Author: editor desk

ठाणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना संशयाच्या कारणाने होत असतांना एक धक्कादायक घटना ठाणे शहरात घडली आहे. आपल्या पतीला दारूचे व्यसन असल्याने महिलेने दोन्ही मुलांना घेऊन आपल्या दिराकडे राहत होती. या दरम्यान पत्नी व मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या पतीने पत्नीसह तिच्या दोन चिमुकल्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कासारवडवली साईनगरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातील कासारवडवली येथे दि.२१ रोजी सकाळी भावना अमित बागडी तसेच खुशी अमित बागडी (वय ६) आणि अंकुश अमित बागडी (वय ८) अशी मृतांची नावे आहेत. मृत भावना हिचा पती अमित धर्मवीर बागडी यानेच क्रिकेटच्या बॅटने तिघांची हत्या…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या वर्षापासून शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर कारवाई सुरु असतांना आता काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. नागपूरच्या बहुचर्चित जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात कोर्टाने शुक्रवारी केदार यांना ५ वर्षांच्या कारावासाची आणि १२.५० लाख रुपये शिक्षा सुनावली आहे. नागपूर पोलिसांनी विधीमंडळाला केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली असून त्यांची आमदारकी रद्द करण्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. कायद्याने आमदारांना २ वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्यास त्यांची आमदारकी रद्द होते. त्यानुसार, आता केदार यांना दोन वर्षांहून अधिक शिक्षा झाल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते.

