भुसावळ : प्रतिनिधी शहरातील ममता हॉटेल जवळील एका दुकानासमोर अडवून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हंसराज व आतीश रवींद्र खरात या दोन्ही भावांविरूध्द खंडणीचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील झेडआरटीआय कॉलनीते नरेंद्र अरूण मोरे हे दि. ७ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता ममता हॉटेलजवळील एका दुकानासमोरुन जात होते. यावेळी हंसराज उर्फ रितीक व आतिश खरात या भावंडांनी मोरे यांना अडवित त्यांच्याकडे ५० हजारांची खंडणी मागितली. मोरे यांनी खंडणीची रक्कम न दिल्याने त्यांना शिवीगाळ करीत घरात शिरून मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात खरात बंधू विरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल…
Author: editor desk
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील धाबे येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले असून संपूर्ण पवार परिवार रस्त्यावर आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे कि, धाबे गावातील अनिल पवार यांचे घर दूध डेअरीला लागून असलेल्या मंदिराजवळ आहे. पवार हे रात्री जेवण करून झोपलेले असताना मंदिराची वायर त्यांच्या घरावर पडल्याने आग लागली. आगेची झळ लागताच तत्काळ अनिल पवार व त्यांचे कुटुंब झोपेतून उठून बाहेर पडले. त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र लोखंडी पेटीत ठेवलेले ६० हजार रुपये जळून खाक झाले. संसारोपयोगी वस्तू कपडे, धान्य, भांडी आदी जळून खाक झाल्याने पवार परिवार उघड्यावर आला…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वाघडू शिवारात शेतातील शेडमधून दोन क्विंटल कापूस चोरून तो विक्रीच्या तयारीत असलेल्या चौकडीला चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेला दोन क्विंटल कापूस व दोन दुचाकी जप्त केल्या. त्यातील एक दुचाकी चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सविस्तर वृत्त असे कि, वाघडू येथील शेतकरी सुरेंद्र दिनकर पाटील यांचे वाघडू शिवारात शेत आहे. शेतातील पत्री शेडमधून दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीचा दोन क्विंटल कापूस चोरून नेला होता. तपासादरम्यान योगेश बेलदार यांना कापूस चोरीतील आरोपी हे स्थानिक असल्याची माहिती मिळाली. त्या दिशेने तपास केला.…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एका भागात १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. पीडितेने सतर्कता दाखवून आरोपीच्या तावडीतून पळ काढला. या प्रकरणी महेश ज्ञानेश्वर तायडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी घडली. सविस्तर वृत्त असे कि, गुरुवारी आरोपीने पीडितेला घरात नेत पाणी देण्याच्या बहाण्याने विनयभंग केला. मात्र, पीडितेने सतर्कता दाखवून पळ काढला. यावेळी जमावाने आरोपीला चांगलेच चोपून काढले. गुरुवारी रात्री उशिरा आरोपीविरोधात पोक्सोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोल्ली करीत आहेत.
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. या राशीच्या अभियंत्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर असणार आहे. आज तुम्हाला कार्यालयीन कामात वरिष्ठांच्या मदतीने थोडा दिलासा मिळेल. आज तुम्ही घरात मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. पालकही मुलांना काही चांगला सल्ला देऊ शकतात. विद्यार्थ्यांना आज ऑनलाइन काहीतरी नवीन शिकायला मिळेल. आज तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे नेण्याची चांगली संधी आहे. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. या राशीच्या महिलांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. तिचा वेळ खरेदीसाठी घालवू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज बहुराष्ट्रीय कंपनीकडून फोन येऊ शकतो. वैवाहिक जीवनात आज गोडवा राहील. स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयारी सुरू ठेवावी. मित्रांचा सल्ला आज तुम्हाला खूप…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात दोन दिग्गज नेत्यांनी प्रवेश घेतल्याने जळगाव जिल्ह्यात आता ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. यात ज्येष्ठ नेत्या डॉ.अस्मिता पाटील व बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाधर पाटील उर्फ लकी टेलर तसेच पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध पदाधिकार्यांनी आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर पक्षात प्रवेश घेतला असून यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला बळकटी प्राप्त झाली आहे. जळगाव जिल्हा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात अलीकडच्या काळात अनेक मान्यवर दाखल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच जळगावचे खासदार उन्मेष पाटील तसेच पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आपल्या समर्थकांसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. यानंतर लागलीच करण…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव MIDC मधील कत्तलखाना संदर्भात उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव येथील बिल्डींग मटेरीअल व्यापारी प्रेमचंद खिवसरा यांचे नाव घेऊन आरोप केला होता. यावर आता प्रेमचंद खिवसरा यांनी प्रसिद्धी पत्रक काढून जाहीर खुलासा केला आहे. त्यात त्यांनी २०१५ मध्ये उन्मेष पाटील हे आमदार असताना कत्तलखाना प्रकरण कस उघडकीस आणले होते, ? तेव्हा त्यांच्या सोबत कोण कोण होते ? नेमका बिल्डींग मटेरीअल सप्लाय चा आणि त्यांचा सबंध काय ? २०१५ मध्ये स्थगिती मिळाल्याचे जाहीर झाल्यानंतर देखील कत्तलखान्याचे काम कसे सुरु राहिले याबाबत त्यांनी सर्व घटनाक्रच आपल्या खुलाश्याच्या माध्यमातून मांडले आहे. प्रेमचंद खिवसरा यांनी केलेला जाहीर खुलासा जश्याचा तसा सर्वाना जय…
रावेर : प्रतिनिधी दोन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील गुढीपाडव्याला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार बनले. एका दिवसापूर्वी पक्षात आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिला अन् अनेक वर्षांपासून पक्षाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला डावलण्यात आले, असा आरोप जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत. पक्षाच्या या निर्णयाविरोधात शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यानंतर आता माजी आमदार संतोष चौधरी बंडाच्या तयारी आहेत. यामुळे जळगावमध्ये शरद पवार गटाला धक्का बसणार आहे. रावेर लोकसभा मतदार संघात श्रीराम पाटील यांनी महाविकास आघाडीने उमेदवारी दिला. महायुतीच्या रक्षा खडसे उमेदवार आहेत. यामुळे…
पुणे : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला नसता, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदींचे कौतुक केले आहे. निकालानंतरही अनेक प्रलंबीत कामांप्रमाणे राम मंदिराचे काम प्रलंबीत राहिले असते, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी ते माध्यमांशी बोलत होते. एका बाजूला कडगुळ आणि एका बाजूला खंबीर नेतृत्व त्यामुळे मी आणि पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. मोदी यांना पाठिंबा देताना महाराष्ट्रासाठी…
सांगली : वृत्तसंस्था सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी यांच्या कार्यकर्त्यांनी आता रक्ताने पत्र लिहिले आहे. रक्ताने पत्र लिहीत ते पत्र विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर लावण्यात आले आहे. विशाल पाटील यांच्यासाठी असे पत्र लिहिणारे धनगर समाजातील कार्यकर्ते असून धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आपण विशाल पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने धनगर समाजाला आरक्षणाबाबत खोटे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप देखील या कार्यकर्त्यांनी केला आहे. रक्ताने लिहिलेल्या त्यांचे हे पत्र विशाल पाटील यांच्याकडे सुपूर्द करत धनगर बांधवांचा विशाल पाटील यांनाच पाठिंबा असल्याची भूमिका या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये महाआघाडीच्या…

