भुसावळ : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वेच्या आवारात चोरीच्या घटनांविरोधात मोहीम उघडली आहे. यात गेल्या तीन दिवसात रेल्वे प्रवाशांकडील मोबाईल चोरणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएफ कर्मचारी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गस्त घालत असतात. १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान ही कारवाई करण्यात आली. भुसावळ स्थानकावर आरपीएफ आणि सीपीडीएस कर्मचाऱ्यांना स्थानकाच्या परिसरात एक जण संशयास्पद फिरताना आढळला. कृष्णा सावंत नावाच्या आरोपीने सचखंड एक्स्प्रेसमधील प्रवाशाचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली. एका प्रवाशाने दिलेल्या माहितीवरुन भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पद फिरणाऱ्या एकास पकडण्यात आले. समीर पठाण असे या आरोपीचे नाव आहे. त्याने अमरावती एक्स्प्रेसच्या जनरल…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील भोद खुर्द शिवारात मुसळी फाट्याजवळ अनिल अग्रवाल व दुर्गेश अग्रवाल यांच्या मालकीच्या दुर्गेश इम्पेक्स जिनिंगचे पैसे कर्मचारी कारने जळगावहून घेऊन जात असताना शनिवार, १७ रोजी दुपारी धरणगाव बायपासजवळ त्यांच्या कारला समोरुन आलेल्या दुसऱ्या कारने धडक दिली होती. यावेळी चालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून कारच्या डिक्कीतून एक कोटी ६० लाख रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले होते. हि घटना घडल्यानंतर पोलिसांनी आता दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कापूस व्यापाऱ्याची कार अडवून दीड कोटी रुपयांची रक्कम लुटून नेणारे चोरटे पोलिसांच्या हाती लागले आहे. अनिल उर्फ बंडा भानुदास कोळी (३२) व योगेश शालिक कोळी (२९)…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकाने कांदा निर्यातीवरली बंदी हटवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांदा निर्यातील मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने देशातील कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी निर्यातीवर बंदी घातली होती. या निर्यात बंदीची डेडलाईन ३१ मार्चपर्यंत होती. मात्र डेडलाईन संपण्याच्या आधीच सरकारने ही बंदी हटवली आहे. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कांदा निर्यातीवरील बंदी हटवताना महाराष्ट्र आणि गुजरातमधील कांद्याच्या साठ्याचा विचार करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीबाबत अमित शाह यांना माहिती दिली होती. ज्यानंतर चर्चा करुन निर्यात बंदी मागे…
अमळनेर : प्रतिनिधी अभ्यासानिमित्त फोनवर बोलण्याऱ्या तरुणीच्या बोलण्याचा गैरफायदा घेत तरुणीचे कुटुंब व होणाऱ्या पतीला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणावर अमळनेर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप महाविद्यालयात एम. ए.च्या प्रथम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या पिडीत तरुणी असून तिच्यासोबत हर्षल हिम्मतराव पाटील हाही त्याच वर्गात शिक्षण घेत होता. दोघांचे अभ्यासासंदर्भात एकमेकांशी बोलणे होत होते. मात्र त्याचा वेगळा अर्थ काढून हर्षल पाटील हा पिडीत तरुणीकडे वाईट नजरेने बघू लागला. डिसेंबर महिन्यात परीक्षा संपल्यानंतर पिडितेचे लग्न जमले. दरम्यान प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आपल्या लहान बहिणीस हर्षलने तुझी मोठी बहिण जर माझ्याशी बोलली नाही, तर मी तुझ्या घरातील सर्वांना…
अमळनेर : प्रतिनिधी महिला वाहकाचा विनयभंग करणाऱ्या आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांच्याविरूध्द अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही अमळनेर आगारात वाहक म्हणून नोकरीस आहे. ३ फेब्रुवारी रोजी अमळनेर-पारोळा बसवर ड्यूटीला असताना आगारप्रमुख इम्रान पठाण यांनी पीडित वाहक महिलेच्या मोबाइलवर फोन करून मंदिरात येशील तेव्हा मला घरी येऊन भेट, असे सांगितले. दुपारी १२:३० वाजता ड्यूटी संपल्याने पीडित व एक महिला वाहक अशा दोघी मंदिरात दर्शनासाठी गेल्या. मात्र, सोबत असलेल्या वाहक महिलेची ड्यूटी असल्याने ती लगेच गेली. आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांच्या घरी गेल्यावर जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आपण हाताला झटके…
