जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आ.एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना आता आमदार खडसे यांनी आपण लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे शनिवारी बोलताना सांगितले. हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे हे खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत दिल्ली येथे गेले होते. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. त्यावेळी खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. मात्र, त्यास खडसेंनी नकार दिला. आता मात्र त्यांनी स्वतःच भाजपामध्ये प्रवेश करीत असल्याचे सांगितले. गौणखनिजप्रकरणी एकनाथ खडसे व कुटुंबाला १३७ कोटींचा दंड ठोठावला होता. नुकताच हा निर्णय शासनाने रद्द केला.…
Author: editor desk
मेष : भीती, चिंता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला सोडावे लागतील. कारण हेच घटक विरोधी मतांना आकर्षून घेण्याचे काम करतात. आर्थिक दृष्ट्या आज दिवस मिळता-जुळता राहील. आज तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो परंतु, यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाहीत. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यत्मिक गुरु सोबत भेटायला जाऊ शकतात. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. त्यामुळे कितीही भांडण झालं तरी जुने सुंदर…
नंदुरबार : वृत्तसंस्था धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला जोडणाऱ्या या पुलावरूल दोन तरुणांनी उडी घेतल्याने गावात विविध चर्चा सुरू आहेत. सारंगखेडा येथील तापी पुलावरून एकाच दिवशी दोन तरुणांनी नदी पात्रात उडी टाकत आपलं जीवन संपवलं आहे. दोन वेगवेगळ्या घटना आहेत मात्र एकाच जागेवरून या दोन तरुणांनी तापी नदी पुलावरून उडी टाकल्याने एकच खळबळ माजली आहे. यावेळी घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलीस स्टेशनची पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केलेली होती. सारंगखेडा येथील तापी पूल आता सुसाईड पॉईंट झाल्याची चर्चा रंगू लागले आहे. हे दोन्ही तरुण कोण आहेत त्यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील नाहाटा चौफुली परिसरात राहणाऱ्या ३७ वर्षीय महिलेला धमकी व मारहाण करून वेळीवेळी अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या गुन्ह्यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नाहाटा चौफुली परिसरात ३७ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्या एका खासगी प्रशिक्षण केंद्रात नोकरीला आहे. दरम्यान, १४ जानेवारी २०२३ ते ९ जानेवारी २०२४ दरम्यान संशयित आरोपी रविंद्र गोलांडे रा. चोरवड ता. भुसावळ याने महिला एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिचा अश्लिल शिवीगाळ व मारहाण करत…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील विप्रो पुल ते बोरी नदी पुलाच्या दरम्यान धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने तांबेपुरा येथील २४ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दुपारी १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निखिल श्याम पाटील वय २४ रा. तांबेपुरा अमळनेर असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील तांबेपुरा भागात निखिल पाटील हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. निखिल पाटील हा सुरत येथून अमळनेर येथे येण्यासाठी सुरत भूसावळ पॅसेंजरने येण्यासाठी गुरूवारी ४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता रेल्वेत सुरत येथून बसला होता. शुक्रवारी…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील महालखेडा शिवारात ३५ वर्षीय महिलेचा खून करण्यात आल्याची माहिती सामोर आली आहे. महिलेच्या डोक्यात दगड टाकून, शरिरावर गळ्यावर धारदार हत्याराने वार करीत तिची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे कि, महालखेडा येथील रहिवासी मालताबाई मनोज खाडे ( वय अंदाजे ३७ ) या आपल्या शेतात काम करण्यासाठी सकाळी गेल्या होत्या. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्या शेतातील काम आटोपून घरी येत होत्या. दरम्यान, शिवारातच कुणी तरी अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून त्यांचा खून करून पलायन केले. मालताबाई घरी न आल्यामुळे कुटुंबिय शेताकडे गेले असता सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरम्यान,…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील रहिवासी व पुण्यातील कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या तरुणाचा मित्रांसोबत दिव-दमणला गेल्यानंतर किरकोळ वादातून खून करण्यात आल्याची घटना बुधवार, 3 रोजी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी संशयीत आरोपीला अटक करण्यात आली. या घटनेत धीरज अरुण जाधव (32) या तरुणाचा मृत्यू ओढवला. मयत तरुणावर गुरुवारी रात्री भुसावळात अंत्यसंस्कार करण्यात आले. सविस्तर वृत्त असे कि, भुसावळच्या नारायण नगरात पोलीस दलातील निवृत्त सहायक फौजदार अरुण जाधव हे परिवारासह वास्तव्यास आहे. त्यांचा मुलगा धीरज हा पुण्यात अभियंता म्हणून कार्यरत आहे. सुटीनिमित्त तो भुसावळात आल्यानंतर मंगळवारी कारने येथून दिव दमणला चुलत भाऊ भूषण व अविनाश जाधव व अन्य दोन मित्रांसोबत…
पुणे : वृत्तसंस्था खडक पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाने लोहियानगर पोलीस चौकीत बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. भरत अस्मार असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. भरत अस्मार खडक पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते. मिळालेल्या माहितीनुसार, लोहियानगर पोलीस चौकीत ते गुरुवारी रात्रपाळीच्या ड्युटीवर होते. मध्यरात्री ते आराम करण्यासाठी पोलीस चौकीतील खोलीत गेले. पहाटेच्या सुमारास त्यांनी बंदुकीतून स्वतःवर चार गोळ्या झाडून आत्महत्या केली. पोलीस चौकीत गोळीबाराची घटना घडल्यानंतर परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अस्मार यांच्या आत्महत्येमागचे कारण…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय तरुणीचे अपहरण करून छायाचित्रे व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर पोलिसांत चारजणांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) मधील एका जवानाचाही समावेश आहे. सविस्तर वृत्त असे कि, वीस वर्षीय तरुणीचे मार्च २३ ते १८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान अपहरण करण्यात आले. तिला छायाचित्रे व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना सहा महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. याप्रकरणात स्वतः तरुणी समोर आल्याने हा प्रकार पोलिसांसमोर आला. मंगला कर उर्फ सुदाम संभाजी कोळी (३०) राहुल सुनील चौधरी सतीश रघुनाथ नाईक उर्फ…
अमळनेर : प्रतिनिधी नगरपालिकेच्या शेजारी खेळण्यांच्या एका दुकानाला आग लागून सुमारे ९ लाखांचे नुकसान झाल्याची घटना ४ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील संदीप राजेंद्र पाटील यांचे शिवसागर गिफ्ट सेंटर या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. घटना कळताच आजूबाजूचे दुकानदार आग विझवण्यासाठी धावले. आपआपल्या परीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन बंब बोलावण्यात आला अग्निशमन प्रमुख दिनेश बिन्हाडे, फारुख शेख फायरमन आनंदा झिंबल, मच्छिंद्र चौधरी, भिका संदांनशिव यांच्यासह नागरिकांनी आग विझवली. मात्र दुकानात मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने आतमध्ये प्रवेश करणेही अवघड होते. दुकानातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी, कॅमेरा सेट अप, भेटवस्तू असा सर्व एकूण ९…

