जळगावः प्रातिनिधी राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना जळगाव जिल्ह्यात अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता राजकीय चर्चेला उधान आले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात शुक्रवारी रात्री आठ वाजता एमआयडीसीतील एका हॉटेलमधील खोलीत १५ मिनिटे बंदद्वार चर्चा झाली. उभय नेत्यांदरम्यान झालेल्या चर्चेचा तपशील समजू शकला नाही; परंतु त्याला लोकसभा निवडणुकीची किनार असल्याचे सांगितले जात आहे. जळगाव व रावेर हे दोन्ही मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला गेले आहेत. स्थानिक पातळीवर असलेल्या शिंदेसेनेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि महाजन यांच्यातील चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे धुळे येथील एका विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी जळगाव विमानतळावर आले होते. तेथून ते…
Author: editor desk
धुळे : प्रतिनिधी पाइप विक्री करण्याच्या बहाण्याने जळगाव येथील एका व्यापाऱ्याला साक्री तालुक्यातील हट्टी शिवारात बोलावून त्याला मारहाण करीत त्याच्याजवळील सोन्याचे दागिने, मोबाइल व रोख असा एकूण ३ लाख १६ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना ३१ मार्च रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी निजामपूर पोलिसांत ४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता आठ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, व्यापारी जावेद आबीद देशमुख (वय ४८, रा. रजा कॉलनी, मेहरूण जळगाव) यांनी निजामपूर पोलिसात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, पाईप विक्री करण्याच्या उद्देशाने संशयित आरोपींनी हट्टी खुर्द येथे बोलावून आरापाना येथे पोहोचल्यावर संशयितांनी त्या…
मेष आजचा दिवस आनंद घेऊन आला आहे. तुमची सकारात्मक विचारसरणी तुम्ही अर्थपूर्ण कामात वापरली तर तुमची सर्जनशील प्रतिभा सर्वांसमोर येईल. लोकांमध्ये तुमचा आदर वाढेल. आज घरातील एखादी गोष्ट दुरुस्त करावी लागेल. महिलांना घरातील कामातून दिलासा मिळेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. जीवनात सुरू असलेल्या समस्या संपतील. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. आज तुमचे सहकारी आणि नोकरीतील वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खूश होतील आणि तुमची प्रशंसा करतील. आज तुम्हाला तुमच्या कामानुसार फळ मिळेल. तुम्हाला जे मोठे ध्येय गाठायचे आहे त्याच्याशी संबंधित मार्ग तुम्हाला सापडेल. अंतिम परिणाम आपल्या कामावर अवलंबून असेल. कुटुंबातील वाद त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करा. वेळेचा योग्य वापर करून काम…
नाशिक : वृत्तसंस्था नाशिक जवळ एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास नाशिकच्या दिंडोरी तालुक्यत भरधाव वाहन झाडावर आदळून अपघाताची घटना घडली. दिंडोरी रोडवर ढकांबेगावाजवळ ही अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात ५ ते ६ जण ठार झाल्याची माहिती समजत आहे. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-दिंडोरी मार्गावरील ढकांबे गावालगत बोलेरो कार व दुचाकीचा अपघात झाला. या भीषण अपघातात तब्बल 5 जण ठार, तर 3 जण गंभीर जखमी झालेत. अपघातग्रस्त कारमधील नागरीक सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन गावाकडे परतत होते. पण रस्त्यातच त्यांच्यावर काळाचा घाला घातला. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा…
कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना अशाच एका घटनेने कोल्हापूर शहर हादरले आहे. साखरपुडा झाल्यानंतर मित्रासोबतच लिव्ह इनमध्ये राहण्याचा हट्ट धरणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणीचा आई, भाऊ व मामाने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याची भयंकर घटना कोल्हापुरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी या तिघांविरोधातही खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे कोल्हापूर व पंचक्रोशीत एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी लक्ष्मीकांत पवार (24) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती एका बँकेत नोकरीला होती. तिच्या लाघवी स्वभावामुळे तिचा मोठा मित्र परिवार होता. वैष्णवी कोल्हापूरमधीलच एका ढोल ताशा पथकाची सदस्याही होती. पण तिने मित्रासोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा हट्ट्…
