जळगाव : प्रतिनिधी प्रा. संदीप दिलीप पाटील यांना विद्यावाचस्पती (Ph.d). झाल्याबद्दल आमदार किशोर भाऊ दराडे यांच्या शुभहस्ते व जुक्टो संघटना व माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला. दिनांक 2 फेब्रुवारी रोजी शिक्षक दरबार कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार किशोर भाऊ दराडे जळगाव येथे आले असता .त्या कार्यक्रमांतर्गत प्रा. संदीप दिलीप पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. यांच्या वतीने विद्यावाचस्पती पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली आहे. प्रा. संदीप पाटील हे किसान कनिष्ठ महाविद्यालयात सेवेत कार्यरत आहेत. त्यांच्या संशोधनाच्या विषय जळगाव “जिल्ह्यातील शिलालेखांच्या चिकित्सक अभ्यास “या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला. त्यांचे मार्गदर्शक म्हणून प्रो. डॉ .सुधाकरराव सु. देशमुख…
Author: editor desk
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकारी गेल्या अनेक दिवसापासून विविध प्रकरणाच्या माध्यमातून अडचणीत येत आहेत. दि.२ फेब्रुवारी रोजी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुख मंगेश करंजकर याने पोलिस कर्मचाऱ्याला पोलिस ठाण्यात श्रीमुखात दिल्याने शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्याप्रकरणी सत्ताधारी शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुख मंगेश सोमनाथ करंजकर याला तपासासाठी पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले होते. मंगेश करंजकर पोलिस ठाण्यात येताच पोलिस कर्मचाऱ्यांना शिव्याशाप करत मला बोलवले कसे, सत्तेत आम्हीच तुमची हिंमत कशी झाली असे म्हणत त्रास दिला तर दंगली घडवून आणेल, असे म्हणत असतानाच फिर्यादी पोलिस…
जामनेर : प्रतिनिधी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पक्षाचे नेते प्रदेश सदस्य बंगालसिंह चितोडिया यांचे अध्यक्षतेखाली जामनेर येथे नुकतीच संपन्न होऊन पक्ष बांधण्यासाठी संपूर्ण तालुक्यात युवा जागर यात्रेचा शुभारंभ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. युवा जागर यात्रा जिल्ह्यासह जामनेर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटामधून तसेच प्रत्येक गावातून जाणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष अरविंदभाऊ चितोडिया यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी अजित दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत व्हावा या उद्देशाने व तालुक्यातील तरुण वर्गाने जास्तीत जास्त संख्येने अजित दादांच्या सोबत यावे. असे आवाहन अरविंद भाऊ चितोडिया यांनी केले. बैठकीत स्थानिक तालुका नेते प्रदेश सदस्य बंगालसिंह चितोडिया,…
जळगाव : प्रतिनिधी बोली भाषांना प्राचीन इतिहास आहे. अनेक बोलीभाषा काळाच्या ओघात लूप्त होत गेल्या. आपल्याला आपली प्राचीन संस्कृती जपायची असल्यास सर्व प्रथम बोली भाषांचे संवर्धन होणे गरजेचे आहे, असा सूर खान्देशी बोलीभाषा (अहिराणी, तावडी, भिल्ली, लेवा गणबोली, गुर्जर) परिसंवादात उमटला. कविवर्य ना.धो.महानोर सभागृह, सभामंडप क्रमांक २ मध्ये पार पडलेल्या खान्देशी बोलीभाषा परिसंवादात डॉ. रमेश सूर्यवंशी (अहिराणी) – कन्नड, अशोक कौतिक कोळी (तावडी) – जामनेर, डॉ. पुष्पा गावीत – (भिल्ली) – धुळे, डॉ. जतीनकुमार मेढे (लेवा गणबोली) भालोद डॉ. सविता पटेल – (गुर्जर) – नंदुरबार यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी डॉ. रमेश सूर्यवंशी होते. सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले. डॉ.सविता पटेल…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सोशल मीडियावर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर ते दुसरे भाजप नेते आहेत, ज्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात येणार आहे. मोदींनी लिहिले की, ‘मला कळवताना अतिशय आनंद होत आहे की लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्यात येणार आहे. मी त्यांच्याशी बोललो आणि अभिनंदन केले. ते आपल्या काळातील सर्वात आदरणीय राजकारणी आहेत. देशाच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान कोणीही विसरू शकत नाही. तळागाळातून कामाला सुरुवात करून त्यांनी देशाच्या उपपंतप्रधानपदापर्यंत मजल मारली. ते देशाचे गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्रीही होते.…
