चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील श्यामवाडी येथील २८ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत १६ रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेवणनाथ संभाजी माळी (२८, शामवाडी ता.चाळीसगाव) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे, रेवणनाथ माळी हा श्यामवाडी येथे आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. १५ रोजी दुपारी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास गावाजवळील एका विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात पसरल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. मृतदेह बाहेर काढून चाळीसगाव येथे रवाना करण्यात आला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. तपास पोलिस नाईक भगवान माळी…
Author: editor desk
यावल : प्रतिनिधी गोवंशाची वाहतूक करताना एक वाहन गोरक्षकांनी दहिगावजवळ पकडले. तालुक्यातील दहिगाव-कोरपावली रस्त्यावर शनिवारी रात्री हनीफ दगडू तडवी रा. महलखेडी हा (वाहन क्रमांक एम. एच.०४एच. एस .१९८७) अवैधरीत्या गोवंश वाहतूक करीत होता. हा प्रकार दहिगाव गावातील गोरक्षकांच्या निदर्शनास आला असता त्यांनी वाहन पकडले. यानंतर यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ, हवालदार राजेंद्र पवार हे पथकासह दाखल झाले. त्यांनी वाहन व वाहनचालकाला ताब्यात घेतले. रात्री उशिरा याप्रकरणी यावल पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलिस करीत आहे.
मेष आज तुमचा दिवस चांगला जाईल. कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते. तुमच्या जोडीदारामध्ये काही मतभेद असू शकतात, परंतु संध्याकाळपर्यंत सर्व काही ठीक होईल. शक्य असल्यास इतरांचे मत घेऊनच कोणतेही काम सुरू करा, यश मिळू शकते. ऑफिसमधील बॉस तुमच्या कामावर खूप खुश असतील. कोणतेही नवीन निर्णय घेणे टाळा. तुमचे काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुमच्या कौटुंबिक जीवनात उत्साहाचे वातावरण असेल. या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे, तुम्हाला तुमच्या कलागुणांसाठी पुरस्कारही मिळतील. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी तुमच्या भावनांबद्दल बोलाल. तुम्ही त्यांनाही कुठेतरी बाहेर काढाल. या राशीच्या व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक असेल, तुमच्या कंपनीला…
भुसावळ : प्रतिनिधी दुचाकी चोरांना भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वी तपास करीत दुचाकी चोरांना बुलढाणा जिल्ह्यातून अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून संशयित ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाजारपेठ पो.स्टे. भुसावळ येथे दि. २५ जून २०२३ रोजी दुचाकी चोरी झालेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचे तपास पोहेकॉ विजय नेरकर हे करीत आहे. तपास दरम्यान मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर येथून तीन संशयितांना अटक केली आहे. यात शेख बासीद शेख बाबु (वय २८, रा. सुलतानपुरा, जळगाव जामोद, जि. बुलढाणा हल्ली मु. मोहम्मदी नगर, भुसावळ), मोहम्मद…
एरंडोल : प्रतिनिधी खडके सिम येथे दुचाकीने परत जात असताना, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रॅक्टरला दुचाकीने धडक दिल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कासोदार रस्त्यावर घडली. त्यात जखमी दुचाकीस्वार प्रणय जितेंद्र पाटील (२३, खडके सिम) या तरुणाचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रणय हा जळगाव येथे रायसोनी महाविद्यालयात बी.टेकला शेवटच्या वर्षाला शिकत होता. तो एरंडोल येथे व्यायामशाळेत व्यायामाला आला होता. घरी परत जात असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. प्रणय हा दुचाकीने (एमएच१९/इजे२४३८) एरंडोल येथून खडकेसिम येथे कासोदा रस्त्याने घरी परत जात होता. कुंदन परदेशी यांच्या शेताजवळ रस्त्याच्या कडेला नादुरुस्त ट्रॅक्टर (एमएच१९/बीजी५१७०) उभा होते. त्यास रिफ्लेक्टर, इंडिकेटर लावलेले…
जळगाव : प्रतिनिधी दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे सेवानिवृत्त विद्यार्थी प्रमोद ठोसर प्रथम तर एस.टी.संवर्गातून परवर लतिक तडवी (179) तिसऱ्या क्रमांकाने व विजयसिंह पाटील यांची जळगाव तलाठीपदी निवड झाल्याबद्दल त्याचा क्लासतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा.वासुदेव पाटील, नारायण पाटील, उमेश सुर्यवंशी उपस्थित होते. दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या शिक्षकांचे वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन लाभल्याने हे यश प्राप्त करता आले असे उद्गार परवर तडवी याने सत्काराप्रसंगी काढले. मेहनत व कष्टाच्या बळावर रिक्षा चालकाचा मुलगा तलाठी होवू शकता असे गौरोद्गार वासुदेव पाटील यांनी काढले. दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या सर्व परिवाराकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे पुढील वाटचालीस शुभेच्छा देवून अभिनंदन करण्यात आले.