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सोन्याच्या किमतीत वाढ होत असतानाच विद्यमान आर्थकस वर्षांमध्ये दागिन्यांची विक्री मूल्याच्या दृष्टीने १० ते १२ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा इक्रा पतमानांकन संस्थेने आपल्या एका अहवालामध्ये व्यक्त केली आहे. देशांतर्गत दागिन्यांच्या विक्रीतील मूल्य वाढीचा अंदाज आधीच्या ८ ते १० टक्क्यांवरून १०-१२ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे हा अंदाज वाढवण्यात आल्याचे इक्राने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत दागिन्यांची विक्री वार्षिक आधारावर १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढण्याची अपेक्षा आहे. अक्षय्य तृतीयेदरम्यान सोन्याची सतत मागणी आणि चढेभाव यामुळे ही वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. परंतु महागाई वाढल्यामुळे ग्रामीण मागणी परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विद्यमान आर्थिक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  यावल येथील भुसावळ मार्गावरील एका शेतातील बांधावर ५० वर्षीय प्रौढ व्यक्ति मृत अवस्थेत मिळाला असून विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा अंदाज असून हे प्रौढ चोपडा तालुक्यातील अडावद येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील अडावद येथील विशाल रमेश मेढे (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, यावल ते भुसावळ मार्गावरील रस्त्यावरील टेलीफोन एक्सचेंजच्या कार्यालयासमोर प्रशांत मुरलीधर महाजन यांच्या शेता (गट क्रमांक ७२४ /२) मध्ये पिकपेरणी केली आहे. डुक्कर व इतर मोकाट गुरांचा त्रास होत असल्याने शेतातील कम्पाउंडला बॅटरीने चालणाऱ्या झटका मशिनची तार लावली आहे. या तारांमध्ये असलेल्या वीज प्रवाहाचा शॉक लागून विशाल मेढे यांचा मृत्यू…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  भुसावळ येथील रेल्वेच्या पीओएच कारखान्यातून आठ लाखांच्या पॉवर केबल चोरीत रेल्वे सुरक्षा बलाच्या हवालदाराचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरपीएफच्या हवालदारासह तिघांना रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटकेतील संशयितांमध्ये सचिन उत्तम तायडे (वय २५, रा. महादेव टेकडी, हनुमान मंदिर, कंडारी, ता. भुसावळ), राहुल रतन मोरे (वय २३, रा. महादेव टेकडी, हनुमान मंदिर कंडारी) व आरपीएफचे हवालदार शशिकांत गणपत सुरवाडे (वय ५७, रा. स्वामी विहार, भुसावळ) यांचा समावेश आहे. दरम्यान, भुसावळातील रेल्वेच्या पीओएच कारखान्यातून ७ लाख ९४ हजार २२७ रुपयांची १ हजार ६०४ किलो पॉवर केबल चोरीला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शेतातील ट्यूबवेल मोटार कनेक्शन देण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना धानोरा येथील वरीष्ठ तंत्रज्ञ अनिल शंकर राठोड (28, लक्ष्मी नगर, धानोरा) यास जळगाव एसीबीने शुक्रवारी लाच स्वीकारताच अटक केली. या कारवाईने वीज कंपनीतील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, देवगाव, ता.चोपडा शिवारात ५० वर्षीय तक्रारदार यांच्या पत्नीचे नावाने गट नंबर 330 मध्ये शेत आहे. या शेतात थ्री फेजचे ट्युबवेल मोटारसाठी यातील तक्रारदार यांनी वीज कनेक्शन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. तक्रारदार अनिल राठोड यांना भेटल्यानंतर 22 रोजी त्यांनी चार हजारांची लाच मागितली व तीन हजारात तडजोड करण्यात आली. शुक्रवारी दुपारी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. अडावद…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे गुरुवारी एसटी बस आणि दुचाकीच्या भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तिघे मृत तरुण धाराशिव जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. हे तरुण गाडी खाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि.२१ डिसेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकींचा बिशन अपघात झाला. या अपघातात कार्तिक यादव, ओंकार पवार, ओम आतकरे या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे तिघेही धाराशिव जिल्ह्यात वास्तव्यास होते. हे तिघे मित्र धाराशिवहून बार्शीकडे निघाले होते. तिन्ही तरुण एसटी बस खाली आल्याने. एका तरुणाचं शीर हे धडापासून वेगळं झालं. तर…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक राज्यात खुनाच्या घटना सातत्याने घडत असताना एक धक्कादायक घटना बिहार राज्यातून समोर आली आहे. शेतातील हरभऱ्याच्या भाजीची पाने तोडल्याच्या रागातून १४ वर्षीय मुलीला काठीने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या बेदम मारहाणीत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चैनपूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या हाता गावातील जितेंद्र राम यांची मुलगी सुंदरी कुमारी (१४) तिच्या चुलत भावासोबत बुधवारी (२० डिसेंबर) शेजारच्या गावातील एका शेतात भाजी काढण्यासाठी गेली होती. यावेळी तिला शेतमालक रामधर…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  बनावट इन्स्टाग्राम खात्यावर पत्नीच्या नावाने चारीत्र्याबद्दल अत्यंत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध झाल्याने व त्याबाबत सातत्याने नागरीकांकडून विचारणा होत असल्याने असह्य झालेल्या पतीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. याप्रकरणी पतीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या अज्ञात इन्स्टाग्राम धारकाविरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावातील विवाहितेच्या नावाने कुणीतरी बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले. त्यावर मला कधीही फोन करा, माझा नंबर … असून या शिवाय अन्य बदनामीकारक मजकूर टाकून तो प्रसिद्ध करण्यात आला. सोशल मिडीयावरील या मजकुराबाबत विवाहितेसह तिच्या पतीला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. सतत नागरीक बदनामीकारक मजकुराबाबत…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  तालुक्यातील बोरअजंटी गावाशेजारी वनविभागाच्या नाक्याजवळ दुचाकीवर तिघेजण गावठी कट्टा सोबत घेऊन चोपडा शहराकडे येत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश मनोहर भोईर (२७, बोरिवली, मुंबई) याच्याकडे २५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आढळला. यात राकेश खजरा मोरे (२१) व मुन्ना वेस्ता मोरे (२०, खोकरी, ता. वरला, जि. बडवानी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून गावठी कट्टा, दुचाकी, मोबाइल, रोख रक्कम, असा एकूण ८६ हजार ४०० रुपयांचा ऐवज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच तिघांनाही अटक करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर आणि सहायक पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शशिकांत…

Read More