जळगाव : प्रतिनिधी सोनसाळखी चोरी करणारे चोरटे हे मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील जुलवानिया येथे असल्याची माहिती मिळाली. पथक दोन दिवस वेशांतर करुन त्याठिकाणी सापळा रचला. त्यानंतर पाच गुन्ह्यात फरार असलेल्या दोघांच्या एमआयडीसी पोलिसांनी बुधवार दि. ३ एप्रिल रोजी इराणी वस्तीतून मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ४० हजारांचा मुद्देला जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गायत्री नगरात पायी जात असलेल्या सुलोचना वसंत खैरनार (वय ६०) या वृद्धेच्या गळ्यातील सोनसाळची दुचाकीवरुन आलेल्यांनी लांबवल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा उलगडा करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथकाकडून तांत्रिक विश्लेषणासह माहिती गोळा केली जात होती.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी बहिणीच्या लग्नासाठी आलेल्या काकांना तरुण रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी गेला होता. तेथून घरी परत जात असतांना त्याच्या दुचाकीचा अपघात होवून प्रणव प्रशांत कुदळे (वय २२, रा. तुळजाई नगर) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सुप्रिम कॉलनी स्टॉपजवळ घडली. एकुलत्या एक मुलावर दुर्देवी काळाने झडप घातल्याने त्याच्या कुटुंबियांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात असलेल्या तुळजाई नगरात प्रणव कुदळे हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. वडीलांसोबत तो शहरात बॅनर लावून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. चार दिवसांपुर्वी त्याच्या बहिणे लग्न झाले आहे. तसेच त्याचे काका राहुल कुदळे हे त्याच्या बहिणीला…
जळगाव : प्रतीनिधी शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत वैद्यकीय व्यवसायिक पंकज विश्वासराव पाटील (वय ४४, रा. निंबोल, ता. जळगाव) यांची १९ लाख चार हजार रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक केली. त्यामुळे वैद्यकीय व्यवसायीकाला शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक पडणे चांगलेच महागात पडले. ही घटना दि. १९ डिसेंबर २०२३ ते दि. २ फेब्रुवारी रोजी दरम्यान घडली. याप्रकरणी दि. ३ एप्रिल रोजी सायबर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील निंबोल येथे पंकज पाटील हे वास्तव्यास असून त्यांचा वैद्यकीय व शेती व्यवसाय आहे. दि. १९ डिसेंबर २०२३ ते दि. २ फेब्रुवारी या दरम्यान व्हाटसअॅप ग्रुप व फेसबुकवरील अनोळखी लिंकद्वारे…
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. कौटुंबिक सल्ला तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. विद्यार्थी आज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला तुमच्या दिनचर्येत काही बदल करावे लागतील. ऑफिसमध्ये काही खास लोकांशी काही महत्त्वाच्या विषयावर बोलण्याची संधी मिळेल, त्याचा पुरेपूर फायदा घ्या. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. आज तुमचे विरोधकही तुमच्या कामाचे कौतुक करतील. आज तुम्ही तुमच्या बुद्धीने सर्व कामे हाताळाल. काम करणाऱ्या लोकांना सहकाऱ्यांची मदत मिळेल त्यामुळे त्यांची कामे लवकर पूर्ण होतील. आज तुम्हाला व्यवसायासाठी राज्याबाहेर जावे लागेल. या राशीच्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेबद्दल जागरूकता निर्माण होईल. आज तुम्हाला गरजूंना मदत करण्याची संधी मिळेल. अचानक आर्थिक लाभामुळे आज…
नंदुरबार : वृत्तसंस्था राज्यात उन्हाळा कहर सुरु असतांना यात हंगामी फळ म्हणून आंबा आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आंब्यांची आवक होत असून मागणी देखील मोठी असते. दरम्यान, यंदा वातावरण बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहरात असताना ढगाळ वातावरण, वारा, पाऊस यामुळे मोहोर गळून पडला. त्यामुळे कैरी उत्पादनात घट होणार आहे. परिणामी कच्च्या कैरीपासून तयार होणाऱ्या आमचूर उत्पादनावर देखील याचा परिणाम पाहण्यास मिळणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील आदिवासी बांधव कैरीपासून तयार होणाऱ्या आमचूर उत्पादनासाठी तयारी करत आहेत. परंतु यंदा निसर्गाने मोहोरवर अवकृपा दर्शवल्याने कैरी उत्पादन दीड महिना लांबवणीवर पडले आहे. सातपुड्यातील पहिला मोहोर आल्यानंतर लागलीच हवामान दोन…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शासकीय कार्यालयात काम करून घेण्यासाठी लाच देण्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. नुकतेच शासकीय काम करून देण्यासाठी तडजोडीअंती तीन हजारांची लाच स्वीकारताना विहितगांव, जि.