जळगाव : प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे गेल्या दीड वर्षापासून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र आज विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची अशोक चव्हाण यांनी भेट घेऊन राजीनामा दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. ते आज भाजपात प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ व वरिष्ठ नेते तसेच गांधी परिवाराशी एकनिष्ठ असलेले अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याची चर्चा गेल्या दीड वर्षापासून सुरू होती. नांदेड जिल्हा हा अशोक चव्हाण व काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अशोक चव्हाण हे भाजपामध्ये सोबत जाणार असल्याची चर्चा होती. आज विधानसभा अध्यक्ष…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील २३ वर्षीय गृहिणी बाजारात आली असता दोघांनी नशेत असतांना तिचा हात पकडून तुला तोंड दाखवायच्या लाईकीची ठेवणार नाही म्हणत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना जळगावातील मुख्य चौकात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकाला दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत २३ वर्षीय गृहिणी वास्तव्यास असून दि.८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास गृहिणी फुले मार्केट परिसरात बाजार येत असतांना दोन इसमांनी तिचा पाठलाग करीत दुपारी ४ वाजेच्या सुमारास महिलेला शहरातील मुख्य चौकात दारूच्या नशेत असलेल्या दोघांनी महिलेचा हात पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य तर…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहर गुन्हेगारीच्या माध्यमातून मोठ्या चर्चेत येत असताना नुकतेच पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खूनाची घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या आईचा खून केला आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, खडकी पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेत ५५ वर्षीय आईचा मुलाने निर्घुन पद्धतीने खून केला आहे. ज्ञानेश्वर असं आरोपी मुलाचं नाव आहे. आईला संपवल्यावर त्याने घरातून पळ काढला असून तो फरार आहे. गुंभाबाई शंकर पवार असं मृत आईचं नाव आहे. आपल्या पोटच्या मुलाला वाढवताना लहानाचं मोठं करताना हा दिवस कधी पहावा लागेल याचा तिने विचारही केला नसेल. मुलाने आईची हत्या आपल्या राहत्या घरात केली.…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे, काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला गेला आहे. गहू, हरभरा, तूर या पिकाला गाटपीटीचा चांगलाच तडाखा बसला आहे. बळीराजा पुन्हा एकदा हवालदील झाला आहे. अवकाळीचा सर्वाधिक फटका हा विदर्भाला बसला आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि अमरावती या जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं हजेरी लावली आहे. पावसासोबतच काही भागांमध्ये गारपीट देखील झाली. हरभरा, गहू, तूर, भाजीपाला आणि फळबागांना या गारपीटीचा चांगलाच तडाखा बसला असून, ऐन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. वर्धा जिल्ह्यात…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी डोकेवर काढत असतांना नाशिक शहरात देखील मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढू लागली आहे. किरकोळ कारणावरुन झालेल्या वादाचा बदला घेताना तिघांनी एका रिक्षाचालकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन त्याचा निर्घुण खुन केला. शंकर गाडगीळ (वय ३५, रा. घरकुल वसाहत, नाशिक) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. ही घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चुंचाळे भागात शनिवारी रात्री पावणे बारा वाजता घडली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. सोनु नवगिरे, सोनू कांबळे आणि महेंद्र कांबळे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक शंकर गाडगीळ आणि आरोपी यांच्यात शनिवारी दुपारी किरकोळ वाद झाला होता. त्यावेळी हा वाद मिटला.…
जालना : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मैदानात उतरले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंबलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांत त्यांनी पाण्याचा थेंब देखील घेतला नसल्याने आणि उपचार घेण्यास नकार दिल्याने कालपासून त्यांची तब्येत देखील खालावली आहे. अमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे यांच्या आरोग्य तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना जरांगेंनी उपचार न घेता माघारी पाठवले. कोणत्याही प्रकारचा उपचार घेणार नसल्याच्या निर्णयावर ते उपोषणाच्या…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मुसळी फाटा जवळील पुलावर जळगावकडून येणारा ट्रक क्रमांक एम. एच.४० वाय १३०८ व एरंडोलकडून येणारा कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याची घटना दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना नागरिकांनी कॅबिनचा पत्रा तोडून बाहेर काढण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल कडून येतांना डाव्याबाजूला रस्त्याचे काम सुरु होते त्यामुळे उजव्या बाजूने येणारे व जाणारे दोन्ही कडचे वाहने जात असतांना दोन्ही गाड्या एकमेकांवर धडकल्यामुळे हा अपघात झाला होता. दरम्यान अपघात झाल्याचे लक्षात येताच काही नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत दोन्ही वाहनांच्या चालकांना बाहे काढून रुग्णवाहिकेला पाचारण करून उपचारासाठी जळगाव येथे हलविले असून पाळधी…
पाचोरा : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवैध वाळू वाहतूकीचे वाहन सुरु असल्याची माहिती महसूल व पोलीस विभागाला मिळताच कारवाई करण्यात येत आहे. नुकतेच पाचोरानजीक वाळू वाहतूक करणारा डंपर पोलिसांनी जप्त केला. दरम्यान घटनेनंतर मालक फरार झाला असून पोलिसांनी डंपरचालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोऱ्यात अवैध वाळू वाहतूक जोरात सुरू असून, दररोज शंभरहून अधिक वाहने गिरणा नदीपात्रातील वाळू उपसा करीत आहेत. तहसीलदार नसल्याने पाचोरा महसूल विभाग वाऱ्यावर आहे. कारवाई होत नाही. उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी दि. ९ रोजी मध्यरात्री १:३०च्या सुमारास गस्तीवरील पोलिसांना इंपरविषयी माहिती दिली. त्यावेळी (एमएच ४६ बीएफ ५०२१)…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील चिलगाव येथील शिवारात सुरू असलेल्या हातभट्टीवर पहूर पोलिसांनी छापा टाकत कच्चे रसायन नष्ट केले. या प्रकरणी गावठी दारूची विक्री करणाऱ्याविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिलगाव येथे पोलिस निरीक्षक सचिन सानप, पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील, गणेश सुस्ते, गोपाळ माळी, शशिकांत पाटील व पोलिस कर्मचाऱ्यांनी या दारुअड्ड्यावर छापा टाकत २ हजार ४०० लीटर कच्चे २४ इम गावठीचे रसायन नष्ट करून हुसेन तडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी येथील बंडू सुपडू तडवी याच्याविरुद्ध या प्रकरणात २० गुन्हे दाखल होते. अखेर त्याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत कारवाई करून अमरावती सबजेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील अनेक छोट्या मोठ्या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरु असतांना दि.९ रोजी शहरातील रिंग रोड परिसरातील एका बँकेसमोर रस्ता ओलांडणाऱ्या संगीता महेश लढे (वय ५४) या महिलेला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी शनिवार, १० फेब्रुवारी रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रिंग रोड परिसरातील रहिवासी संगीता लढे (वय ५४) या शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी रात्री रिंग रोडवर रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी एका खाद्यपदार्थ पोहोचविणाऱ्या कंपनीच्या दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत महिलेच्या मानेला गंभीर दुखापत झाली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार…