पारोळा : प्रतिनिधी शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास कजगाव चौफुलीवर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर धारदार हत्याराने वार करण्यात आले. यामध्ये दोघे जखमी झाले असून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास कजगाव चौफुलीवर उभे असलेल्या रमेश महाजन (पारगल्ली, पारोळा) यांच्याकडे वंश काशिनाथ नरवाळे (रामदेवजी बाबानगर, पारोळा) याने काही कारण नसताना पैशांची मागणी केली. यावेळी त्यांनी त्यांच्या पुतण्या राकेश सुरेश महाजन व अनिल विठ्ठल महाजन यांना एक व्यक्ती पैसे मागत आहे व शिवीगाळ करत आहे, असे सांगत बोलावून घेतले. यावेळी यांच्यात शाब्दिक वाद होत वंश याने त्याच्या हातात असलेल्या धारदार हत्याराने राकेश आणि अनिल यांना…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर येथील तरुण विद्यार्थ्याचा गावातील अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यात राहुल विजय चौधरी (३१) या तरुणाचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल चौधरी हा बी.एस्सी.चे (कृषी) शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. शनिवारी दुपारी तो एकुलती रस्त्यावर असलेल्या अभ्यासिकेत अभ्यास करीत होता याचवेळी त्याच्या छातीत वेदना सुरू झाल्या. त्याला तातडीने खासगी डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यांनी जामनेर येथे नेण्याचा सल्ला दिला. परंतु जामनेर येथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. राहुल याची घरची परिस्थिती जेमतेम आहे. मोठा भाऊ सागर चौधरी हा जामनेर…
जळगाव : प्रतिनिधी यावल येथे स्वावलंबन योजनेचा निधी मंजूर झाल्यानंतर त्यापोटी बक्षीस म्हणून एक लाख रुपये लाच मागितल्यानंतर लाच रक्कम स्वीकारल्याप्रकरणी चुंचाळे ग्रामपंचायतीचा ऑपरेटर सुधाकर धुडकू कोळी (35, चुंचाळे) यास जळगाव एसीबीने अटक केली तर चुंचाळे ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी (चुंचाळे) हा फरार झाला आहे. हा सापळा शनिवार, 17 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास यशस्वी करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, चुंचाळे येथील 46 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, चुंचाळे, ता.यावल गावी त्यांच्या वडिलांच्या नावाची संस्था असून त्यामध्ये 15 वित्त आयोगाच्या शिफारशीतून गावात शिलाई मशीन प्रशिक्षण देवून ग्रामीण भागातील महिला व युवतीना स्वावलंबी करण्यासाबाबत केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता. मंजूर…
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जळगाव जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त “जाणता राजा ” या महानाट्याचे आयोजन जळगाव जिल्ह्यातील शिवप्रेमी रसिकांसाठी करण्यात आलं असून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येपासून दिनांक 18, 19 आणि 20 फेब्रुवारी 2024 असे तीन दिवस दररोज सायं. 6.00 वा. जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदानावर हे महानाट्य सादर होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व शौर्य अनुभवण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील शिवप्रेमी नागरिकांनी हे नाट्य पाहायला यावे असे आवाहन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. या महानाट्याच्या आयोजनातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि जीवन सर्वांना…
धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हेगारी मोठ्या संख्येने वाढत असतांना नुकतेच धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ कपाशी व्यापाराची गाडी आडवून व्यापाऱ्याजवळील दीड कोटींची रक्कम घेवून अज्ञात तीनजण पसार झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी घडली आहे. या घटनेमुळे धरणगाव तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील दुर्गेश इम्पेक्स नामक जिनिंगचे पेमेंट जळगावहून पिंप्रीला जाण्यासाठी कारमधून नेले जात होते. मुसळी फाट्या ते पिंप्री गावादरम्यान असलेल्या निलॉन्स कंपनी समोरील उड्डाण पुलाच्या खाली व्यापाऱ्याची गाडी येताच बोलेरो कारमधून आलेल्या अज्ञात तिघांनी व्यापाऱ्याची गाडी आडविली. व्यापाऱ्याची गाडी अडवून गाडीतून काही मिनीटात दीड कोटीचे पेमेंट असलेली रक्कमेची लुट करून तिन्ही…