नाशिक तलाठी सतीश गिरीश नवले (48, फ्लॅट नंबर – 303, अक्षराधारा ई, सँडी बेकरी जवळ, आनंद नगर, उपनगर, नाशिक) व विहितगार तलाठी मदतनीस दत्तात्रेय सुखदेव ताजनपुरे (43, राधिका निवास, उज्वल कॉलनी, पंपिंग स्टेशन रोड, नाशिक, पुणे रोड चेहडी बु.॥) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 38 वर्षीय तक्रारदार यांच्या पतीचे नावे असलेल्या जमिनीच्या क्षेत्रामध्ये तुकडे बंदी व तुकडे जोड कायद्याचा भंग होत असल्याने तहसीलदार नाशिक यांनी त्यांच्या मालकीचे क्षेत्र 0.01 चे एकूण…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था १० बँकांवर नियमांचे पालन न केल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने कडक कारवाई केली आहे. या १० बँकांना ६० लाख रूपयांपर्यंतचा दंड ठोठवला आहे. त्यांनी बँकीग नियमाचे पालन आणि ग्राहकांची सुरक्षितता याचे उल्लघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर हा दंड लावण्यात आला आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशातील बँकाचा या समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बँकांमध्ये महाराष्ट्रातून सोलापूरतील सोलापूर जनता सहकारी बँक, नाशिकतील जनलक्ष्मी सहकारी बँक, छत्रपती संभाजीनगरतील स्टँडर्ड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबईतील उत्कृष्ट सहकारी बँक, पश्चिम बंगालातून हावडातील हावडा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तामिळनाडूतून राजापालयमतील राजापालयम को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक, दिंडीगूलतील दिंडीगुल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक…
भुसावळ : प्रतिनिधी लोहमार्ग पोलिसांनी अट्टल मोबाइल चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे आठ मोबाइल जप्त केले आहेत. गजानन वसंता सुशीर (३०, धरणगाव, ता. मलकापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या अटकेनंतर अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी प्रदीप बनसोडे (भांडूप पूर्व मुंबई) या ८ फेब्रुवारी २०२४ रोजी डाऊन शालिमार एक्सप्रेसने ठाणे ते अकोला असा प्रवास कोच एच-५ मधून करीत असताना भुसावळ सुटल्यानंतर त्यांच्या झोपेचा फायदा घेत पर्स चोरीला गेली. हे लक्षात येताच त्यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पर्समध्ये २५ हजारांचा मोबाइल व रोख रक्कम तसेच कागदपत्रे मिळून ३८ हजार ८०० रुपयांचा ऐवज होता. याबाबत…
जळगाव : प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथे प्रेमसंबंधातून एका ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार व नंतर तिचा खून करण्यात आल्याची घटना वरखेडे (ता. चाळीसगाव) येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत मेहुणबारे (ता. चाळीसगाव) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत एकास अटक करण्यात आली आहे. संजय धोंडा गायकवाड (३१, रा. वरखेडे खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला बुधवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान गावालगतच्या खडक्या नाल्यात शौचासाठी गेली होती. ती लवकर घरी परत न आल्याने मुलांनी तिचा शोध घेतला. त्यावेळी गिरणा नदीपात्रात वाळूमध्ये अर्धवट पुरलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिस पाटील संतोष तिरमली…
भडगाव : प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकरी शेतातील पिकांना पाणी भरत असताना त्यांच्यावर रानडुक्कराने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी चाळीसगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कजगावसह परिसरात रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ३ रोजी तांदुळवाडी येथील शेतकरी रवींद्र सुपडु पाटील (वय ५०) हे सकाळी बाजरी, मका पिकांना पाणी भरण्यासाठी भोरटेक शिवारातील आपल्या शेतात गेले होते. पिकांना पाणी भरत असताना अचानक रानडुक्कराने पाटील यांच्यावर झडप घेत मांडीला चावा घेतला. मांडीला गंभीर इजा झाल्याने त्यांना तत्काळ चाळीसगावच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, पिकांची नासाडी करणाऱ्या रानडुक्कराने शेतकऱ्यांवर हल्ले चढवण्यास सुरुवात केल्याने…

