जळगाव : प्रतिनिधी एकनाथराव खडसेंनी आजवर खुनशी राजकारण केले. अनेक नेत्यांना संपविले. खडसे अंधारात होत असताना शरद पवार साहेबांनी त्यांना उजेडात आणले. आमदारकी दिली. पक्षांतर्गत विरोध असताना देखील त्यांना उमेदवारी दिली. पक्ष वाढला नाही मात्र गटबाजी वाढली. आज खडसे विधानपरिषद सदस्य आहेत. ज्यांनी मतदान केले त्यापैकी २५ सदस्य आज अजित पवारांसोबत आहे. खडसेंमध्ये स्वाभिमान असेल तर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग त्यांनी पुन्हा निवडून यावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिली आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच बारामती इच्छूक उमेदवार सुनेत्रा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्याविषयी काही उद्गार…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव भारतीय जनता पक्षाची महत्वाची बैठक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कार्यालयात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी जेष्ठ नेते वसंतराव चंदात्रे, प्रीतमदास रावलानी, सुरेश तात्या सोनवणे, संजय भास्करराव पाटील, के.बी.साळुंखे, प्रेमचंद खिवसरा, सुरेशभाऊ स्वार, धर्मराज वाघ, राजेंद्र चौधरी, शेषरावबापू पाटील, जगनअप्पा महाजन, महिला मोर्चाच्या देवयानीताई ठाकरे, संगीताताई गवळी, मार्केट सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड, संघटना पदाधिकारी प्रशांत पालवे, धनंजय मांडोळे, रमेश सोनवणे, प्रा.सुनील निकम सर, नितीनभाऊ पाटील, घृष्णेश्वर तात्या पाटील, शेतकी संघाचे अविनाशनाना चौधरी, विवेक चौधरी, अमोल चव्हाण, अमोल नानकर, गिरिष बरहाटे, युवा मोर्चाचे भावेश कोठावदे, गोरख राठोड, मनोज…
जळगाव : प्रतिनिधी एप्रिल २०२३-२४ या कालवधीत तीन लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या नियमीत शेतकऱ्यांना केवळ कर्जाची मुद्दल भरावी लागणार आहे. त्यावरील व्याज माफ करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना चेअरमन संजय पवार यांनी सांगितले की, जिल्हा बँकेकडून एप्रिलमध्ये घेतलेल्या कर्जाची परतफेड ३१ मार्चपर्यंत करावी लागते. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाची वसूली व्याजासह करावी असे आदेश दिले होते. मात्र या आदेशामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली होती. याबाबत नुकतीच नाशिक येथे सहकार मंत्री दिलीप वळसेपाटील यांनी घेतलेल्या बैठकीत चर्चा करण्यात…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील उमाळा ग्रामपंचायतमध्ये पाणीपट्टी व घरपट्टीचे बनावट पावती पुस्तक वापरून ५ लाख ५८ हजार रूपयांचा अपहार केल्याच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी तत्कालीन ग्रामसेवकाला अटक करण्यात आली आहे. संदीप चंद्रभान निकम रा. जामनेर असे अटक केलेल्या तत्कालीन ग्रामसेवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उमाळा ग्रामपंचायतमध्ये १३ मार्च २०२३ ते ३ जुलै २०२३ च्या दरम्यानच्या काळात संशयित आरोपी संदीप चंद्रभान निकम हे ग्रामसेवक पदावर होता. त्यावेळी ग्रामसेवक पदावर असतांना पाणीपट्टी व घरपट्टीची बनावट पावती पुस्तक वापरून ५ लाख ५८ हजार रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. या संदर्भात पंचायत समितीचे अधिकारी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेश इंगळे…
बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील जलचक्र बुद्रूक शिवारातील विहिरीत महिनाभरापूर्वी एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. या घटनेमागील गूढ उकलण्यात जवळपास महिन्याने बोदवड पोलिसांना यश आले आहे. ही घटना खुनाची असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एकास अटकही करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेत कुजल्यामुळे चेहरा नव्हता. हाडांच्या सांगाड्यात असलेल्या कपड्यांवरून तपास करीत पोलिसांनी हा तपास लावला आहे. गत महिन्यात १८ फेब्रुवारीला तालुक्यातील जलचक्र बु, शिवारात शंकर जयराम पाटील यांच्या शेतातील १०० फूट खोल कोरड्या विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. तब्बल महिनाभर तपास सुरू ठेवला. मयत कुवरसिंग राजाराम बारेला (३५, रा. खामना, जि. बुऱ्हाणपूर, हल्ली मुक्काम जुनोना, ता. बोदवड) असल्याची ओळख पटवत…