जळगाव : प्रतिनिधी चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या कुटुंबाची कार पार्किंगमध्ये उभी केलेली असताना तिच्यावर धारदार वस्तूने ओरखडल्याने कारचे नुकसान झाले आहे. यात कारवर धारदार वस्तूने अश्लील शब्दही लिहिले आहेत. हा प्रकार शुक्रवार, १५ मार्च रोजी रात्री घडला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हेनगर परिसरातील निखिल दीपक अग्रवाल हे पत्नीसह शहरातील एका चित्रपट गृहामध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. सायंकाळी ७:१५ वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांची कार (एमएच १९, ईजी २३५५) पार्किंगमध्ये उभी केली होती. रात्री १०:१५ वाजता ते चित्रपट पाहून बाहेर आले असता, त्यांच्या चारचाकीच्या चहूबाजूने अज्ञात टवाळखोरांनी धारदार वस्तूने ओरखडे पाडले होते, तसेच अश्लील…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील शांतीनगर परिसरातील शिक्षक कॉलनीत मारुती मंदिराच्या आवारात असलेल्या ट्रॉन्सफॉर्मरने पेट घेतल्याने या परिसरात पाच टीव्ही, चार फ्रीज, पाच एसी, ३० पेक्षा जास्त लाइट, पाण्याचे पंप, संगणक जळाले आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास घडली. यामुळे या भागातील रहिवाशांचे सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, शांतीनगरातील शिक्षक कॉलनी भागात असलेल्या मारुतीच्या मंदिराच्या आवारात वीज कंपनीची डीपी बसविली आहे. या डीपीवर मोठ्या प्रमाणावर झाडे आणि वेली वाढलेल्या आहे. डीपीवर वाढलेल्या वेलींमुळे तेथे शॉर्टसर्किट होताच डीपीने पेट घेतला. डीपीने पेट घेताच या भागातील अनेक घरांमध्ये सुरू असलेले टीव्ही, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन, संगणक…
मेष : तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. जीवनसाथी सोबत पैश्याने जोडलेल्या कुठल्या मुद्यांना घेऊन आज वाद होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या व्यर्थ खर्चावर तुमचा साथी तुम्हाला लेक्चर देऊ शकतो. मित्र आणि नातेवाईक मदत करतील, त्यांच्या सहवासात तुम्ही बरेच आनंदी रहाल. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की, मैत्रीमुळे आपल्या महत्वाच्या वेळेला खराब करू नका. मित्र हे येणाऱ्या काळात ही भेटू शकतात परंतु, शिक्षणासाठी ही वेळ अधिक उत्तम आहे. आज तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या दु:खद आठवणी विसरून जाल आणि वर्तमानकाळ साजरा कराल. आज तुम्ही सर्वात दूर जाण्याच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील लोकसभा निवडणुकीच आजपासून बिगुल वाजले असून लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज दि.१६ रोजी लोकसभेचे वेळापत्रक जाहीर केले. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सात टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात टप्प्यात मतदान होणार असून महाराष्ट्रात २० मे ला लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करण्यात येणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 26 एप्रिलला पहिला तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा असेल. 26 एप्रिलपासून, 7 मे, १३ मे, २० मे, २५ मे रोजी मतदान असेल तर ४ जूनला मतमोजणी होईल, अशी माहिती केंद्रीय निवडणुक आयुक्तांनी…

