचाही दुसऱ्यावरचा विश्वास कमी झाला तर सगळंच बिघडू शकतं. आणि या नात्यात एकदा संशयाचा किडा घुसला की मग संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. अशाच संशयाचा किडा डोक्यात वळवळवल्याने एका पतीने जे कृत्य केलं त्यामुळे त्याचा संसार तर विखुरलाच पण बाकीच्यांचही आयुष्य नासलं. हि घटना यवतमाळ जिल्ह्यातून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा गावात मंगळवारी रात्री ११ वाजता पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका नराधम पतीने सासरवाडीत पत्नीसह जाऊन चौघांची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. आरोपीने त्याची पत्नी,…
एरंडोल : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात दोन दिवसापासून अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच एरंडोल तालुक्यात देखील एक भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील अंतुर्ली खुर्द शिवारातील आयटीआय कॉलेजजवळ दोन दुचाकींमध्ये समारोसमोर झालेल्या धडकेत दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेत उत्राण व निपाणे येथील तरुणांचा मृत्यू झाला असून यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्राण येथील अमोल मांगीलाल भोई उर्फ गोलू (वय २२) हा मंगळवारी दुचाकी (एमएच – १९, डीई- ४०५८) ने कासोदा येथील बाजारात पेरु विक्रीसाठी गेला होता. बाजारात पेरु विक्री केल्यानंतर अमोल भोई हा दुचाकीने उत्राणकडे परत निघाला. याच वेळी…
चोपडा : प्रतिनिधी जळगाव येथून चोपडा येथे प्रांताधिकारी एकनाथ दत्तात्रय भंगाळे हे त्यांचे खासगी वाहन (एम.एच.२०-एफ.वाय, ०२१६) चालवत असताना रस्त्यात अवैध वाळू नेणारे ट्रॅक्टर रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केला, यावेळी ट्रॅक्टर चालकाने थेट त्यांच्या कारला धडक दिली. या धडकेत प्रांत भंगाळे हे जखमी झाले. ही खळबळजनक घटना दि. १९ दुपारी खडगावजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून बैठक आटोपून दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान प्रांताधिकारी भंगाळे हे पत्नी आणि मुलीसह चोपडा येथे परत येत असताना खडगाव येथे एक ट्रॅक्टर अवैध वाळू नेताना आढळला. त्यांनी खडगाव येथील तलाठी गुलाबसिंग वाहऱ्या पावरा यांना ही माहिती कळविली. यानुसार या ट्रॅक्टरचा तलाठी पावरा यांनी पाठलाग केला.…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील शाळेत गेलेले दोघे भाऊ शाळा सुटल्यानंतर घरी परतलेच नाहीत. या दोघांना अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांत सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. हि घटना दि.१३ डिसेंबर रोजी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुद्र किरण सोनवणे (६) व आर्यन किरण सोनवणे (११) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. किरण भावलाल सोनवणे (मिलिंदनगर, चाळीसगाव) हे दि. १३ रोजी भुसावळ येथे ऊसतोडणीसाठी गेले होते. दोन्ही मुले रुद्र व आर्यन हे सकाळी त्यांच्या धुळे रोडवरील प्राथमिक विद्यालयात गेली होती. सायंकाळी ती घरी आलीच नाहीत,…