अकोला : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अनेक अपघाताच्या अनेक घटना घडत असतांना एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. लग्नात आलेल्या चारचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एक ठार तर चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा अपघात अकोला जिल्ह्यात झाला आहे. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील माना येथील राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री ट्रक आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला. चारचाकी वाहनात प्रवास करणारी लोक मित्राच्या लग्नाला गुजरातहून वरुडकडे निघाले असताना ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात वाहन चालक धीरज वैराळे (राहणार मलकापूर जिल्हा बुलढाणा) याचा जागीच मृत्यू झाला आहे. या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात भाजपच्या आमदाराने सत्ताधारी शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याची घटना घडल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. आता याच घटनेचा व्हिडीओ व्हायरल होवू लागला आहे. त्यात भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर खुलेआमपणे गोळीबार केल्याचे दिसून येत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गणपत गायकवाड यांनी आपण स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा केला होता. पण या फुटेजमुळे त्यांचा हा दावा निखालस खोटा असल्याचे स्पष्ट होत आहे. गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री उल्हासनगरच्या हिल पोलिस ठाण्यात शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरमी पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्यासह 3 जणांना अटक केली आहे.…
पाचोरा : प्रतिनिधी येथील बसस्थानकातील जळगाव बसमध्ये चढताना एका महिलेच्या गळ्यातील ७ ग्रॅम वजनाची २० हजारांची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली असून या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील सटाणा नाका परिसरातील अयोध्या नगरमधील वैष्णवी ज्ञानेश्वर जाधव (वय २३) या खासगी कामानिमित्त पाचोरा येथे आल्या होत्या. दरम्यान, २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वैष्णवी जाधव या पाचोरा येथून पाथरी या गावी जाण्यासाठी पाचोरा ते जळगाव बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरुन पोबारा केला. काही वेळाने वैष्णवी जाधव यांच्या लक्षात चोरीची घटना येताच त्यांनी तपासले असता…
जळगाव : प्रतिनिधी चोरीच्या दुचाकी घेऊन फिरणाऱ्या धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी गुरुवार १ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सुप्रीम कॉलनी परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैय्याज शकुर मनीयार रा. दोंडाईचा जि. धुळे सुप्रीम कॉलनी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रीम कॉलनी फैय्याज शकुर परिसरात मनीयार हा तरुण चोरीची दुचाकी असल्याची एमआयडीसी घेऊन फिरत गोपनीय माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, त्यानुसार पथकाने गुरुवार १ फेब्रुवारी रोजी दुपारी ४…
पाचोरा : प्रतिनिधी उसनवारीचे पैसे परत केले नाहीत, याचा राग येऊन दोघांनी घरात घुसून महिलेसह तिच्या पतीला मारहाण केली. महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दिनेश पाटील व अमोल पाटील यांच्याकडून पीडित महिलेच्या पतीने पैसे घेतले होते- दोघांनी उसनवारीचे पैसे घेण्यासाठी वारंवार तगादा लावला. मात्र पीडितेच्या पतीने पैसे परत केले नाहीत. याचा राग येऊन दोघांनी पीडितेच्या घरी जाऊना शिवीगाळ करीत गैरवर्तन केले. पती क पत्नीला मारहाण केली. ही घटना २७ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी पोलिसात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेको भगवान बडगुजर करीत आहेत.