जळगाव : प्रतिनिधी जळगावहून धरणगावकडे जाणाऱ्या धावत्या कारचा स्टिअरिंग रॉड अचानक तुटल्याने ती झाडाला धडकली. या अपघातात कार चालक ठार तर एक जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मुसळी गावाजवळ घडली. सविस्तर वृत्त असे कि, शरद पाटील (वय २५, रा.सारवे) असे मृत झालेल्या चालकाचे तर सुरेश अशोक अहिरे (वय ४०, रा. सारवे) हे जखमी झाले आहे. ते दोघे गुरुवारी दुपारी जळगावहून धरणगावकडे कार (क्रमांक एमएच- ०९, डीएक्स- ८९९१) ने जात होते. मुसळी गावाजवळ गाडीचा स्टिअरिंग रॉड अचानक तुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे कार झाडाला धडक देऊन रस्त्याचे बाजूला शेतात घुसली. अपघात झाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव…
मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे 7 खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला असून शिंदे गटाचे निम्मे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत, असे ते म्हणाले. वडेट्टीवार यांच्या या दाव्यामुळे महायुतीच्या विशेषतः शिंदेंच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे. महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे हे नाराज खासदार स्वगृही म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत परतण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. त्यात विजय वडेट्टीवार यांनी उपरोक्त दावा केल्यामुळे या चर्चेला चांगलीच हवा मिळाली आहे. शिंदेंच्या 7 खासदारांची काय गत झाली? उद्धव ठाकरे भेटत नसल्याची ओरड करणाऱ्यांना आता जागाही भेटत नाही. त्यांचे निम्मे…
धरणगाव : प्रतिनिधी तांब्याची तार चोरल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी गोरगावले (ता. चोपडा) येथील एकाला अटक केली असून, त्याच्यावर अमळनेर व चोपडा येथे गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. मिळालेल्या माहितीनुसार, तांब्याची तार चोरल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध सुरु असताना धरणगाव पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून संशयित आरोपी प्रशांत जगन वार्डे (२९) याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ४.५ किलो तांब्याची तार हस्तगत केली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्यावर चोपडा तसेच अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आरोपीचा शोध घेण्याकामी पोकॉ प्रवीण पाटील, चंदन पाटील…
यावल : प्रतिनिधी नंदुरबारहून भुसावळ येथे अवैध वाळू नेणारा ट्रॉला यावल तालुक्यातील किनगावजवळ यावलच्या महसूल पथकाने पकडला. ही कारवाई ४ रोजी मध्यरात्री करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १२:३० वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील अंकलेश्वर- बऱ्हाणपूर या राष्ट्रीय महामार्गावर साडेसहा ब्रास अवैध वाळू वाहकरताना हा ट्रॉला किनगावजवळ साकळी मंडळाधिकारी व तलाठी यांनी पकडून यावल तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केला आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म शाखा यांनी नंदुरबार येथून भुसावळ येथे वाळू वाहतुकीचा दिलेला चालकाजवळील परवाना पाहिला असता वाळू वाहतूक परवान्याची मुदत वेळ बुधवारी, ३ रोजी सायंकाळी ७:३० वाजेपर्यंत होती. परवान्यात नमूद वेळेव्यतिरिक्त अवैधपणे वाहतूक करताना ट्रॉला (एमएच १५ एमएम ६०६०) आढळल्याने हा…
जळगाव : प्रतिनिधी गुरे वाहतुक करण्याचा कुठलाही परवाना नसतांना एका वाहनात तब्बल १७ म्हशी कोंबून त्यांची निर्दयीपणे वाहतुक करणारे वाहन नशिराबाद पोलिसांनी टोल प्लाझा रोडवर पकडले. ही घटना दि. ३ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी हरफान हिरू खान रा. देवास, इसाक रुस्तम रा. सारबेडे बु. हबीज हुसना रा. देवास यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद टोल प्लाझाजवळील रोडवर दि. ३ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास (एमएच १८, बीजी ७२१२) क्रमांकाच्या आयशर वाहनात सुमारे १७ म्हशींची निर्दयीपणे वाहतुक करीत होते. दरम्यान, नशिराबाद पोलिसांच्या पथकाने हे वाहन अडवून तपासणी केल्यानंतर म्हशी वाहतुक करतांना वाहनात मॅटींग…