मेष विद्यार्थ्यांना आज काहीतरी नवीन शिकायला मिळेल. आज कुटुंबियांसोबत चांगला वेळ जाईल. काही दिवसांपासून कुटुंबात सुरू असलेल्या समस्येवर उपाय सापडेल. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात ती आज पूर्ण होणार आहेत. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. आज योजना आखून एखादे काम कराल आणि मेहनतीचा संपूर्ण फायदा मिळेल. योजलेली सर्व कामं आज पूर्ण होतील. आज एखाद्या चांगल्या कंपनीकडून मुलाखतीसाठी कॉल येऊ शकतो. उत्पन्न मिळवण्याच्या, कमाईच्या अनेक संधी मिळतील. मिथुन मन स्थिर नसल्यामुळे तुम्हाला थोडी चिंता वाटेल, परंतु तुमच्या प्रियजनांच्या मदतीने तुम्हाला दिलासा मिळेल. कार्यालयात आज तुमचे काम लक्षणीय वाढू शकते. जास्त कामामुळे थकवा जाणवू शकतो. एखाद्यासोबत वादही होऊ…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीसोबत झालेल्या भांडणात पत्नीला मारहाण झाली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेबाबत पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. विवाहीत महिलेच्या हत्येने सध्या परिसरात खळबळजनक वातावरण पसरलं आहे. मिळालेल्या अधिक महितीनुसार, नाशिकच्या तामसवाडी निफाड येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. एक विवाहीत जोडपं येथे राहत होतं. महिलेचा पती कायम दारूच्या नशेत असायचा. पती सतत दारू पित असल्याने पत्नीचे आणि त्याचे नेहमी भांडण व्हायचे. काल देखील या दोघांमध्ये अशीच जोरदार भांडणे झाली. ही भांडणे इतकी विकोपाला गेली…
मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. ८१ वर्षीय बिग बी यांना शुक्रवारी सकाळी ६ वाजता मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी समोर आली आहे. 2018 च्या ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटात ॲक्शन सीन करताना त्यांना खांद्याला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर नव्हती मात्र त्यांना बॉडी डबल वापरण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण त्यांनी हा सीन स्वतःच करण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये कौन बनेगा करोडपती 14 च्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांच्या पायाची नस धातूच्या तुकड्याने कापली गेली होती. सेटवर स्नायूतून खूप रक्तस्त्राव झाला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. अमिताभ…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणूक आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा उद्या, शनिवारी निवडणूक आयोगाकडून होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग उद्या दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही पत्रकार परिषद लाइव्ह दाखवण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीसह ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुका सात ते आठ टप्प्यांत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नवनियुक्त निवडणूक आयुक्तांच्या औपचारिक स्वागतानंतर पूर्ण आयोगाची बैठक झाली. ही बैठक जवळपास ४५ मिनिटे चालली. निवडणूक आयोगाच्या आजच्या बैठकीत निवडणुका निष्पक्ष, शांततेने व्हाव्यात यासाठी संवेदनशील क्षेत्रांत आणि राज्यांमध्ये किती मनुष्यबळ तैनात…
जळगाव : प्रतिनिधी कुठल्या न कुठल्या कारणावरुन वाद घालणाऱ्यांकडून तिघांनी एका कुटुंबाला बेदम मारहाण केली. ही घटना दि. १२ मार्च रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शासकीय कायटीआय शेजारी घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शासकीय आयटीआय शेजारी बाली करण कातोळी (वय २९) या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दि. १२ मार्च रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणारे त्यांचे नातेवाईक शारदा मोरे यांनी त्यांच्या सासू व पुतण्या हा बाली कातोळी यांच्या सासू सोबत भांडण करीत होते. दरम्यान, त्यांचे पती हे भांडण का करत आहे अशी विचारणा केली असता, तिघांकडून महिलेस तिच्या पतीला शिवीगाळ करण्यात आली.…

